Pages - Menu

Wednesday, April 10, 2019

होय मी पुणेकर बोलतोय….गिरीष बापट उत्तर द्या….! तुम्हाला मत म्हणजे मोदी-शहा जोडीला मत…! राजेश खडके सकल मराठी समाज

 
        विषय असा आहे की,पुणे हे स्वराज्याचे माहेर घर आहे.कारण शहाजीराजे यांच्या स्वराज्य संकल्पनेतून पुण्यामध्ये लाल महाल उभारला गेला होता.ह्याच संकल्पनेला शिवरायांनी अठरा पगड जातीचा मावळा बरोबर घेऊन अस्तित्वात आणली होती.प्रत्येकाला आपले वाटेल असे स्वराज्य निर्माण करून शिवराय छत्रपती झाले होते.अशा स्वराज्याच्या संकल्पनेचे अस्तित्व पेशवाईने संपवून शनिवार वाडा निर्माण केला आहे.इथला स्वत:ला मावळा समजणारा याच पेशवाईचा गुलाम झाला आहे.युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संपलेले स्वराज्य संविधानाच्या माध्यमातून पुन्हा इथल्या जनतेला दिलेले आहे.परंतु इथला अठरा पगड जातीचा मावळा याला या मनुवादी व्यवस्थेने धार्मिक गुलाम बनवून वंचित केले आहे.अशा वंचित समुहाला एकत्रित करण्यासाठी सकल मराठी समाज स्थापित करून गेल्या दोन वर्षापासून तसा प्रयत्न आम्ही केला आहे.या प्रयत्नाला यश म्हणून आज प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करून मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात यल्गार उभारलेला आहे.यातच गेल्या पाच वर्षाच्या काळातील नरेंद्र मोदी सरकारचा अभ्यास केला तर असे समोर येते की,ज्याप्रमाणे पेशवाईने स्वराज्य संपविले त्याप्रमाणे स्वतंत्र भारताला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपविण्याचा घाट या मनुवादी मोदी सरकारने घातला आहे.या सरकारच्या माध्यमातून स्वराज्यात काळग्या करणारा जसा अन्नोजी दत्तो नावाचा मंत्री होता आणि जसा तो इतर लोकांना अमिष दाखवून किंवा कारवाईची धमकी देऊन आपल्या गोटात सामवून घ्यायचा त्याप्रमाणे इथले संविधान संपविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने इथले लोक आपल्याकडे वळविलेले आहे.त्यांची नावे येथे घेणे मला योग्य वाटत नाही.परंतु त्यांना हाताशी धरून त्याने भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारा बळीराजा याला संपविले आहे.भारताचे भविष्य असणारे तरुण बेरोजगार करून संपविले आहे.इथल्या सरकारी यंत्रणा खासगी उद्योजक यांच्या ताब्यात दिलेले आहे.इथली सैनिकी व्यवस्था उद्योग समूहाच्या हातात देण्याची यंत्रणा उभी केलेली आहे.पत्रकारिता ताब्यात घेऊन इथल्या जनतेचा बुद्धीभेद करण्यासाठी त्याचा वापर करीत आहे.हे केवळ इथल्या नागरिकाच्या हक्काची असणारे संविधान बदल्यासाठीचा आणि एकाधिकारशाही निर्माण करण्यासाठी केले आहे.त्यामुळे २०१९ ची निवडणूक ही इथल्या अठरा पगड जाती समुहाचे उद्याचे भविष्य ठरविणार आहे.त्यामुळे जनतेने कोणाच्या पाठीशी उभे रहायचे आहे ते ठरवायचे आहे.परंतु या सरकारने आपले वाटोळे कसे केले आहे आणि कसे करणार आहे हे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे.त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा उमेदवाराला आपण नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणूनच बघितले पाहिजे आणि त्याप्रमाणे कोणाला मतदान करायचे ते ठरविले पाहिजे.म्हणून आमचा या अभियानाच्या माध्यमातून असा प्रयत्न राहणार आहे की कोण उमेदवार आहे त्याला बघून मतदान करू नका फक्त सरकार बघून आणि त्याचे द्रुषकृत्य बघून त्याला नाकरून त्याच्याकडे खालील उपस्थित प्रश्न प्रत्येक भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षाच्या उमेदवाराला विचारा..! आम्ही पुणेकर म्हणून पुणे लोकसभा उमेदवार गिरीष बापट यांना नरेद्र मोदी आणि अमित शहा म्हणून प्रश्न विचारतो की होय मी पुणेकर बोलतोय गिरीष बापट उत्तर द्या….!

१ नोटाबंदीमुळे फायदा कोणाचा झाला…? नुकसान मात्र आमचे झाले…..गिरीष बापट उत्तर द्या….!

२ अनिल अंबानी यांना राफेल ठेका कसा काय दिला…? नुकसान मात्र आमचे झाले…..गिरीष बापट उत्तर द्या….!

३ मला १५ लाख रुपये देतो म्हणाले...परंतु ते दिलेच नाही…! माझी फसवणूक का केली...गिरीष बापट उत्तर द्या….!

४ एकाच्या बदल्यात दहा शिर न आणता नवाब शरीफचा केक का खालला...? गिरीष बापट उत्तर द्या….!

५ आमचे दोन कोटी रोजगाराचे काय झाले….? गिरीष बापट उत्तर द्या….!

६ ज्यांनी परीक्षा पास केल्या त्यांना कॉल लेटर का नाही आली….! गिरीष बापट उत्तर द्या….!

७ नोटाबंदीमुळे मिळणारे लाखो कोटी रुपये कुठे गेले…? गिरीष बापट उत्तर द्या….!

८ नोटाबंदी करू आतंकवादी यांची कंबर मोडली ना..मग जावांची प्रेत का पडत आहे…? गिरीष बापट उत्तर
द्या….!

९ इम्रानखान याला प्रेमपत्र पाठवून..शहिदांच्या जीवावर आपले बूथ का बांधीत आहात…? गिरीष बापट उत्तर
द्या….!

१० मुकेश अंबानी यांचे जिओ 4 G माझे BSNL 3G असे का…? गिरीष बापट उत्तर द्या….!

११ सरकारी हॉस्पिटल आणि विमानतळ अडाणी याला का विकली…? गिरीष बापट उत्तर द्या….!

१२ ना दाऊदला परत आणला ना महसूदला परत आणला…? गिरीष बापट उत्तर द्या….!

१३ तुम्ही ज्यांचे गुणगान गायले ते मल्ल्या आणि निरव मोदी चोर का निघाले...!? गिरीष बापट उत्तर द्या….!

१४ धनगर आरक्षणाची फाईल गायब होते कसे….? गिरीष बापट उत्तर द्या….!

१५ मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाची फसवणूक का केली…? गिरीष बापट उत्तर द्या….!

No comments:

Post a Comment