Sunday, April 29, 2018

पराक्रमी राजाचा पराक्रमी पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना एका धर्माच्या चौकटीत अडकवू नका....!


शहाजीराजे - माता जिजाऊ संकल्पित आणि शिवराय स्थापित स्वराज्य म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली आणि अफजलखानाचा कोथळा काढला इतपर्यंत सिमित नव्हते.तर स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीला समाधान कसे मिळेल आणि तो समाधानी कसा होईल असा दुष्टीकोन ठेऊन स्थापित केलेले राज्य म्हणजे स्वराज्य होय.सप्तबंदी लादणारे मनुस्मृतीचे राज्य म्हणजे स्वराज्य होऊ शकत नाही म्हणून शिवरायांनी स्थापित केलेले स्वराज्य हे समतावादी होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.अशा समतावादी स्वराज्याचे रक्षक होते ते छत्रपती संभाजी महाराज हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे.संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वयाच्या १६ व्या वर्षी ग्रंथ लिहिला त्यांना कीर्ती मिळाली.परंतु वयाच्या १४ व्या वर्षी शंभूराजे यांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला त्यांना धर्मवीर बनवून कट्टर हिंदुत्ववादी म्हणून एका धर्माच्या चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरु झाल्याचे आपल्याला पाहिला मिळत आहे.ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली ते ज्ञानेश्वर यांना श्रेष्ठ मानतात परंतु ज्यांनी बुधभूषण – सातशतक – नायिकाभेद – नखशिकांत असे ग्रंथ लिहून मोठ्या प्रमाणात मानवीमुल्य जपणारे समाज उपयोगी साहित्य निर्माण केले.कवी,संस्कृत पंडित,साहित्यिक,समतेचे राज्य निर्माण करणाऱ्या अशा महान राजाच्या समाधीस्थळा पासून आपण अनभिज्ञ आहोत याची आम्हाला खंत वाटते.जगातील मोठा राजा असणारा औरंगाजेब आणि त्याचप्रमाणे एकाच वेळी पाच शत्रू विरोधात लढणारा पराक्रमी एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते हे आपण विसरलो आहे.अशा राजाला आमने सामनेच्या लढाईत कोणीही शत्रू हरवू शकत नाही याची कल्पना जेव्हा औरंगाजेबास आली तेव्हा शंभूराजे यांचे नातेमंडळीना फितूर करून विश्वासघाताने जेरबंद करून त्यांची हत्या करण्यात आली.हे आपण याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या मनात स्थान निर्माण करणारे राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.शंभूराजे यांचे कर्तुत्व एवढे महान असताना त्यांना बदनाम करण्याचे मोठ्या प्रमाणात राजकारण घडलेले आहे आणि घडत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.समतावादी असणारा महान राजा आज आपल्या समोर कट्टर हिंदुत्ववादी म्हणजे धर्मवीर बनून समोर आणला जात आहे आपण वेळीच सावधान झाले पाहिजे.यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची वाटचाल ही जागतिक कीर्तीची होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे.संपूर्ण समुद्री पश्चिम किनारा स्वराज्याच्या ताब्यात यावा यासाठी शंभूराजे इंग्रज गव्हर्नर केजविन याचे बरोबर करार करून मुंबई विकत घेण्याचा प्रयत्न सुरतच्या इंग्रजांमुळे फोल ठरला यावरून आपण लक्षात घेतले पाहिजे की,किती दूर दृष्टीचा राजे होते संभाजी महाराज म्हणून अशा राजाला एका धर्माच्या पलीकडे घेऊन जाणे हे आपले आद्य कर्त्यव आहे.म्हणून सकल मराठी समाज यांचे वतीने अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या सन्मानासाठी “शंभूराजे सन्मान अभियान” हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. 


राजेश खडके
सकल मराठी समाज
 

Saturday, April 21, 2018

असा आहे भगव्या विरुध्द निळा संघर्ष त्यामुळे भगवा पण आपला आहे आणि निळा पण आपलाच आहे....!


