Thursday, January 31, 2019

मला राजगृहावर नेत्यांची गर्दी पहायची आहे...आणि तुम्हाला पण ना...! राजेश खडके सकल मराठी समाज

राजगृह हा चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आत्मा आहे म्हणजेच काळीज आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.कारण येथे प्रत्येक भीम अनुयायी यांच्या भावना जुडलेल्या आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जेव्हा दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते तेव्हा त्यांचे पार्थिव देह मुंबई येथील याच राजगृहावर आणले होते.याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील गावाच्या कान्याकोपऱ्यातून आपल्या घरची भांडीकुंडी विकून समाज बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लाखोच्या समुदायात आला होता.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इथूनच भारतातील प्रत्येक अनुयायी यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला होता.१९२२ साली कोल्हापूर गादीचे आरक्षणाचे जननायक छत्रपती शाहू महाराज भेटायला आले होते.याच मुंबईतून बाबासाहेबांनी संपूर्ण जगात विद्वान म्हणून नाव लौकिक मिळविला होता.त्यामुळे या राजगृहाला देशातील प्रत्येक नेत्याने भेट द्यावी असे इथल्या भीम अनुयायी यांना वाटत आहे.परंतु इथली जातीय व्यवस्था इतकी भयंकर आहे की,माणूस म्हणून इथल्या प्रत्येक मानवाला जगायला शिकविणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेकडे जातीय नजरेने पहात आहे.परंतु भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभास मानवंदना देण्यास आलेल्या अलुतेदार यांचेवर हल्ला केला आणि त्या हल्ल्याला ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले.त्यामुळे इथला अलुतेदार आणि बलुतेदार त्यांच्याकडे वळला आहे आणि आता त्याच्या लक्षात आले की,इथल्या जातीयवादी कॉंग्रेसने वंचितांना नेहमी गृहीत न धरता राजकारण केले आहे.त्यामुळे आम्ही आहोत हे त्यानी कॉंग्रेसला दाखविण्यासाठी जे पाऊल उचलले ते स्वागतार्य होते म्हणून कॉंग्रेसला अखेर राजगृहावर यावे लागले.परंतु इथल्या भीम अनुयायी यांचे असे म्हणणे आहे की,नेहमी ज्यांनी मानवतावादी धर्माच्या विरोधात कार्य केले जातीयवादाचा विष नेहमी पेरण्याचे काम केले.जातीय दंगली\ना नेहमी बढावा दिला अशा मातोश्रीवर नेत्यांची नेहमी वर्दळ राहिली आहे.परंतु ज्यांनी जगाला मानवतेचा संदेश दिला.भारत देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार दिला अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर वर्दळ का नाही.परंतु सध्याचे राजकारण पहाता इथल्या भीम अनुयायी यांची मागणी आहे की,राजगुहावर नेत्यांची वर्दळ झाली पाहीजे आणि माझीही इच्छा आहे की,राजगृहावर मला नेत्यांची गर्दी पहायची आहे.

Wednesday, January 30, 2019

कॉंग्रेसचा ६ जागांचा प्रस्ताव धोकेबाजीच…..आता वंचित बहुजन आघाडीने गाफील राहू नये…! वंचितांचा विश्वास आता प्रकाश आंबेडकरच….! सकल मराठी समाज राजेश खडके

कोणत्या पक्षांनी कोणत्या पक्षा बरोबर युती करावी किंवाआघाडी करावी हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे.परंतु कॉंग्रेस ह्या पक्षाने नेहमीच वंचितांना अविकसित ठेवले आहे याची जाण आता इथल्या दलित-मुस्लीम-ओबीसीना झालेली आहे.त्यामुळे तो आता कॉंग्रेस पासून दूर गेल्याचे चित्र आपल्याला या उभ्या महाराष्ट्रात पाहयला मिळत आहे.आणि याच वंचित समाजाने आता प्रकाश आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवला असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे कॉंग्रेस घाबरलेली आहे.त्यामुळे काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सादर प्रस्तावा संदर्भात ३० जानेवारी रोजी पर्यंत कॉंग्रेस पक्षाला अल्टीमेटम दिल्यानंतर लगेचच वरिष्ठांची परवानगी घेऊन महाराष्ट्र कॉंग्रेस राजगृहाकडे जाऊन त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन ६ जागांचा प्रस्ताव सादर करून महाआघाडीत येण्याविषयी विनंती केली होती.परंतु प्रकाश आंबेडकर यांना कॉंग्रेसचा २०१४ चा चांगला अनुभव नसल्यामुळे त्यानी लागलीच कॉंग्रेसला ठोकून सांगितले की,आमच्या वंचित बहुजन आघाडीचा १२ जागांचा प्रस्ताव होता आणि त्यात सोलापूरच्या जागेचा विषय होता.आता आम्ही आघाडीत येणार नसून तुम्हाला वंचित बहुजन आघाडीत यावे लागेल आणि १२ जागा कोणत्या आहेत त्या मी ठरविणार आहे.त्यामुळे कॉंग्रेस जो ६ जागांचा प्रस्ताव सादर केला तो प्रस्ताव म्हणजे ६ जागा देऊन कॉंग्रेस त्या जागा पाडण्याच्या मनसुभ्यात आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कॉंग्रेसचा जर त्या ६ जागांचा प्रस्ताव आपण मान्य केला तर निश्चितच तो आपल्याला धोका देणार आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने गाफील राहून चालणार नाही.आता कॉंग्रेस नको आहे असा जनतेचा आवाज आहे.त्यामुळे कॉंग्रेस कितीही म्हणाली की,आघाडी बरोबर आमची बोलणी सुरु आहेत त्यावर विश्वास न ठेवता ठरलेल्या उभ्या महाराष्ट्रात २५ जागा लोकसभेच्या लढवाव्यात आणि त्या कशा जिंकून येतील त्याकडे लक्ष द्यावे असे जाणकार यांचे मत आहे.त्यामुळे कॉंग्रेसचा ६ जागांचा प्रस्ताव धोकेबाजीच असून आता वंचित बहुजन आघाडीने गाफील राहू नये असे आमच्या सकल मराठी सामाजाला वाटत आहे त्यमुळे वंचितांचा विश्वास आता प्रकाश आंबेडकरच आहेत असे जाणकारांचे म्हणणे आहे.

आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाकडे पाहून वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठींबा द्यावा…! रिपब्लिकन चळवळीला चांगले दिवस येत आहेत….! सकल मराठी समाज राजेश खडके.

शिव-फुले-शाहू-आंबेडकर जनतेचा मूड सध्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाकडे पाहून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री पदावर पहाण्याचा आहे.त्यामुळे त्यांना आता रोखणे कठीण झालेले आहे.त्याचे कारण असे आहे की,गेल्या ७० वर्षामध्ये अशी संधी रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकार्त्यच्या हातामध्ये आली नव्हती ती २०१९ च्या माध्यमातून आलेली आहे त्य्यामुळे तो ही संधी सोडेल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत नाही.एकंदरीत मायवती यांचे उत्तर प्रदेश मधील राजकारण पहाता त्यांनी प्रधानमंत्री कसे होता येईल याचीच रणनीती आखलेली आहे.त्यामुळे त्यानी अखिलेश यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचे वचन दिलेले आहे.त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून मायावती यांना वंचित बहुजन आघाडीची गरज म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची गरज दिल्लीमध्ये लागणार आहे.त्यांमुळे मायावतींचा कल हा महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील हे पाहण्याचा आहे.त्यामुळे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री व्हावेत असेच आश्वासन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेले आहे..त्यामुळेच त्यानी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठींबा दिल्याचे चित्र महाराष्ट्रातील जनतेसमोर स्पष्टपणे दिसत आहे.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन जनतेसाठी मोठा त्याग केला आहे यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही..परंतु त्या त्यागापोठी त्यांनी सत्तेची फळे चाखली असल्याचे सर्वांनाच माहित आहे.आता रिपब्लिकन जनतेने आठवले यांना असे आवाहन केले आहे की,२०१९ हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीचे साल आहे आणि याची जाण इथल्या आंबेडकर अनुयायी यांना झालेली आहे.त्यामुळे जसा मायावती यांनी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठींबा दिलेला आहे तसा पाठींबा रामदास आठवले यांनी द्यावा.त्यामुळे एकही रिपब्लिकन पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात जाईल असे वाटत नाही.जर तसा कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी जनता त्याला माफ करेल असे वाटत नाही.त्यामुळे रामदास आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाकडे पाहून वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठींबा द्यावा असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.;

Tuesday, January 29, 2019

आठवले आणि कवाडे सोडून वंचित बहुजन आघाडीस मायावती आणि मेश्राम यांचा बिनशर्त पाठींबा….? आंबेडकरी चळवळीला येणार चांगले दिवस….! सकल मराठी समाज राजेश खडके


आंबेडकरी चळवळीच्या पक्षांचे एकंदरीत राजकारण पहाता २०१९ ची केंद्रीय निवडणूक अतिशय भयंकर आणि रिपब्लिकन पक्षासाठीची चांगले दिवस आणणारी निवडणूक आहे असे सकल मराठी समाजाचे स्पष्ट म्हणणे आहे.त्याचे कारण असे आहे की,मायावती यांनी कोणत्याही परिस्थितीत दिल्ली गाठण्याचा मनसुभा केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळे विरोधी असणारा अखिलेश यांच्या पक्षाशी हातमिळवणी करून त्यांच्या बरोबर युती करून कॉंग्रेसला बाजूला सारून निवडणुकीची समीकरणे आखली आहेत.अखिलेश याने उत्तर प्रदेश सांभाळायचा तर मायावती यांनी दिल्ली सांभाळायची आहे अशी समीकरणे या दोघांनी जमवली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर याना बिनशर्त पाठींबा देण्याची तयारी बहन मायावती यांनी केली असल्याची माहिती सकल मराठी समाजाला समजली आहे.वामन मेश्राम हे आंबेडकरी चळवळीचे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांच्याही लक्षात असे आले आहे की,इथली रिपब्लिकन जनता यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभी आहे आणि केंद्रीय राजकारण आपण करू शकत नाही.त्यामुळे मेश्राम ह्यांनीही प्रकाश आंबेडकर यांना पाठींबा दिला असल्याचे लक्षात येत आहे.त्यामुळे घडत असलेली राजकीय समीकरणे कोणीही नाकारू शकत नाहीत.कावडे सर हे कॉंग्रेसचे चांगले मित्र आहेत त्यांना यावेळी रिपब्लिकन जनतेचा मूड लक्षात का येत नाही…? असा आमचा प्रश्न आहे.कवाडे सर जर स्वत:ला खरेच आंबेडकरवादी म्हणत असतील तर त्यांनी बिनशर्त वंचित बहुजन आघाडीला पाठींबा दिला पाहिजे.यातच रामदास आठवले म्हणतात की,प्रकाश आबेडकर यांच्या बद्दल मला आदर आहे त्यांच्या बोलण्याचे मी काहीच वाईट मानत नाही….जर असे असेल तर आठवले यांनी नरेंद्र मोदी यांची स्तुतिसुमने गाण्याचे बंद करून प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.आपण आता सत्ता भरपूर प्रमाणात भोगल्या आहेत जो त्याग केला होता त्याची फळे भरपूर प्रामाणात चाखली आहेत.आता एक आंबेडकरवादी म्हणून आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना बिनशर्त पाठींबा दिला पाहिजे.त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पहाता आठवले आणि कवाडे सोडून वंचित बहुजन आघाडीस मायावती आणि मेश्राम यांचा बिनशर्त पाठींबा….? आंबेडकरी चळवळीला येणार चांगले दिवस….! असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

अखेर पाऊले निघाली राजगृहाकडे….स्वाभिमानाने भीमसैनिकांची छाती फुगली…! एमआयएमची साथ सोडणार नाही...अखेर आंबेडकर यांनी कॉंग्रसला ठणकावले…! सकल मराठी समाज राजेश खडके


चलो राजगृह…! चलो राजगृह…!! हा कार्यक्रम यशस्वी झाला असे म्हणायला कांही हरकत नाही.मिडीयाच्या माध्यामतून नेहमी ऐकायला यायचे की,मुंबईमध्ये मातोश्रीवर हा अमुक आला तो तमुक आला….अशा प्रकारे आपल्या राजगृहावर अमुक आला तमुक आला अशा काही गोष्टी कानावर आल्या नाहीत.परंतु ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून वंचिता मधला एक एक घटक अहोरात्र कष्ट करून जोडण्याचे काम केले. अशा घटकांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडी उभी करून ज्या प्रकारे सभा घेण्याचे सत्र पुढे मागे न बघता सुरु ठेऊन स्पष्टपणे ३० जानेवारी पर्यंत कॉंग्रेस पक्षाला अल्टीमेट्म दिले त्याचे फलित म्हणून आज २९ जानेवारी रोजी महाराष्ट्र कॉंग्रेसला राजगृहावर यावे लागले.हे फलित इथल्या स्वाभिमानी जनतेचे आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे. कॉंग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण सोबत ओबीसी नेते छगन भुजबळ यांना बरोबर घेऊन लेखी प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांचेकडे सादर केला आहे.आपल्याला माहित असेल की,या अगोदरच छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील उमेदवारीला आबेडकर यांनी पाठींबा जाहीर केलेला आहे.त्यामुळे कॉंग्रेस किती भयभीत झाले याचे चित्रण स्पष्टपणे जाणवत आहे.यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे कॉंग्रेसला ठणकावून सांगितलेले आहे की,वंचित बहुजन आघाडीचा १२ जागांचाच प्रस्ताव आहे….आणि त्या १२ जागेमध्ये सोलापूरची जागा हवीच आहे...आणि एमआयएमची साथ आम्ही सोडणार नाही.त्यामुळे कॉंग्रेसने अल्टीमेटमला घाबरून आघाडीची बोलणी यापुढेही चालूच राहणार आहे असे मिडीयाला सांगितले आहे.या सर्व गोष्टीवर भीमसैनिक लक्ष ठेऊन होता त्याला सगळ्यात जास्त आनंद झाला...आणि तो मनातल्या मनात पुटपुटला...अखेर पाऊले निघाली राजगृहाकडे…! त्यामुळे स्वाभिमानाने भीमसैनिकांची छाती नक्कीच फुगली असेल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

