Sunday, March 31, 2019

पुणे लोकसभा मतदार संघात होणार गिरीश बापट आणि प्रवीण गायकवाड यांची घोर फसवणूक….? राजेश खडके सकल मराठी समाज

“पुणे तेथे काय उणे जिकडे तिकडे सोनेच सोने” अशा प्रकारचा हा पुणे लोकसभा मतदार संघ आहे. वैचारिक, ऐतिहासिक,मौलविक,आद्योगिक आणि व्यावसायिक असलेला मतदार संघ आहे कोणालही या मतदार संघाचा मोह सुटलेला नाही.म्हणून देशाच्या संसदेत या मतदार संघाला अन्यन्य असे महत्व प्राप्त आहे.याच मतदार संघातून आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रवीण गायकवाड यांनी आपली सामाजिक प्रतिष्टा पणाला लावत कॉंग्रेसमध्ये आपल्या समर्थकासह प्रवेश केलेला आहे.तसेच पूर्वीपासून कॉंग्रेसमध्ये असणारे अरविंद शिंदे हे आपल्या शेवटच्या राजकारणाचा जुगार खेळत आहे.मोहन जोशी आपले राजकारण स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहे तर या पुणे शहराचा मान आपल्याला मिळावा आणि आपले शेवटचे आयुष्य चांगले जावे असे गिरीश बापट यांना वाटत आहे.वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर होऊनही म्हणावा तसा प्रचार अद्याप तरी सुरु झालेला नाही. उमेदवार आमच्या पर्यंत पोहचत नाही अशा तक्रारी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करताना दिसत आहे. प्रचाराला चांगला जोर धरावा म्हणून लक्ष्मण माने प्रयत्न करीत आहेत.परंतु कार्यकर्ते या उमेदवाराला अपेक्षाने बघत आहेत.काही जुनी राजकीय कार्यकर्ते आपली चमकोगिरी करण्याच्या नादात असताना दिसत आहे.असो परंतु या मतदार संघावर शरद पवार यांची पकड आहे त्यांच्या मनातील थांगपत्ता लावताना गिरीश बापट आणि प्रवीण गायकवाड तसेच अरविंद शिंदे कमी पडताना दिसत आहेत.वयाच्या अनुमानाने पाहिले तर प्रधानमंत्री होण्यासाठी शरद पवार यांना शेवटची संधी असल्याचे जाणकार यांचे म्हणणे आहे.शरद पवार यांचे राजकारण पाहता महाराष्ट्रातील संपूर्ण कॉंग्रेस त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेली परिस्थिती आहे.म्हणून येणाऱ्या दोन दिवसात शरद पवार हे आपल्या राजकारणाची चुणूक पुणे लोकसभा मतदार संघात दाखवतील यात मात्र कोणतीही शंका बाळगायचे कारण नाही म्हणूनच पुणे लोकसभा मतदार संघ देशाच्या राजकारणात चर्चेत शरद पवार यांनीच आणला आहे असे आमच्य सकल मराठी समाजाचे ठाम मत आहे.म्हणून आम्ही म्हणतो.पुणे लोकसभा मतदार संघात होणार गिरीश बापट आणि प्रवीण गायकवाड यांची घोर फसवणूक….

Saturday, March 30, 2019

कॉंग्रेसकडून प्रवीण गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यास….वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दाखल होईल काय…? राजेश खडके सकल मराठी समाज

          
विषय असा आहे की,गेल्या नऊ महिन्यापासून प्रवीण गायकवाड हे कॉंग्रेस श्रेष्टीच्या पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नात आहेत.आणि उमेदवारी मिळाल्यास प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या उमेदवारीस पाठींबा द्यावा अशी त्यांची आणि बहुजन मराठा वर्गाची आग्रही विंनती आहे.त्यांच्या या विनंतीला प्रकाश आंबेडकर मान देतील काय…? हा त्या वेळेचा प्रश्न आहे.परंतु उमेदवारीच्या रिंगणातून गुरुवार २८ मार्च रोजी प्रवीण गायकवाड यांनी माघार घेतली आणि शनिवारी ३० मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दाखल होणार आणि ही उमदेवारी दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यानी महात्मा फुले वाडा येथे जमावे अशा सूचना शुक्रवारी २९ मार्च रोजी देण्यात आलेल्या होत्या.परंतु प्रवीण गायकवाड यांनी २९ मार्च रोजी सांयकाळी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असे जाहीर केले.आणि त्यानंतर ३० मार्च रोजी दाखल होणारी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी काही तांत्रिक अडचणीमुळे थांबली गेली आहे.आता येथे प्रश्न असा निर्माण झालेला आहे की,३० मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी तर दाखल झाली नाही परंतु ३० मार्च रोजी प्रवीण गायकवाड यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश झालेलां आहे.प्रवीण गायकवाड यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास खरेच वंचित बहुजन आघाडी पाठींबा देणार आहे काय....? असो कोणत्या पक्षांनी कोणाला पाठींबा द्यावा हा ज्या त्या पक्षाचा विषय आहे.परंतु सामजिक स्तरावर प्रवीण गायकवाड यांची मान्यता चांगली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना पाठींबा मिळणार आहे.परंतु त्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांना शांत करावे लागणार आहे.

Wednesday, March 20, 2019

प्रकाश आंबेडकरामुळे धोक्यात आलेल्या बामणी व्यवस्थेला वाचविण्यासाठी कॉंग्रेस आणि मराठा पुढे सरसावले…! चर्मकार समाजाला मिळाली आहे एक संधी…! राजेश खडके सकल मराठी समाज


           एकंदरीत संपूर्ण देशाचे राजकारण पहाता हा देशच बदल्यासाठीचा कार्यक्रम आरएसएसने मोदी-शहाच्या माध्यमातून सुरु केलेला आहे.देशातील सामान्य नागरिकाचे भवितव्य किती भयंकर असणार आहे याची त्याला जाण नाही.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ही धोक्याची घंटा ओळखलेली असल्यामुळे आरएसएस प्रणीत भाजप आणि कॉंग्रेस यांना सपोर्टर असणारा ओबीसी समाज जागृत करून त्यांचा कार्यक्रम थांबविण्याचे मोठे कार्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती अंताची लढाई जरी उभी केली आहे.त्यामध्ये इथल्या मागास जातींचे सर्वेक्षण करून त्यांना शेड्युल्ड ठरवून देऊन ते म्हणाले होते की ज्या वेळेस इथला मागासवर्ग जातीयनिहाय समाज जागरूक होईल तेव्हा तो त्याचे अस्तित्व शोधू लागेल आणि त्याला ज्या दिवशी आपल्या अस्तित्वाचा शोध लागेल त्यादिवशी इथली बामणी व्यवस्था कोलमडून पडेल.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी जातीयनिहाय उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात उभे करून त्या जाती जागरूक केल्या आहेत.त्या संपूर्ण जाती जागरूक झाल्यामुळे खरेच बामणी व्यावस्था आज धोक्यात आलेली आहे.त्यामुळे या बामणी व्यवस्थेला वाचविण्यासाठी इथली कॉंग्रेस आणि मराठा पुढे सरसाविलेला आहे.
कॉंग्रेसची निर्मिती बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी १८८४ मध्ये हिंदू महासभेतून केलेली आहे.ह्या कॉंग्रेसचे एकच देह होते आणि ते म्हणजे इथल्या ब्रिटीश प्रशासनात बामणी व्यावस्था उभे करून ती मजबूत करून इथल्या भारतावर आपले एकाधिकार प्रशासन व्यावस्था निर्माण करायची आणि ही प्रशासन व्यवस्था मजबूत करण्यासाठी आयबी ही गुप्तचर यंत्रणा १८८७ मध्ये त्यांनी उभी केलेली आहे.परंतु स्वतंत्र भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या आयबीला संविधानात्म्क दर्जा दिलेला नाही परंतु आजही ही यंत्रांना सुरु असून या यंत्रणेला नागपूरच्या संघ कार्यालयातून चालविले जात आहे.
इथला ओबीसी याला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांचेनंतर याच बामणी व्यवस्थेने घराणेशाही निर्माण करून त्या घराणेशाहीचा दबदबा गावपातळी निर्माण करून त्या घराणेशाहीवर बामणी व्यवस्थेने ताबा निर्माण केलेला आहे.पेशवाई काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या लढवय्या वर्गाला “मराठा” जात नावाचे लेबल लावण्यात येऊन त्याला अज्ञातवासात ठेवण्यात आले. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्य कर्तुत्वामुळे इथला मागासवर्ग जागरूक झाला आणि तो समतेच्या लढाईत सहभागी झाला.
इथल्या टिळक कॉंग्रेसने ब्रिटीश प्रशासनावर दबाव टाकून इथल्या प्रशासन व्यावस्था बामणी व्यवस्थेच्या ताब्यात घेण्याचे कार्य सुरु झाले.त्यामुळे इथाल्या घराणेशाहीला आपल्या ताब्यात घेऊन धार्मिक खेळ उभा करून संपूर्ण देशात मनुस्मृतीची अमलबजावणी सुरु केली.परंतु टिळकांच्या मृत्यूनंतर इथली कॉंग्रेस मोहन करमचंद गांधी यांच्या ताब्यात आली.आणि इथला ओबीसी त्यांनी जागरूक करून संपूर्ण देशात घरोघरी ती कॉंग्रेस पोचविण्यात आली.त्यामुळे जागरूक झालेल्या इतर समाजामुळे हिंदू संकप्लना धोक्यात येणार असे ज्यावेळेस टिळक समर्थकांना वाटले.आणि ज्या वेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन करून त्यांचे पुढील कार्य सुरु केले तेव्हा इथल्या बामणी व्यवस्थेच्या लक्षात आले की,इथला अस्पृश्य व्यक्ती जागरूक झाला तर पुन्हा आपण संकटात येऊ म्हणून त्या समता सैनिक दलाला प्रतिरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएस या संघटनेची स्थापना कॉंग्रेस मधून बाहेर पडून केशव बळीराम हेगडेवार यांनी केली.पुढे जागरूक झालेला ओबीसी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जागरूक केलेला अस्पृश्य यांच्यासाठीचा संघर्ष उभा राहिला.आणि याच आरएसएस वाल्यांनी व्दिराष्ट्र धर्म संकल्पनेतून महात्मा गांधी यांची हत्या केली.त्यामुळे इथे दोन विचारांचा ओबीसी उभा राहिला एक गांधीवादी आणि दुसरा संघवादी..!
इथला गांधीवादी ओबीसी हा संघवाद्याला महात्मा गांधी यांचा हत्यारा समजत असल्यामुळे तो त्याचेकडे कधी आकर्षित होत नाही.परंतु त्या गांधीवादी ओबीसी वाल्याला हे माहित नव्हते की,गांधी हत्यानंतर इथली कॉंग्रेस ही आरएसएस वाल्यांनी ताब्यात घेतली आहे.परंतु त्या गांधीवादी ओबीसीला जागरूक करण्याचे काम प्रकाश आंबेडकर यांनी केल्यामुळे तो या कॉंग्रेस मधून आणि भाजपा मधून बाहेर पडून तो प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात उतरलेला आहे.त्यामुळे इथला मागास,इतर मागास,दलित,मुस्लीम एकत्र करून प्रकाश आंबेडकर यांनी इथली बामणी व्यवस्था धोक्यात आणलेली आहे.आणि ही बामणी व्यावस्था खरोखरच धोक्यात आल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा ही सत्ता हातात मिळविण्यासाठी आपले स्वीपरसेल बाहेर काढले आहेत.त्यामुळेच कॉंग्रेस संपूर्ण देशात भाजपला फायदा कसा होईल असे काम त्यांनी सुरु केले आहे.परंतु प्रकाश आंबेडकर यांनी हा काँग्रेसी खेळ हाणून पाडल्यामुळे इथल्या कॉंग्रेसने आणि सावरकर समर्थक शरद पवार यांनी या महाराष्ट्रात असे वातावरण निर्माण केले आहे की,घराणेशाहीला राजकीयदृष्ट्या नाराज करून त्यांना भाजपाकडे जाण्यास कळत न कळत भाग पाडले आहे.
एकंदरीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात दिलेले उमेदवार हे कमजोर उमेदवार देऊन त्याची सरशी केलेली आहे.सध्या पोटाला भागेल एवढेच खायचे असे धोरण कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांनी सुरु केलेले आहे.त्यामुळे स्वघरातील व्यक्तींना प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात टीका करून प्रकाश आंबेडकर यांनी जागरूक केलेला समाज भटकाविण्याचे काम सुरु झालेले आहे.छत्रपती शिवराय यांना मानणारा मराठा वंचित बहुजन आघाडी पासून दूर सारण्यासाठी बी जी कोळसे-पाटील यांचा वापर शरद पवार यांनी केला आहे.
बहन मायावती यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात बीएसपी पक्षाचे उमेदवार उभे करायला लावून शरद पवार यांनी इथल्या चर्मकार यांच्या मतांचा प्रश्न मार्गी लावलेला आहे.हा चर्मकार समाज कधीही फुले-शाहू-आंबेडकर विचाराला प्रामणिक न रहाता स्वत:च्या फायद्यापुरता आंबेडकर समर्थक राहिलेला आहे.आज या समाजाला खरेच प्रामणिक रहाण्याची संधी प्राप्त झालेली आहे.त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.आज जर चर्मकार समाज प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राहिला नाही.तर भविष्यात त्याला ही संधी कधीही प्राप्त होणार नाही,त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी उभा केलेला बामणी व्यवस्थेचा लढा हा निर्णायक वळणावर असल्यामुळे सर्वानी त्यांना साथ दिली पाहिजे. त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे की,प्रकाश आंबेडकरामुळे धोक्यात आलेल्या बामणी व्यवस्थेला वाचविण्यासाठी कॉंग्रेस आणि मराठा पुढे सरसावले…! चर्मकार समाजाला मिळाली आहे एक संधी…!

