Wednesday, January 10, 2018

शिवरायांच्या स्वराज्याचे समतावादी धोरण...यल्ल्या मांगाच्या हातून चढविले स्वराज्याचे पहिले तोरण....!




         शहाजीराजे यांनी स्वराज्य निर्माण करण्यासठी पुणे (निजबत मुंजेरी ) येथे हाड्कीच्या (महार समाजाच्या) जागेत राशीनच्या बांगर यांचेकडून १६१६- १६१७ मध्ये लाल महाल बांधून घेतला होता...आणि तो झांबरे पाटील याला देखरेखीसाठी देण्यात आलेला होता.शहाजीराजे यांना पहिला पुत्र संभाजी झाल्यानंतर १६२३ मध्ये “नागरवास” गावात हत्तीच्या वजना एवढी तुळा करून तेवढ्या वजनाचे सोने चांदी धन धान्य रयते मध्ये वाटून स्वराज्य संकल्पित केले होते.तुळा झालेवरून “नागरवास” या गावचे नाव पुढे “तुळापुर” झाले.शिवनेरी गडावर शिवाजी महाराज यांचा १९ फेब्रुवारी १६३० मध्ये जन्म झाला.त्यांचे प्रशिक्षण कर्नाटक मध्ये वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलार मामा यांचेकडे झाले होते.आता संकल्पित स्वराज्याची स्थापना करण्याची वेळ आली होती. शहाजीराजे यांच्या संकल्पित स्वराज्याचे भगवे प्रतिक घेऊन शिवराय आणि माता जिजाऊ यांचे सोबत वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलार मामा हे शहाजीराजे यांनी प्रचंडगडाचे महार राजे रायनाक परवारी यांचे नावे दिलेला लखोटा घेऊन शिवगंगा खोऱ्यातील पासलकर वाड्यामध्ये येतात....आल्यानंतर स्वराज्य स्थापनेची गनिमी कावे सुरु होतात. शिवरायांची मांग दरीतील यल्ल्या मांग आणि मोसे खोऱ्यातील तवं गाव येथील खंड्या महार यांची पासलकर वाड्यात भेट होते.ठरल्याप्रमाणे शिवराय प्रचंडगडाच्या पायथ्याशी यल्ल्या मांग आणि खंड्या महार यांचे बरोबर थांबतात....आणि वीर बाजी पासलकर आणि नेताजी पालकर शहाजीराजे यांनी दिलेला लखोटा घेऊन गडावर जातात.गडावर रायनाक परवारी यांना भेट देतात आणि लखोटा त्यांच्या स्वाधीन करतात....लखोटा वाचल्यानंतर रायनाक परवारी अत्यंत आनंदित होतात.कारण तो लखोटा असतो स्वराज्य स्थापनेसाठी प्रचंडगड शिवरायांच्या हाती स्वाधीन करण्याचा....शहाजीराजे आणि त्यांची स्वराज्य संकल्पने संदर्भात पूर्वीच चर्चा झालेली होती. त्यामुळे ठरल्याप्रमाणे गड स्वराज्यात देण्याचे वचन आता रायनाक परवारी यांना पूर्ण करण्याची वेळ आले होती.सुरु असलेल्या स्वराज्याच्या गनिमी काव्याप्रमाणे गडाच्या पायथ्याशी थांबलेले शिवरायांना वचनपुर्तीचा सांगावा येतो.शिवराय आपल्या बरोबर असलेल्या यल्ल्या मांग आणि खंड्या महार यांना बरोबर घेऊन गडावर निघतात.स्वराज्याचे भगवे निशाण यल्ल्या मांग हातामध्ये घेऊन त्यांच्या सोबत निघतो.शिवराय गडावर पोहचल्यानंतर गड स्वाधीन करून घेण्याची प्रक्रिया सुरु होते.....प्रक्रीये दरम्यान वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलार मामा - यल्ल्या मांग - खंड्या महार इ.उपस्थित असतात.गड स्वराज्याच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिवराय यल्ल्या मांग याला स्वराज्याचे भगवे निशाण “पहिले तोरण” म्हणून प्रचंडगडावर उभारण्यास सांगतात.