Monday, January 28, 2019

Tv9 ला दिली ५०० कोटीची नोटीस….म्हणून Tv9 करते वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात प्रचार आणि दंगल भडकाविण्याचे काम….? राजेश खडके सकल मराठी समाज


एकंदरीत पहाता लोकशाही मजबूत राहवी म्हणून चौथा खांब म्हणून पत्रकारिता करणाऱ्या मिडीयावर प्रामणिक जबाबदारी आहे.परंतु जसे इलेक्ट्रोनिक मिडीयाचा बाजार सुरु झाला तसे या क्षेत्रात व्यवसायाने मोठ्या प्रामाणात तोंड घातले आहे.पत्रकारिता हा क्रांतीचा खूप मोठा पर्याय आहे याची जाणीव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला करून दिलेली आहे.त्यामुळे आपल्या स्वत:चे पत्रकारिता माध्यम उभे करा असे त्यांनी स्वत: प्रात्यक्षिक करून दाखविलेले आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुध्द भारत पुन्हा सुरु करून त्याचा लाईव्ह बेब चायनल सुरु करून त्यांची स्पष्ट भूमिका जनतेपर्यंत पोहचवत आहेत.त्यामुळे Tv9 हे मिडीया माध्यम लोकांच्या समोर उघडे पडत चालले आहे.आता प्रश्न असा पडलेला आहे की,Tv9 असे वागत आहे...तर त्याचे कारण असे आहे की,या भाजप सरकारने या Tv9 ला ५०० कोटी दंड करून तो भरण्यास सांगितलेला आहे.त्यामुळे एक मध्यम मार्ग म्हणून वंचित बहुजन आघाडीचा प्रचार रोखण्याचे काम Tv9 ला मिळाले आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या विरोधातील जास्तीत जास्त खोट्या बातम्या प्रसारित करण्याचे कार्य या Tv9 ने सुरू केले असल्याचे आता स्पष्टपणे जाणवत आहे.यातच देशात दंगल घडवून पुन्हा एकदा भाजपा सरकारला सत्तेत यायचे आहे.त्यामुळे भाजपा या Tv9 चा उपयोग करीत आहे….? असा आमच्या सकल मराठी समाजाचा प्रश्न आहे त्यामुळे भिवंडी शहर हे संवेदनशील असून समाज शांतता बिघडवून कायदा सुव्यावस्था बिघडविण्याचे काम हे Tv9 चायनल करीत असल्याचे दिसून येते.त्यामुळे वेळीच Tv9 च्या खोट्या प्रसारित होणाऱ्या बातम्या संदर्भात आवाज उचलणे गरजेचे आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

Sunday, January 27, 2019

कॉंग्रेस बरोबर आघाडीची बोलणी समाप्त…..? प्रकाश आंबेडकर आणि ओवीसी यांची वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या २५ जागा लढणार…? राजेश खडके सकल मराठी समाज


आंबेडकर आणि ओवीसी जोडीने महाराष्ट्रातील सगळ्याच पक्षाला हादरा देण्यास सुरुवात केली आहे...आणि त्यांना हादरे बसत असल्याचे चित्र आता सर्वत्र स्पष्टपणे दिसत आहे.यामुळे कॉंग्रेस आणि भाजपा दलालांची भामेरी उडालेली आहे असे आता सर्वांनाच जाणवत आहे.एकंदरीत आंबेडकर-ओवीसी जोडीने संपूर्ण महाराष्ट्रात जो सभांचा धडाका लावलेला आहे आणि त्या सभेतील दोघा नेत्यांचे भाषण ऐकले असता असे दिसून येते की,जवळ जवळ वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे.ओवीसी यांच्या नांदेड येथील भाषणा नंतर कॉंग्रेसने राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर करून आम्हाला वंचित बहुजन आघाडीची गरज नसून फक्त प्रकाश आंबेडकर यांचीच गरज असल्याचे दाखवून दिले आहे.परंतु प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला ठोकून सांगितले आहे की,इथला दलित-मुस्लीम-ओबीसी यांच्या हिताचे राजकारण मी करीत असून त्यांच्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे.मी माझ्या खासदारकीसाठी त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही.त्यामुळे कॉंग्रेसचा खेळ हा बदमाश लोकांचा खेळ आहे.कॉंग्रेसकडे लोकसभेसाठीचे उमेदवार दिसून येत नाही असे असताना कॉंग्रेस ज्या ठिकाणी पडलेली आहे आणि भविष्यात पुढे पडणार आहेत त्याच जांगाची मागणी वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसकडे केली होती.त्यांनी असे सांगितले की,एमआयएम पक्षाला बाजूला ठेवा तेव्हाच आघाडीची बोलणी पुढे होऊ शकते.त्यामुळे ओवीसी दोन पावले मागे येत त्यांनी कॉंग्रेसला असे सांगितले की,तुम्ही प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान करा मी महाराष्ट्रात एकही उमेदवार उभा करीत नाही.मात्र कॉंग्रेस एक निचपत पडलेला अजगर असल्यामुळे त्त्याने ओवीसी आणि आंबेडकर यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच या जोडीने कॉंग्रेसला ३० जानेवारी पर्यंतचे अल्टीमेटम देऊन त्यांचा प्रस्ताव निकाली काढला असून महाराष्ट्रात २५ जागी लोकसभेचे उमेदवार देण्याची तयारी जोरदार सुरु केली असून त्याची घोषणा प्रकाश आंबेडकर ३१ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.आणि या २५ जागेतून कमीत कमी १७ उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे निवडून येतील असे पोलीस गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे आणि हेच म्हणणे खरे ठरणार असून येणारे सरकार हे वंचित घटकांसाठीचे असेल असे आमच्या सकल मराठी समाजाचे ठाम मत आहे.

Saturday, January 26, 2019

वंचित बहुजन आघाडीला १२ जागा न दिल्यास कॉंग्रेसचा होणार धुव्वा….! आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदार संघातून होणार विजयी…! राजेश खडके सकल मराठी समाज


  महाराष्ट्रातील कॉंग्रेसची वाढलेली घमेंड उतरविण्याची जबाबदारी ही आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे हे आपण सर्वानी लक्षात घेतले पाहिजे.त्याचे कारण असे की,जातीयवादी चेहरा म्हणून कॉंग्रेस आता आपल्या समोर आलेली आहे.इथला दलित-मुस्लीम-ओबीसी समाज संपविण्याचा घाट या उभ्या महाराष्ट्रामध्ये घातला गेलेला आहे.भाजप आणि कॉंग्रेस या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामध्ये कॉंग्रेस म्हणजे छापा तर भाजपा हे काटा आहे या दोघांनी प्रादेशिक पक्ष संपविण्यासाठी आणि संविधान बदलाण्यासाठीचे कार्य सुरु केले आहे.तसे नसते तर वंचित बहुजन आघाडीचा घटक एमआयएम मधून वगळल्याशिवाय आम्ही आघाडीची बोलणी करणार नाही अशी अट कॉंग्रेसने प्रकाश आंबेडकर यांचे समोर ठेवली होती परंतु ही अट साफपणे आंबेडकर यांनी नाकरली.परंतु नांदेडच्या सभेत ओवीसी यांनी सांगितले की,कॉंग्रेसने प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान ठेवल्यास आमचा पक्ष महाराष्ट्रात लोकसभेचा एकही उमेदवार उभा करणार नाहीत.परंतु कॉंग्रेस प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान करताना दिसत नाही.ओबीसी नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान केला आहे.इतर घटक पक्ष आंबेडकर यांचा सन्मान करीत आहे….परंतु कॉंग्रेस सन्मान करताना दिसत नाहीत.ज्या नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची लाखोची सभा झाली त्याठीकाणी वंचित बहुजन आघाडीला आव्हान म्हणून नांदेड लोकसभेमधून राहुल गांधी निवडणूक लढविणार असे आव्हान देण्यात आले त्यामुळे कॉंग्रेसला घमेंडी आलेली आहे ती आपण सर्वानी पुढे येऊन उतरविली पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.कॉंग्रेस हे विसरलेली आहे की,हा महाराष्ट्र गांधींचा नसून माता जिजाऊ,छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे.त्यामुळे या महाराष्ट्रात कितीही गांधी आले तरी ते टिकणार नाही.आणि वंचितांचे नेतृत्व याच महापुरुषांनी केले आहे त्यामुळे या उभ्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचाच विजय होणार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.आजचे राजकीय समीकरण सांगते की,उद्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर असतील यात काही कोणाचे दुमत असयाचे कारण नाही.यातच लक्ष्मण माने यांनी सांगितले आहे की,विधानसभेसाठीच्या २८८ पैकी २५ जागा या धनगर समाजासाठी आणि १०० जागा ह्या भटक्या विमुक्त जातीसाठी वंचित बहुजन आघाडीत आरक्षित राहतील.आणि त्याची जर खरी मोठ बांधायची असेल तर प्रकाश आंबेडकर यांनी दोन मतदार संघातून निवडणूक लढविली पाहिजे.एक अकोला मतदार संघातून तर दोन सोलापूर मतदार संघातून त्यामुळे राजकीय समीकरणे मोठ्या प्रामाणात वाढतील असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे...आणि त्यामुळे वंचितांची विधानसभेत जाण्यासाठीची दरवाजे मोठ्या प्रमाणात उघडतील असेही आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

Friday, January 25, 2019

आज प्रजासाताक दिवस....आठवण होते मला शिवरायांचे संविधान दिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांची...! राजेश खडके सकल मराठी समाज


             २६ जानेवारी आली की,मला माझ्या हक्काची आणि शिवरायांच्या स्वराज्याचे आठवण होते….आणि ही आठवण होते ती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून लिहिलेल्या संविधानामुळे आणि याच संविधानामुळे मी स्वतंत्र असल्याची मला जाण होते.मला हे माहित नाही की,डॉ बाबासाहेब आंबेडकर कोण कसे बघते...आणि शिवराय यांना कोण कसे बघते.पण मी एक याठिकाणी नक्की सांगेन हे संविधान स्वतंत्र भारताला प्रदान होत होते तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संसेदेत केलेल्या भाषणात म्हणाले होते की,छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य मला समजले म्हणून मी संविधान लिहू शकलो आहे.बाबासाहेबांचे हे म्हणणे सत्य आहे..त्याचे कारण असे आहे की,स्वतंत्र भारताचे संविधान लिहिण्याची धमक बाबासाहेब सोडले तर कोणातही नव्हती कारण स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकासाठी संविधान लिहायचे होते..कोण काय लिहिणार…? असा प्रश्न होता मी म्हणत नाही या देशात दुसरे कोणी तज्ञ नव्हते म्हणून….होते परंतु त्यांचेवर वैदिक धर्म पंडितांचा पगडा होता.हजारो वर्षापासून त्यांनी मनूचा कायदा वापरला होता….परंतु छत्रपती शिवरायांनी हा मनूचा कायदा मोडीत काढून स्वराज्याच्या रयतेसाठी संविधान बनविले होते...त्यामुळे वैदिक धर्म पंडित वेडे झाले होते..रागविले होते….आणि यातच छत्रपती शंभूराजे यांनी याच संविधानाचे संरक्षण करण्यासाठी वैदिक धर्म पंडितांना हत्तीच्या पायी देऊन मृत्यू दंडाची शिक्षा दिलेली आहे.नंतरच्या काळात याच वैदिक धर्म पंडित यांनी दुश्मना बरोबर संधान बांधून हे साविधानिकी स्वराज्य बुडविले असल्याचे आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेले आहे.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिवाय आपल्याला म्हणजे भारतातील नागरिकांना स्वतंत्र मिळणे कठीण होते...त्यामुळे या फुलेंचे आपण उपकार आपण कधीही विसरू शकत नाही...आणि फेडू शकत नाही.बरेच लोक आपल्याला छत्रपती शिवराय यांच्या ३२ मन सोन्याच्या सिहासानाची आठवण करून देतात...मात्र हेच स्वराज्यासाठी तयार केलेल्या संविधानाची आठवण करून देत नाही.त्याची प्रत आज कोठे आहे हे कोणी सांगत नाही.मात्र त्यांच्या संविधानाची प्रत कोल्हापुरचे छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दिली होती आणि त्याची साक्ष आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्नेह संबधातून मिळते...दुसरी साक्ष २४ सप्टेंबर १९२४ मध्ये स्थापन केलेल्या समता सैनिक दल..तिसरी साक्ष भीमा कोरेगाचा येथील विजयस्तंभ देतो...आणि चौथी साक्ष रायगडाच्या परिसरात जाळलेली मनुस्मृती देत आहे.अशा बऱ्याच प्रत्यक्ष घडलेल्या घटना आणि बाब आहेत.परंतु हे आपण कशी कोणाला ठासून सांगत नाही ही आपली शोकांतिका आहे...भीती आहे.त्यामुळे वैदिक धर्म पंडितांच्या वारसांनी याच संविधानाच्या विरोधात एक मोठा वर्ग तयार केलेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे...आणि तो वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे.त्यामुळे आपल्या सर्वावर मोठी जाबाबदारी आहे की,डॉ बाबासाहेब आंबेडकर दिलेले हे आपल्या हक्काचे संविधान याचे संरक्षण करायचे आहे...म्हणून आज प्रजासाताक दिवस आहे....त्यामुळे आठवण मला शिवरायांचे संविधान दिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची होत आहे.

