Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील बारावा बलुतेदार चौगुला होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


 

       सुरुवातीला मानवधर्माची निर्मिती सिंधू संस्कृतीमध्ये झाली.मानवाला आवश्यक साधन संपत्तीचा विकास सिंधू संस्कृतीमध्ये झाला आहे.सिंधू संस्कृतीमध्ये कृषी क्रांती झालेली आहे.....आणि ही क्रांती स्त्रियांनी केलेली आहे....आणि या सिंधू संस्कृतीमध्ये आर्यांचे आक्रमण झाले....म्हणजेच भारतावर पहिले परदेशी आक्रमण हे आर्यांनी केलेले आहे.आर्यांनी आक्रमण करून इथे सनातन धर्म व्यवस्था निर्माण केली आहे.मातीत “बी” पेरून पहिला पुरुष शेतकरी झाला तो “बळीराजा” होय.....आणि या बळीराजाला संपविण्याचे काम आक्रमित आर्यांनी केलेले आहे.सिंधू संस्कृतीमधून निर्माण झालेल्या देशाला सनातन धर्म व्यवस्थे विरुध्द संघर्ष करून पहिला मानवधर्म देण्याचे कार्य हे गौतम बुध्दांनी केले आहे....आणि हा संपूर्ण भारत देश बौद्धमय करण्याचे कार्य सम्राट अशोक यांनी केले आहे.आर्य नंतरच्या काळात वैदिक धर्म स्थापन करून ते वैदिक धर्म पंडीत झाले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात यांना वैदिक धर्म पंडीतच म्हणायचे.परंतु यांना गावगाड्यामध्ये ग्रामदैवत आणि कुलदैवत यांचे पूजन करायचा अधिकार नव्हता.गावगाड्यातील ग्रामदैवतेचे आणि कुलदैवतेचे पूजन करण्याचा अधिकार हा अलुतेदार यांनाच होता....कारण वैदिक धर्म पंडित गावगाड्यातील लोकांना शुद्र मानीत होते...आणि शुद्राच्या घरी ते कधीही येत नव्हते....म्हणूनच छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक हा स्वराज्यातील वैदिक धर्म पंडितांनी केला नाही.जेव्हा पेशवाईला सुरुवात झाली तेव्हा अष्टविनायकांची मंदिरे स्थापन झाली तेव्हा हा वैदिक धर्म पंडित ब्राह्मण झाला....आणि त्याने ब्राह्मण धर्म स्थापन केला आहे.

       छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार घेऊन स्वराज्य निर्माण केले.त्यातील बारा बलुतेदार नेमके कोण होते हे गेल्या अकरा लेखातून अकरा बलुतेदार म्हणजे १) महार २) सुतार ३) लोहार ४) चांभार ५) कुंभार ६) न्हावी ७) सोनार ८) जोत्सी ९) परिट १०) गुरव ११) कोळी समजून घेतले आहे.आता आपण या लेखात शेवटचा बलुतेदार म्हणजे बारावा बलुतेदार “चौगुला” समजून घेणार आहोत.गावगाड्यातील लोकांना एकत्रित करून त्यांना काय काम द्यायाचे हे चौगुला ठरवायचा.गावच्या कार्यक्रमात एखादा मोठा व्यक्ती गावात आला की त्याचे स्वागत करण्याचे काम चौगुला यांचेकडे असायचे.त्या कार्यक्रमाचे जेवणाची सोय करणे म्हणजे जेवणासाठी लागणारी भांडीकुंडी जमवायचे भाजीपाला जमवायचे तसेच सदरच्या कार्यक्रमाचे गावगाड्यातील लोकांना निमंत्रण देण्याची जबाबदारी ही या चौगुल्याकडे होते.हे काम चौगुल्याचे असणारे दहा कुटुंबापैकी एक दोन कुटुंब करायची...आणि इतर कुटुंबातील लोक काळीमध्ये “बी” पेरून शेती करायची.शेती करत असल्यामुळे चौगुला पुढे “कुणबी” म्हणून ओळखला जाऊ लागला.

      छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या सैन्यामध्ये हा चौगुला भरती होऊन स्वराज्याच्या लष्कराची ताकद वाढवून तो स्वराज्याचा मावळा झाला.याच स्वराज्याच्या मावळ्याला पुढे “मराठा” म्हणून संबोधले जाऊ लागले.त्यामुळे आजचा मराठा हा दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वराज्यासाठी लढणारा अलुतेदार बलुतेदार आहेत.आज या समाजाची ओळख पुसली गेली आहे.तो अस्तित्वहीन झालेला आहे.

No comments:

Post a Comment