‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी . . .’ गाण्यातील या शब्दांनीच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माणसांच्या काळजाला हात घातला. सतत जागता पहारा देऊन सीमांचे रक्षण करणारा सैनिक हा ‘अनामवीर’ ठरू नये, त्याच्यापाठीमागे हा देश, हे राज्य खंबीरपणे ऊभे आहे हे सांगणारा कृतज्ञता भाव काल ‘कारगिल विजय दिना ’ निमित्तानं आयोजित स्मृतिकार्यक्रमात प्रत्येकाच्या चेहर्यावर उमटला होता.
‘उत्तुंग आमुचि उत्तर सीमा इंच इंच लढवू, अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज ऊंच ऊंच चढवू. परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला, हे कोटि कोटि भुजदंड होतील इथे ध्वजदंड, छातीची करूनि ढाल या संगिनीस भिडवू. . ’ . वसंत बापटांच्या या कवितेच सार खर्या अर्थाने आपल्या जीवनात जर कुणी उतरवला असेल तर तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून अखंड दक्ष राहणार्या सैनिकांनी.
ऊन-वादळ-वारा-पाऊस, कडाक्याची थंडी, बर्फाच्या गडद चादरीवर उभं राहून सीमांचे रक्षण करतांना, शत्रुचा भ्याड हल्ला परतवून लावताना ज्या सैनिकांनी आपल्या निधडय़ा छातीवर निर्भयपणे गोळ्या झेलल्या, अटीतटीच्या प्रसंगात जीवाची पर्वा न करता शत्रुला सळो की पळो करून सोडलं, त्या धैर्याला, त्या समर्पणाला आणि त्या त्यागाला सलाम करण्याचा, त्यांची प्रेरणा घेऊन देशसेवेला वाहून घेण्याचा, त्यांचे देशसेवेचे वेड, व्रत म्हणून अंगिकारण्याचा संदेश देणारा हा दिवस म्हणजे ‘कारगिल विजय दिन’. काल मंत्रालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा ह्दयस्पर्शी सोहळा संपन्न झाला.
वीरपत्नी, वीरमाता, वीर पिता होणं ही अभिमानाची गोष्ट असली तरी लहानवयात आलेलं वैधव्य अनुभवतांना, दररोज आपल्या माणसाशिवाय जगण्याचा संघर्ष करतांना त्या वीरपत्नीच्या किंवा म्हतारपणची हाताशी आलेली काठी हरवलेली पाहतांना त्या वीर माता-पित्याच्या मनात काय भावना ऊंचबळत असतील हे वेगळ्यानं सांगायला नको. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्या आसु घेऊन अनुदानाची रक्कम स्विकारताना भरून आलेले, भांबावलेले मन बरचं काही सांगून गेले. त्यामुळेच त्यांचा आनंद, त्यांचे दु:ख हे केवळ त्यांचेच राहिले नाही. पतीच्या- मुलाच्या मृत्यूचा होणारा सन्मान, गौरव पाहतांना मनाची होणारी घालमेल ही केवळ या वीरपत्नी-वीरमाता-पित्यांचीच राहिली नाही तर अख्खं परिषद सभागृह त्यांच्या या संमिश्र भावनांमध्ये सहभागी झालं.
‘ऑपरेशन फाल्कन’ मध्ये शहीद झालेले ले.कर्नल मंदार सुहास नेने असोत किंवा ‘ऑपरेशन रक्षक’ मध्ये वीरमरण आलेले गनर दिपक गुलाब चौधरी असोत प्रत्येकाची शहादत त्यांच्या त्या ऑपरेशनमधील विजयाची, त्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांची शौर्यगाथाच सांगत होती.
तुम्ही एकटे नाही, तुमच्या मागे हा देश, हे राज्य अतिशय खंबीरपणे पाठीशी उभं आहे. वीर सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि वृद्ध वीर माता-पित्यांसाठी हे राज्य आणि प्रत्येक मराठी मनं समर्पित आहे, कटिबद्ध आहे हे जणू या कार्यक्रमातून प्रतीत होत होतं.
२६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने काल सैनिक कल्याण विभागामार्फत एका ह्दयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध युद्ध प्रसंगात शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि पित्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले तर याच परिस्थितीत जखमी झालेल्या, अपंगत्व प्राप्त झालेल्या सैनिकांनाही त्यांच्या अपंगत्वानुसार पुनर्वसनासाठी १ ते ३ लाखांपर्यंतची आर्थिक मदत करण्यात आली.