Thursday, January 24, 2019

प्रकाश आंबेडकर यांचा अखेर….कॉंग्रेसला दणका १२ जागा द्या अन्यथा स्वबळावर लढल्यास १७ जागेवर विजयी होऊ…! राजेश खडके सकल मराठी समाज


सध्याचे महाराष्ट्रातील वातवरण पहाता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी मास्टर स्ट्रोक दिल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.त्याचे कारण असे की,गेल्या वर्ष भरापासून प्रकाश आंबेडकर अहोरात्र कष्ट करून या महाराष्ट्रातील एक एक वंचित घटक जोडताना दिसत आहेत.एकंदरीत पहाता मराठा मूक मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी शिवारायंचा मराठा जोडला आहे आणि याचे फलित लवकरच आपल्याला पाहयला मिळणार आहे.भीमा कोरेगावच्या माध्यामतून त्यांनी अलुतेदार आणि बलुतेदार आपल्याकडे वळविल्याचे चित्र २०१९ च्या भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ येथे पहायला मिळाले आहे.छगन भुजबळांच्या बाबतीत घेतलेली भूमिका पहाता माळी समाज जुडलेला दिसत आहे.ओवीसी यांच्या माध्यमातून इथला मुस्लीम समाज जुडलेला दिसत आहे.धनगर ,आदिवासी इत्यादी समाज जुडलेला दिसत आहे.त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी संसदीय राजकारणाला लागणारी राजकीय समीकरणे जोडली आहेत.त्यामुळे मतांची टक्केवारी पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीची वाढलेली दिसत आहे आणि त्यातच शिवसेनेची होणारी राजकीय पिचेहाट पहाता तसेच भाजपची संपूर्ण खेळी हि जनते समोर उघडी पडलेली आहे.तसेच नुसते संविधान आम्ही वाचविणार आहोत असे म्हणून संविधानच संपविण्यास निघालेली कॉंग्रेस आता लोकासमोर आलेली आहे.रिपब्लिकन घटक पक्षाच्या नेत्यांची लाचारी आता जनतेसमोर आलेली आहे त्यामुळे कॉंग्रेसने कितीही यांचे माध्यमातून डाव टाकायचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही असे दिसून येते.त्यामुळे विदर्भ ,खानदेश तसेच मराठवाडा येथील जनता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्याचे चिन्ह दिसत आहे.त्यामुळे कॉंग्रेसकडे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सादर केलेला १२ जागांचा प्रस्ताव योग्य आहे आणि तो प्रस्ताव कॉंग्रेसने मान्य केल्यास त्यांचा फायदा होणार आहे.त्यामुळे जे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी पक्षश्रेष्ठी यांचेकडे साकडे घातले आहे की,कोणत्याही परिस्थितीत प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घ्यावे.परंतु कॉंग्रेस पुढे असे आव्हान आहे की,१२ जागांचा प्रस्ताव कसा मान्य करायचा..? त्यामुळे नांदेड मधून राहुल गांधी यांची भीती दाखविण्याचा आणि राष्ट्रीय स्तरावर प्रियांका गांधी यांची भीती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु आता मतदार हा हुशार झालेला आहे त्यामुळे अशा गोष्टीना तो घाबणार नाही तो एकदिलाने आणि एकमताने प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राहील असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

Tuesday, January 22, 2019

EVM मशिन केली गोपीनाथ मुंडे यांची हत्या….त्यांना भगवानबाबा शिक्षा करेल काय…? माझे मत माझी मालमत्ता आणि तिला चोरणारा गुन्हेगारच…! राजेश खडके सकल मराठी समाज


              माझे मत माझी मालमत्ता आणि तिला चोरणारा गुन्हेगारच…! असे मत आमच्या सकल मराठी समाजाचे आहे.गोपीनाथ मुंडे हे भगवानगडच्या भगवानबाबा यांना खूप मानीत होते.अतिशय सरळ आणि प्रामाणिक असा दिलेल्या शब्दाला जागणारा नेता होता.त्यांची ओळख फक्त वंजारी समाजातच नसून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला होती.ज्याठिकाणी ते उभे राहयचे त्या ठिकाणी गर्दी असायची त्यामुळे त्यांची लोकनेते म्हणून ओळख निर्माण झालेली होती आणि त्यांना प्रत्येक पक्षात मान सन्मान होता हे सर्वश्रुत आहे.अचानक देशात माहिती पसरते की,गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धक्का लागला आणि त्यांचा मृत्यू हार्ट अॅटयक ने झाल्याची खबर पोहती न पोहते तोच त्यांचे पोस्टमार्टम करून बॉडी तयार करून ठेवली होती.दिल्ली ही सामाजिक आणि बहुजन व्यक्तीसाठी घातक आहे हे आता जवळ जवळ सगळ्यांनाच माहित झालेले आहे.गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू सहज होऊ शकत नाही याची कल्पना सर्वांना आल्यामुळे मोठ्या प्रमाणात एक आवाज उठविला गेला होता.परंतु व्यावस्था इतकी भयानक आहे की,हा झालेला मृत्यू आजही संश्यास्पद असल्याची भावना वारंवार उठत आहे.परंतु जो पर्यंत घरचे लोक तक्रार करीत नाही काही बोलत नाही या आरोपाला गंभीर स्वरूप प्राप्त होत नाही असे कायदा सांगतो आणि त्यात पंकजा मुंडे काहीच बोलत नाही.यातच लंडन मध्ये EVM मशिन हॅकर सय्यद शुजा याने व्हिडीओ पत्रकार परिषदेमध्ये असा गंभीर आरोप केला आहे की,सद्याचे जे मोदी सरकार निवडून आलेले आहे ते जनतेच्या चोरलेल्या मतावर निवडून आलेली आहे.आणि ह्या चोरीमध्ये माझा प्रत्यक्ष सहभाग होता आणि याची कल्पना गोपीनाथ मुंडे यांना झाली असल्यामुळे त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते त्यामुळे त्यांची हत्या होणे गरजेचे होते म्हणून त्यांची हत्या झालेली आहे त्यामुळे हा अपघात नसून मत चोरी प्रकरण दडपण्यासाठी केलेली हत्याच आहे अशी साक्ष या सय्यद शुजाने पत्रकार परिषद घेऊन केली आहे.त्यामुळे भारत सरकारने या सय्यद शुजाला अटक करून त्याला ताब्यात घेऊन प्रथक EVM मशिन हॅक प्रकरणी गुन्हा नोंद करून गोपीनाथ मुंडे यांच्या हत्ये प्रकरणी साक्षीदार करून त्याची एफआयआर नोंद करून तपास सुरु करावा अशी सकल मराठी समाजाची मागणी करीत वंजारी समाजाला अशी भावनिक साद घालीत आहे की,या समाजाला गोपीनाथ मुंडे पिता समान होते आणि त्यांची भगवानबाबा जवळ श्रध्दा होती त्यामुळे हा वंजारी समाज एक होऊन भगवानबाबाकडे साद घालेल काय…? आणि त्यांची श्रद्धा म्हणून त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा करेल काय…?

साहेब दलित-मुस्लिम-ओबीसीना गिळंकृत करणाऱ्या काँग्रेसी अजगरला मारून टाका….आणि वंचितांचे भले करा…! राजेश खडके सकल मराठी समाज


इतिहास साक्षीला आहे काँग्रेसी अजगराने नेहमी दलित-मुस्लिम-ओबीसीना भाजपाची भीती दाखवून नेहमी गिळंकृत करीत आलेला आहे.या अजगराने नेहमी उभारत्या चळवळी गिळंकृत करून इथल्या सामन्य माणसाला संपविण्याचे कटकारस्थान तो करीत आलेला आहे.भीमा कोरेगावच्या हल्ल्या संदर्भात कॉंग्रेसने गेल्या वर्षभरात कधीही आ अक्षर सुध्दा काढलेले नाही.तुम्ही तो लढा योग्य रीतीने हाताळून इथली भयानक होणारी परिस्थिती हाताबाहेर जाऊन दिली नाही.मराठा मूक मोर्चाच्या माध्यमातून पुढचा धोका पाहून प्रतीमोर्चे होऊ दिले नाहीत.हिंदू-मुस्लिम दंगल रोखण्यास तुमचा मोठा पुढाकार आहे.इथला अलुतेदार आणि बलुतेदार यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या न्याय हक्काची लढाई म्हणून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे.त्यामुळे विश्वासाने इथला वंचित घटक आपल्या नेतृत्वाखाली एकवटला आहे.त्यातच तुम्ही मुस्लीम समजाच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या एमआयएम पक्षाची हातमिळवणी करून जी समीकरणे आखली आहेत ती समीकरणे अतिशय योग्य आहेत.यातच आपण कॉंग्रेसकडे जो १२ जागासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे तो त्यांच्यासाठीचा पराभूत असलेल्या जागा आहेत आणि त्या जागा वंचित बहुजन आघाडीला देणे संबधित त्यांना काहीच अडचण नाही.परंतु पूर्वीपासून पुरोगामीपणाचा ढोंग करून नेहमी दलित-मुस्लिम समाजाला स्वत:ची वोट बँक म्हणून स्वत:च्या फायद्यासाठी वापर करीत आलेली आहे.परंतु वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावाला आणि आघाडीमध्ये सामील होणेसंदर्भात त्यांनी आपल्या मार्फत एमआयएमला गिळंकृत करण्याचा डाव टाकलेला होता.परंतु आपण आणि ओवीसी यांनी या दलित-मुस्लीम विरोधी कॉंग्रेसची खेळी ओळखून त्यांना एक चांगल्या प्रकारे राजकीय रणनीती दाखवून ओवीसी साहेबानी वंचित घटकासाठी आणि प्रकाश आंबेडकर म्हणून त्यांच्यासाठीची कुर्बानी देण्यास मागेपुढे न पहात लाखो लोकासमोर “नारे तकदीर अल्ला हु अकबर" अशी घोषणा देऊन ओवीसी यांनी सांगितले आहे की,इथली कॉंग्रेस ही मुस्लिम समाजाचे भले बघत नाही.त्यामुळे एकदिलाने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम एकवटले पाहिजे असे असताना देखील कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव मान्य करायला तयार आणि केवळ दलितांची दिशाभूल करण्यासाठी वारंवार सांगतात की,अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांना खासदार करायचे आहे आता त्यांना खासदार इथला वंचित घटक करणार आहे.परंतु नांदेडच्या सभेने इथला दलित-मुस्लिम समाज कॉंग्रेसपासून दूर गेल्याचे लक्षात येताच कॉंग्रेसकडून राहुल गांधी नांदेड मधून निवडणूक लढविणार असे म्हणून गांधी कार्ड चालविण्यात आले आहे.यातच प्रकाश आंबेडकर यांना रोखण्यासाठी कॉंग्रेसने जुनी चाल खेळली आहे आणि ती म्हणजे इतर दलित संघटना आणि पक्ष एकत्र करून त्यांना वंचित बहुजन आघाडी विरोधात प्रचार करून आंबेडकर यांच्या अडचणीत वाढ कशी होईल याची ते आखणी करीत आहे.आजची परिस्थिती पहाता अशा कॉंग्रेसला धडा शिकविण्यासाठी आणि वंचितांचे भले करण्यासाठी साहेब दलित-मुस्लिम-ओबीसीना गिळंकृत करणाऱ्या काँग्रेसी अजगरला मारून टाकले पाहिजे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे त्यामुळे आता कॉंग्रेस बरोबर आघाडी नको असा जन सामन्यांचा आवाज आहे.

