Wednesday, June 20, 2018

होय मी नक्षलवादी आहे.....! स्वतंत्र भारताला संविधान देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!


मनोहर भिडे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे संभाजी हे नाव धारण करून झालेले संभाजी भिडे जर मनुस्मृतीची पुन्हा एकदा अमलबजावणी करा म्हणून जाहीर सांगत असतील तर हाच खरा देशद्रोह आहे.महात्मा ज्योतिबा फुले यांनी समतावादी छत्रपती शिवरायांचे दर्शन आम्हाला देऊन समतेचे स्वराज्य दाखविले अशा महात्मा ज्योतिबा फुले यांना जर हाच मनोहर भिडे देशद्रोही म्हणत असेल तर हा संभाजी भिडे स्वराज्यद्रोही आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे.असा देशद्रोही व स्वराज्यद्रोही जर पुन्हा एकदा भीमा कोरेगावचे निमित्त साधून स्वराज्याच्या अलुतेदार व बलुतेदार यांच्यावर हल्ला करीत असेल तर अशा व्यक्तीचे संभाजी नाव काढून त्याला देशद्रोही आणि स्वराज्यद्रोही ठरवून तुरुंगात डांबून टाकले पाहिजे.अशी असणारी खरी परिस्थिती असताना जर केवळ या देशाचे प्रधानमंत्री श्री मोदी यांचे संभाजी भिडे गुरु आहेत म्हणून त्यांना क्लीन चीट देणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री फडवणीस सुध्दा दोषी आहेत अशी असणारी परिस्थती आहे.अलुतेदार आणि बलुतेदार यांचे हे राज्य चालवीत नसून मनुवादी व्यवस्थेचे राज्य चालवीत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.छत्रपती संभाजी महाराज यांचा सत्य इतिहास रयतेसमोर येऊ नये आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केलेली मनुस्मृती पहाता हे राज्य साविधांनाचे आहे याची सल वारंवार या मनुवादी व्यवस्थेला होत आहे.हीच मनुवादी व्यवस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करून अलुतेदार व बलुतेदार यांच्या पासून तोडण्याचे हे एक मनुवादी षड्यंत्र आखीत आहे. म्हणून प्रकाश आंबेडकर नक्षलवादी आहेत असा प्रचार करण्याचा प्रयत्न जोरात सुरु झालेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.एखादी खोटी गोष्ट १०० वेळा बोलली की,ती खरी वाटायला लागते त्यामुळे ही खोटी गोष्ट पोलिसांच्या माध्यमातून जनते समोर पोहचविण्याचा डाव या मनुवादी षडयंत्राने आखला आहे.पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त श्री रविंद्र कदम यांचे माध्यमातून एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.आता प्रश्न असा आहे की,या रवींद्र कदम यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्री प्रकाश आंबेडकर हे नक्षलवादी आहेत असे सांगायला कोण लावले आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.यल्गार परिषद कोण भरविली..? त्याला निधी कोणी दिला...? हे सर्वांना माहित आहे.असे असताना जर एकटेच प्रकाश आंबेडकर जर टार्गेट होत असतील तर हे मनुवादी षड्यंत्र आखले गेले आहे असे आपल्याला मान्य करावेच लागेल.कारण या मनुवादी व्यवस्थेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला १०० वर्ष पूर्ण होऊ द्यायची नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.भारत देशाची राज्यघटना बदलणे हेच “एकमेव ध्येय” या मनुवादी व्यवस्थेचे असल्यामुळे आणि या राज्यघटनेचे संरक्षणार्थ एकमेव प्रकाश आंबेडकरच आहेत हे मनुवादी व्यवस्थेच्या लक्षात आलेले आहे.त्यामुळे “नक्षलवादी” म्हणून प्रकाश आंबेडकर यांना बदनाम केल्यास विरोध करणारा कोणीही व्यक्ती शिल्लक रहात नाही.पुढील काळात भारताचे संविधान बदलणे हाच एकमेव उपक्रम मनुवादी व्यावस्थेचा  असून प्रकाश आंबेडकर यांना “नक्षलवादी” म्हणणे ही एक नांदी आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.या मनुवादी व्यवस्थेचे काही रमणाधारी लोक आपल्या चळवळीमध्ये आहेत हे विसरून चालणार नाही.त्यामुळे जर स्वतंत्र भारताला संविधान देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