विविध युद्धात वीरमरण पत्करलेल्या सैनिकांबद्दल देशाला सार्थ अभिमान असल्याचे आणि त्यांचे हे उपकार देश कधीच विसरणार नसल्याचे भावस्पर्शी उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले तर मृत्यू अटळ आहे. कोणी अमरत्व घेऊन जन्माला आलेलं नाही. पण लाखमोलाचं मरण हे फक्त सैनिकांना येतं ही भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.सैनिकाचं मरण हे सर्वोत्कृष्ट-सन्मानाचं मरण असल्याचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सांगितले.
सैनिक कल्याण विभागामार्फत शासन आजी-माजी सैनिकांसाठी, शहीद जवानांच्या पत्नी आणि मुलांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी ज्या योजना राबविते त्यांची माहिती यावेळी देण्यात आली. या सगळ्याचा अर्थ एवढाच होता की, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या बरोबर, तुमच्या सुखदु:खात आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आमचे आणि या देशाचे लाडके सुपुत्र आहात म्हणूनच तर तुमच्या जीवावर आम्ही भारतीय भयमुक्त वातावरणात राहू शकतो, जगू शकतो. तुम्ही रात्र रात्र जागून देशाच्या सीमेचे रक्षण करता म्हणून आम्ही शांतपणे झोपू शकतो. तुमचे हे उपकार खरंच आम्ही कधी विसरू शकणार नाही. तुम्ही मृत्यूवर विजय मिळवलेले मृत्यूंजय आहात. तुम्ही अमर आहात तुमच्या शौर्याने, तुमच्या त्यागाने, तुमच्या पराक्रमाने तुम्ही या देशाला नितांत सुंदर गौरव प्राप्त करून दिला आहे.
कुटुंबापासून आपल्या माणसापासून दूर सीमेवर तुम्ही एकटे उभे असलात, लढत असलात तरी सहकार्याचा आमचा एक हात सदैव तुमच्यासाठी ऊंचावलेला तुम्हाला पहायला मिळेल. तुमचं हे न फिटणारं ऋण आमच्या शिरी घेऊन आम्ही जगत आहोत हे ही आम्ही कधी विसरणार नाही. म्हणूनच हे मृत्युंजया, आमचा पहिला सलाम तुझ्यासाठी- तुझ्या - माझ्या देशासाठी ही प्रेरणा घेऊनच कारगिल विजय दिवसाच्या या कार्यक्रमाचा काल समारोप झाला.
डॉ. सुरेखा मुळे
‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी . . .’ गाण्यातील या शब्दांनीच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माणसांच्या काळजाला हात घातला. सतत जागता पहारा देऊन सीमांचे रक्षण करणारा सैनिक हा ‘अनामवीर’ ठरू नये, त्याच्यापाठीमागे हा देश, हे राज्य खंबीरपणे ऊभे आहे हे सांगणारा कृतज्ञता भाव काल ‘कारगिल विजय दिना ’ निमित्तानं आयोजित स्मृतिकार्यक्रमात प्रत्येकाच्या चेहर्यावर उमटला होता.
‘उत्तुंग आमुचि उत्तर सीमा इंच इंच लढवू, अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज ऊंच ऊंच चढवू. परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला, हे कोटि कोटि भुजदंड होतील इथे ध्वजदंड, छातीची करूनि ढाल या संगिनीस भिडवू. . ’ . वसंत बापटांच्या या कवितेच सार खर्या अर्थाने आपल्या जीवनात जर कुणी उतरवला असेल तर तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून अखंड दक्ष राहणार्या सैनिकांनी.
ऊन-वादळ-वारा-पाऊस, कडाक्याची थंडी, बर्फाच्या गडद चादरीवर उभं राहून सीमांचे रक्षण करतांना, शत्रुचा भ्याड हल्ला परतवून लावताना ज्या सैनिकांनी आपल्या निधडय़ा छातीवर निर्भयपणे गोळ्या झेलल्या, अटीतटीच्या प्रसंगात जीवाची पर्वा न करता शत्रुला सळो की पळो करून सोडलं, त्या धैर्याला, त्या समर्पणाला आणि त्या त्यागाला सलाम करण्याचा, त्यांची प्रेरणा घेऊन देशसेवेला वाहून घेण्याचा, त्यांचे देशसेवेचे वेड, व्रत म्हणून अंगिकारण्याचा संदेश देणारा हा दिवस म्हणजे ‘कारगिल विजय दिन’. काल मंत्रालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा ह्दयस्पर्शी सोहळा संपन्न झाला.