Monday, January 21, 2019

ओवीसी यांच्या कुर्बानीचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होईल काय…? कॉंग्रेस एक निचपत पडलेला अजगर….! राजेश खडके सकल मराठी समाज


                          महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे लपलेले विचार आणि समाधी शोधून त्यांनी लिहिलेले स्वराज्याचे संविधान आपल्या पर्यंत आणून सोडले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे समतावादी आहे याचे आपल्याला दर्शन घडविण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना २४ सप्टेंबर १८७३ मध्ये केली आहे.त्यानंतर बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी १८८४ मध्ये हिंदू महासभेची स्थापना केली आणि त्या हिंदू महासभेचे पुढे कॉंग्रेसमध्ये रुपांतर झालेले आहे.१९१५ मध्ये बळीराम हेगडेवार आणि १९१६ मध्ये मोहन करमचंद गांधी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.टिळकांच्या १९२० मध्ये मृत्यू झालेनंतर कॉंग्रेसची सूत्रे गांधी यांनी आपल्या हातात घेतली होती.महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक व राजकीय जीवनाला सुरुवात केली होती.यासाठी त्यानी समता हे प्रमुख ध्येय ठेऊन २४ सप्टेंबर १९२४ साली समता सैनिक दल सुरु करून १९२७ ला समतावादी छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेऊन जातीयवादी पेशवाईचे अंताचे ठिकाण भीमा कोरेगाव येथील महार शूर वीरांना अभिवादन करून महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह करून मानव धर्माला अडचण असणारी मनुस्मृती रायगडच्या परिसरात दहन करून समतावादी लढ्याला सुरुवात केली.ब्रिटीश राजवटीने भारतला स्वतंत्र देण्याची घोषणा करून सायमन कमिशनची स्थापन करून गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.असूउद्दीन ओवीसी यांचे पूर्वज यांनी १९२७ साली एमआयएमची स्थापना केली होती.या गोलमेज परिषदेला मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्यामुळे कॉंग्रेस गांधी यांनी कॉंग्रेसच्या माध्यमातून विरोध करून त्यांचेवर हल्ले करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी अमान्य करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधात वातावरण तयार करून त्यांना मजबूर करून पुणे करार यशस्वी करून घेतला.त्यानंतर एमआयएमने १९३७ ला मुस्लीम धर्मासाठी शरयत नावाचा अकबर यांचा धार्मिक कायदा जतन करण्यास सुरुवात केली.त्यानंतर भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताचे संविधान लिहिण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुढे आले आणि २६ नोव्हेंबर १९४९ ला भारत देशास प्रधान केले आणि २६ जानेवारी १९५० ते लागू झाले.१९५२ ला हिंदू कोड्वील आणले याला यांचा विरोध होता.१९५६ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायी यांचे सोबत बौध्द धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांचे महापरिनिर्वाण झाले.वास्तविक पहाता हे सगळं होत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेस हे जळते घर हे आपल्याला सांगून गेले आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस राजकारणात सक्रीय होऊ नये याची त्यांनी तजवीज करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभी केलेल्या चळवळीला वेगळी दिशा देऊन चळवळ एकसंघ एका नेतृत्वाखाली राहू नये यासाठी वारसांना सक्रीय राजकारणातून बाहेर काढण्यासाठी रिपब्लिकन नावाने अनेक गट निर्माण करून वेगवेगळ्या प्रकारे या निचपत पडलेल्या अजगराने ही प्रामाणिक चळवळ गिळंकृत केली होती.साल १९८४ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर राजकारणात सक्रीय झाले.भीमा कोरेगावच्या २०० वर्षापुर्ती दिनांनिमित्त सत्य इतिहास बाहेर आल्याने त्याठिकाणी दहशत माजविण्यासाठी हल्ला करण्यात आला.आणि हाच विषय प्रकाश आंबेडकर यांनी उचलून धरला आणि संपूर्ण देशामध्ये याचे लोन पसरले आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी प्रकाश आंबेडकर प्रकाश झोतात आले.भीमा कोरेगाव अलुतेदार आणि बलुतेदार यांनी लढलेला इतिहास सांगून त्यांनाच आज वंचित ठेवले असल्याची घोषणा करून यांना न्याय देण्यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून इथला अलुतेदार आणि बलुतेदार उभा करून कॉंग्रेसकडे लोकसभेच्या १२ जागांचा प्रस्ताव सादर करून आपली भूमिका जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली.परंतु कॉंग्रेस हाअजगर असल्यामुळे तो वेळेची वाट बघत बसला आणि पाच राज्यातील जशा निवडणुकीचा निकाल लागला तो तयार झाला आणि त्याने पहिला फुसकारा सोडला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीतील एमआयएम या पक्षावर आणि त्याने सांगितले की,जोपर्यंत एमआयएम वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे तो पर्यंत आंबेडकर यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर विचार करता येणार नाही.निवडणुकांची वेळ जवळ येऊ लागली वंचित बहुजन आघाडीच्या मंचकावरून ओवीसी गायब झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या मात्र आंबेडकर एक एक उमेदवार जाहीर करीत चालले होते..शेवटी नांदेड येथील सभेत ओवीसी हजर झाले आणि त्यांनी स्वत:ची कुर्बानी देत असे सांगितले की,जर प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी कॉंग्रसला माझी अडचण होत असेल तर तर त्यांचा सन्मान होण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे.त्यामुळे या निचपात पडलेल्या काँग्रेसी अजगराने असूउद्दीन ओवीसी यांचेवर हल्ला करून त्यांना आपल्या विळख्यात जखडून ठेवला आहे.त्यामुळे एकंदरीत घडामोडी पहाता सकल मराठी समाजाला अस प्रश्न पडला आहे की,ओवीसी यांच्या कुर्बानीचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होणार आहे काय….?
      

Sunday, January 20, 2019

राष्ट्रवादी चे ओबीसी नेते छगन भुजबळ हे प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्यात यशस्वी होतील काय...? राजेश खडके सकल मराठी समाज


     
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी दुपारी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसोबत तासभर चर्चा केली. एमआयएमचे नेते खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी मला एकही जागा नको, मी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडतो पण प्रकाश आंबेडकरांचा सन्मान करत त्यांना महाआघाडीत सामावून घ्या, असे आवाहन केले होते. त्यानंतर आघाडी व वंचित बहुजन नेत्यांत चर्चा सुरू झाल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बुलढाणा येथे पोहचलेली निर्धार परिवर्तन यात्रा सोडून औरंगाबादमध्ये येऊन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणे पसंत केले आहे. रविवारी दुपारी तासभर या नेत्यांची चर्चा झाली. या बैठकीला छगन भुजबळांसह आमदार बळीराम सिरस्कर, आमदार सतीश चव्हाण, आमदार हरिदास भदे, माजी आमदार विजय मोरे, प्रा. किसन चव्हाण प्रा. सदानंद माळी आदी नेते उपस्थित होते. या बैठकीचा तपशील अद्याप समोर आला नसला तरी महाआघाडी करताना वंचित बहुजन आघाडीला किती जागा हवा आहेत याचा अंदाज भुजबळांच्या माध्यमातून आघाडी घेत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर राज्यातील काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडत आहेत दुसरीकडे, शरद पवारांसोबतचा त्यांचा वैचारिक वाद जगजाहीर आहे. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत महाआघाडीबाबत बोलणार नाही. मी दुय्यम नेत्यांशी बोलणार नाही काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी बोलेन असे वक्तव्य आंबेडकरांनी काही दिवसापूर्वी केले होते. त्यामुळे प्रदेश काँग्रेस पातळीवरून त्यांच्याशी चर्चा करण्यास कोणीच तयार नाही. मध्यतरी माणिकराव ठाकरे व विखेंनी आंबेडकरांनी चर्चा केली होती. मात्र, त्यातून फारसे काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी मागील पंधरवड्यात छगन भुजबळ यांची मुंबईत भेट घेतली होती. भुजबळ हे शरीराने राष्ट्रवादीत असले तरी मनाने वंचित बहुजन आघाडीसोबत आहेत असे वक्तव्य या भेटीनंतर आंबेडकरांनी केले होते. भुजबळ हे ओबीसी वर्गातून येतात. त्यामुळे ओबीसी व दलितांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मराठा बहुल नेत्यांनी संधी दिली नसल्याचा आरोप आंबेडकर करत आले आहेत. राज्यातील 180 मराठा कुटुंबातच सत्ता फिरते असा आरोप मागील आठवड्यातील सांगलीतील सभेत त्यांनी केला होता. त्यामुळे आंबेडकरांशी बोलणी करण्यास मराठा नेते कचरत असताना भुजबळांनी पुढाकार घेतल्याचे कळते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने तेच यापुढे प्रकाश आंबेडकरांशी वाटाघाटी करतील अशी माहिती समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाआघाडीत आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर सोपविल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्यात यशस्वी होतील काय...?

Saturday, January 19, 2019

असुउद्दीन ओवीसी यांचे वंचित बहुजन आघाडीच्या मंचका वरील अखेरची भाषण...? कॉंग्रेस असे का वागतय....आणि आम्ही कॉंग्रेसची वाट का बघतोय...! राजेश खडके सकल मराठी समाज


        

                          नारे तकदीर अल्ला हु अकबर....! असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव मान्य करा आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करा...माझे मोठे भाऊ बाळासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी मी कॉंग्रेस बरोबर तडजोड करायला तयार आहे.असे म्हणत संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यासाठी मी कुर्बानी द्यायला तयार आहे असे आवाहन उपस्थित लोका समोर ओवीसी यांनी नांदेडमध्ये केले आहे.आमच्या सकल मराठी समाजाला असा प्रश्न पडला आहे की,संपूर्ण राज्यातील आदीवासी-धनगर-माळी-दलित-मुस्लीम-मराठा समाज आज बाळसाहेब आंबेडकर यांच्या सभेमध्ये उतरला आहे.असे असताना वंचित बहुजन आघाडीला कॉंग्रेसची वाट का....? बघावी लागत आहे....कॉंग्रेस असे का....? वागत आहे.या प्रश्नाचे उत्तर शोधताना आमच्या सकल मराठी समाजाच्या अशा लक्षात आले आहे की,सध्या संपूर्ण महाराष्ट्रात इतर दलित नेत्यांना इथल्या चळवळीने स्पष्टपणे नाकरले आहे.त्यामुळे सध्याच्या परीस्थितीचा फायदा घेऊन एक नवी समीकरणे उभारण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर करीत असताना दिसत आहे....आणि हा बाळासाहेबांचा मास्टर स्ट्रोक असल्याचे जाणकार यांचे म्हणणे आहे...त्यांचे असे म्हणणे आहे की,असुउद्दीन ओवीसी मातबबर चाणाक्ष असे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या माध्यमातून देशातील राजकीय रणनीती प्रकाश आंबेडकर यांची ओळखली आहे...आणि असा नेता भविष्यात आपल्या बरोबर असणे फार गरजेचे आहे असे त्यांना वाटत आहे.जर भविष्यात प्रकाश आंबेडकर आपल्या बरोबर असतील तर पुढची आपली राजकीय वाटचाल चांगली असेल...नाहीतर भविष्यातील राजकारण आपल्याला अंधारात चाचपडावे लागेल आणि ते आपल्यासाठी योग्य नाही.या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन सभामध्ये सतत गैरहजर असणारे ओवीसी यांनी कॉंग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या मंचकावर उपस्थित राहून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आपला प्रामाणिकपणा दर्शविलेला आहे.त्यांनी भाषण करीत असताना आपल्या मुस्लीम समाजाचा कट्टरवाद जतन करण्यासाठी "नारे तकदीर अल्ला हु अकबर" अशा घोषणा देऊन आम्ही कट्टरवादी हिंदुच्या विरोधात असून अशी भूमिका प्रस्थापित करून इथला मुसलमान हा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंचकावरून "जय भीम"चा नारा द्यायला ते विसरले नाहीत. एकंदरीत पहाता असूउद्दीन ओवीसी यांनी लोकसभेसाठीचे हे शेवटचे भाषण केले असल्याचे जाणकार म्हणत आहेत.त्याचे कारण असे आहे की,त्यांनी असे सांगितले की,बाळासाहेब यांची मागणी पूर्ण करा मी महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढविणार नाही याचा अर्थ  ओवीसी यांना जे सांगायचे आहे ते त्यांनी सांगितलेले आहे.त्यामुळे पुढील सभेत ते उपस्थित राहतील काय...? असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे.त्यामुळे कॉंग्रेसला आता नेमके बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकारण समजले असून त्याप्रमाणे ते पुढील राजकारणाची आखणी करित आहे  हे मात्र निश्चित...!

Friday, January 18, 2019

प्रवीणदादा गायकवाड यांच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी शिरूर मतदार संघातून खासदार होण्यासाठीच…! राजेश खडके सकल मराठी समाज


