Pages - Menu

Saturday, June 16, 2018

( भाग – ४५ ) १९८३ च्या रिपब्लिकन पक्ष बांधणीत अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना जयदेव गायकवाड आणि निलमताई गोरे यांची साथ...! अॅड.प्रकाश आंबेडकरांना यांना रोखण्यासाठी आणि सतत बदनामीच्या छायेत ठेवण्यासाठी आर्य सनातनी मनुवादी व्यवस्थेचे रमणाधारी यांची घूसपैठ.....!


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांचे १९७७ मध्ये निधन झाले त्यांचे नंतर त्यांचे पुत्र प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना राजकारणात सक्रीय व्हा असे सांगण्यात येत होते.परंतु सक्रीय राजकारणापासून काही स्वार्थी लोकांनी यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना बाहेर ठेवले होते.त्यामुळे ते सक्रीय राजकारणात येण्याविषयी शंका निर्माण केली होती परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निस्वार्थपणे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले होते.तेव्हा जी जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्यावर सोपविली ती पार पाडली पाहिजे असा निर्णय घेऊन ते १९८३ मध्ये सक्रीय झाले.त्यामुळे स्वार्थी नेत्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले होते कारण मनुवादी व्यवस्थेची रमणा घेऊन त्यांचे सुरु असलेले कार्य थंडावणार होते.मनुवादी व्यवस्था पुन्हा एकदा सावध झाली होती.त्यांनी काही रमणाधारी लोक त्यांच्या नेतृत्वात घुसडले होते.परंतु याची चालूल आणि याची खबर कानोकान कोणाला होय दिली गेले नाही.जसे छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्यात मनुवादी व्यवस्थेने सनातनी प्रवृत्तीचे मराठे घुसविले होते त्याच पद्धतीत काही बौध्द धम्माची दीक्षा घेऊन आंबेडकरी चळवळीमध्ये घुसडण्याचे काम पद्धतशीरपणे केले गेले होते.अस्पृश्य महार हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर होता परंतु अस्पृश्यतेच्या नावाखाली काही लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण नंतर घुसडलेला आहे.त्याला आंबेडकर घराण्याला विरोध करण्याचे आणि नेहमी बदनामीच्या छायेत ठेऊन समाजापासून तोडण्याचे कार्य दिले गेलेले आहे.तो ते कार्य पद्धतशीरपणे कोणालाही चाहूल न लागता करीत आहे.आता प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर उतरले आहेत म्हटल्यावर आपल्या रमणाधारी लोकांना सक्रीय होण्याचे आदेश मनुवादी व्यवस्थेने दिले.
रिपब्लिकन पक्षाच्या पुर्नबांधणीला प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची सुरुवात -:
अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी दि. २७ नोव्हेंबर १९८३ रोजी सिद्धार्थ विहार वडाळा येथे काही समविचारी लोकांची बैठक बोलविली. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतील ‘रिपब्लिकन पक्ष' या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्बाधणीच्या कार्याला प्रारंभ केला. त्यासाठी दि. ५ व ६ मे १९८४ रोजी अहिल्याश्रम नानापेठ, पुणे येथे पुनर्गठित रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन गिताबाई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आले. या अधिवेशनात भारतीय रिपब्लिकन पक्ष' या नावाने रिपब्लिकन पक्षाचे पुनर्गठन करून एक स्वतंत्र राजकीय व्यासपीठ निर्माण करण्यात आले.पक्षाची पुनर्बाधणी करत असताना यावेळी अॅड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला खराखुरा रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा आपण निर्धार करत आहोत. या देशातील राजकारणावर सरंजामदार व श्रीमंतांची घट्ट पकड आहे. येथे दलित श्रमिकांना कोणतेही राजकीय अस्तित्व नाही. या बहुसंख्यांकांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आपण रिपब्लिकन पक्षाची पुनर्बाधणी करत आहोत. सद्याचे एका जातीचे राजकारण ठोकरून आपण सर्वसमावेशक वृत्तीने सर्व तळागाळातील समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल समुहांना बरोबर घेऊन केवळ मी पणाच्या वल्गना न करता विचार आणि वृत्तीने सर्व जनतेचे राजकारण करून, तुकड्यांचे व लाचारीचे राजकारण न करता पोलादी वृत्तीने संपूर्ण सत्ताच ताब्यात घेण्यासाठी लढून, या देशातील सर्व राष्ट्रीय प्रश्नांकडे देशहिताच्या दृष्टिने पाहून, देशाचे नेतृत्व करणारा पक्ष निर्माण करत आहोत. अशी घोषणा करून रिपब्लिकन पक्षाचे पुनर्गठन केले.
भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्बाधणीसाठी अॅड. बाळासाहेब आंबेडकरांना अनेकांचे सहकार्य लाभले त्यात प्रामुख्याने श्री. लंकेश्वर गुरुजी, श्री. बी. आर. सिरसाठ, गुणवंतराव पाटील, दिलीप तायडे, प्राचार्य पटनायक, श्री. सुखदेवराव जाधव, श्री बळीराम खोडके, अॅड. पी. बी. मोरे, वाल्मीक अण्णा दामोदर, किशोर मानवटकर, श्री. चंदन तेलंग, श्री. एस. डी. म्हस्के, श्री. डी. जी. आडे, शिवा इंगोले, अँड. पी. एस. खडसे, अॅड. पी. पी. ताजणे, श्री. श्रावण निंबाळकर, श्री. देवराव वानखडे, नाना श्यामकुळे, श्री. शंकर माणके, एन. यु. सदावर्ते, अॅड. बी. एच. गायकवाड, प्रा. अविनाश डोळस, ज. वि. पवार, प्रा. खांडेकर, के. व्ही. मोरे, राजाभाऊ ढाले, अर्जुन डांगळे, प्रा. माधव मोरे, प्रा. एस. के. जोगदंड, डॉ. अशोक गायकवाड, टी. पी. सावंत, सुरेशदादा गायकवाड, श्री. सिद्धार्थ वानखडे, अॅड. पी. एस. धन्वे, आप्पासाहेब जुमळे, अॅड. जयदेव गायकवाड, निलमताई गोरे, सरला मेश्राम, पुष्पाताई इंगळे, यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने अॅड. बाळासाहेब आंबेडकरांना भारतीय रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोप-यापर्यंत पोहचविता आले.(क्रमश😊

No comments:

Post a Comment