वीरपत्नी, वीरमाता, वीर पिता होणं ही अभिमानाची गोष्ट असली तरी लहानवयात आलेलं वैधव्य अनुभवतांना, दररोज आपल्या माणसाशिवाय जगण्याचा संघर्ष करतांना त्या वीरपत्नीच्या किंवा म्हतारपणची हाताशी आलेली काठी हरवलेली पाहतांना त्या वीर माता-पित्याच्या मनात काय भावना ऊंचबळत असतील हे वेगळ्यानं सांगायला नको. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्या आसु घेऊन अनुदानाची रक्कम स्विकारताना भरून आलेले, भांबावलेले मन बरचं काही सांगून गेले. त्यामुळेच त्यांचा आनंद, त्यांचे दु:ख हे केवळ त्यांचेच राहिले नाही. पतीच्या- मुलाच्या मृत्यूचा होणारा सन्मान, गौरव पाहतांना मनाची होणारी घालमेल ही केवळ या वीरपत्नी-वीरमाता-पित्यांचीच राहिली नाही तर अख्खं परिषद सभागृह त्यांच्या या संमिश्र भावनांमध्ये सहभागी झालं.
‘ऑपरेशन फाल्कन’ मध्ये शहीद झालेले ले.कर्नल मंदार सुहास नेने असोत किंवा ‘ऑपरेशन रक्षक’ मध्ये वीरमरण आलेले गनर दिपक गुलाब चौधरी असोत प्रत्येकाची शहादत त्यांच्या त्या ऑपरेशनमधील विजयाची, त्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांची शौर्यगाथाच सांगत होती.
तुम्ही एकटे नाही, तुमच्या मागे हा देश, हे राज्य अतिशय खंबीरपणे पाठीशी उभं आहे. वीर सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि वृद्ध वीर माता-पित्यांसाठी हे राज्य आणि प्रत्येक मराठी मनं समर्पित आहे, कटिबद्ध आहे हे जणू या कार्यक्रमातून प्रतीत होत होतं.
२६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने काल सैनिक कल्याण विभागामार्फत एका ह्दयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध युद्ध प्रसंगात शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि पित्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले तर याच परिस्थितीत जखमी झालेल्या, अपंगत्व प्राप्त झालेल्या सैनिकांनाही त्यांच्या अपंगत्वानुसार पुनर्वसनासाठी १ ते ३ लाखांपर्यंतची आर्थिक मदत करण्यात आली.
विविध युद्धात वीरमरण पत्करलेल्या सैनिकांबद्दल देशाला सार्थ अभिमान असल्याचे आणि त्यांचे हे उपकार देश कधीच विसरणार नसल्याचे भावस्पर्शी उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले तर मृत्यू अटळ आहे. कोणी अमरत्व घेऊन जन्माला आलेलं नाही. पण लाखमोलाचं मरण हे फक्त सैनिकांना येतं ही भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.सैनिकाचं मरण हे सर्वोत्कृष्ट-सन्मानाचं मरण असल्याचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सांगितले.
सैनिक कल्याण विभागामार्फत शासन आजी-माजी सैनिकांसाठी, शहीद जवानांच्या पत्नी आणि मुलांसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी ज्या योजना राबविते त्यांची माहिती यावेळी देण्यात आली. या सगळ्याचा अर्थ एवढाच होता की, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या बरोबर, तुमच्या सुखदु:खात आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आमचे आणि या देशाचे लाडके सुपुत्र आहात म्हणूनच तर तुमच्या जीवावर आम्ही भारतीय भयमुक्त वातावरणात राहू शकतो, जगू शकतो. तुम्ही रात्र रात्र जागून देशाच्या सीमेचे रक्षण करता म्हणून आम्ही शांतपणे झोपू शकतो. तुमचे हे उपकार खरंच आम्ही कधी विसरू शकणार नाही. तुम्ही मृत्यूवर विजय मिळवलेले मृत्यूंजय आहात. तुम्ही अमर आहात तुमच्या शौर्याने, तुमच्या त्यागाने, तुमच्या पराक्रमाने तुम्ही या देशाला नितांत सुंदर गौरव प्राप्त करून दिला आहे.