         छत्रपती संभाजी महाराजांचा सत्य इतिहास उजागर होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास बाहेर येऊन लपलेल्या मावळ्यांना न्याय मिळावा यासाठी इतिहासाची पाने उघडण्यासाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची या सामजिक संघटनेची स्थापन पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली होती.बामसेफच्या केटरबेस मध्ये तयार झालेले हे मराठ्यांचे संघठन होते.नंतरच्या काळात मोठ मोठी आंदोलने करून हे संघटन देशपातळीवर उभे राहिले आणि कालांतराने या संघटनेच्या माध्यमातून उभे राहिलेल्या नेतृत्वामध्ये महत्वकांक्षा निर्माण झाल्या त्यामुळे संघटनेत वादविवाद उभे राहिले आणि पहिला वाद उभा राहिला तो मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मध्ये आणि संघटनेतून गायकवाड बाहेर पडले आणि त्यानी सर्व कामकाज बंद करून व्यवसायाकडे लक्ष दिले.परंतु असा सामाजिक दुष्टीकोन असणारा नेता समाजातून बाहेर रहाणे कोणाला पसंद नव्हते.परंतु हे सर्व होत असताना त्यांनी कोणाचे एकले नाही आणि संघटनेचा राजीनामा देऊन बाहेर पडले.त्यामुळे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड हे सामाजिक संघटन बंद होऊन संभाजी ब्रिगेड नावाचा पक्ष निर्माण करण्यात आलेला होता.परंतु या पक्षाची पायाभरणी करण्यासाठी खेडेकर यांनी मराठवाडा आणि विदर्भाकडे लक्ष केंद्रित केली होते.त्याचे कारण असे की,खेडेकर साहेब स्वत: कुणबी असल्यामुळे त्याठिकाणी कुणबी समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना तिकडे मोठ्या प्रमाणात वाव मिळाला आहे.परंतु मराठा आरक्षण हा मुद्दा पुढे आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात लाखोचे मोर्चे निघाले आणि जनतेला माहित नसलेला मराठा आणि कुणबी वाद पुढे आला.कुणबी समाजाला पूर्वीपासून घटनात्मक आरक्षण होते.परंतु मराठा ही जात नसल्याने त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता.राणे समितीने दिलेले आरक्षण कायद्याच्या कचाट्यात अडकले होते आणि ते अडकलेले आरक्षण मराठा समाजाला सोडवायचे होते,मराठा आरक्षण लढा हा पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी उभे केलेले आंदोलन आहे.त्यामुळे नेमके यातून राजकारणाचा वास येत होता पण तो नेमका कोणता…? याचा मागसुम कोणाला लागला नाही.आणि हे आरक्षण फसवे निघते की काय…? असा प्रश्न निर्माण होतो न होतो.तोच मूक मोर्चाचे रुपांतर ठोक मोर्चा मध्ये झाले आणि या ठोक मोर्चाचे नेतृत्व कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून सुरु केले आणि बंद केले आता जवळ जवळ हे सगळ्यांना माहित झाले आहे.या मूक मोर्चातून आणि या ठोक मोर्चातून कोणाला काही मिळाले नाही हे मात्र निश्चित आहे.परंतु मराठा समाजाला १६ % आरक्षण भाजप सरकारने दिल्याचे आरोळी मात्र सर्वत्र दिली गेली आणि ती आरोळी मराठा समाजा पर्यंत पोहचते ना पोहचते तोच लागली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० % सवर्ण आरक्षण जाहीर करून त्याचा कायदा पास करून सवर्ण-दलित असा विषय निर्माण केला.आता आमचे असे म्हणणे आहे की,आरक्षित समाज म्हणून आणि बहुजन मराठा म्हणून आरक्षण घ्यायचे की,जातीवादी सवर्ण म्हणून आरक्षण घ्यायचे असा प्रश्न मराठा समाजा समोर उभे राहिलेला आहे.यातच प्रवीण गायकवाड यांनी शेतकरी कामगार पक्षाची बहुजन म्हणून कास धरून दिलेला राजीनामा परत घेऊन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पुन्हा सुरु केली त्यामुळे कुणबी असणारे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि गायकवाड यांच्या मोठा वाद सुरु झाला आणि तो न्यायालयीन वाद होऊन न्यायच्या प्रतीक्षेत उभा आहे.आता सगळ्याच्या समोर संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना आणि संभाजी ब्रिगेड राजकीय संघटना म्हणून उदयास आली.यामध्ये सच्चे कार्यकर्ते दोन्ही संघटनेतून बाहेर पडले आणि व्यावसायिक आणि आणि राजकीय कार्यकर्ते दोन्ही ब्रिगेडमध्ये विभागले गेले.यातच प्रवीण गायकवाड यांनी “खिशात गांधी आणि डोक्यात शिवाजी” अशी घोषणा देऊन मोठ्या प्रमाणात राजकारण सुरु केले आहे.हेच राजकारण म्हणून गायकवाड हे सारखे बारामतीला असतात कारण यावेळेस काही करून पवार साहेबांना प्रधानमत्री म्हणून सगळ्यांना बघायचे आहे.यामुळे आकडेवारीची गणिती कशी वाढतील याकडे लक्ष दिले गेले आहे आणि याची सुरुवात म्हणून तुळापुरला येण्या आगोदर अजितदादा पवार यांनी शिरूर मतदार संघातून लढ्याला आमचे कार्यकर्ते पुढे येत नाही त्यामुळे आता शिरुंर लोकसभा मतदार संघ मीच लढणार आणि खासदारही मीच होणार अशी घोषणा दिलेली होती.कधी तुळापुर येथे न येणारे दादा यावेळेस छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेक कार्यक्रमी एकत्र आले.भीमा कोरेगावला कधी न येणारे प्रवीण गायकवाड भीमा कोरेगाव येथील बामसेफच्या कार्यक्रमाचे उद्घाटक झाले.त्यामुळे येथे स्पष्टपणे दिसते की,अजितदादा यांनी प्रवीण गायकवाड यांच्या साठी शिरूर मतदार संघातून लोकसभेमध्ये जाण्यासाठी जमीन तयार केली आहे.

खासदार संजय काकडे यांनी भाजापा विरुध्द उभारले बंडाचे निशाण…..! राजेश खडके सकल मराठी समाज


बांधकाम व्यावसायिक क्षेत्रातील एक मोठे नाव म्हणून संजय काकडे यांचे घेतले जाते.अजितदादा पवार यांचे खास मित्र म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.असे म्हणतात की,संजय काकडे हे पवार साहेबांच्या शब्दाबाहेर नाहीत त्यामुळे आज ते एवढे मोठे व्यावसायिक म्हणून उदयास आलेले आहे.परंतु भाजपाच्या मदतीने राज्यसभेवर खासदार झाले असल्यामुळे पुणे महानगरपालिका आणि पर्यायाने पुणेशहर आपल्या ताब्यात कशी राहील यासाठी त्यांनी भाजपच्या तिकिटावर आपले स्वत:च्या हक्काचे लोक नगरसेवक म्हणून निवडून आणले आहेत.पुणे मनपाच्या निवडणुकीत भाजपच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांची आकडेवारीच यांनी सांगितली होती आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्या आकड्याचे नगरसेवक निवडून आले होते.आता पुणेशहर लोकसभेतून त्यांना निवडून खासदार व्हायचे आहे त्यामुळे सध्या त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागणी केल्याचे समजते परंतु त्यांना डावलण्याची खेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष दानवे यांच्या माध्यमातून खेळत असल्याचे संजय काकडे यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी दानवे यांच्या मतदार संघाचा आढावा घेऊन त्यांनी पत्रकार यांचे समोर असे जाहीर करून आव्हान केले आहे की,जर शिवसेने बरोबर भाजपाची युती झाली नाही तर दानवे यांचा दोन लाखांनी पराभव होईल.आणि हे सर्व करीत असताना भष्ट्राचार प्रकरणी गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा.आमच्या सकल मराठी समाजचे असे मत आहे की,संजय काकडे एक दबाव तंत्राचे राजकारण करीत आहे.त्यांना जर भाजपाने पुणे लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जर दिली नाही तर ते बंडाचे निशाण उभारून स्वत:च्या हक्काचे ४२ नगरसेवक घेऊन ते पुणे मनपात गात निर्माण करून त्यांचे जीवावर एखाद्या दुसऱ्या पक्षात जाऊन तेथील उमेदवारी घेऊ शकतात किंवा बंडखोरी करू शकतात.संजय काकडे यांच्या या भूमिकेमुळे पुणे लोकसभा मतदार संघ कोणाला द्यायचा किंवा ठेवायचा यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात चुरस सुरु आहे.त्यामुळे संजय काकडे यांना विश्वास वाटत आहे की,पुणे शहरातून येणाऱ्या लोकसभा खासदारकीची माळ पुण्यातील मतदार आपल्या गळ्यात घालतील त्यामुळे संजय काकडे यांनी भाजप विरुध्द बंडाचे निशाण उभारले आहे असे दिसते.

Thursday, January 17, 2019

कॉंग्रेसने वंचित बहुजन आघाडीला तीन जागा न दिल्यास महाराष्ट्रातून होणार कॉंग्रेसचा सुपडा साफ....! राजेश खडके सकल मराठी समाज




               बरेच दिवसापासून ओवीसी येणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आणि त्यांची बऱ्याच सभांना गैरहजेरी स्पष्टपणे दिसत होती.परंतु नांदेडच्या सभेत ओवीसी यांची हजेरीमुळे कॉंग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे हे मात्र निश्चित आहे.नेमका बाळासाहेबांचा प्रस्ताव काय आहे त्याचा मागसुम कालच्या नांदेड येथे झालेल्या सभेमध्ये दिसून आला आहे. बाळासाहेबांचे नेमके राजकारण काय आहे याचे अवलोकन कोणाला काय होत नव्हते ते काल झाले आहे.बाळासाहेबानी आता वंचित बहुजन आघाडीमध्ये इतरांना बरोबर घ्यायचे हे टाळलेले दिसत आहे.कारण छगन भुजबळ यांना जामीन मिळविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता त्यामुळे माळी समाजात त्यांची प्रतिमा उंचाविली गेल्याचे स्पष्टपणे जाणविले गेले आणि त्याचा स्पष्टपणा जाणवला तो भुजबळ यांची भेट घेऊन नाशिकमध्ये सभा झाल्यावर बाळासाहेबांनी भुजबळ यांना पाठींबा दिला आहे.बाळासाहेबांनी भुजबळांना पाठींबा दिल्यावर राष्ट्रवादी पक्षाकडून कोणीच काही बोलले नाही म्हणजे जाहीर समर्थनही केले नाही आणि विरोधही केला नाही.परंतु कोणाला पाठींबा द्यायचा आणि कोणाला विरोध करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.या पाठींब्यामुळे कॉंग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे.यातच मराठा नेत्यांच्या भेटी घेऊन बाळासाहेबांची बहुजन रणनीती मजबूत झालेली आहे.एकंदरीत वंचित बहुजन आघाडीच्या सभा आणि जाहीर होत असलेले उमेदवार यांचे अवलोकन केल्यास ज्या मतदार संघातून बाळासाहेबांनी उमेदवार जाहीर केले आहेत ते मतदार संघ कॉंग्रेस महाआघाडीकडे मागित आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बाळासाहेबांची ही एक दबावतंत्राची राजकीय रणनीती आहे हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.मग बाळसाहेब ही राजकीय रणनीती का खेळत आहेत तर त्यांना लोकसभेच्या तीन जागा हव्या आहेत.एक जागा अकोला मतदार संघ.दुसरी जागा औरंगाबाद मतदार संघ आणि तिसरी जागा मुंबई मतदार संघ अशा तीन जागेंचा प्रस्ताव असल्यामुळे या त्यांच्या प्रस्तावाला ओवीसी यांनी नांदेड मध्ये केलेल्या भाषणातून समर्थनच केले आहे.ओवीसी यांचे भाषण बाळासाहेबांच्या प्रस्तावाला भावनिक समर्थनच होते कारण आजची वेळ पुन्हा येणार नाही.त्यामुळे कॉंग्रेसचे महराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की,आम्हाला अकोल्यातून बाळासाहेबांना निवडून आणायचे आहे.याचा अर्थ कॉंग्रेसच्या लक्षात आले आहे की,सध्या तरी बाळासाहेबांना जाहीर डावलणे योग्य नाही.मुस्लीम मतदार हा कॉंग्रेसचा पारंपारिक मतदार असल्यामुळे त्यांना एमआयएम पक्षाची अडचण होत आहे.त्यातच ओवीसी म्हणाले जर कॉंग्रसला माझी अडचण होत असेल तर मी महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढविणार नाही.त्यामुळे बाळासाहेबांचा प्रस्ताव तुम्ही मान्य करा असाच त्यांचा एकंदरीत सूर होता.त्यामुळे कॉंग्रेसची प्रमुख अडचण काल नांदेडमध्ये ओवीसी यांनी दूर केली आहे.त्यामुळे कॉंग्रेसला आता बाळासाहेबांचा प्रस्ताव मान्य केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.जर कॉंग्रेसने प्रस्ताव नाकारल्यास कॉंग्रेसच्या उमेदवार यांच्या विरुध्द वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहतील आणि महाराष्ट्रातून कॉंग्रेसचा सुपडा साफ होईल.