शिवरायांचे आदेश घेऊन यल्ल्या मांग समतावादी स्वराज्याचे भगवे निशाण प्रचंडगडावर उभारतो तो दिवस २८ जानेवारी १६४५ इतिहासात नोंद होतो.शिवराय या गडाचे नामकरण करतात ते म्हणतात प्रचंडगडावर यल्ल्या मांगाने चढविलेले हे भगवे निशाण म्हणजे समतावादी स्वराज्याचे पहिले तोरण आहे आणि आजपासून या “प्रचंडगडाचे” नाव “तोरणागड” झाले असे समजावे.समतावादी स्वराज्याच्या पहिल्या तोरणागडाची पहिला किल्लेदार म्हणून यल्ल्या मांगाची निवड करतात.यल्ल्या मांग पहिला किल्लेदार म्हणून शिवरायांना मुजरा करतो.शहाजीराजे संकल्पित स्वराज्याची स्थापना झाली होती....आता योजना आखण्याची गरज होती.शिवराय गडावरून पासलकर वाड्यात येतात पासलकर वाड्यामध्ये त्यांच्या बरोबर वीर बाजी पासलकर – नेताजी पालकर – शेलारमामा – कान्होजी जेधे – झुंजारराव मरळ – हैबतराव शिळीमकर – माणकोजी (दहातोंडे) - रायनाक परवारी - यल्ल्या मांग – खंड्या महार – इ. बरोबर स्वराज्याची योजना (आपण सर्वजण त्याला स्वराज्याची शपथ म्हणतो ) पासलकर वाड्यामध्ये आखली.त्याच दिवशी महिलेची बेअब्रू झाली म्हणून पासलकर वाड्यात तक्रार आलेली होती.माता जिजाऊ आणि शिवराया समोर त्या महिलेची तक्रार होताच शिवराय गडगडले त्यांनी लागलीच त्या महिलेची बेअब्रू करणाऱ्या बाबाजी भिकाजी गुजर ह्या मोगलाच्या पाटलाला धरून हजर करण्याचे आदेश केले.त्या बाबाजी भिकाजी गुजर याला धरून माता जिजाऊ आणि शिवराया समोर उभे केले असता त्याचे हातपाय कलम करून त्याचा चौरंगा करण्याचे आदेश शिवरायांनी दिले असता यल्ल्या मांग आणि खंड्या महार यांनी त्या पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा चौरंगा स्त्री संरक्षणासाठी करून आपल्या मांग समाजचे योगदान स्वराज्यात २८ जानेवारी १६४५ मध्ये निश्चित केले आहे.समतावादी स्वराज्याचा पहिला गडकरी होण्याचा मान यल्ल्या मांगाला मिळाला आहे.याच यल्ल्या मांगाने स्वराज्याची पहिली बाजारपेठ तोरणागडाच्या गावतील लोकांसाठी उभारून व्यावसायिक दुष्टीकोन दाखवून दिलेला आहे.आजही त्या बाजारपेठेला येल्याची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते.आज जे लोक तोरणगडा जवळ राहतात त्यांना हा इतिहास पूर्णपणे माहित आहे.आजही तोरणागड किल्ल्याला भेट द्यायला जाणारे पर्यटक दिंडी दरवाज्यातून आत प्रवेश करताना “येलोजी बुवाचा चांग भले” अशी घोषणा देत प्रवेश करीत असतात.परंतु हा येलोजी बुवा कोण...? असा प्रश्न कोणीही इतिहासाला विचारीत नाही.जो पर्यंत इतिहासाला प्रश्न विचारले जाणार नाही तो पर्यंत अठरा अलुतेदार यांचे स्वराज्यातील योगदान तुमच्या आमच्या समोर येणार नाही.मग हा इतिहास कोणी लपविला असा जर प्रश्न आपण इतिहासाला विचारला तर इतिहास आपल्याला सांगतो की,हा इतिहास वैदिक धर्म पंडीत आणि त्यांचे असणारे गुलाम यांनी आणि शिवरायांचे विरोधक मोगलांचे समर्थक असणारे मराठा यांनी लपविले असल्याचे सांगतो.तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यदर्शन रयतेला होऊ दिले नाही....त्यांचा अंत्यसंस्कार कोणत्या धर्म पद्धतीत केला गेला हे गुढ इतिहासाने सांगितले आहे.