गौतम बौध्द (भगवा ध्वज) सम्राट अशोक (भगवा ध्वज) गौतम बौध्द पंढरपूर विठ्ठल वारकरी सांप्रदाय (भगवा ध्वज) स्वराज्य संकल्पना निर्माते नागवंशीय शहाजीराजे (भगवा ध्वज) समतावादी स्वराज्य संस्थापक नागवंशीय बौध्द अनुयायी शुद्र छत्रपती शिवाजी महाराज (भगवा ध्वज) समतावादी स्वराज्य रक्षक साहित्यिक संस्कृत पंडित रयतेला समतेचा स्वतंत्र्याचा न्यायाचा मार्ग दाखविणारे छत्रपती संभाजी महाराज (भगवा ध्वज) छत्रपती संभाजी महाराज यांचे अंत्यसंस्कार करणारे शाक्त धर्मीय गोविंद महार (भगवा ध्वज) १ जानेवारी १८१८ युध्द करणारे सातारा गादीचे सरदार शाक्त धर्मीय सिद्ध्नाक महार (भगवा ध्वज) २४ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक धर्म स्थापन करणारे महात्मा ज्योतिबा फुले (भगवा ध्वज) २४ सप्टेंबर १९२४ ला समता सैनिक दल स्थापन करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर (भगवा ध्वज) आणि स्वतंत्र भारताचा ध्वज भगवा असावा असा प्रस्ताव मांडणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर याच विचारावर प्रबोधनकार ठाकरे यांनी १९६७ ला शिवसेना स्थापन केली (भगवा ध्वज) आणि बाळासाहेब ठाकरे यांनी १९७८ हाच भगवा ध्वज घेऊन हिंदुत्ववाद उभा करून मराठवाडा विद्यापिठास डॉ बाबसाहेब आंबेडकर नामकरण करण्यास विरोध केला.त्यामुळे आपला असलेला भगवा ध्वज हा आपल्याला आपला वाटेनासा झाला आणि १९८० ला आरएसएस ने घेतला आणि हाच भगवा ध्वज भारतीय जनता पार्टी यांनी हिंदुत्ववाद म्हणून १९८२ स्वीकारला.हिंदुत्ववाद प्रगल्भ करण्यासाठी १९८९ ला अॅक्ट्रोसिटी अॅक्ट नुसार कायदा तयार झाला आणि महार हा शब्द जातीवाचक करण्यात आला.या कायद्याचा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा काही एक संबध नाही.आणि १९९४ ला मराठवाडा विद्यापीठास नामविस्तार केला.असा आहे भगव्या विरुध्द निळा संघर्ष त्यामुळे भगवा पण आपला आहे आणि निळा पण आपलाच आहे म्हणून मी म्हणतो “भगवा ध्वज विचार तर निळा ध्वज संघर्ष”

*"भगवा"* ही सुद्धा *बुद्धाचीच देन आहे.*
"""""""""""""""""""""""""""""""""""


*पाली वाङ्मयात बुद्धांना* पुनःपुन्हा वापरण्यात आलेला शब्द म्हणजे *'भगवा'*,
*भगवा* म्हणजे *'उत्तम गुणांनी संपन्न*. या शब्दाचे मुळ रूप *'भगवत्'* असे आहे. *'भगवा'* हे त्याचे प्रथमा विभक्तिमधील एकवचन होय.
संस्कृतमध्ये *'भगवान्'* असे रूप वापरले जात असले, तरी *पालीमध्ये 'भगवा'* हेच वापरल्रे जाते. *मुळ त्रिपिटकात भगवा हा शब्द ८७५८ वेळा आला आहे*.

*त्रिपिटक, अठ्ठकथा आणि टिका या सर्व ग्रंथांचा एकत्रित विचार केला तर, 'भगवा' हा शब्द १७९४२ वेळा आला आहे.*

एकीकडे *'भगवा'* हा शब्द *बुद्धांना* उद्देशून इतक्या वेळा वापरला गेला आहे आणि दूसरीकड़े तो शब्द एक रंगाचा द्योतक आहे. या दोन गोष्टींचा एकमेकींशी अत्यंत जवळचा संबंध आहे. विविध गुणांनी संपन्न या अर्थाने वापरला जाणारा भगवा हा शब्द *गोतम बुद्धांचा* द्योतक होता.

त्यांचे *चीवर म्हणजे भिक्खुंनी वापरावयाचे वस्त्र रंगीत होते*. बौद्ध भिक्खुंचे *चीवर* ज्या ज्या रंगामध्ये असते, भगवा हा एक महत्वाचा रंग आहे. *गौतम बुद्धांना* उद्देशून वापरला जाणारा *भगवा* हा शब्द काळाच्या ओघात लक्षणेने त्यांच्या *चीवराचा रंग दर्शविण्यासाठी वापरला जाऊ लागला* आणि मग *'भगवा'* हा शब्द एका रंगाचा द्योतक बनला.

.गोतम बुद्धांना* पचविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणूनच वैदिकांनी *भगवा हा शब्द* स्वीकारुन तो आपल्या संस्कृतीचा एक *मानबिंदु बनवला*
आणि
*गोतम बुद्धांवरील प्रेमामुळे भगव्या रंगाविषयी आदर असलेला बहुजन समाज नकळत वैदिक संस्कृतीशी जोडला गेला,* हळुहळु बुद्धांपासून तुटून वैदिकांच्या बंधनात अधिकाधिक अडकत गेला. (बुद्धाशिवाय पर्याय नाही)

*(डॉ. आ. ह. साळुंके)*

*।।इपितो सो भगवा अरहंत।।*


राजेश खडके
सकल मराठी समाज