कुटुंबापासून आपल्या माणसापासून दूर सीमेवर तुम्ही एकटे उभे असलात, लढत असलात तरी सहकार्याचा आमचा एक हात सदैव तुमच्यासाठी ऊंचावलेला तुम्हाला पहायला मिळेल. तुमचं हे न फिटणारं ऋण आमच्या शिरी घेऊन आम्ही जगत आहोत हे ही आम्ही कधी विसरणार नाही. म्हणूनच हे मृत्युंजया, आमचा पहिला सलाम तुझ्यासाठी- तुझ्या - माझ्या देशासाठी ही प्रेरणा घेऊनच कारगिल विजय दिवसाच्या या कार्यक्रमाचा काल समारोप झाला.
डॉ. सुरेखा मुळे
आज विज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्याचे युग आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०१०-२०११ अंतर्गत शेतकरी शेती शाळेचे देसाईगंज तालुक्यातील मौजे डोंगरगाव हलबी येथे आयोजन करण्यात आले होते. डोंगरगाव हलबी या गावातील धान पिकावर कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होता. तसेच हा भाग आदिवासी असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अंधश्रध्दा व पारंपरिक पध्दतीची प्रगतीमध्ये अडचण येत होती. कारण आदिवासी आपली पारंपरिक पध्दत सोडण्यास सहज तयार होत नाही. याकरिता येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबद्दल जनजागृती करण्यात आली.
गावातील शेतकऱ्यांना शेतीशाळेची माहिती देण्यासाठी सर्वप्रथम या गावात जाहीर दवंडी देऊन शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेतून इच्छुक व प्रगतीशिल ३० शेतकऱ्यांची शेतीशाळेकरिता निवड करण्यात आली. प्रत्येकी ६-६ शेतकऱ्यांचे ५ गट पाडण्यात आले. त्यांना मित्रकीटकांचे नाव देऊन प्रत्येक गटातून १ शेतकरी संपर्क शेतकरी म्हणून नेमण्यात आला. उपस्थित सर्व शेतकरी भात उत्पादक होते.
शेतीशाळेकरीता १० हेक्टर धान पिकाचे क्षेत्र आय. पी. एम. प्लॉट म्हणून व १० हे. क्षेत्र कंट्रोल प्लॉट म्हणून गावाच्या दक्षिणेस गावालगतच निवडण्यात आले. या क्षेत्रावर निरीक्षणे घेऊन शेतीशाळा राबविण्यात आली. त्याकरिता २० आठवड्यांचा आठवडी कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी श्री. वडसा यांचेकडून मागविण्यात आला. सर्व प्रथम गावात सभा घेऊन गावाची माहिती संकलित केली. त्यामध्ये गावाची लोकसंख्यास महिला व पुरुष संख्या, शेतकरी संख्या, गावाचा नकाशा, त्या गावातील भात पिकावरील क्षेत्र, कीड व रोगाबाबत समस्या व त्याच्या व्यवस्थापनासाठी वापरत असलेले उपाय व सिंचन सुविधा इत्यादी माहिती घेण्यात आली होती.
या ३० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता देसाईगंजचे मंडळ कृषी अधिकारी जी. ए. रामटेके यांनी काम पाहिले. प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शक म्हणून पी. जी. कोमटी, वाय. पी. रणदिवे, टि. एम. मेंद यांनी भात पिकासंदर्भातील आधुनिक माहिती दिली. या प्रशिक्षणामध्ये शेतीशाळेचे महत्त्व व उद्देश समजावून सांगण्यात आले. त्यानंतर भात-बियाणे निवड, बीज प्रक्रिया, भात रोपवाटिका तयार करण्यापासून ते भाताची कापणी, साठवणूक होईपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणातून शेतीचे प्रमुख उद्देश- निरोगी व सशक्त पिक जोपासना, किडीच्या नैसर्गिक शत्रूचे संवर्धन करणे, नियमितपणे निरीक्षण करणे. शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये तज्ज्ञ बनविणे याचे शास्त्रोक्त पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात आले.