Sunday, March 17, 2019

कोळसे-पाटलांना आंधळ्या प्रेमामुळे शरद पवारांनी फसविले आणि संपविले….वंचित बहुजन आघाडीचा खरा शत्रू आरएसएस….! राजेश खडके सकल मराठी समाज


          प्रश्न असा आहे की,वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार पहाता प्रस्थापित मराठा संपूर्ण महाराष्ट्रात एकटा पडलेला दिसत आहे.प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच अलुतेदार आणि बलुतेदार यांना बरोबर घेऊन १५९ घराणेशाहीला दणका दिलेला आहे.कारण हीच घराणेशाही इथल्या आरएसएस वाल्यांना संरक्षण देण्याचे काम करत आहे…..याला उदाहरण द्यायचे झाले तर जयंत पाटलांचे आपल्याला देता येईल कारण याच घरामध्ये संभाजी भिडे पडून असतो.मिरजच्या झालेल्या दंगलीमध्ये भिडेला कोणी वाचविले हे कोणाला सांगायची गरज नाही असे आमच्या सकल मराठी समजाला वाटत आहे.शरद पवार हे पुर्व्रीपासून सावरकर समर्थक राहिलेले आहेत.महाराष्ट्राचा विकास करीत असताना त्यांनी इथली संस्कृती शिल्लक ठेवली नाही.पाश्चत्य संस्कृतीचे दर्शन यांनी याच आरएसएसवादी यांच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला दिले आहे असो इथे हा विषय नाही.इथे विषय आहे तो कोळसे-पाटील यांचा आता कोळसे पाटील का फसले तर त्यांना लोकसभेत जायचे आहे.आणि लोकसभेत गेल्यावर प्रधानमंत्री म्हणून शरद पवार यांना सपोर्ट करायचा आहे.त्यामुळे कोळसे-पाटील यांना वाटले आपण वंचित बहुजन आघाडी बरोबर राहिल्यास त्यांना महाआघाडीत सामील करून घेऊ आणि असे झाल्यास आपण निवडून जरी आलो नाही तरी आपली वर्णी राज्यासभेवर पवार साहेब लावतील असा शब्द पवार साहेब यांनी कोळसे-पाटील यांना दिलेला आहे.परंतु प्रामणिक असे प्रकाश आंबेडकर यांनी कोळसे-पाटील यांना वंचित बहुजन आघाडीची औरंगाबादची उमेदवारी दिली परंतु त्यांना ही उमेदवारी जनता दल (एस) कडून हवी होती.त्यांच्या या हट्टाला बाळासाहेबानी समर्थन दिले आणि वंचित बहुजन आघाडीचा त्यांच्या उमेदवारीला पाठींबा जाहीर केला.असे असताना त्यांचा हा हट्ट होता की, लाचारी करून कॉंग्रेस बरोबर आघाडी करा..परंतु प्रकाश आंबेडकर त्यांना सांगत होते की जो पर्यंत कॉंग्रेस आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा प्रस्ताव देत नाही तो पर्यंत त्यांच्या बरोबर आघाडी करता येणार नाही.कॉंग्रेसने कोणताही प्रस्ताव तसा वंचित बहुजन आघाडीला दिला नाही त्यामुळे ही आघाडी होऊ शकली नाही.परंतु कोळसे-पाटील यांची गोची ही झाली की,पुण्यात शिवमहोत्सव कार्यक्रमावेळी एकच मंचकावर शरद पवार आणि कोळसे-पाटील उपस्थित होते.उपस्थित भाषणांत कोळसे-पाटील यांनी पवार साहेबांना प्रधानमंत्री पदासाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबाच जाहीर केला.आता असे चालेल काय…? कारण ओवीसी आणि २६० संघटनानी प्रकाश आंबेडकर यांना वंचित आघाडीचा प्रमुख केला आहे.तरीही प्रकाश आंबेडकर हे कोळसे-पाटील यांना काही बोलले नाही राजकारण म्हणून विषय कानामागे टाकला.परंतु कोळसे-पाटील यांची खरी गोची केव्हा झाली जेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी बारामती मधून सुप्रिया सुळे-पवार यांचे विरुध्द नवनाथ पडळकर (धनगर) आणि मावळ मधून पार्थ पवार विरुध्द राजाराम पाटील (आगरी कोळी) यांची उमेदवारी जाहीर केले तेव्हा..कारण ह्या दोन्ही उमेदवारी अडचणीत आली त्यामुळे पवार साहेब कोळसे-पाटील यांना म्हणाले तुम्ही तर मला प्रधानमंत्री करायला निघाले आहेत परंतु माझ्या घरातील दोन उमेदवार धोक्यात आले त्याचे काय…? आता पवार साहेबांना शब्द दिला होता तो तर कोळसे-पाटील यांना पाळायचा होता कारण तो शब्द जर पाळला नाही तर आपल्याला राज्यसभेवर जाता येणार नाही.प्रकाश आंबेडकर यांचेवर बोट उचलण्याची कोणाची हीमत नाही परंतु कोळसे-पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे चांगले मित्र असल्यामुळे ते त्यांना बोलू शकत होते.परंतु इतक्या वर्षे प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर राहून देखील कोळसे-पाटील हे त्यांना ओळखू शकले नाही.बारामती आणि मावळ लोकसभा मतदार संघात उमेदवार देऊ नका असा हट्ट कोळसे-पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचेकडे धरला होता.परंतु समाजाला बांधील असणारे प्रकाश आंबेडकर आपल्या आजोबांच्या विचरा विरोधात जाऊ शकत नाही.परंतु पवार साहेबांना शब्द दिलाय तो तर पूर्ण करायचा आहे.मग दुसरे हत्यार पवार साहेबांच्या आंधळ्या प्रेमापोटी कोळसे-पाटील यांनी बाहेर काढले आणि ते म्हणजे बदनामी…! एवढा चांगला प्रामाणिक मराठा माणूस आंधळ्या प्रेमात पडला आणि त्या प्रेमापोटी आयुष्यभर कमाविलेले धुळीत घालून बसला.ज्या आरोपाला काही अर्थ नाही असे आरोप करून ते फसले आणि संपले…! म्हणून आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे की,कोळसे-पाटलांना आंधळ्या प्रेमामुळे शरद पवारांनी फसविले आणि संपविले….वंचित आघाडीचा खरा शत्रू आरएसएस….!

Saturday, March 16, 2019

प्रस्थापित मराठा घराणेशाहीतील पार्थ पवार विरुध्द वंचित घटक आगरी समाजातील राजाराम पाटील असा सामना मावळ मतदार संघात रंगणार…! राजेश खडके सकल मराठी समाज


मावळ लोकसभा मतदार संघ २००८ साली निर्माण करण्यात आला व ह्यामध्ये पुणे व रायगड जिल्ह्यातील प्रत्येक ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्व आहे हे महत्व ओळखूनच महत्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी रायगडाला व रायगडाच्या परिसराला विशेष महत्व दिलेले आहे.त्यामुळे येथे शेतकरी कामगार पक्षाची ताकद असताना येथे त्यांचा उमेदवार सध्या निवडून येऊ शकत नाही.सध्या तो पक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत आहे.बहुजन समाज पक्षाची २५ हजार मते या मतदार संघात असल्यामुळे शरद पवार हे पार्थ पवार यांची उमेदवारी निवडून आणण्यासाठी बहन मायावती यांना गळ घालीत आहेत.सध्या शिवसेनेचा खासदार म्हणून श्रीरंग बारणे आहेत...त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही सांगता येत नाही.परंतु हा मतदार संघ आरएसएसच्या ताब्यात आहेत रायगडच्या सभेत भाषण करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की,याठिकाणी आरएसएसच्या लोकांकडे बॉम्ब आणि पिस्तुले सापडलेली आहेत.या परिसरात आरएसएसची आतंकवादी अड्डे आहेत.इथल्या खोतांनी कुळाला मारून टाकले आहे.इथल्या कुळासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती आंदोलन केले आहे.स्वराज्यातील आरमाराची शान असलेला आगरी समाज इथल्या मनुवादी व्यावस्थेने भांडवलशाहीच्या माध्यमातून संपविण्याचा घाट घातला आहे.त्यामुळे इथला वंचित घटकांचा अजूनपर्यंत विकास होऊ दिलेला नाही.बरेच असे प्रश्न आहे ती प्रश्न धर्माच्या नावाखाली दाबलेली आहेत.त्यामुळे ज्या प्रकारे बारामती लोकसभा मतदार संघाचे झाले आहे.त्याच प्रमाणे या मतदार संघाचे झाले आहे आणि पुढे होणार आहे.त्यामुळे इथला शिवसेनचा उमेदवारही पडला पाहिजे आणि प्रस्थापित मराठा घराणेशाही देखील उभी राहिली नाही पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेऊन आलेला हा आगरी समाजास संसदेत कसे पाठविता येतील याची काळजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी घेतली पाहिजे.कारण हा लढा इथल्या आरएसएस प्रणीत आतंकवादी आणि प्रस्थापित मराठाशाही यांचे बरोबर आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी मोठ्या ताकदीने या आगरी समाजाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