पासलकर साहेब अब्दाली निघून गेला...म्हणून औरंगाजेबाचे समर्थन होऊ शकत नाही..तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे होऊच शकत नाही…..! राजेश खडके सकल मराठी समाज



             त्यावेळचा पेशवा म्हणून नानासाहेब पेशवा होता आणि नानासाहेबांचा इतिहास हा सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळे येथे सांगणे मला गरजेचे वाटत नाही.पानिपतचे युध्द अठरा पगड जातीचे मराठे कधीही विसरू शकत नाही कारण हे युध्द शिवनीती विरुध्द होते म्हणूनच या युध्द्दात एक लाख अठरा पगड जातीचे मराठे मारले गेले आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे हा शहीददिन आहे विजयदिन म्हणून साजरा करणे म्हणजे शिवनीतीच्या विरोधात समर्थन करणे होय.वास्तविक पहाता मराठ्यांचे हे युध्द खरेच दिल्ली जिंकण्यासाठी होते का असा प्रश्न आपण इतिहासाला विचारला पाहिजे कारण इतिहास नक्कीच तुम्हाला त्याचे उत्तर देईन...! अब्दाली हा अफगाणिस्तान मधून दिल्ली जिकण्यासाठी जवळ जवळ पावणेदोन लाखाचे सैन्य घेऊन आलेला होता...आणि दिल्लीवर आपल्यालाही ताबा मारायचा होता.कारण पेशवाई मध्ये हे युध्द जिंकणे म्हणजे शिवनिती कशी चुकीची होती हे दाखविण्याचा प्रयत्न नानासाहेब पेशव्यांनी केला होता.त्यामुळे सदाभाऊ पेशवे आणि विश्वासराव यांचे नेतृत्वात लढण्यासाठी जवळ जवळ सव्वालाखाचा लवाजमा पाठवून नानासाहेब पेशवे पुण्यातच थांबले होते आणि तो काळ होता १७६१ चा यापूर्वी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा कोणताही सण साजरा केला जात नव्हता हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे अठरा पगड जातीच्या मराठ्यांचे अब्दाली बरोबर पानिपत येथे सामना झाला होता.मराठ्यांना शिवानिती माहित होती परंतु हे युद्ध शिवनीती नुसार नव्हते...कारण पेशव्यांना त्यांची नीती येथे राबवायची होती.परंतु पेशव्यांची नीती अब्दाली याला माहित झाली होती कारण तो एक योध्दा होता.त्याने लागलीच मराठ्यांची रसद तोडली हे मराठ्यांच्या लक्षात यायला वेळ लागला युध्द सुरु झाले होते.मराठे अब्दालीच्या सैन्यावर तुटून पडले रसद तुटल्यामुळे मराठे सैन्य कमजोर पडले परंतु वीर योध्दा असल्यामुळे त्यांनी अब्दालीला हैराण करून सोडले हाहाहा म्हणता युध्दाचे स्वरूप भयानक होत चालले होते.इकडे नानासाहेब पेशवा नगरमध्ये एका बारा वर्षाच्या मुली बरोबर विवाह करीत होता आणि तिकडे वीर मराठे धारतीर्थ पडत चालले होते.त्यावेळेस एक लाख अठरा पगड जातीचा मराठा युध्दात शौर्य दाखवीत शहीद झाला होता.त्यामुळे शिवनिती विरुध्द झालेल्या या युध्दांमुळे स्वराज्यात १ लाख महिला विधवा झाल्या होत्या एक लाख कुटुंबात शोककळा पसरली होती.स्वराज्यावर एकप्रकारची संक्रात आली होती.या युध्दामुळे अब्दाली विजय झाला असे म्हणता येणार नाही पण हे युध्द झाल्यावर त्यालाही मोठ्या प्रमाणात हानी झाली होती काही मराठ्यांना त्यांनी बंदी बनवून तो तेथेच चार महिने राहिला.या युध्दामुळे झालेला नरसंहार पाहून त्या युध्दाचा त्यालाही पश्चाताप झाला आणि पुन्हा तो आफगानिस्तानकडे जायला निघाला जाताना त्यांने बंदी केलेले मराठे सरदार तो बरोबर घेऊन गेला आणि जाता जाता त्यांना तो बलुचीस्थान मध्ये सोडून गेला आजही त्या मराठ्यांच्या वारसांना स्वराज्याची आठवण होत आहे.त्यामुळे या पानिपतच्या युध्दाला विजयदिन म्हणणे म्हणजे शिवानितीचा अपमान करणे होय.आपण जर या पानिपतच्या युध्दास विजयदिन म्हणू लागलो तर आपल्याला औरंगाजेबाचेही समर्थन करावे लागेल कारण येथे जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांची त्याने हत्या केली म्हणून त्याला स्वराज्य काही मिळाले नाही.त्याला शंभूराजे यांच्या हत्येनंतर पश्चाताप झालेला होता.कारण एखाद्या राजाला जर दुसऱ्या राजाने जेरबंद केले तर तो अशाप्रकारे दुसऱ्या राजाची हत्या करीत नाही.छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या औरंगाजेबाने केली म्हणून तो काही विजयी झाला नाही कारण येथेही त्याला काही मिळाले नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे पानिपतच्या युद्धातून आपल्याला काही मिळाले नाही आणि अब्दालीलाही काही मिळाले नाही.येथे फक्त शौर्य दिसले म्हणून आपण छत्रपती संभाजी महाराज यांना शौर्यवीर म्हणतो त्याच प्रमाणे पानिपतचे युध्द हे शौर्यदिन आहे.यानंतर पेशवाईने या युध्दाची सल स्वराज्यातील रयतेच्या मनातून काढण्यासाठी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि पानिपतला जे झाले ते विसरून जा असे म्हणत हा सण उत्सव म्हणून इथल्या रयतेच्या मनात बिंबविला आहे.त्यामुळे पासलकर साहेब पानिपतचे युद्ध हा विजयदिन नसून शौर्यदिन म्हणजेच शहीददिन आहे त्यामुळे पानिपतच्या युध्दाचे समर्थन करणे म्हणजे अन्यायकारी पेशवाईचे आणि औरंगाजेबाचे समर्थन करण्यासारखे होईल.

Tuesday, January 15, 2019

शाक्त पंथीय राज्यभिषेक निमित्त आपण सर्वानी छत्रपती संभाजी महराज यांना मानाचा जोहार करावा...! राजेश खडके सकल मराठी समाज


                    युवराज शंभूराजे यांचा विवाह श्रुंगारपूर येथील शाक्त पंथीय पिलाजीराव शिर्के यांची कन्या येसूबाई यांचे बरोबर झाला होता.त्यानंतर शंभूराजे यांनी शाक्त पंथ स्विकारून त्याचे आचरण सुरु केले होते.तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणारी शाक्तदेवी म्हणजे सिंधू संस्कृतीची आदी गणमाता नेऋती यांचे पूजन करीत असे त्यामुळे वैदिक धर्म पद्धतीत झालेला ६ जूनचा राज्याभिषेक नाकरून २४ सप्टेंबरला शाक्त पंथीय राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराज यांनी करून घेतला होता.त्यामुळे शाक्त पंथानुसार झालेला राज्याभिषेक हा समतावादी राज्यभिषेक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापरिनिर्वाण नंतर युवराज शंभूराजे यांनी स्वत:चा राज्यभिषेक हा शाक्त पंथानुसार करून घेऊन त्यांची राजमुद्रा ही बोधीसत्व वृक्ष म्हणजे पिंपळाचे पानावर कोरून घेतली आहे.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे समतावादी राजे होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे आपल्या सर्वांचे कर्त्यव्य आहे की,आजच्या शाक्त पंथीय राज्यभिषेक निमित्त आपण सर्वानी छत्रपती संभाजी महराज यांना मानाचा जोहार करावा...!

Monday, January 14, 2019

तुमच्याविरुद्ध खोटी FIR दाखल झाली तर काय कराल? समजून घ्या…



आपसातील भांडणातून खोटे एफआयआर दिल्या जाण्याच्या घटना अनेकदा कानावर येत असतात. कायदा आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आहे, परंतु याचा गैरवापर टाळणे देखील तितकेच आवश्यक आहे.
जरी त्या व्यक्तीने कायद्यांतर्गत आपले निर्दोषत्व सिद्ध केले तरी समाजात त्याच्याकडे गुन्हेगाराच्या नजरेने पाहिले जाते. 
तो आधीसारखा आदर मिळवू शकत नाही. आपल्याला खोटा एफआयआर टाळण्यासाठी कायद्याची काय तरतूद आहे, एफआयआर दाखल करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कोणती कारवाई केली जाऊ शकते आणि कसे करावे याची माहिती सदर लेखातून दिली आहे.

एफआयआर काय आहे?

एफआयआर हे फर्स्ट इन्फोर्मेशन रिपोर्टचे लघुरूप आहे. जेव्हा एखादा गुन्हा घडतो, तेव्हा ज्यांच्यासोबत गुन्हा घडला आहे तो पोलिसांना कळवतो याला एफआयआर म्हणतात.
जेव्हा घटनेची तोंडी सांगितलेली पहिली माहिती लिखित स्वरुपात बदलली जाते तेव्हा ती एफआयआर असते.
फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या कलम १५४ अंतर्गत पोलिसांना दखलपात्र गुन्हा असलेल्या प्रकरणात एफआयआर दाखल करावा लागतो.

एखाद्याने खोटा एफआयआर दाखल केल्यास काय करावे?

अनेक प्रकरणात असे दिसून आले आहे की, काही लोक वादविवाद झाल्यास परस्परांविरुद्ध खोटे किंवा बनावट एफआयआर दाखल करतात. ज्यांच्याविरुद्ध खोटा एफआयआर दाखल केला जातो, त्याला पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये अडकवले जाते.
त्यामुळे त्या व्यक्तीचा वेळ, पैसा इत्यादी विनाकारण खर्च होत असतात.
परंतु खोटे एफआयआर दाखल होण्याविरूद्ध काही मार्ग आहेत होणारा त्रास टाळला जाऊ शकतो. फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या कलम ४८२ असा कायदा आहे ज्याचा उपयोग अशा हेतुपरस्पर घटनांपासून दूर राहण्यासाठी केला जाऊ शकतो.

फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ काय आहे?

या कलमाच्या अंतर्गत वकीलाद्वारे उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाऊ शकतो. यांत ज्याच्यावर एफआयआर दाखल झाला आहे ती व्यक्ती त्याच्या निर्दोषपणाचा पुरावा देऊ शकते.
म्हणजे, फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२अन्वये, ती व्यक्ती दाखल झालेल्या एफआयआरला आव्हान देऊ शकते आणि उच्च न्यायालयात न्यायाची मागणी करू शकते.
त्यासाठी, वकीलच्या मदतीने यासंबंधीचा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला जातो आणि खोट्या एफआयआरच्या विरोधात प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते.
फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी व्यक्ती उच्च न्यायालयात खालील आधार घेऊन अर्ज दाखल शकते आणि खोटे एफआयआर रद्द करू शकते,
– जर खोटा एफआयआर दाखल केला गेला असेल तर.
– जो गुन्हाच झालेला नाही त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला गेला असेल तर.
– एफआयआरमध्ये आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप असतील तर.

फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ काय आहे?

या कलमाच्या अंतर्गत वकीलाद्वारे उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाऊ शकतो. यांत ज्याच्यावर एफआयआर दाखल झाला आहे ती व्यक्ती त्याच्या निर्दोषपणाचा पुरावा देऊ शकते.
म्हणजे, फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२अन्वये, ती व्यक्ती दाखल झालेल्या एफआयआरला आव्हान देऊ शकते आणि उच्च न्यायालयात न्यायाची मागणी करू शकते.
त्यासाठी, वकीलच्या मदतीने यासंबंधीचा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला जातो आणि खोट्या एफआयआरच्या विरोधात प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते.
फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी व्यक्ती उच्च न्यायालयात खालील आधार घेऊन अर्ज दाखल शकते आणि खोटे एफआयआर रद्द करू शकते,
– जर खोटा एफआयआर दाखल केला गेला असेल तर.
– जो गुन्हाच झालेला नाही त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला गेला असेल तर.
– एफआयआरमध्ये आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप असतील तर.
इथे हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे की,दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा यांच्यात काय फरक आहे.
जर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असेल तर तो दखलपात्र गुन्हा असतो आणि किरकोळ स्वरूपाचा गुन्हा अदखलपात्र समजला जातो. या दोन्ही प्रकारचे गुन्हे नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र नोंदवही असणे कायद्याने बंधनकारक आहे.
जर गुन्हा दखलपात्र असेल तर पोलीस त्याला लेखी स्वरूप देऊन, तक्रार देणाऱ्याला ते वाचून दाखवले पाहिजे. तसेच त्यावर तक्रारकर्त्याची सही घेऊन त्याची प्रत मोफत देण्याचे बंधन कायद्याने पोलिसांवर आहे.
अशी तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असतील तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते आणि अधिकाऱ्याला त्याची नोंद घेत तपास सुरु करावा लागतो.
अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेणे पोलिसांना बंधनकारक असले तरी न्यायालयाचा आदेश आल्यावरच ते या गुन्ह्यात तपास सुरु करू शकतात. तेव्हा हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, पोलिसांकडे कुठलीही तक्रार दाखल झाली की लगेच तपास सुरु होतो.
अर्थात कुठला गुन्हा दखलपात्र आहे किंवा अदखलपात्र आहे हे  ठरवत असतांना पोलिसांची भूमिका देखील महत्वपूर्ण असते.
१. जर कोणी खोटा एफआयआर दाखल केला असेल तर आपण आधी अटकपूर्व जामीन घेऊ शकतो ज्यामुळे अटक टळू शकते आणि जर ते शक्य नसेल तर अटक झाल्यानंतर नियमित प्रक्रियेतून जामीन मिळवता येतो.
एखाद्या व्यक्तीविरूद्ध एफआयआर दाखल झाला असेल तर त्याच्याकडे आपण गुन्हा केलेला नाही याबाबत जर काही पुरावा असेल तर उच्च न्यायालयात अर्जासोबत पुरावा म्हणून, ऑडिओ,व्हिडिओ, फोटोग्राफी किंवा व्हिडिओ अशा कोणत्याही स्वरूपात देता येतो.
जसे कोणी आपल्याविरुद्ध चोरी करण्यासाठी आपल्याविरुद्ध खोटे एफआयआर करते तसे आपण त्या वेळी तेथे नसल्याचे पुरावे म्हणून देऊ शकता आणि स्थान कोठे आहे ते पुरावे दिले जाऊ शकतात. वकीलच्या मदतीने पुरावे योग्य रीतीने मांडू शकतात.
आपल्या बाजूने कोणताही साक्षीदार असल्यास, त्याचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल करतांना नक्की उल्लेख करा.
जेव्हा उच्च न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अंतर्गत अर्ज दिला जातो तेव्हा त्यासंदर्भात सुनावणी घेतली जाते आणि न्यायालयासमोर आपण सबळ पुराव्यांच्या आधारे आपले निर्दोषत्व सिद्ध केले तर न्यायालय एफआयआर रद्द करण्याचा आदेश देऊ शकतो.
परंतु जर आपण न्यायालयात आवश्यक पुरावा देऊ शकत नाही ज्याने तुमची निर्दोषता सिद्ध केली असेल तर न्यायालय हा अर्ज नाकारते. त्यानंतर एफआयआर दाखल झालेल्या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले जातात आणि न्यायालयात सुनावणी सुरु होते.
उच्च न्यायालयात अर्ज नाकारल्यानंतर आपण  सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागू शकतो. येथे एक महत्वपूर्ण मुद्दा देखील आहे की जर कोणी आपल्या विरूद्ध खोटा एफआयआर करतो.
आपण त्याच्या विरुद्ध न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अन्वये एक अर्ज द्याल, तेव्हा न्यायालय निर्णय देईपर्यंत पोलिस आपल्या विरुद्ध कारवाई करू शकत नाही आणि आपल्याला अटक करू शकत नाही.
चौकशीसाठी तपासणी अधिकाऱ्याला न्यायालय आवश्यक ते निर्देश देखील देऊ शकतात. जर न्यायालयाने यांत आपले निर्दोषत्व मान्य केले तर आपण वरील खोटे एफआयआर,आपली बदनामी या प्रकरणात त्या व्यक्तीच्या विरोधात होते मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतात.
(फौजदारी प्रक्रिया संहिता २५०) यांत  ज्यांनी खोटा एफआयआर दाखल केला आहे त्यांना सुद्धा शिक्षा मिळू शकते.
अजून एक पर्याय म्हणजे भारतीय दंड विधानाच्या कलम २११ नुसार आपण त्याविरुद्ध एक केस दाखल करू शकता, ज्यामध्ये खोटा एफआयआर देणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांची शिक्षा तसेच दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा दोन्ही या स्वरूपात शिक्षा हो शकते.
तसेच, भारतीय दंड विधानाच्या कलम १८२ नुसार, ज्या पोलिस अधिकाऱ्याने खोटे एफआयआर दाखल केला आहे,त्याच्यावर देखील कारवाई होते आणि तो अधिकारी शिक्षेस पात्रअसतो. २. संविधानाच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत आपण उच्च न्यायालयात खोट्या एफआयआरच्या विरूद्ध अर्ज करू शकता:
संविधानाच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत रिट याचिकाः
जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीविरूद्ध खोट्या एफआयआर दाखल केला असेल तर अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीने संविधानच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत एक रिट याचिका दाखल करू शकतो ज्याद्वारे खोटा एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज देऊ शकता.
उच्च न्यायालयाने पुरावे तपासल्यानंतर, असे सिद्ध झाले की ज्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे तो निर्दोष आहे, मग तो खोटा एफआयआर रद्द होतो.
अशा पद्धतीने कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन आपण खोट्या एफआयआर विरुद्ध लढा देऊ शकतो.

