Pages - Menu

Thursday, February 21, 2019

आरएसएस बरोबर दोन हात करण्याची तयारी असेल तरच आम्ही कॉंग्रेस बरोबर...अन्यथा नाही…! पुलवामा हल्ल्या संदर्भात मोदींनी देशाची माफी मागावी…! सकल मराठी समाज

पुलवामा हल्ल्या संदर्भात देशात एक मोठी सांशकता निर्माण झाली असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.जेव्हा देशाचा प्रधानमंत्री मला व्हायचे आहे अशी स्वप्न बघणाऱ्या नरेंद्र मोदीने देशाला सांगितले की,मी रेल्वेस्टेशनवर चहा विकत होतो.परंतु ज्या रेल्वे स्टेशनवर मोदी चहा विकत होते असे सांगतात तेव्हा ते रेल्वेस्टेशनच नव्हते असे मोदी बरोबर असणाऱ्या प्रवीण तोगडिया यांनी सांगितले आहे.नरेंद्र मोदी यांना भारताच्या इतिहासात प्रधानमंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी केलेले प्रत्येक निर्णय त्यांना घ्यायचे आहे त्यामुळे साडेचार वर्षात त्यानी युध्द सोडले तर जवळ जवळ सगळेच निर्णय घेतले आहे.पुलवामा हल्ल्या संदर्भात वापरण्यात आलेले साडे तीनशे किलोचे आरडीएक्स आले कोठून आणि भारतीय जवानांना घेऊन चाललेल्या वाहनाला धडकते कसे..? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी बुलढाणा येथे उपस्थित केला आहे.त्यानी नरेंद्र मोदी यांना स्पष्ट इशारा दिला आहे की,निवडूक जिंकण्यासाठी पाकिस्तान बरोबर युध्द करू नको.तू केलेल्या वाईट कृत्याबद्दल देशाची माफी माग मोठ्या मनाने देश तुला माफ करेन.परंतु मोदी हा आरएसएस\\ या संघटनेचा मोहरा आहे त्यामुळे त्याच्या हातात काही नाही आणि अशा प्रकारे जे बॉम्बस्फोट झाले आहेत जसे पुण्यातील जर्मन बेकरीतील स्फोट,मुंबई येथील डायमंड मर्चंट मधील स्फोटातील आरोपी सर्वांनाच माहित असल्यामुळे ते सापडलेले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे.प्रकाश आंबेडकर म्हणतात मला ही सत्ता वंचित घटकांच्या हातात आणायची आहे.परंतु इतिहासकाळापासून वंचितांना मुख्य प्रवाह बाहेर ठेवण्याचे जे षड्यंत्र चालत आलेले आहे ते षड्यंत्र मला मोडीत काढायचे आहे.आणि ते षड्यंत्र मोडीत काढण्यासाठी आरएसएस या संघटनेला संविधानाच्या चौकटीत आणले पाहिजे.मात्र त्यांना संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठीचा जो वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव कॉंग्रेस का मान्य करीत नाही असा माझा प्रश्न आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत.आरएसएसकडे कॉंग्रेसच्या काळात एके ४७ सारखी हत्यारे आलेली आहेत.त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की,जर या प्रस्तावाला कॉंग्रेस मान्य करीत नाहीत तर याचा अर्थ सरळ सरळ होतो की,या आरएसएसचे संगोपन कॉंग्रेसच करीत आहे.त्यामुळे आता देशात गंभीर प्रश्न या चर्चेने प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.त्यामुळे पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांनी जो लढा सुरु केला होता तोच लढा प्रकाश आंबेडकर यांनी सुरु केल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.गोव्या संदर्भात जेव्हा प्रश्न उपस्थित झाला होता तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन मार्ग सांगितलेले होते.त्यातील पहिला मार्ग असा होता की,गोवा विकत घ्या.नाहीतर लीजवर घ्या,नाहीतर सैन्य घुसवून संपवून टाका.याचप्रमाणे आजची परिस्थिती आपण हाताळू शकतो परंतु ही परिस्थिती तुम्ही हाताळण्यासाठी तयार आहात काय…? की याच मुद्द्यावर राजकारण करून भाजपा सरकारचे अपयश झाकून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी युध्द करायचे आहे…? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असल्याचे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.त्यामुळे एकंदरीत कॉंग्रेस संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो अतिशय गंभीर प्रश्न आहे त्यामुळे जो पर्यंत आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणले जात नाही तो पर्यंत देश सुखी होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे.


No comments:

Post a Comment