प्रस्थापित मराठा घराणेशाहीतील सुप्रियाताई सुळे विरुध्द वंचित घटक धनगर समाजातील नवनाथ पडळकर असा सामना बारामती मतदार संघात रंगणार…! राजेश खडके सकल मराठी समाज


बारामती मतदार संघाचा आभ्यास केल्यास इतिहासाकडे गेल्याशिवाय वर्तमानात काय करावे हे कळत नाही.बरेच लोक म्हणतात इतिहासात रमणारे वर्तमानात काम करू शकत नाही त्यामुळे इतिहासात न रमलेले बरे…! पण हे सर्व चूक आहे असे आम्ही मानतो.कारण इतिहास हा सिंधू संस्कृतीचा आहे,इतिहास हा गौतम बुद्धांचा आहे,इतिहास सम्राट अशोकांचा आहे,इतिहास हा वारकरी सांप्रदाय यांचा आहे,छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा आहे, इतिहास हा महार योध्यांचा आहे,इतिहास हा महात्मा ज्योतिबा फुले,शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे.आणि जो पर्यंत यांचा अभ्यास होत नाही तो पर्यंत वर्तमान कळत नाही.जेथे जेथे इतिहास घडलेला आहे तेथे तेथे विकास झालेला नाही आणि जो जो इतिहासात चांगल्या कार्यात सहभागी झालेला आहे त्याला वंचित ठेवण्यासाठीचे कार्य इथल्या मनुवादी व्यवस्थेने केले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.बारामती मतदार संघाचा आभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की,भोर-वेल्हा आणि खडकवासला असा ऐतिहासिक भाग या मतदार संघात येतो.याच मतदार संघात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अलुतेदार आणि बलुतेदार यांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले.स्वराज्याचे पहिले तोरण म्हणून वेल्ह्यातील प्रचंडगड ताब्यात घेऊन स्वराज्याचे पहिले तोरण उभारून त्याचे नामकरण तोरणागड केले आहे.याच मतदार संघात स्त्रीची बेअबदा झाली म्हणून गुजर पाटलाचे हातपाय कलम केले आहे.याच मतदार संघात राजगड उभारून तेथून स्वराज्याचा २२ वर्षे कारभार शिवरायांनी चालविलेला आहे.त्यामुळे आजही या मतदार संघातील स्वराज्य उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या वंशाजाचा विकास आजपर्यंत झालेला नाही.१९८४ पासून हा मतदार संघ बारामतीचे शरद पवार यांचेकडे आहे.आज त्याच्या कन्या या मतदार संघातील खासदार आहे.धनगर समाजाचा खूप मोठा स्वराज्यात इतिहास आहे.या समाजातील २५ तरुणानी जेरबंद छत्रपती संभाजी महाराज यांची सुटका करण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती दिलेली आहे.हा अजरामर इतिहास असून आजही या ऐतिहासिक स्थळाचा विकास केला जात नाही.इथल्या वंचित घटकांना कोणताही रोजगार उपलब्ध करू दिला जात नाही.इथले तरूण आजही हमाली करीत आहेत.चौकीदार म्हणून मोठ्या प्रमाणात इथला वर्ग बाहेर गावी काम करत असतो.स्वत;च्या विकासाची स्वत: संधी शोधत असतो.या मतदार संघात धरणे असताना इथल्या शेतीला पाणी दिले जात नाही.पावसाळी शेतीवर इथल्या शेतकरी यांना जगावे लागत आहे.इथल्या शेतकरी यांच्या जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही.इथल्या गोरगरीब लोकांच्या कवडीमोल भावाने जमिनी लाटल्या गेलेल्या आहेत.या मतदार संघात पवार नावाची दहशत असल्यामुळे इथला मतदार दुसऱ्याला मतदान करण्यास घाबरत असतो.परंतु प्रकाश आंबेडकर यांनी याच मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची सभा घेऊन ती दहशत कमी केलेली आहे.याच मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने धनगर समाजाचे नवनाथ पडळकर यांना सुप्रियाताई सुळे-पवार यांचे विरोधात उमेदवारी दिलेली आहे.त्यामुळे इथल्या अलुतेदार आणि बलुतेदार यांना एक बळ मिळालेले आहे.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत न भिता तो वंचित मतदार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पारड्यात भरघोस मते घालून प्रचंड मताने विजयी करणार आहे.त्यामुळे सकल मराठी समाजाचे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की,या धनगर समाजाच्या वंचित घटकातील नवनाथ पडळकर यांची लढाई येथील प्रस्थापित मराठा घराणेशाहीतील सुप्रिया सुळे यांचे बरोबर आहे.त्यामुळे कार्यकर्त्यानी मजबूतपणे नवनाथ पडळकर यांचे कार्य करून त्यांना संसदेत पोहोचवावे.

Friday, March 15, 2019

मी नाराज नाही...आणि नाराज होणारही नाही..! कारण मी वंचित घटक आहे आणि प्रकाश आंबेडकर वंचित घटकांसाठीच लढत आहे….! राजेश खडके सकल मराठी समाज


एकंदरीत सध्याची लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची आणि रोमांचकारी आहे.कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेना यांच्या “वापर योजने” विरुध्द प्रकाश आंबेडकर यांनी लढा उभा केलेला आहे.गेल्या ७० वर्षात फक्त मतदार म्हणून अलुतेदार आणि बलुतेदार यांचेकडे राजकीय समीकरणातून पाहण्याचा जो दृष्टीकोन होता तो दृष्टीकोन प्रकाश आंबेडकर यांनी बदलेला आहे.त्यामुळे इथली राजकीय व्यवस्था आणि पत्रकारिता ज्यांच्या हातात आहे ते पिसाळलेल्या प्राण्याप्रमाणे वागताना दिसत आहे.त्याचे कारण तसेच आहे शरद पवार यांच्या नातवाला म्हणजे पार्थ पवारला तिकीट मिळणार आहे की नाही किंवा त्याला तिकीट मिळाले ह्या बातम्यांना जास्त जोर देण्यात आलेला आहे.परंतु प्रकाश आंबेडकर यांनी इथल्या राजकीय व्यवस्थेने नाकारलेल्या अलुतेदार आणि बलुतेदार या वंचित घटकांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी त्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली गेली याचे काही महत्व वाटत नाही.परंतु आम्ही वंचित घटक आहोत त्यामुळे प्रस्थापित विरुध्द आम्हाला उभे करून आमचा मनसन्मानच प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे त्यात दुमत असायचे कारण नाही.परंतु आमच्या सकल मराठी समाजाने जो प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे सादर केला आहे त्या प्रस्तवा संदर्भात काय निर्णय घेतला हे कळविलेले नाही.स्वाभिमान हा आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकविलेला आहे.त्यामुळे आमचे एवढेच म्हणणे होते की,आमचा प्रस्ताव स्वीकारला अगर नाकारला याबाबत आम्हाला कळविणे गरजेचे होते व आहे.ठीक आहे आमचा प्रस्ताव संदर्भात आम्हाला काही उत्तर जरी दिले नाही तरी चालेल परंतु जाहीर झालेल्या उमेदवारांचा प्रचार करणे संदर्भात अधिकृत आदेश वंचित बहुजन आघाडीने द्यावे अशी आमची आजही विनंती आहे.परंतु त्या संदर्भातही अद्याप आम्हाला कोणताही सांगावा नाही म्हणून पुढे काय करावे असा आमच्या सकल मराठी समाजापुढे पेच निर्माण झालेलां आहे.वंचित बहुजन आघाडी बरोबर २६० संघटना आहेत त्यात २६१ वी म्हणून आम्हाला सहभागी करून घ्यावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.परंतु जर काहीच उत्तर प्राप्त झाले नाहीतर विना आदेश वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारचा प्रचार करणे अतिशोक्ती होईल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.आणि हा आगावपण करण्याचे धाडस आमची सकल मराठी समाज करू शकत नाही.कारण आम्ही आंबेडकर घराणे मानतो आणि आमच्यासाठी त्यांचा आदेश हा महत्वाचा आहे,लोकशाही उत्सव सुरु झाला आहे आम्हाला त्या उत्सवात सहभागी व्हायचे आहे.शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांची आम्ही कार्यकर्ते आहोत.या लोकशाही उत्सवातून आम्ही बाहेर राहू शकत नाही किंवा घरातही बसू शकत नाही.त्यामुळे मी नाराज नाही...आणि नाराज होणारही नाही..! कारण मी वंचित घटक आहे आणि प्रकाश आंबेडकर वंचित घटकांसाठीच लढत आहे….!