शेतकऱ्यांना या प्रशिक्षणामध्ये लष्कर अंडी, पाने गुंडाळणारी अंडी, खोडकिडा व तुटतुटे अणि करपा, कडाकरपा, काजळी या कीड व रोग इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या पाच गटांकडून ड्राँईंग पेपरवर किड्यांचे चित्र काढून घेण्यात आले. त्यामुळे या किडीची ओळख शेतकऱ्यांच्या स्मरणात राहिली. तसेच त्यांच्या नियंत्रणाकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने उपाययोजना कशी करावी याचे तांत्रिक मार्गदर्शन कृषी सहाय्यक व गट प्रमुख यांच्यामार्फत देण्यात आले. तसेच एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक पाणी व्यवस्थापनाचे शिक्षण देखील या शेतीशाळेत देण्यात आले.
धान पिकांच्या सर्व हंगामात व पिकांच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेतील, लागवडीपासून ते काढणीपर्यंत, धानाचे वाढीमध्ये कोणते बदल होतात, किडीची अवस्था कशी असते याचे शेतीशाळेतील सात दिवसांत निरीक्षण घेण्यात आले. तसेच पिकांच्या शत्रू किडी व मित्र किटक यांची ओळख सुध्दा प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना समजावून देण्यात आली. संपूर्ण शेतीशाळेत प्रत्यक्षात रोग अणि किडी, शेतकऱ्यांना दाखवित असल्यामुळे व त्यांचे उपाय सांगीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे दुसऱ्या वर्गास पिकामध्ये काय बदल होतात व त्याची आपणास काय माहिती मिळते याबाबत शेतकरी विचारणा करीत होते. शेतकरी नियमितपणे कीड व रोग याबाबत सुध्दा क्षेत्रीय कर्मचारी व प्रशिक्षण देणाऱ्या टिमशी चर्चा करीत होते.
जे शेतकरी शेतीशाळेत हजर राहत होते, ते गावातील इतरही शेतकऱ्यांना शेतीशाळेत मिळालेली माहिती समजावून सांगत होते. कृषि संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार संपूर्ण गावामध्ये कसा करता येईल यासाठीसुध्दा प्रशिक्षक टिमकडुन प्रात्याक्षिक करण्यात येत होते. त्यामुळे गावातील इतर शेतकरीसुध्दा या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करु लागले.
या शेतीशाळेमुळे गावातच तज्ज्ञ शेतकरी तयार होऊन इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करु लागल्यामुळे त्या गावाची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे.

- रोजगार हमी योजनेच्या सद्यस्थितीची माहिती तातडीने संकलित करण्यात होणारा कालापव्यय टाळण्यासाठी आता सिमनिक सॉप्टवेअरचा अवलंब करण्यात येणार आहे. हे तंत्र वापरल्यास रोजगार हमी योजनेची तालुकावार परिस्थिती आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्राने राबविलेली रोहयो जशी केंद्राने राबविली, तसेच या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने खास विकसित केलेली ही ऑनलाईन प्रणाली संपूर्ण देशभर वापरली जाणार आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज ऑनलाईन नोंदविली जाते. ही नोंदवत असताना अनेक अडचणीचा सामोरे जावे लागते.
विशेषत: तालुका पातळीवरुन ही माहिती फॅक्सद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात येत असते. रोजच्या रोज माहिती अपडेट करताना रोहयो कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते. यावर उपाय म्हणून सिमनिक सॉप्टवेअर वापरण्याचा निर्णय केंद सरकारने घेतला आहे.
रोजगार हमी योजनेचे कोकण विभागीय उपायुक्त डी.एस.डोईफोडे यांनी नुकताच अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयोच्या कामाचा जिल्हास्तरीय आढावा घेतला.
यावेळी जिल्हयातील रोहयोचे कार्यकारी अभियंता डी.वाय.जाधव, सर्व तहसिलदार गटविकास अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सिमनिक सॉप्टवेअर वापरण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.
सिमनिक म्हणजे काय ?
स्टेटस् इन्फॉरमेशन मॅनेजमेंट सिस्टिम या तंत्राचा वापरामुळे तालुकास्तरावर रोहयोची किती कामे चालली आहेत, त्यावर किती मजूर काम करताहेत.
ही कामे सध्या कुठल्या पातळीवर याची माहिती सर्वांना घरबसल्या मिळू शकणार आहे.
सध्या जे एनआयसीचे सॉप्टवेअर वापरले जाते. त्यात केवळ जिल्हास्तरीय माहिती संकलित करण्याची सुविधा आहे.
ग्रामपातळीवर ही माहिती ऑनलाईन संकलित करण्याचा शासनाचा विचार आहे.