आंबेडकर यांची अकोल्याची उमेदवारी कॉंग्रेसची खेळी का आंबेडकर यांची युती…? वं.ब.आ. च्या कार्यकर्त्याला व मतदाराला पडलेला प्रश्न -: राजेश खडके सकल मराठी समाज




                 कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभेचा प्रचार सुरु केला आहे.एमआयएम बरोबर वंचित बहुजन आघाडी तयार केल्यानंतर या दोन्ही पक्षाला मोठा झटका बसलेला या संपूर्ण महाराष्ट्र राज्याने पाहिला आहे.त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीसाठी १२ जागांचा प्रस्ताव सादर करून महाराष्ट्र राज्यात दिवस रात्र फिरून कष्ट करून सभांचा धडाका सुरु केला आहे.वंचित बहुजन आघाडीची राज्यात एवढी मोठी चर्चा झाली की,सभेला लाखोंची संख्या वाढली आहे असे असताना या लाखोच्या गर्दीच्या सभेमधून ओवीसी गायब झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.त्यातच बाळासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांची भेट घेतली आहे.याचाच फायदा कॉंग्रेसने घेऊन वंचित बहुजन आघाडीचा १२ जागांचा प्रस्ताव फेटाळला असल्याचे जाणकार यांचे मत आहे.कारण छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे असल्यामुळे बाळासाहेबांनी महाआघाडीत जाण्यासाठीचे रस्ते खुली केली आहेत …? असा प्रश्न जाणकारांनी दावा होता आणि हा दावा कॉंग्रसने जाहीर केलेल्या उमेदवारी वरून तरी निश्चित झाल्याचे दिसत आहे.परंतु आंबेडकर जाणकारांचे असे मत आहे की,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन आंबेडकर यांनी कॉग्रेसला येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणा बरोबर असेल असा डाव टाकल्यामुळे ही उमेदवारी कॉंग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी जाहीर केली आहे.तसेच जाणकार असे म्हणतात की,प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातूनच उमेदवारी लढत असतात त्यामुळे त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता भ्रमित होणार नाही.कारण सोलापूर येथील कार्यकर्त्यांचे मत असे आहे आंबेडकर यांनी आमच्याकडून निवडणूक लढवावी.पण आमच्या सकल मराठी समजाचे असे मत आहे की,एमआयएम प्रमुख ओवीसी यांचा नाराजीचा सूर आहे आता कॉंग्रसच्या खेळी मुळे ते नाराज आहेत की भेट अस्त्रामुळे नाराज आहे परंतु आमच्या म्हणण्या प्रमाणे ओवीसी हे आंबेडकर यांनी घेत्लेलेया भूमिकेमुळे नाराज आहे.कारण एमआयएम हा वंचित बहुजन आघाडीतील महत्वाचा घटक आहे त्याला विश्वासात घेऊनच आंबेडकर यांनी बीड नाशिक आणि म्हाडा येथील उमदेवारी जाहीर करणे गरजेचे होते त्यातच पश्चिम महाराष्ट्र मधून त्यांचेशिवाय मुस्लीम उमेदवार जाहीर करणार असे त्यांनी बोल्यामुळे ओवीसीची सभांना गैरहजेरी लागत आहे.एकंदरीत राजकीय जाणकारांचे असे म्हणणे आहे की,आबेडकर यांच्या जाहीर सभांचा आढावा घेतला असता आणि त्या सभांच्या भाषणाचे अवलोकन केले असता स्पष्टपणे असे दिसून येते की,प्रकाश आंबेडकर यांची कॉंग्रेस बरोबर झालेली युती असल्यामुळे अकोल्यातून प्रकाश आंबेडकर असतील असे जाहीर केलेल्या उमेदवार यादीतून दिसून येते.














Saturday, January 12, 2019

प्रकाश आंबेडकर यांचे भेट अस्त्र कोणासाठी..! बहनजी याची भेट झाल्यास समीकरण बदलेल....! राजेश खडके सकल मराठी समाज


                             विषय असा आहे की,संसदीय राजकारण करीत असताना इतर राजकीय मित्रांची सांगड घालून नवी समीकरणे उभी करावी लागतात यात काही दुमत नाही.परंतु हि समीकरणे अमलात आणीत असताना त्याचा आपल्यावर दुष्परिणाम तर होणार नाही ना याची काळजी फार घ्यावी लागते हे कोणाला सांगावे असे मला वाटत नाही.परंतु राजकीय आढावा घेतला तर सध्या वरच्या स्थरावरचे राजकारण वंचित बहुजन आघाडीला कोंडीत पकडण्यासाठीचे सुरु आहे हे मात्र निश्चितपणे संसदीय राजकारण समजणारा कार्यकर्ता नक्कीच समजून जाईल हे कांही सांगायचे कारण आहे असे मला वाटत नाही.प्रकाश आंबेडकरांचा १२ जागांचा प्रस्ताव जवळ जवळ कॉंग्रेसने नाक्र्ल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.कारण काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार आणि कॉंग्रेसचे राहुल गांधी यांची बैठक झाली आणि या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेसाठीच्या ४८ जागांचे आपसात वाटप झाले आहे त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला २३ जागा तर कॉंग्रेसला २५ जागा मिळाल्या आहेत.याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीच्या १२ जागांचा प्रस्ताव नाकारण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत.त्यामध्ये आता कॉंग्रेस पक्ष त्यांच्या मित्र पक्षाला काय देणार आणि स्वत:कडे काय ठेवाणार आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे नवीन अस्त्र म्हणजे नवीन मित्रांची जुळवणी अस्त्र बाहेर काढले आहे आणि ते म्हणजे "भेट अस्त्र" यामध्ये त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जुळवणी करीत आहेत काय...? अशा चर्चेला उधाण आले आणि तशा प्रकारच्या सोशल मिडीयावर बातम्याही प्रसिध्द झाल्या आहेत.यातच सकल मराठा समाजाच्या महाराष्ट्र क्रांती सेनेच्या पक्ष नेतृत्वाने आंबेडकर यांची भेट घेऊन युतीचा प्रस्ताव सादर केल्याची बातमीही एका वेब चॅनलला प्रसारित झाली आहे.नव्यानेच शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांची भेट घेऊन प्रकाश आंबेडकर मराठा-ओबीसी समीकरण आखीत आहेत असे दिसते.परंतु सामन्य कार्यकर्ता आणि मतदार यांना असा प्रश्न पडला आहे की या भेट अस्त्राचा परिणाम प्रकाश आंबेडकर कोणासाठी वापर करीत आहे.आणि या अस्त्राचा खरच परिणाम होणार आहे काय...? हा ही विचार होणे गरजेचे आहे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.जर खरेच भेटीचे अस्त्र जर प्रकाश आंबेडकर यांना मजबूत कराचे असेल तर त्यांनी मायावती बहन यांची भेट घेतली पाहिजे याचा परिणाम नक्कीच होईल यात काही दुमत नाही.कारण आता वेळ राहिलेली नाही कॉंग्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रस यांनी आपला प्रचार सुरु केला आहे.

Friday, January 11, 2019

माता जिजाऊ यांच्या ४२१ व्या जयंती निमित्ती माझे दोन शब्द ....! राजेश खडके सकल मराठी समाज



माता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये सिंध्दखेड येथे लाखोजी जाधव यांच्या घरामध्ये झाला आहे.आज त्यांची ४२१ वी जयंती आहे या जयंती निमित्ती कोटी कोटी प्रणाम....! मित्रहो आपणास माता जिजाऊ कोण होत्या हे सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.परंतु त्यांच्या कार्याला आणि इतिहासाला पुन्हा उजाळा मिळावा म्हणून काय इतिहासातील गोष्टी समोर आणण्यासाठीचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे.माता जिजाऊ यांचे लग्न वेरुळचे भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्या बरोबर झाले.शहाजीराजे यांचे स्वप्न होते की,रयतेचे राज्य निर्माण झाले पाहिजे आणि इथली रयत आणि शेतकरी तसेच स्त्री यांचे संरक्षण झाले पाहिजे ही संकल्पना त्यांनी त्यांची पत्नी माता जिजाऊ यांना बोलून दाखविली.त्यासाठी लागणारी व्यवस्था म्हणून त्यांनी १६१५ मध्ये पुणे येथे लाल महाल बांधला होता आणि नागरवास या गावी हत्तीच्या वजना एवढी तुळा करून गोर गरीब जनतेमध्ये धन धान्य आणि सोने चांदी स्वराज्याची संकल्पना प्रस्थापित केली पुढे त्याच गावचे नाव तुळा केलेवरून तुळापुर असे पडले.आणि १६३० मध्ये मुरार जगदेव याने याच लाल महालावर हल्ला करून पुणे बेचीराग केले.पुढे १९४५ माध्ये माता जिजाऊ आणि शिवराय पुणे येथील पासलकर वाड्या मध्ये आल्यानंतर प्रचंगगडाचा राजा रायनाक परवारी यांनी हा गड शिवरायांच्या हाती स्वाधीन केला आणि याच गडावर शिवरायांनी माता जिजाऊ यांच्या मार्गदर्शानाखाली यल्या मांगाच्या हातून स्वराज्याचे पहिले तोरण चढवून त्याचे पुढे तोरणागड असे नामकरण केले.त्यानंतर याच दिवशी स्त्रीची बेअबदा गुजर पाटलाची हातपाय कलम करून त्याचा चौरंगा करण्याची शिक्षा पासलकर वाड्यामध्ये देऊन पहिला न्याय निवाडा करून स्वराज्य प्रस्थापित केले.नंतर त्याच बाजूला राजगड उभारून २२ वर्ष स्वराज्याचा राज्य कारभार चालविला.बेचीराग झालेले पुणे आणि लाल महाल दुरुस्त करून पुन्हा त्याची उभारणी केली.स्वराज्याला मान्यताप्राप्त आणि सुरक्षित अशी राजधानी असावी म्हणून रायगड उभारून ६ जून १६७४ मध्ये माता जिजाऊ यांचे आदेशावर पहिला राज्याभिषेक करून आता स्वराज्य प्रस्थापित झाले आहे असा संदेश संपूर्ण जगाला दिला.माता जिजाऊ यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांना तयार करून समतावादी स्वराज्य निर्माण केले.