भोई समाजाच्या २६ पोटजाती तरीही त्याला महाराष्ट्रात लोकसभेची उमेदवारी नाही...? साहेब आम्हीही वंचित घटक आहोत...! राजेश खडके सकल मराठी समाज


                भोई समाज हा महाराष्ट्रातील मुंबई,ठाणे,रायगड,रत्नागिरी जिल्हे व इतरत्र आढळतो. मासेमारी हा भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे. कोकणातले भोई मासेमारी बरोबर भातशेतीही करतात. कोकणातले भोई खाडी व समुद्रात मासेमारी करतात. तर घाटावरचे भोई गोड्यापाण्यात म्हणजे नदी, तलाव इत्यादीमध्ये मासेमारी करतात. भोई समाजातील सर्व रीती, परंपरा ह्या कोळ्यांप्रमाणेच आहेत. भोई समाजाचे उदरनिर्वाहाचे अन्य प्रमुख साधन म्हणजे दाळे, फुटाणे, बत्तासे, शेवचिवडा बनवणे व विकणे आणि नदीकाठी खरबूज, टरबूजांचे पीक घेऊन त्यांची विक्री करणे.
भोई समाजाच्या देशभरात ३२ जाती-पोटजाती आहेत.त्यापैकी महाराष्ट्रात २६ जाती, पोटजाती आढळून येतात. कवट, कहार, किरात, खाडी भोई, खारे भोई, गाढव भोई, गोंडिया, झिंगा भोई, जातिया, ढिवर, ढेवरा, धीवर, धीमर, धुरिया, नावाडी, परदेशी भोई, पालेवार, बोई, भोई, मछंद्र, मछुआ, मल्हार, मल्हाव, मांझी, राज भोई, अशा भोई समाजाच्या जाती आणि पोटजाती आहेत. महाराष्ट्रात कहारू, जालिया, झिंगा, दुराया, नावाडी, परदेशी, पालेवार, मच्छिंद्र, राज, या आणि अशा एकूण २६ उपजाती या समाजात आहेत. सरकारदृष्ट्या भोई समाज हा देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या प्रवर्गांत समाविष्ट आहे. काही राज्यांत भोई समाज अनुसूचित जातीत, तर काही राज्यात अनुसूचित जमातीमध्ये गणला जातो. महाराष्ट्रात भोई समाजाला अन्य भटक्या जातीमध्ये स्थान देण्यात आले आहे. हा समाज महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या योजनेत 'ओबीसी (अदर बॅकवर्ड क्लास)'तसेच (NT)Nomadic Tribeमध्ये सामील आहे.
मासळी विक्रीच्या व्यवसायात भोई समाजाचा पूर्वापार मोठा सहभाग असला, तरी आता हे प्रमाण २५ टक्के इतके झाले आहे. त्याला कारणे देखील अनेक आहेत. पुणे शहरात या समाजाची सुमारे चार हजार घरे अाहेत. पूर्वी कसबा पेठेत केंद्रित असलेला हा समाज, शहर विकासाबरोबर आणि मुख्यत्वे पानशेत पुरानंतर पर्वती, लक्ष्मीनगर, महर्षीनगर, मुकुंदनगर आणि पौड रोड परिसरात विखुरला गेला. शिक्षण आणि रोजगाराच्या उपलब्धीमुळे विकासाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आणि अनेकांनी परंपरागत व्यवसाय सोडून विविध क्षेत्रांत सहभाग घेण्यास सुरुवात केली. प्रशासन, व्यापार, वकिली, वैद्यकीय, साहित्य, कला अशा क्षेत्रात या मंडळींनी कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि पेशव्यांच्या काळात नामवंतांच्या पालख्या उलण्याचे काम भोई करत असत. आजही भोई समाजाला पालखी उचलण्याचा मान सर्वप्रथम मिळतो.म्हणून आम्हाला पालखीचे भोई असे म्हटले जाते.परंतु या समाजाचा इतिहास हा स्वराज्याच्या प्रती खूप मोठा आणि लौकिक दाखविणारा असल्यामुळे त्याच्या हातातील तलवार काढून त्याचेवर पालखीचे ओझे देऊन त्याची मुख्य ओळख इतिहासात बुजविण्याचे कार्य इथल्या मनुवादी व्यवस्थेने केली आहे.अशा समाजाला परिवर्तनाची गरज असून त्याला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.याला नेहमीच राजकारणापासून दूर ठेवण्याचे काम केली गेले आहे.

Thursday, March 14, 2019

आंबेडकरी समर्थकांनी प्रामणिकपणा दाखविल्यास.....पुरोगामी महाराष्ट्राचे उद्याचे मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर..! राजेश खडके सकल मराठी समाज


गेल्या ४० वर्षापासून जी धडपड प्रकाश आंबेडकर करीत आहे त्याला २०१९ ला आंबेडकरी समर्थकांनी प्रामणिकपणा दाखविल्यास.....पुरोगामी महाराष्ट्राचे उद्याचे मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर असतील यात काही कोणाचे दुमत असायचे कारण नाही.१९५६ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या असत्या तर नक्कीच राजगृहाशिवाय देशात पर्याय राहिला नसता आमच्य या म्हणण्याला कोणी नाकारेल असे आम्हाला वाटत नाही.परंतु काही नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करून आंबेडकर घराणे राजकारणापासून दूर ठेवले होते.परंतु १९८४ ला प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणात प्रवेश करून इथल्या वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत होते.परंतु इथे असणारी अन्नोजी दत्तोच्या टीम नेहमी त्यांना बदनामीच्या छायेत ठेवण्याचा प्रयत्न करीत होती व करीत आहे.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासाकडे बघा या संदेशाकडे कधीही कोणी पाहिले नाही मात्र २०१८ ला प्रकाश आंबेडकर यांनी इतिहासाकडे पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की,स्वराज्यातील अलुतेदार आणि बलुतेदार हा महत्वाचा घटक असून इथल्या मनुवादी व्यवस्थेने त्यांना विकासापासून दूर ठेवले आहे.आणि काही मोजक्या घराणेशाहीच्या हातात इथली सत्ता दिलेली आहे.त्यामुळे इथली घराणेशाही मोडीत काढल्याशिवाय इथल्या वंचित घटकांना न्याय मिळणार नाही.तेव्हा भगव्याचा विरोध कितपत यीग्य आहे याचा शोध घेतला पाहिजे.जेव्हा प्रकाश आंबेडकर यांना भगव्याचा शोध लागला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की,मनुवादी व्यावस्था आणि भगव्या ध्वजाचा काहीही संबध नाही.जो इतिहासाचा जाणकार आहे त्याला भगव्या ध्वाजाचा इतिहास माहित आहे.ज्याला तो इतिहास माहित नाही त्याने त्याचा अभ्यास केला पाहिजे.त्याने आभ्यास केल्यास नक्कीच त्याला इथली सिंधू संस्कृती आणि २२ प्रतिज्ञा यात कोणताही फरक जाणविणार नाही.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केल्यानंतर हेगडेवार यांनी १९२५ मध्ये आरएसएस स्थापन करून त्या संस्थेला भगवा ध्वज न घेता स्वस्तिक असलेली काळा ध्वज घेतला होता.पुरोगामी विचारांची संघटना म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांनी १९६६ ला शिवसेना स्थापन करून त्या संघटनेला भगवा ध्वज स्विकारला होता.परंतु प्रबोधनकार ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्या भगव्या ध्वजाला हिंदुत्ववादी विचारसरणीची जोड दिली.जनसंघाचे रुपांतर भारतीय जनता पार्टीत झाले तेव्हा त्यांनी १९८० मध्ये हिंदुत्ववादी भगवा ध्वज स्वीकारून तो समतेपासून कधी दूर नेला हे आपल्याला कळलेच नाही.म्हणून आज त्या समतावादी भगव्या ध्वजाला आपण हिंदुत्ववादी ध्वज म्हणून पाहतोय.असो हा इतिहास खूप मोठा आहे पुढे हळू हळू याचे विश्लेषण देईल,परंतु इतिहासाची ओळख किती महत्वाची असती हे आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलेले आहे.म्हणून आरएसएसचे खरे रूप जगासमोर मांडण्याचा आभ्यास प्रकाश आंबेडकर यांचा झाला आहे.त्यामुळे आर]एसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचे कार्य सुरु करून प्रकाश आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने इथल्या वंचित घटकांना न्याय देण्याचे कार्य सुरु केले आहे.परंतु या आरएसएसचे पालन पोषण इथली कॉंग्रेस करीत असल्यामुळे त्यांना आरएसएसला रोखायचे नाही म्हणूनच ते संविधानाच्या चौकटीत बसविणे संदर्भात कोणतीही पावले उचलत नाही.त्यांची ही भूमिका इथल्या अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेऊन मोठ्या संखेने वंचित बहुजन आघाडीत सहभागी झाले आहेत.परंतु स्वत:ला आंबेडकर चळवळी कार्यकर्ता म्हणविणारा मोठ्या प्रमाणात प्रकाश आंबेडकर यांना आणि त्यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचे काम करीत आहे.एकतर त्याला इतिहासाचा आभ्यास नसेल किंवा स्वार्थ भावनेपोटी तो विरोध करीत असेल परंतु जर खरा आंबेडकर समर्थक प्रामणिकपणे प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राहिला तर...आंबेडकर घराण्यातील वारस उद्याचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

Wednesday, March 13, 2019

मायावती यांचा वंचित बहुजन आघाडीला अघोषित पाठींबा…? तर मत विभाजन करून २०१९ साठी कॉंग्रेसची भाजपाला साथ…! राजेश खडके सकल मराठी समाज


एकंदरीत कॉंग्रेसचे संपूर्ण देशात राजकारण पहाता बुडत असलेल्या भाजपाला संपूर्ण देशात मत विभाजन करून २०१९ ला पुन्हा सत्तेच्या राजकारणा जवळ नेण्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर म्हणतात की,कॉंग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकत चाललेली दिसत आहे.त्याला तसेच कारणही आहे कधी जानवे न घालणारा व्यक्ती राहुल गांधी जानवे घालून प्रर्दशन करीत असताना संपूर्ण जगाने पाहिला आहे.२०१९ ची निवडणूक लढवीत असताना प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीत येण्यासाठीचा जो प्रस्ताव कॉंग्रेसकडे सादर केला होता तो प्रस्ताव कॉंग्रेसने मान्य केला नाही.कॉंग्रेसने जर आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसविले असते तर नक्कीच प्रकाश आंबेडकर हे महाआघाडीत सहभागी झाले असते.कारण महाराष्ट्रात कॉंग्रेसकडे नेतृत्व न राहिल्यामुळे त्यांना २५ जागी देण्यासाठी उमेदवार शिल्लक राहिलेले आपल्याला दिसत नाहीये.त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला पाठींबा देणे गरजेचे होते.परंतु देशातील कॉंग्रेसची खेळी पहाता त्यांच्याकडून भाजपाला पुन्हा एकदा सत्तेकडे घेऊन जाण्याची तयारी सुरु झाली असल्याचे दिसून येते.त्याचे कारण असे आहे की,आरएसएसला संपूर्ण देश व्दिपक्ष राजकारणातच अडकवून ठेवायचा आहे.देशात तिसरा पर्याय उभा राहून द्यायचा नाही.त्यामुळे कॉंग्रेसने दिल्लीत आप बरोबर आघाडी केलेली नाही सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करून मत विभाजन करून भाजपला साथ द्यायची आहे.बहुजन समाज पक्षा बरोबर जागांच्या वाटाघाटी सन्मान पूर्वक केल्या नाहीत याउलट उत्तर प्रदेश मध्ये सपा-बीएसपी यांचे विरोधात जास्तीत जास्त उमेदवार उभे करून मत विभाजनाचा फायदा भाजपाला कसा होईल याचीच काळजी घेतली जातेय.त्यामुळे मायावती आणि प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसची राजनीती ओळखलेली आहे.म्हणून महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अघोषित पाठींबा देण्याच्या तयारीत मायावती असल्याचे जाणकार यांचे मत आहे.त्यामुळे महाराष्ट्रात मत विभाजनाचा आरोप प्रकाश आंबेडकर यांचेवर लावण्याच्या सुरुवात कॉंग्रेसने केली आहे.त्यांनी असे काही दलाल बाजारात सोडले आहेत ते दलाल सोशल मिडीयावर,चौका चौकात,वस्ती पातळीवर आणि गावोगावी हाच प्रचार करीत आहेत.चळवळीच्य बैठकी ठिकाणी सहभागी होऊन ते मत विभाजनाचा आरोप वंचित बहुजन आघाडीवर करीत आहे.त्यामुळे अशांना जशाच तसे उत्तर आंबेडकर समर्थक यांनी दिले पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.म्हणूनच सर्वानी एकत्र येऊन या स्वराज्याच्या गद्दार आन्नोजी दत्तो आणि त्याच्या टीमला धडा शिकवून छत्रपती संभाजी महाराज यांनी कसे हत्तीच्या पायी कसे दिले याची आठवण करून दिली पाहिजे.आमच्या सकल मराठी समाजाचे असे म्हणणे होते की,जेव्हा जनमत तयार होईल तेव्हा देशातील आरएसएस आणि कॉंग्रेस संपुष्टात येईल.आज जनमत तयार होताना दिसत आहे त्यामुळे कॉंग्रेस आणि आरएसएस संपण्याच्या मार्गावर असल्यामुळे बहन मायावती ह्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला अघोषित पाठींबा देतील असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.