होय मी नक्षलवादी आहे.....!
१ छत्रपती शिवरायांचे स्वराज्य पुर्नस्थापित करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी
  असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
२ छत्रपती शिवरायांचे समतावादी स्वराज्य दाखविणारे महात्मा फुले यांना गुरु मानणारे डॉ बाबासाहेब
  आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
३ जातीवादी पेशवाईचा अंत करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला स्वराज्याचे सरदार
  सिद्धनाक महार यांची शौर्य गाथा भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ दाखविणारे डॉ बाबासाहेब
  आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
४ चवदार तळ्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यांना न्याय देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर
  नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
५ चातुवर्ण व्यवस्थेचे प्रतिक मनुस्मृती दहन करून मनूच्या विळख्यातून मानवाला मुक्त करणारे डॉ
  बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
६ छत्रपती राजश्री शाहू महाराज जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करीत असतील अशा डॉ
  बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
७ भारतीय रिजर्व्ह बँक ज्या व्यक्तीच्या आभ्यासावर स्थापन झाली अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे
  नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
८ संपूर्ण मागासलेल्या लोकांचे गोलमेज परिषदेत प्रतिनिधित्व करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे
  नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
९ स्वातंत्र भारताला अशोक स्तंभ देऊन भारताची प्राचीन ओळख दाखविणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर
  यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
१० स्वातंत्र भारताचा ध्वज स्वराज्याचा भगवा ध्वज असावा म्हणून आग्रही राहणारे डॉ बाबासाहेब
   आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
११ स्वातंत्र भारताच्या तिरंग्यामध्ये अशोक चक्र देऊन भारताची प्राचीन ओळख दाखविणारे डॉ
   बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
१२ स्वातंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकांना मुलभूत हक्क व अधिकार देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर
   यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
१३ स्वातंत्र भारताला शांततेचा मार्ग जगातला पहिला धर्म बौध्द धर्म दाखविणारे डॉ बाबासाहेब
   आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
असेच आहे आणि असेच असेल तर..........होय मी नक्षलवादी आहे...! होय मी नक्षलवादी आहे...!! होय मी नक्षलवादी आहे...!!!

राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी समाज

Sunday, June 17, 2018

( भाग – ४८ ) डॉ बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माफ करा....! मी करतोय एक दिवसांचे “आत्मक्लेश आंदोलन” कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली “समता” आम्ही जतन करू शकलो नाही....!


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सिंधू संस्कृती पासून भगवान गौतम दिलेल्या विचारापासून ते छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्य पर्यंत आहे हे आपण समजूनच घेतलेले नाही.आपण जर बौध्द धम्माची घेतलेली दीक्षा जर बघितली आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या २२ प्रतिज्ञा जर वाचल्या आणि त्याचे जर आकलन केले तर स्पष्टपणे दिसून येते की “सभ्यता” म्हणजे काय याचे दर्शन होते.कारण सभ्य आचरण असलेल्या व्यक्तीचे कोणीही नुकसान करू शकत नाही हे त्यांनी सांगितले आहे.मात्र अशा सभ्य व्यक्तीला संपविण्यासाठी आपत्यांचीच गरज पडते हे लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे गौतम बुध्द असतील,छत्रपती शिवराय असतील किंवा शंभूराजे असतील, डॉ बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे संरक्षण कवच म्हणजे त्यांची “सभ्यता” होती हे आपण लक्षात घीतले पाहिजे.मनुवादी व्यावस्था म्हणजेच आर्य व्यावस्था होय हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे.हे जेव्हा आर्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आपली “सभ्यता” चोरून घेतली आहे हे आपण लक्षात घ्यायला विसरलो आहे.मनुवादी व्यवस्थेला जर संपवायचे असेल तर आपण “सभ्यता” स्विकारली पाहिजे हे लक्षात घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “सभ्यता” धारण करून मनुवादी व्यवस्थेला संपविण्याचे कार्य केले आहे.अशा सभ्यतेचे कवच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्माची दीक्षा देऊन दिली आहे आणि ती म्हणजे २२ प्रतिज्ञा होय.सर्वात प्रथम आपण हिंदू आणि हिंदू धर्म समजून घेतला पाहिजे असे मला वाटते.हिंदू आणि हिंदू धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत यात कोणाला काय दुमत असायचे काही कारण नाही.हिंदू ही संस्कृती आहे तर हिंदू धर्म ही मनुवादी व्यवस्था आहे आणि ही मनुवादी व्यवस्थेचे देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती आहेत.ही हिंदू धर्माची निर्मिती आहे म्हणजे मनुवादी व्यवस्थेची निर्मिती आहे हे आपण समजून घेतले पाहीजे.म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती नाकरून मनुवादी व्यवस्थाच नाकारलेली आहे.परंतु कोणतेही कुळदैवत नाकारण्यास सांगितलेले आहेत असे मला वाटत नाही.त्यामुळे भारतीय निवासी हा संपूर्णपणे एकच आहेच असे त्यांना सांगायचे आहे.म्हणूनच “समता” प्रस्थापित करणे हे त्यांचे एकमेव ध्येय होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.भारत हा प्राचीन काळापासून बौध्द धर्मीय होता यासाठीच स्वातंत्र भारताने “अशोक चक्र” आणि “अशोक स्तंभ” स्विकारलेला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून “समता” प्रस्थापित केलेली आहे.एवढे हल्ले होऊनही त्यांनी कोणताही प्रतिहल्ला केल्याचे किंवा करावयास लावल्याचे दिसून येत नाही.मात्र त्यांचे महापरिनिर्वाण झाले आणि इथला व्यक्ती मनमानेल तसा वागू लागला.आपल्यावर झालेल्या हल्ल्याचे तो प्रती उत्तर देऊ लागला तो प्रतीहल्ला करू लागला त्याचा परिणाम असा झाला की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जोडलेला अलुतेदार आणि बलुतेदार आपल्यापासून जवळ जवळ तुटल्यासारखा आणि आपल्या पासून दूर गेल्याचे वातावरण निर्माण झाले.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांना चौकट निर्माण होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य महारांची मालमत्ता होऊन बसली.असे समीकरण झाले की बौध्द म्हणजे अस्पृश्य महार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच लोकांसाठी कार्य केले असा समज होऊन बसला त्यामुळे आज त्यांनी दिलेले संविधान बदलण्याची भाषा होऊ लागली आणि तसे वातावरण निर्माण झालेले आहे.त्यामुळे माझे स्पष्ट असे म्हणणे आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली “समता” आम्हीच विस्थापित करण्याचे कार्य केले आहे.जो पर्यंत पुन्हा एकदा समता प्रस्थापित करण्याचे कार्य सुरु होणार नाही तो पर्यंत आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विश्वासघात केला आहे असे मी म्हणेन....! त्यामुळे एकंदरीत जो आभ्यास माझ्या समोर आलेला आहे त्याचे अवलोकन केले असता आपण सर्वच “समता” विस्थापित करण्यास कारणीभूत आहोत त्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे.माझ्याकडे आत्मक्लेश करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही.यासाठी मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी लागणार आहे.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली “समता” आम्ही जतन करू शकलो नाही म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने करतोय एक दिवसांचे “आत्मक्लेश आंदोलन” डॉ बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माफ करा....! 

राजेश खडके 
समन्वयक 
सकल मराठी समाज 
मो.नं.९८८१७९५३०७