Wednesday, January 9, 2019

बहनजी वंचित आघाडीत सामील झाल्यास भाऊ मुख्यमंत्री होतील...! राजेश खडके सकल मराठी समाज


           आदरणीय काशीराम साहेबानी संपूर्ण देशामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करून बहुजन समाज पार्टी स्थापन केली पुढे बहन मायवती यांनी याच विचारावर काशीराम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संसदीय राजकारण मोठ्या प्रमाणात केले आहे.तुम्हा सर्वांना सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही परंतु सदरच्या लेखाचा जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्याचा उच्चार याठिकाणी होणे गरजेचे आहे असे मला वाटत आहे.बहुजन समाज पार्टीचा एकंदरीत महाराष्ट्र राज्याचा आढावा घेतला तर असे दिसून येते की,राज्यातील ७० ते ८० मतदार संघात बहनजी यांचा प्रभाव आहे आणि हा पक्ष आंबेडकरी विचारांचा आहे यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही.एकंदरीत आजची परिस्थती पहाता बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यातील बऱ्याच विधानसभेच्या मतदार संघावर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यामतून प्रभाव निर्माण केला आहे.उत्तर प्रदेश मध्ये बहन मायावती यांनी अखिलेश यादव आणि अजित जोगी यांना बरोबर घेऊन कॉंग्रेसला बाजूला सारून आघाडी तयार केलेली आहे.त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यात बहन मायावती वंचित बहुजन आघाडीत सामील झाल्यास राज्यातील १७० ते १८० जागांवर प्रभाव पडु शकतो अशी परिस्थिती आहे.असे जर झाले तर वंचित बहुजन आघाडीला राज्यातील महाआघाडीची गरज पडणार नाही असे स्पष्ट चित्र आहे.छगन भुजबळ यांचे काही राज्यात ओबीसी मतावर प्राबल्य आहे यात काही दुमत नाही परंतु त्यांचेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पगडा आहे.बाळासाहेब सध्या ओबीसी कार्ड खेळत आहेत त्यानी हे राजकीय समीकरण नक्की आखावे पण हे आखीत असताना आंबेडकरी विचारांचा बहनजीकडे असणारा मतदार आपल्याकडे कसा येईल याचीही रणनीती आखली पाहिजे.एकंदरीत आघाडीचे राजकारण पहाता कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात काही पाडेल असे चित्र दिसत नाही त्यामुळे मागणी केलेल्या १२ जागांचा प्रस्ताव त्यांना मान्य करायचा आहे असे दिसत नाही.परंतु हे करीत असताना आकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर निवडून येतील असेही ते म्हणत आहेत जर अशा वाक्याचा अर्थ जर काढायचा असेल तर स्पष्टपणे असे दिसते की,त्यानी पुन्हा एकदा बाळासाहेब जर आघाडीत आले नाही तर ते त्यांच्या विरोधी षड्यंत्र केल्याशिवाय गप्प बसणार नाही.छगन भुजबळ यांची जरी बाळासाहेबानी भेट घेऊन एक दबावतंत्र निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला असेल तरी ते काही वंचित बहुजन आघाडीच्च्या गळाला लागेल असे वाटत नाही.परंतु बहन मायावती यांना जर वंचित बहुजन आघाडी बरोबर जोडण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी केला तर निश्चितच बाळसाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली वंचित बहुजन आघाडी १४० जागा निवडून येतील आणि मुख्यमत्री पदावरील वंचित बहुजन आघाडीचा दावा हा मजबुतीने बसेल आणि महाराष्ट्र राज्याचा भावी मुख्यमंत्री हे डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे नातू असतील यात काही कोणाचे दुमत असायचे कारण नाही.परंतु जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचे असतील तर बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही बहन मायावती यांचेवार दबाव गट निर्माण केला पाहिजे.आमच्या तर सकल मराठी समाजाचे असे मत आहे की,यासाठीचा प्रयत्न आपण सर्वानी केला पाहिजे जर बहन मायावती वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाल्यास भाऊ प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील आणि हि संधी पुन्हा येईल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत नाही.त्यामुळे अशा संधीचा फायदा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घ्यावा यासाठी सकल मराठी समाजाचा दाखल प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने मान्य जरी केला नाही तरी चालेल....त्यामुळे बहनजी वंचित आघाडीत सामील झाल्यास भाऊ मुख्यमंत्री होतील ही काळ्या दगडा वरील पांढरी रेष आहे...!

Tuesday, January 8, 2019

सकल मराठी समाजाचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे सादर ः राजेश खडके


साहेब कॉंग्रेस धोका देणार....पण वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि मतदार आपल्या शब्दाबाहेर नाही....! राजेश खडके सकल मराठी समाज

 
 
                              भीमा कोरेगाव हल्ल्यानंतर वंचित घटकासाठी आता एकच विश्वास म्हणजे आदरणीय बाळसाहेब आंबेडकर असे समीकरण झाले आहे.यातच आता तिसरा पर्याय म्हणून देशातील जनता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी संघटना यावर विश्वास ठेवताना दिसत आहे.त्यामुळे इतर राजकीय पक्ष आता पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत आहेत.त्यामुळे इथली बामणी व्यावस्था मोठ्या प्रमाणात कामाला लागलेली दिसत आहे.सुरुवातीपासून कॉंग्रेसने नेहमी वंचित घटकांना गुलाम केल्याची परिस्थिती संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे.आरक्षित जागेतून समाजाचा प्रतिनिधी निवडणून येत नाही तर गुलाम निवडून येतो असे सुतोवाच आपण केले आहे.यातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेस हे जळते आहे असे म्हणाले होते.त्यामुळे नेहमीच सत्तेपासून आंबेडकरी पक्ष दूर ठेवण्याचे कटकारस्थान कॉंग्रेस पक्षाने केले आहे.यातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कॉंग्रेसने निवडणुकीत पराभव करून आपल्याही विरोधात षड्यंत्र करून आपल्यालाही पराभूत केले आहे.त्यामुळे यंदाची निवडणूक ही आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याच्या विश्वासहर्तेची निवडणूक असुन काँग्रेसी राजकारण हा विश्वास कसा संपेल याचे षड्यंत्र आखीत आहे.त्यामुळे इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते यांना संसदीय निवडणुकीच्या राजकारणात उतरून पक्ष बांधणी करावी असे जाणकारांचे मत आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडी बरोबर जुळणारा घटक नेहमी जोडता ठेवल्यास महाराष्ट्र राज्यातील सत्ता समीकरणे बदलून त्याची चावी आंबेडकरी जनतेच्या हातामध्ये येईल असे जाणकारांचे मत आहे.कॉंग्रेस हा धोका देणारा पक्ष असल्याचे मत आता आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचे झालेले आहे.त्यामुळे तो धोकाच देणार.....! असो शेवटी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहात आणि गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण करीत आहात.सकल मराठी समाजाचे एवढेच म्हणणे आहे की,तयार झालेला मतदार हा वंचित असून त्याचा हिरमुस होऊ नये हीच अपेक्षा....!
धन्यवाद

Monday, January 7, 2019

लाखोंच्या गर्दीचा फायदा आंबेडकर यांनी मतात परिवर्तीत करून आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा.....! राजेश खडके सकल मराठी समाज

              एकंदरीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभांना होणारी लाखोची गर्दी पहाता ते करीत असलेल्या कष्टाचे अवलोकन आपणा सर्वांना झालेच असेल यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.बाळसाहेब आंबेडकर यांनी भीम कोरेगाव विजयस्तंभाबाबत घेतलेली भूमिका सकल मराठी समाजाने उभारलेले शंभूराजे सन्मान अभियान यशस्वी झाल्याची नोंद संपूर्ण जगात झाली असल्याचे आता समोर आले असल्याचे जाणकार यांचे मत आहे.या शंभूराजे सन्मान अभियानात आदरणीय अंजलीताई आंबेडकर सहभागी झाल्या होत्या.मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मा.प्रवीणदादा गायकवाड आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक मा.शांताराम कुंजीर यांनी त्यांचा सहभाग दर्शविला होता.संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक तसेच छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याचे पहिले सरनोबत वीर बाजी पासलकर यांचे विचार वंशज मा.विकास पासलकर आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मा.संतोष शिंदे यांचा सहभाग होता.कोल्हापूर गादीचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले या शंभूराजे अभियानात प्रत्यक्ष सहभाग देऊन सामील झाले होते.डा बाबसाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट देऊन असे उदगार काढले होते की,"जो इतिहास वाचणार नाही,तो इतिहास घडविणार नाही" या त्यांच्या भूमिकेला येत्या १ जानेवारी रोजी वढू येथील शंभूराजे यांच्या समाधीस्थळी जमलेल्या लाखोच्या जनसमुदायामुळे सन्मान प्राप्त झाला आहे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.इतिहासातील महार योध्यांची कर्तबगारी आता जवळ जवळ संपूर्ण देशाने मान्य केले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.हीच भूमिका मान्य करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकासाठी वंचित बहुजन आघाडी निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील अलुतेदार आणि बलुतेदार यांना न्याय देण्याच्या भूमिकेचे स्वागत झाले असल्यामुळे संपूर्ण वंचित घटक त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.परंतु जर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी या संधीचा जर फायदा वंचित बहुजन आघाडीसाठी करून घेतला नाही तर अशी संधी त्यांना पुन्हा प्राप्त होईल असे वाटत नाही.बाळासाहेबांनी राजकीय कोंडीत पकडण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसत आहेत.....ते कोंडीत सापडू शकत नाही परंतु यासाठी जमत असलेला लाखोचा जनसमुदाय मतात कसा परिवर्तीत होईल यासाठी मोठी शर्त त्यांना करावी लागेल.एकंदरीत त्यांची राजकीय खेळी पहाता आता पर्यंत ते यशस्वी झाले असल्याचे दिसून येते......परंतु समाजात फिरत असणारा विरोधाचा संदेश वेळीच रोखला पाहिजे आणि तळ्यात मळ्यात न रहाता आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली पाहिजे.लाखोच्या सभा ह्या लोकसभेसाठीच्या ४८ जगासाठी आणि विधानसभेसाठीच्या २८८ मतदार संघासाठी कशा फायदेशीर ठरतील याचा विचार होणे गरजेचे आहे.असो सकल मराठी समाजाने सादर केलेला प्रस्ताव स्वीकारून त्यांचा सन्मान व्हावा हिच अपेक्षा....!

Sunday, January 6, 2019

बाळासाहेबांची राजकीय रणनीती ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना बुचकळ्यात पाडणारी आहे....? राजेश खडके सकल मराठी सामाज


                                       संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे.त्यातच २०१९ मध्ये १६ सभेंचे आयोजन करून त्यांनी इथला वंचित मतदार याचा विश्वास मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि तो जवळ जवळ यशस्वी होईल असे जाणकारांचे मत आहे.परंतु एक गोष्ट मात्र इथला सामाजिक कार्यकर्ता आणि वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता तयारीला लागला असताना विधानसभेच्या २८८ पैकी फक्त ५० जागा लढविणार असे मध्यंतरी बाळासाहेबांनी घोषित केल्यामुळे इथला मतदार आणि कार्यकर्ता भ्रमित झाला होता.त्याच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडीत होता की,बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला लाखो लोकांची गर्दी होत आहे आणि वंचित बहुजन आघाडी फक्त ५० जागाच लढविणार यावर त्याचे मत असे होते की,मग उरलेल्या २३८ जागासाठी काय करायचे....? याची चर्चा बहुतेक बाळासाहेब यांचेपर्यंत जाऊन पोहचल्याने त्यांनी २८८ जागा लढविणार असल्याचे संकेत दिले आहे असे जाणकार यांचे मत आहे.परंतु जाणकार असेही म्हणतात जर असे झाले तर निशिच्तच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वंचित बहुजन आघाडीच
ठरवेल.लोकसभेसाठी ४८ जागा आहेत त्यापैकी २४ जागी कॉंग्रेस तर २४ जागी राष्ट्रवादी कॉंग्रेस लढविणार आहेत मग आघाडीकडे मागणी केलेल्या १२ जागा वंचित बहुजन आघाडीला मिळणार नाहीत असे दिसते त्यामुळे बाळासाहेबांनी लोकसभेच्या ४८ जागा लढविण्याचे संकेत देत असताना आघाडीची दरवाजे खुली ठेवली आहे हे मात्र निश्चित आहे.परंतु लोकसभेसाठीच्या दोन जागा बाळसाहेब आंबेडकर यांनी जाहीर करून कोणाला काय संदेश दिले आहेत याचा काही थांगपत्ता लागत नाहीये.परंतु एकंदरीत सभा पहाता एमआयएमचे प्रमुख ओविसी काही सभांना हजेरी लावताना दिसत नाही त्यामुळे मतदारात आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचे जाळे पसरत चालले आहे.यातच बाळासाहेबांनी पश्चिम महाराष्ट्रात मुस्लीम समाजासाठी एक जागा घोषित करणार असल्याचे संकेत दिले आहे.त्यामुळे बुलढाणा माळी समाजासाठी तर नांदेड धनगर समाजासाठी जाहीर केले आहे.आता पश्चिम महाराष्ट्रातून मुस्लीम समाजासाठी कोणता जिल्हा निवडतील याची आता वंचित घटक वाट बघून आहे.परंतु हे सर्व करीत असताना इथला एमआयएम पक्षाचा विचार होतोय किंवा नाही याचीही वाट इथला मतदार पहात आहे.एकंदरीत बाळासाहेबांची रणनीतीचा आढावा अजून तरी कोणाला लागत नाहीये.परंतु प्रचार सभेंचे नियोजन पहाता प्रत्येक ठिकाणी लोकसभेसाठीचा उमेदवार तयार करीत असताना बाळासाहेब दिसत आहे.यातच त्यांनी २८८ विधानसभेसाठीचे उमेदवार लोकसभेच्या निवड प्रक्रियेत जाहीर करणार असल्याचे संकेत दिले आहेत.असोत बाळासाहेबांची रणनीती ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना बुचकळ्यात पाडणारी दिसत आहे या खेळीचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होणार का....? हा विषय फक्त येथे महत्वाचा आहे.