Tuesday, March 12, 2019

सकल मराठी समाजाचा प्रकाश आंबेडकर यांच्या सोलापूरच्या उमेदवारीस पाठींबा का….? कारण आरएसएसकडे गेलेला स्वराज्याचा भगवा परत मिळविण्यासाठी….! राजेश खडके सकल मराठी समाज


स्वराज्य खूप कष्टाने आणि अलुतेदार व बलुतेदार यांच्या बलीदानावर शिवरायांनी उभे केलेले होते हे कोणालाही विसरून चालता येणार नाही.स्वराज्यात तुळापुरला खूप महत्व होते आणि हे महत्व कोणीही आपल्याला सांगणार नाही.स्वराज्य असावे अशी शहाजीराजे यांची संकल्पना होती आणि ती माता जिजाऊ यांचे बरोबर त्यांनी शेअर केली होती.त्यामुळे स्वराज्याचे महत्व माता जिजाऊ याना समजले होते.स्वराज्य उभारणीसाठीची जमीन शहाजीराजे यांनी तयार केली होती हे कोणी आपल्याला सांगणार नाही.परंतु स्वराज्य उभारणीत खूप मोठे योगदान शहाजीराजे यांचे होते त्यामुळे त्यांना झाकण्याचा प्रयत्न सर्वच स्थरावर केला जातोय हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण शहाजीराजे यांचे गाव वेरूळ आहे.वेरूळ हे बौध्द लेण्यासाठी प्रसिध्द असलेले ठिकाण आहे.त्यामुळे शहाजीराजे वास्तव्य लेण्यामध्येच गेले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.इतिहासात हिंदू नावाचा शब्द केव्हा दाखल झाला याचे काही पुरावे उपलब्ध नाहीत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते असे मानण्यास कोणताही पुरावा उपलब्ध नाही.परंतु भगव्या ध्वजाला ऐतिहासिक महत्व होते हे आपल्याला नाकरून चालणार नाही कारण इतिहासात भगवा ध्वज समतावादी होता याला अनेक पुरावे आहेत.प्रथम भगव्या ध्वजाची निर्मिती ही गौतमीपुत्र सिध्दार्थ यांनी केली आहे.पिंपळाचे वृक्ष प्रथम गौतम बुध्दानी जगा समोर आणलेली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि सम्राट अशोक यांनी याच भगव्या ध्वजाला आपल्या समतावादी साम्राज्याचे प्रतिक केले आहे.त्यांच्या नंतर संत नामदेव महाराज यांनी पंढरपूर येथील बौध्द विहारतील गौतम बुद्धांना पांडुरंग म्हणजे कमळाचे फुल असे नाव देऊन वारकरी सांप्रदाय स्थापन करून समतेचे प्रतिक म्हणून हाच भगवा ध्वज वारकरी यांच्या हातात दिलेला आहे.त्यामुळे स्वराज्य संकल्पना असणारे शहाजीराजे यांनी स्वत: पुण्यामध्ये लाल महालाची निर्मिती वासिमचे बांगर यांचेकडून १६१५-१६ मध्ये करून घेतली आहे हे कोणी सांगणार नाही.१६२२ मध्ये नागरवास या गावी हत्तीच्या वजना एवढी तुळा करून त्या वजना एवढे सोने चांदी आणि अन्न धान्य गोरगरीब रयतेमध्ये वाटून १६२२ मध्ये स्वराज्य संकल्पित केले आहे.म्हणून तुळा झालेवरून नागरवास या गावाला तुळापुर असे नाव पडले आहे.हाच समतावादी भगवा ध्वज शिवरायांचा हातामध्ये दिला आणि शिवरायांनी समतावादी स्वराज्य स्थापन केले आहे.शाक्त पंथीय शंभूराजे यांनी वैदिक धर्म पद्धतीत झालेला ६ जून १६७४ चा पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार २४ सप्टेंबर १६७४ मध्ये करून घेतलेला आहे.या राज्याभिषेक पद्धतीला मनुवादी व्यवस्थेने बदनाम करण्याचे षड्यंत्र केले आहे.कारण ज्या देवीची पूजा शंभूराजे करीत होते तिला यांनी अघोरी लोकांची देवी म्हणून जनमानसात पेरण्याचे काम केले आहे.परंतु शंभूराजे ज्या देवीला पुजायचे ती सिंधू संस्कृती मधील पहिली स्त्री राणी होती तिला नेऋती असे म्हणत जिने शेतीचे संशोधन करू अन्न धान्य आणि शेतीच्या अवजारे यांचा शोध लावला,या नेऋतीला शेतात मरीआई म्हणून पूजले जाते.अशांना वैदिक धर्म पंडित कधीही पूजा कारायला जात नाही आणि हे आवर्जून कित्येक वेळा प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेले आहे.अशा शंभूराजे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी “बुधभूषण” नावाचा ग्रंथ लिहिला आहे.बुध म्हणजे विद्वान आणि भूषण म्हणजे गौरवशाली आणि पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “बुध्दभूषण” नावाची प्रिटींगप्रेस काढली होती ती रत्नाकर गायकवाड या मनुवादी गुलामाने उध्वस्थ केली आहे.असा इतिहास पुन्हा उभा राहू नये म्हणून वैदिक धर्म पंडित यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे जिथे स्वराज्य संकल्पित झाले तेथेच म्हणजे तुळापुर येथे केली आहे हे आपण आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. अशा समतावादी संभाजीराजे यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज “ असे नामकरण करून आपल्याला त्यांचेपासून दूर ठेवलेली आहे हे पण आपण आवर्जून लक्षात ठेवले पाहिजे.अशा शंभूराजे यांच्या हत्येचा बदला स्वराज्याचा सरदार सिद्धनाक महार याने भीमा कोरेगाव येथे घेऊन उभी राहिलेली जातीयवादी पेशवाई संपविलेली आहे हे पण कोणी सांगणार नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले काही कार्य आपण आंबेडकर समर्थक म्हणून आभ्यासायला हवे जसे १९२० साली कोल्हापूर गादीचे छत्रपती शाहू महाराज यांची भेट,संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानणे,२४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दलाची स्थापना का केली आणि हाच दिवस का निवडला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य समातवादी होते हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला दाखवून शिवरायांनी केलेला दुसरा राज्याभिषेक दिवसाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.आणि याच दोन्ही दिवसांचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समतावादी भगव्या ध्वजाचाच मान ठेवला आहे.भीमा कोरेगावला भेट देऊन तेथील शूर वीरांना अभिवादन करून महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह करून मनुस्मृतीचा कायदा मोडून मनुस्मृती दहन करून स्वतंत्र भारताला संविधान देऊन २२ प्रतिज्ञामध्ये १० प्रतिज्ञा समता प्रस्थापित करण्याची घेतली आहे.आणि हाच समतावादी भगवा ध्वज प्रधान करून प्रकाश आंबेडकर हे संविधान वाचविण्यासाठी आणि स्वराज्यातील त्या अलुतेदार आणि बलुतेदार यांना म्हणजे बामणी व्यावस्थेने वंचित केलेल्या घटकासाठी लढत आहे म्हणून त्यांना संसदेत निवडून पाठविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे म्हणून सकल मराठी समाजाच्या वतीने त्यांच्या सोलापूर येथील उमेदवारीस सक्रीय पाठींबा आम्ही देत आहोत.

Saturday, March 9, 2019

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनम्र आवाहन….आमच्या सकल मराठी समाजाला समाहून घेण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे गळ घाला…! राजेश खडके सकल मराठी समाज

          गेल्या दोन वर्षापासून भीमा कोरेगाव ते वढू बुद्रुक असा संबध असल्याचे इतिहास सांगत असल्याचे आम्ही सांगत होतो.तशी मांडणीही आंम्ही वेळोवेळी करीत आलो होतो.इतिहासातील महार योध्दा हा प्रामणिक होता आणि शिवराय यांनी उभारलेल्या स्वराज्यात त्याचे मुख्य स्थान होते.अशा महार योध्यांचा इतिहास बाहेर येऊ नये म्हणून शुद्रातून अति शुद्र म्हणून अस्पृश्यता निर्माण करण्यात आलेली होती.ही अस्पृश्यता मजबूत व्हावी आणि इतिहासातील अलुतेदार आणि बलुतेदार यांचा इतिहास भविष्यात कोणाला कळू नये यासाठी मराठा ही जात निर्माण करण्यात आली.छत्रपती संभाजी महाराज बौध्द लेण्याना महत्व देत असत त्यामुळे त्यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या करून त्या हत्येला धार्मिक रूप देण्यात आले होते.परंतु या संभाजी राजांना वाचविण्यासाठी अर्जुना महार आणि रायप्पा महार यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले हे कोणी सांगणार नाही.याच शंभूराजे यांच्यावर गोविंद महार याने अंत्यसंस्कार केले हे कोणी सांगणार नाही.महार योध्दा प्रामाणिक होता आणि त्या प्रामणिकपणेची साक्ष भीमा कोरेगाव देतो हे कोणी सांगणार नाही.अशा अस्पृश्य केलेल्या महार योध्यांचा सन्मान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगावला जाऊन त्या वीरांना मानवंदना देऊन महार रेजिमेंट सुरु केली हे कोणी सांगणार नाही.परंतु ५०० विरुध्द २८००० हजार असा मनाचा इतिहास कोणीही सांगत आले तर तो इतिहास आम्ही खरा मानून आमच्या बुद्धीचे प्रदर्शन करीत आलेलो आहोत.परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले होते म्हणून वैदिक धर्म पंडित यांनी त्यांच्या हत्या केल्या आहेत याचीही आठवण काढायला कोणी तयार नाही.स्वराज्यात तलवार उचलली जात होती ती विचारांची तलवार असायची...परंतु शिवरायांना माहित होते की,तलवारीच्या जीवावर स्वराज्य उभे करता येते परंतु उभारलेले स्वराज्य हे तलवारीच्या जीवावर चालविता येत नव्हते तर ते लेखणीच्या जीवावर चालवावे लागते.त्यामुळे स्वराज्यात संविधान होते आणि लोकशाही होती याचीही साक्ष स्वत: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या भाषणात दिलेली आहे.त्यामुळे इतिहासातील हे युध्द मुस्लीम विरोधी नव्हते तर लोककल्याण करण्यासाठी आणि लोकशाही उभारण्यासाठी होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे आज पुन्हा एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली लोकशाही आणि त्या लोकशाहीला दिलेले संविधान धोक्यात आलेले आहे.हे संविधान वाचविण्यासाठीचा लढा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी सुरु केला असल्यामुळे ऐतिहासिक असणारा अलुतेदार आणि बलुतेदार योध्दा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर उतरलेला आहे.यासाठी आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,अशा लढ्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी उभी केलेली वंचित बहुजन आघाडीत सहभागी होऊन आपले योगदान निश्चित करावे.यासाठी आमच्या सकल मराठी समाजानी वंचित बहुजन आघाडीकडे तसा प्रस्ताव सादर केलेला आहे.हा प्रस्ताव सादर करून आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या संपर्कात आहोत.आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे भारिप बहुजन महासंघ अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अशोक सोनाने यांच्या संपर्कात आहोत.गेल्या नऊ महिन्यापासून म्हणजे मे २ पासून बाळासाहेब आंबेडकर यांची दोन मिनिटांची भेट मागित आहोत.त्यांची भेट का होत नाही किंवा त्यांची वेळ का मिळत नाही याचा काही मागसुम लागायला तयार नाही.म्हणून मी राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज आता प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला,समर्थकाला आणि हितचिंतक यांना विनम्र आवाहन करतो की,आमच्या सकल मराठी समाजाला समाहून घेण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे गळ घाला…! आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या लोकशाही उत्सवात आमच्या सकल मराठी समाजाला सहभागी होऊ द्या….!