रोहयोची कामे
विहिरी, रोपवाटीका, गाळ काढणे, रस्ते, वनराई बंधारे, वृक्ष लागवड, शेततळी, खैसाच्या कामांचा समावेश आहे.
त्यासाठी प्रत्येक तालुक्याकरिता १० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
जिल्ह्यात एक लाख १४ हजार ४२३ मजुरांची नोंदणी झाली असून, ८८ हजार १८८ मजुरांना जॉबकार्ड देण्यात आले आहेत.
'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. महाराष्ट्राचा काश्मीर म्हणूनही महाबळेश्वरला संबोधले जाते. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश-विदेश पातळीवर लौकिकास आले आहे. म्हणूनच येथे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ असते. राज्यात सध्या सर्वात जास्त पाऊस सातारा जिल्ह्यात पडला आहे. त्यामुळे येथील सृष्टी हिरवाईने नटली आहे. हा शृंगारलेला निसर्ग डोळ्यांत साठवून घेण्यासाठी आणि पावसाची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी महाबळेश्वरला वाढू लागली आहे.
महाबळेश्वर-पाचगणी गिरीप्रदेश सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगांमधील एक भाग असून सिंदोला टेकड्यांमधील विल्सन पॉईन्ट हा देखील सर्वात उंच भाग आहे. पठाराच्या चहुबाजुंनी नद्यांची खोरी, विविध उंचीच्या सुळ्यांच्या डोंगराचा विशाल प्रदेश व येथील उभट डोंगर कड्यांचा भूप्रदेश ही या प्रदेशाची विशेषत: होय. या पठाराच्या पश्चिम व नैऋत्येकडील कोयनेचे आणि उत्तरेकडील कृष्णेचे विशाल खोरे भू स्वरुपाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
महाबळेश्वर-पाचगणीचे पठार व त्याच्या उतारावर कृष्णा, कोयना, सावित्री, वेण्णा व सोळशी या नद्यांचा उगम होतो. महाबळेश्वर समुद्रसपाटीपासून १३५० कि.मी. उंचीवर आहे. येथील मुख्य डोंगराचे खडबडीत उभट कडे व त्यातील खोऱ्यामुळे सह्याद्रीचे विशाल दर्शन घडते. डोंगराचा पूर्व आणि उत्तरेकडील भाग वगळता संपूर्ण डोंगरमाथा थेट कड्यापर्यंत विविध वृक्ष व वनराईने व्यापला असून येथील वनराई इतकी दाट आहे की उंचावरुन पाहिल्यास मोठ्या पर्णसंभासच्या लाटांचा भास व्हावा.
ऋतुपरत्वे महाबळेश्वमध्ये निसर्ग सौंदर्य बदलत असते. नैऋत्य मान्सून ओसरल्यानंतर म्हणजे ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक सौंदर्य बहरलेले असते. बहुतांश भागावर वनफुलांचा गालीचा अंथरलेला असतो. वनराईच्या मोकळ्या जागा अरारुट आणि लिली फुलांनी भरुन जातात. येथील कडे, चकाकणारे असंख्य ओहोळ, फवारे, इंद्रधनु रंगीबेरंगी तुषारांनी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
महाबळेश्वर मंदिर प्राचीन असून यादव राजाने १३ व्या शतकात बांधले आहे. विल्सन पॉईंट, मारवारिया पॉईंन्ट, केल्स पॉईंन्ट, ईको पॉईंन्ट, आर्थर पॉईंन्ट, विंडो पॉईंन्ट, कसलरॉक पॉईंन्ट, सावित्री पॉईंन्ट, मार्जोरी पॉईंन्ट, एल्फिस्टन पॉईंन्ट, कॅनॉट पीक हंटर पॉईंन्ट, नॉथकोर्ट पॉईंन्ट, लॉडविक पॉईंन्ट, बॉम्बे पॉईंन्ट, हत्तीचा माथा, चायनामन धबधबा, फॉकलंड पॉईंन्ट, इत्यादी पॉईंन्ट पर्यटकांना भूरळ घालतात.
महाबळेश्वरास बाल कवींनी 'निसर्ग देवतेला पडलेले सुंदर स्वप्न' असे म्हटले आहे, याची प्रचिती महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांना निश्चितच येते यात मात्र शंका नाही. म्हणूनच महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नंदनवन ठरले असून येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.