Friday, March 8, 2019

पनवेल व रायगड मध्ये प्रकाश आंबेडकर यांची खोती आंदोलनाला सुरुवात…..तर मोदीच्या खोटारडेपणामुळे जगात देशातील नागरिकाची होतेय प्रतिमा खोटारडी…! राजेश खडके सकल मराठी समाज


                विषय असा आहे की,छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेती करण्यासाठी रयतेला जमिनी दिल्या त्यामुळे शेती करणाऱ्याला कुणबी असे म्हणत...या कुणबी समाजाचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याच्या शेतात पिकणाऱ्या मालाला संरक्षण दिले.त्यामुळे वैदिक धर्म पंडितांच्या असे लक्षात आले की,इथला कुणबी जो पर्यंत मारला जात नाही आणि इथल्या जो पर्यंत जमिनी ताब्यात येत नाही तो पर्यंत इथली अर्थव्यवस्था,प्रशासन व्यवस्था आणि राजव्यवस्था ताब्यात येणार नाही.त्यामुळे नंतरच्या काळात कोकणातील मोठ्या प्रमाणातील जमिनी ह्या ब्रिटीश अधिकारी असणाऱ्या व्यक्तीकडे गेल्या त्यालाच खोत असे म्हटले जाते.त्यामुळे कोकणातील खोत हे जास्तीत जास्त प्रमाणात सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ. सापडतील.हे खोत लोक आपल्या जमिनी कसण्यासाठी कुणबी समाजाला द्यायचे आणि इतर कामे करण्यासाठी अलुतेदार आणि बलुतेदार नेमायचे त्यामुळे या लोकांचे खोताकडून मोठ्या प्रमाणात शोषण केले जायचे.असा सुरु असलेला अन्याय जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कळाला तेव्हा ते खोतांच्या विरोधात कुळांच्या बाजूने उभे राहिले.त्यामुळे खोती आंदोलन नारायण नागू पाटील यांचे नेतृत्वात सुरु करण्यास सांगितले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे खोतांच्या जमिनी जो पर्यंत कुळांना मिळत नाही तो पर्यंत शेती पिकवली जाणार नाही असा पवित्रा घेतला.त्यामुळे या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे हे आंदोलन ६ वर्षे चालले.या आंदोलनात बऱ्याच लोकावर गुन्हे दाखल झाले त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्णपणे ताकद लावून हे आंदोलन यशस्वी केले...आणि स्वतंत्र भारतात खोती विरोधी कुळाचा अधिकार १९४९ ला तयार करून तसा न्याय या कोकण वासियांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे.
            परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर खोतांनी दंडेलशाहीच्या जोरावर आपल्या जमिनी कुळाच्या ताब्यात जाऊ दिल्या नाहीत.आणि इथली राजकीय आणि भांडवली व्यवस्था इथल्या खोतांच्या पाठीशी उभी असल्यामुळे कुळ आजही अन्याय सहन करीत आलेला आहे.त्यामुळेच याच भागात सनातनी व्यावस्था मोठ्या प्रमाणात दहशत करून आपले प्रशिक्षण केंद्र चालवीत आहे.पुन्हा खोतांच्या विरोधी कोणतेही आंदोलन उभारले जाऊ नये म्हणून या कोकण वासियांना जास्तीत जास्त धर्मांध कसे करता येईल याकडे लक्ष दिले जाते.म्हणून या खोतांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी पनवेल आणि रायगड येथील वंचित बहुजन आघाडीच्या सभेच्या माध्यमातून आंदोलन पुकारले आहे.त्यमुळे आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा जो प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरु केला आहे.तो योग्य असून आमची सकल मराठी समाज त्यांच्या या मागणीला पूर्णपणे समर्थन करीत आहे.
             प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की,नरेंद्र मोदी हा खोटा माणूस आहे,देशभक्तीच्या खोट्या वल्गना करीत आहे.भारतीय वायुसेनेने जो एअर स्ट्राईक पाकिस्तानवर केला त्याची खरी गरज होती परंतु त्याला उत्तर म्हणून जो पाकिस्तानने आपल्या भारतीय सेनेच्या तळावर हल्ला केला त्याला उत्तर देणे गरजेचे होते.परंतु जेव्हा खरे उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा हे मोदी महाशय समोर आले नाही.मोदी आणि अमित शहा यांनी जो दहशतवादी मेल्याचा ३०० चा आकडा सांगितला आहे तो आकडा युरोपियन मिडीयाने खोडून काढला आहे.त्यामुळे मोदी यांनी खोटारडे पणाचा कळस करून जागतिक पातळीवर भारताची आणि भारतीय नागरिकाची प्रतिमा खोटेपणाची निर्माण केली आहे.त्यामुळे भारतातील नागरिक हा खोटेपणाचे समर्थन करीत नाही ही जर प्रतिमा संपूर्ण जगात उभी करायची असेल तर मोदी सरकारला पाडले पाहिजे.त्यांच्या या मताशी आमची सकल मराठी समाज सहमत असून त्यांनी उभारलेल्या या लढ्याला समर्थन करीत आहोत.त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी यांनी आमच्या सकल मराठी समजाला त्यांचे उमेदवार यांचा प्रचार करण्याचे आदेश प्रकाश आंबेडकर यांनी द्यावेत अशी विनंती करीत आहोत.

Thursday, March 7, 2019

शिवरायांचे स्वराज्य संपविले…..आणि आता डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी उभारलेली लोकशाही संपविण्याच्या मार्गावर….! राजेश खडके सकल मराठी समाज


छत्रपती शिवाजी महाराज यांनी इथला अलुतेदार आणि बलुतेदार यांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापित केले. राज्याभिषेक करून साऱ्या जगामध्ये असा संदेश दिला की,हे रयतेचे राज्य आहे.आणि या राज्यात महिलेच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली आहे.शेतकऱ्याच्या देठाला त्याच्या परवानगी शिवाय हात लावता येणार नाही.म्हणून रयतेच्या राज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे संविधान निर्माण केले त्यामुळे पहिले संविधान देण्याची भूमिका शिवरायांनी राबविलेली आहे.त्यामुळे वैदिक धर्म पंडितांना त्यांची मनुस्मृती राबविता येत नव्हती त्यातच छत्रपती शिवाजी महराज यांचा अकस्मात मृत्यू झाला.नंतरच्या काळात त्यांची विषप्रयोग करून हत्या केल्याचे पुढे आल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांनी वैदिक पंडित यांचेवर केस दाखल करून सुनावणी घेऊन दोष सिद्ध झाल्यावर त्यांना हत्तीच्या पायी दिले आहे.स्वराज्यमध्ये हिंदू-मुस्लीम असा भेद कधीच नव्हता तो लढा मोगलशाही विरुध्द होता.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी होते असा जो संदेश वैदिक धर्म पंडीत यांच्याकडून १९९५ नंतर देण्यात आलेला आहे.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या झालेल्या हत्येनंतर पेशवाईचा उगम झाला आणि त्यानी सर्वात पहिले स्वराज्यातील स्त्रीचे संरक्षण धोक्यात आणले होते.इथला शेतकरी देशोधडीला लावण्याचे काम पेशवाईच्याच काळात सरू झाले.स्वराज्य स्थापनेतील अलुतेदार आणि बलुतेदार यांना देव नावच्या संकल्पनेत उतरून त्यांचेवर एक दहशत बसविण्याचे कार्य सुरु झाले.देव संकल्पनेवर इथला माणूस माणसापासून वेगळा करण्यात आला.काहीना शुद्र तर काहीना अतिशूद्र म्हणून अस्पृश्यता निर्माण करण्यात आली.स्वराज्यातील गुप्तचर यंत्रणा संपवून स्वत:ची गुप्तचर यंत्रणा उभारण्यात आली.छत्रपती शिवरायांनी वैदिक धर्म पद्धतीत केलेला पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार २४ सप्टेंबर १६७४ मध्ये केलेला होता.याच दिनाचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.या दोन्ही दिवसाचे औचित्य साधून डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दलाची स्थापना केली होती.छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या “बुध्दभूषण” ग्रंथाचे वाचन डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी केले होते.छत्रपती संभाजी महराज यांची राजमुद्रा पिंपळाच्या पानावर कोरलेली होती.त्यामुळे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी “बुध्दभूषण” नावाची प्रिंटींग प्रेस सुरु केली होती.आजही भारतरत्न हा पुरस्कार पिंपळाच्या पानावर दिला जातो.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे कट्टरवादी नसताना त्यांना “धर्मवीर” बनविण्यात आले.अशा स्वराज्याच्या संविधानाचा आभ्यास डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचा झालेला होता.त्यामुळेच समता सैनिक दल संपविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आलेली होती.आज हीच संघटना देशाचे संविधान बदलत चालली आहे.देशात समांतर प्रशासन व्यवस्था चालवीत असून आता त्यांनी दहशतवादी कॅम्प उभारले आहेत असे पनवेलच्या भाषणात बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे.त्यामुळे खरेच जर ही व्यावस्था बदलायची असेल तर इथली कुटुंबशाही बदलायला हवी या प्रकाश आंबेडकर यांच्या मताशी आमची सकल मराठी समाज सहमत आहे.त्यामुळे एकंदरीत देशाची परिस्थिती जर पाहिली तर खरेच डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी उभारलेली लोकशाही संपविण्याच्या मार्गावर आहे हे आरएसएस भाजापा मोदीच्या चाललेल्या राजकारणा वरून वाटत आहे.त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजचे असे मत आहे की,शिवरायांचे स्वराज्य संपविले…..आणि आता डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी उभारलेली लोकशाही संपविण्याच्या मार्गावर आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीच्या उत्सवात वंचित बहुजन आघाडीने आम्हाला सहभागी करून घ्यावे….! राजेश खडके सकल मराठी समाज


स्वतंत्र भारतासाठी अहोरात्र कष्ट करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीब-श्रीमंत,उच्च-निच्च,स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव न ठेवता वय वर्षे १८ पूर्ण असणाऱ्या भारत देशातील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिलेला आहे.त्यामुळे दर पाच वर्षानी या भारत देशात याच निवडणूक प्रक्रियेला मोठ्या उत्साहाने निवडणूक आयोगा मार्फत राबविला जातो.संपूर्ण नागरिक या प्रक्रियेत सहभागी होत असल्यामुळे याला लोकशाहीचा उत्सव असे म्हणतात.जे लोक या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत नाही त्यांना मूर्ख असे म्हटले जाते.त्यामुळेच देशातील ३० ते ४० टक्के लोक मूर्ख आहेत म्हणून या देशातील मतांची टक्केवारी ५० ते ६० टक्के पर्यंतच पोहचत असते.त्यामुळे ज्याला मताचा अधिकार आहे अशा व्यक्तींनी मोठ्या उत्सवात हा लोकशाहीचा उत्सव साजरा केला पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.आरएसएस मोदी सरकार हा उत्सव बंद करण्याच्या मार्गावर आहे. एकदा हा उत्सव बंद झाला तर या देशातील वंचित घटकांना वाचविण्यासाठी पुन्हा कोण येणार नाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नाव पुन्हा एकायला मिळणार नाही...कारण त्यांनी दिलेले संविधानच बदलले जाणार आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू हे संविधान वाचविण्यासाठी आणि हा लोकशाहीचा उत्सव अबाधित ठेवण्यासाठी लढत आहे.म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे.या आघाडीच्या माध्य्यमातून रस्तेच्या कडेला रहाणारा उमेदवार दिला आहे...प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सगळ्यांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहान केले आहे..आपण सर्वानी त्यांच्या आवाहनाला साद द्यायची आहे.वंचित बहुजन आघाडीला आमच्या सकल मराठी समाजाचे असे आवाहान आहे की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या लोकशाही उत्सवात आम्हाला सहभागी करून घ्यावे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचे आदेश द्यावेत.

Wednesday, March 6, 2019

प्रवीणदादा गायकवाड यांचेवर आम्ही नाराज का आहे….? त्यांनी नाराजी दूर करावी….! राजेश खडके सकल मराठी समाज


प्रवीणदादा गायकवाड यांनी शेकापमध्ये गेल्यावर नव्याने संभाजी ब्रिगेड सुरु केली सदरची संभाजी ब्रिगेड ही सामाजिक असल्याचे सांगण्यात आले.आणि ती संघटना कोणत्याही राजकीय पक्षा बरोबर जाणार नाही असे सांगितले होते.आता त्या संघटनेने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.त्यात बोलण्याचा आम्हाला कोणताही अधिकार नाही.परंतु सत्य इतिहासाची पाने तुम्हीच खोलली आहे.त्यामुळे ती उघडलेली पाने आम्ही वाचली.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास आम्हाला माहित झाला.त्याच इतिहासाची साक्ष म्हणून आम्ही मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी सकल मराठी समाजाच्या वतीने केली होती.त्या मागणीला पाठींबा मिळावा म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे निमित्त साधून किल्ले पुरंधर याठिकाणी १४ मी २०१८ रोजी स्वाक्षरी मोहीम राबविली होती.या मोहिमेत स्वत: खासदार छत्रपती संभाजी माहाराज युवराज सहभागी झाले होते.परंतु त्याच ठिकाणी गाडीत उपस्थित असणारे प्रवीण गायकवाड आणि त्यांचे सहकारी मित्र शांताराम कुंजीर सदरच्या मोहिमेत सहभागी झाले नाही.त्यानी छत्रपती संभाजी महाराज यांचे खाली उतरून दर्शन देखील घेतले नाही.प्रवीण गायकवाड आणि शांताराम कुंजीर हे माझे चांगले मित्र आहेत असे असताना सदरच्या सकल मराठी समाजाच्या मागणीला त्यांनी पाठींबा दिलेला नाही.ही आमची नाराजी व्यक्तिगत नाही….तर समाजिक आहे.
त्याच प्रमाणे तुम्हीच उघडलेल्या इतिहासाच्या पानामध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला राज्यभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक हा २४ सप्टेंबर १६७४ मध्ये केल्याचे सांगितले.तो समतावादी राज्याभिषेक कार्यक्रम आमच्या सकल मराठी समाज आणि समता सैनिक दल यांच्या माध्यमतून आदरणीय अंजलीताई आंबेडकर आणि वीर बाजी पासलकर यांचे वंशज विकास पासलकर आणि प्रवीण गायकवाड यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता.सदरचा कार्यक्रम होऊ नये अशी तुमची धारणा होती.परंतु सदरच्या कार्यक्रमात आदरणीय अंजलीताई आंबेडकर आणि विकास पासलकर यांनी उपस्थिती दाखवून सदरचा समतावादी राज्यभिषेक कार्यक्रमाची शोभा वाढविली होती,परंतु प्रवीण गायकवाड पुण्यात असताना देखील सदरच्या कार्यक्रमात येतो येतो म्हणून आले नाहीत.अशी त्यांची मानसिकता आजही आम्हाला त्रास देते.म्हणून आम्ही त्यांचेवर नाराज आहोत स्वत:ची भूमिका स्पष्ट आणि प्रामणिक असावी आम्ही साथ देऊ परंतु त्यात जर प्रामणिकपणा नसेल तर जवळच्या मित्रांनाही त्रास होतो हे लक्षात घेतले पाहिजे.आम्ही केलेला फोन ते उचलत नाही आमच्या फोनला उत्तर देत नाही म्हणून आम्ही नाराज आहोत.त्यामुळे त्यांनी आमची नाराजी दूर करावी….!


Tuesday, March 5, 2019

अशांना ठोकून काढा....! मी राजकारणातील मुलगी नाही...परंतु मी पैसे घेऊन आंबेडकर विरोधी राजकारण करते...! राजेश खडके सकल मराठी समाज

विषय असा आहे गेल्या ७० वर्षात वंचित घटकांचे शोषण झाले आहे….आणि छत्रपती संभाजी महाराज यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या झाल्यानंतर उभी राहिलेल्या पेशवाईने अलुतेदार आणि बलुतेदार यांना देव नावाच्या संकल्पनेत अडकवून मोठ्या प्रमाणात जातीवाद निर्माण केला आहे.परंतु अशा जातीवादी पेशवाईला संपविण्याचे कार्य स्वराज्याचा सरदार सिद्धनाक महार याच्या नेतृत्वात भीमा कोरेगाव याठिकाणी झालेले आहे.या युध्दात प्रतीशिवाजी राजे उमाजी नाईक समर्थक सहभागी झालेले होते.१ जानेवारी १८१८ च्या भीमा कोरेगावच्या युध्दानंतर उमाजी नाईक यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान असणाऱ्या पुरंधर किल्ल्यावर बामणी व्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्वत:चा राज्यभिषेक १८२२ मध्ये केला होता.अशा प्रतीशिवाजी राजे उमाजी नाईक यांना ब्रिटिशाबरोबर संगनमत करून पुणे येथील मामलेदार कचेरी मधील पिंपळाच्या वृक्षाला म्हणजे बोधीसत्व वृक्षाला लटकवून फाशी दिलेली होती.त्यावेळी थोड्याच अंतरावर असणाऱ्या फुले वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले हे ७ वर्षाचे होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे प्रतिशिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजे उमाजी नाईक यांचा इतिहास महात्मा ज्योतिबा फुले यांना माहित होता.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास महात्मा ज्योतिबा फुले यांना कळाल्यामुळे संभाजीराजे यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबा कडून करून घेतली होती म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते की,माणसाला माणूस म्हणून जगू न देणारी मनुस्मृती दहन केली पाहिजे.अशी मनुस्मृती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये दहन केली आहे.त्यामुळे अशा महापुरुषांचे विचार हे नेहमी माणसाच्या कल्याणकारी जीवनासाठीच होते आणि मनुस्मृतीच्या विरोधात होते.ही मनुस्मृती पुन्हा जिवंत करण्यासाठीचे कार्य आरएसएस या असंवैधानिक संघटनेने जोरात सुरु केले आहे.म्हणून अशा संघटनेला संविधानाच्या चौकटीत आणल्यास इथल्या वंचित घटकांना न्याय मिळेल आणि त्यांचा विकास होईल यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करून मोठ्या प्रमाणात संघर्ष उभारलेला आहे.त्यांचा तो संघर्ष मोडून काढण्यासाठी सावरकर समर्थक शरद पवार यांनी पैशासाठी स्वत:चे पोट भरणारी सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून गणराज्य आघाडी निर्माण केली आहे.त्यामुळे सुपारी घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खोडण्यासाठी आणि केवळ पैशासाठी स्वत:चे पोट भरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला विरोध करण्यसाठी सुषमा अंधारे यांना उभारले गेले आहे.त्याच्या कडे कोणताही विचार नाही की,आचार नाही.त्यामुळे प्रकाश आंबेडकर म्हणाले सुपारी घेऊन काम करणाऱ्या अशा लोकांना ठोकून काढा…! राहिला प्रश्न सुरेश माने यांचा ते एक पक्ष चालवीत आहेत त्यामुळे राजकीय भूमिका घेणे त्यांना गरजेचे आहे.त्यांनी सुषमा अंधारे यांच्या आघाडीत न जाता सरळ महाआघाडीत सहभागी होणे गरजेचे होते.परंतु वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात तयार झालेल्या आघाडीत जाऊन त्यानी त्यांच्या विद्वानपणाचा कळस गाठला आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

Sunday, March 3, 2019

साहेब आमचा प्रस्ताव मान्य करा…..नाहीतर आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे काम करण्याचे आदेश द्या….! राजेश खडके सकल मराठी समाज

साहेब आमच्या सकल मराठी समाजाचे कार्य आपणास माहित आहे.सिंधू संस्कृतीपासून ते भीमा कोरेगाव पर्यंत सत्य इतिहास आमच्या सकल मराठी समाजाने जनतेसमोर आणला आहे.त्यामध्ये वारकरी सांप्रदाय समतावादी विचारावर कार्य करणारे होते म्हणून संत परंपरेतून आलेले संत कबीर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले होते.बुध्द-धम्म-संघ विचारांचे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी स्थापित केले होते.रयतेला हे स्वराज्य आपले वाटावे यासाठी छत्रपती शिवरायांनी संविधान तयार केले होते.म्हणून संविधान सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्याचा उच्चार केला होता.वयाच्या १४ व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांनी “बुधभूषण” नावाचा ग्रंथ लिहून बुध म्हणजे विद्वान आणि भूषण म्हणजे गौरव करण्यासारखा असे विश्लेषण आपल्या पर्यंत पोहचून बोधिसत्व वृक्षाचे महत्व समजून घेऊन छत्रपती संभाजी महराज यांनी त्यांची राजमुद्रा पिंपळाच्या पानावर म्हणजेच बोधीसत्व वृक्षाच्या पानावर कोरलेली आहे.म्हणजेच पहिला बुध्द छत्रपती संभाजी महाराज यांना कळाले म्हणून ते शाक्त पंथीय होते.म्हणून त्यांना समतावादी स्वराज्यरक्षक संभाजी महाराज असे म्हणतात.अशा शंभूराजे यांची वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबाच्या माध्यमातून मनुस्मृती प्रमाणे हत्या केली असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कळाले होते.असे बुध्द-धम्म-संघ विचारांचे स्वराज्य आणि समतावादी राजा महात्मा ज्योतिबा फुले यांनी जगासमोर आणल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांनाही गुरु मानले होते.छत्रपती संभाजी महाराज यांचा “बुधभूषण” ग्रंथ लक्षात ठेऊन त्यांनी “बुध्दभूषण” नावाची प्रिंटींग प्रेस उभारली होती.तीच प्रिंटींग प्रेस रत्नाकर गायकवाड याने जमीनदोस्त याच मनुवादी सरकारच्या काळात केली होती आणि अशा मनुवादी रत्नाकर गायकवाड याला अमित भुईगळ या प्रकाश आंबेडकर समर्थकाने चांगला चोप दिला होता.अशा समतावादी बुध्द-धम्म-संघ विचारांचा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला ज्या वीर योध्यांनी भीमा कोरेगाव येथे घेतला त्या वीरांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवंदना देऊन तीच मनुस्मृती स्वराज्याची राजधानी रायगडच्या परिसरात दहन केली होती.अशा ऐतिहासिक पुणे शहरात आम्ही अलुतेदार आणि बलुतेदार यांचे एकत्रीकरण करून सकल मराठी समाजाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम गेल्या पाच वर्षापासून करीत आहोत.अशा मनुला गाढण्यासाठी आणि छत्रपती शिवराय यांचे संविधान वाचविण्यासाठी या वैदिक धर्म पंडितांच्या विरोधात जो लढा प्रकाश आंबेडकर यांनी उभा केलेला आहे.तो म्हणजे स्वराज्याच्या अलुतेदार आणि बलुतेदार यांना वंचित ठेवण्याचे कार्य इथली आरएसएसने केले आहे.अशा दहशवादी आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा जो विडा उचलेला आहे त्यामध्ये आमच्या सकल मराठी समाजचे योगदान असावे.संविधान वाचविणे हे या देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य आहे.असे मानून आमच्या सकल मराठी समाजाच्या वतीने संसदीय राजकारण सुरु केले आहे.यासाठीचा लोकहित,जनहित तसेच इतिहास जतन करणारा प्रस्ताव आपल्या वंचित बहुजन आघाडीकडे आम्ही सादर केलेला आहे.अद्याप तो मंजूर करण्यात आलेला नसून त्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही.त्यामुळे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचेकडे आम्ही विंनती करतो की आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे आदेश करावेत.कोणतेही कार्य स्वाभिमानाने करावे असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितले आहे.म्हणून आमचा स्वाभिमान अबाधित रहावा ही विंनती.संसदीय राजकारण हा लोकशाहीचा गाभा असल्यामुळे आम्हाला संसदीय राजकारण म्हणून कोणती तरी भूमिकी स्पष्ट करावी लागेल.म्हणून साहेब आमचा प्रस्ताव मान्य करा…..नाहीतर आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे काम करण्याचे आदेश द्या….!

Saturday, March 2, 2019

पुण्यात झालेल्या बाॅम्ब स्फोटामागे...आणि नरेंद्र दाभोळकर हत्येच्या आरोपीच्या मागे मनुवादी असल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी त्यांचे संरक्षण करीत होते काय…? राजेश खडके सकल मराठी समाज

बारामती लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने सभा आयोजित केली होती….या सभेला अलोट गर्दीचा जनसागर लोटणार नाही याची तजवीज स्थानिक नेत्याकडून करण्यात आलेली होती यात काय कोणाचे दुमात असायचे कारण नाही.परंतु या सभेला गर्दी होण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.एकंदरीत प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणांची मीमांसा जर केली तर अतिशय मार्मिक आणि गंभीर भाषण करीत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ते त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.परंतु वंचित घटक त्यांच्या पाठीशी प्रामणिकपणे उभा रहातोय का हे पहाणे अत्यंत महत्वाचे आहे.आता लोकसभेच्या निवडणुकांची तारीख केव्हाही घोषित होईल.त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस बरोबर जाणार नसल्याचे चित्र जवळ जवळ स्पष्ट होताना दिसत आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत स्वार्थ भावनेने सहभागी झालेल्या लोकांच्या मनात काहूल माजू लागल्याचे जाणवत आहे.याचा काहीही परिणाम बाळासाहेब आंबेडकर यांचेवर होणार नाहीये.पाकिस्तान हा भारताचा शांततेचा आणि विकासाचा कट्टर शत्रू आहे त्यामुळे त्याठिकाणी असणारे सर्व दहशतवादी कॅम्प भारताने उध्वस्त केले पाहिजे असे ते म्हणाले.परंतु एकाच ठिकाणी हल्ला करून नरेंद्र मोदी फक्त निवडणुकीचे राजकारण करीत आहेत.सामन्य माणूस सैन्यात देशसेवा करण्यासाठी भरती होतो परंतु त्याच्या मृत्यूचे राजकारण स्वार्थापायी केले जात असल्यामुळे इथले सरकार खरेच देशप्रेमी आहे का…? असा प्रश्न उपस्थित होत आहे.देशातील सरकारी खजाना सरळ पद्धतीने कॉंग्रेस लुटत होती आता नरेंद्र मोदी कंपनीच्या माध्यमांतून म्हणजे त्रयस्त पद्धतीने तो खजिना लुटत आहे.धर्म संकटात आलेला आहे असे जे लोक म्हणतात त्यांचा आणि हिंदू संस्कृतीचा काहीही संबध नाही कारण आमचे कुलदैवत ज्योतिबा-खंडोबा-जगदंबा आहेत...कोणताही आरएसएसवाला खंडोबाच्या जत्रेला येत नाही किंवा छत्रपती संभाजी महाराज हे मानीत असलेल्या मरीआईची पूजा करीत नाही.त्यामुळे कोणताही धर्म संकटात आलेला नाही याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे.कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात पुण्यातील जर्मन बेकरी आणि फर्गुसन कॉलेज येथील झालेले बाॅम्ब स्फोटातील आणि नरेंद्र दाभोळकर यांचे आरोपी का सापडत नाही.कारण कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे मनुवादी व्यवस्थेच्या पाठीशी उभे आहेत आणि इथला मनुवाद जोपासत असल्यामुळे त्यांना आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणायचे नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.



Friday, March 1, 2019

“साहेब” आमचा प्रस्ताव मान्य होणार की नाही...आम्हाला वंचित बहुजन आघाडीत सन्मान मिळणार आहे की नाही….! राजेश खडके सकल मराठी समाज

आम्ही सत्यशोधक चळवळीची माणसं….महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्या विचारावर कार्य करणारे लोक आहोत.त्यामुळे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे “सत्य शोधणे हाच खरा धर्म” हे मानून तेच सत्य शोधण्याचा गेल्या पाच वर्षापासून सकल मराठी समाजाच्या माध्यमातून करीत आहोत.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला खरा इतिहास शोधत आहोत.त्यामुळे तो आम्हाला सापडला आणि तो इतिहास म्हणजे छत्रपती शिवराय यांचे स्वराज्य समतावादी स्वराज्य होते….बुध्द-धम्म-संघ विचारांचे स्वराज्य होते असे समोर आलेले आहे.त्यामुळे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे थोर विचार आम्हाला भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक युध्दातून पुढे आल्यामुळे तो सत्य इतिहास आम्ही अलुतेदार आणि बलुतेदार यांचे समोर मांडण्याचा प्रयत्न केला.त्यातून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी अलुतेदार आणि बलुतेदार यांचा इतिहास नाकरून त्यांना वंचित ठेवण्याचे जे कार्य बामणी व्यावस्थेकडून झाले आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन त्या वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका स्पष्ट केल्यामुळे त्यांच्या आघाडीत सहभागी होऊन कार्य करण्याचा मानस आमच्या सकल मराठी समाजाने करून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची भेट मागितलेली होती.आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समतावादी राज्याभिषेक अभिवादन कार्यक्रम घेण्यात आलेला होता.वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी १ जानेवारी २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीकडे प्रस्ताव सादर केला होता.प्रस्ताव सादर करून तो मान्य होणे संदर्भात पाठपुरावा करीत आहोत.सदरच्या प्रस्तावा संदर्भात आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी नऊ महिन्यापासून आम्ह्यी रांगेत उभे आहोत.प्रास्ताविक मागण्यांचे काय झाले कोणी सांगायला तयार नाही पाठपुरावा केला असता थोड्याच दिवसात भेट होईल असे सांगितले जाते परंतु अद्याप भेट झालेली नाही.सादर प्रस्ताव हा लोकहित आणि जनहित तसेच इतिहास जतन करणारा आहे.आता केव्हाही लोकसभेच्या निवडणुका घोषित होण्याच्या मार्गावर आहे.वंचित बहुजन आघाडीची कोणतीही भूमिका सकल मराठी समाजा संदर्भात स्पष्ट होत नसल्यामुळे आम्ही संभ्रम अवस्थेत आहोत.आम्ही कार्य करणारी माणसं आहोत.संसदीय राजकारण करणे आमचे कर्त्यव्य आहे असे आम्ही मानतो.त्यामुळे जर वंचित बहुजन आघाडीने कोणताही निर्णय घेतला नाही तर आम्हाला आमचे कार्य करणे अवघड होईल.त्यामुळे आमची विनंती आहे आमच्या ऐतिहासिक कार्याचा सन्मान वंचित बहुजन आघाडीने करावा...!