परंतु तो इतिहास वैदिक धर्म पंडित आणि त्यांचे गुलाम असणारे स्वराज्याचे विरोधक यांनी लपविलेले आहे.परंतु शिवरायांनी पहिला स्वराज्यभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत २४ सप्टेंबर १६७४ मध्ये केल्याचे इतिहास सांगत आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वराज्य हे समतावादी स्वराज्य होते असे इतिहासाचे गूढ उकल करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी रयतेला सांगितले आहे.मोगल समर्थक मराठा यांनी आणि वैदिक धर्म पंडित तसेच त्यांचे गुलाम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्याचे समतावादी विचार रयते समोर आणण्याचे कार्य केले आहे.अशा महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले आहे.इतिहास आपल्याला सांगतो की,छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे करून जी पेशवाई उभी राहिली ती पेशवाई स्वराज्यातील अठरा अलुतेदार यांनी स्वराज्याचा सरदार सिद्धनाक महार यांच्या नेतृत्वात भीमा कोरेगाव येथील १ जानेवारी १८१८ मध्ये झालेल्या युध्दात संपुष्टात आणली.दुसरा बाजीराव पेशवा याचा पाठलाग करून त्याचा सरदार बापू गोखले याला आष्टी जवळ पुन्हा झालेल्या युध्दात ठार केले.....तेथून दुसरा बाजीराव कोठे पळून गेला याचे इतिहासामध्ये गुढ कायम आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा समतेचा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढला.....त्यांची लपविली गेलेली समाधी जेव्हा महात्मा फुले यांनी बाहेर काढून पहिली शिवजयंती साजरी केली.तेव्हा वैदिक धर्म पंडितांनी त्यांना छळण्यास सुरु केले त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा वस्ताद लहूजी साळवे यांनी त्यांचे संरक्षण करून पुन्हा एकदा स्वराज्यात मातंग समाजाचे योगदान निश्चित केले आहे.....म्हणून वस्ताद लहूजी साळवे यांचा स्वराज्याची रयत सर्वत्र सन्मान करते.महात्मा ज्योतिबा फुले यांचे मार्गदर्शन घेऊन सातारा गादीचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी अठरा अलुतेदार यांच्यासाठी पहिली शाळा स्थापन केली....त्या शाळेमध्ये भीमराव रामजी सपकाळ (डॉ बाबासाहेब आंबेडकर ) यांचे १ ली ते ४ थी पर्यंत शिक्षण झालेले आहे.कोल्हापुर गादीचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मोलाची मदत केलेली आहे त्यामुळे स्वराज्या बरोबर त्यांचा घनिष्ट संबध आला असल्यामुळे त्यांना इतिहासाने भरपूर काय सांगितलेले आहे.त्यामुळेच त्यांनी रयतेला स्वराज्याची उकल व्हावी यासाठी पहिले आंदोलन सुरु करण्यापूर्वी पेशवाईचा अंत ज्याठिकाणी झाला म्हणजे भीमा कोरेगाव याठिकाणी शूरवीर यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या विजयस्तंभास भेट देवून तेथे मानवंदना देऊन स्वराज्याची असलेली राजधानी रायगडाच्या परीसरात मनुस्मृतीचे दहन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा सत्याग्रह्याना देण्यास सांगितल्या आहेत.आणि महाड येथील चवदार तळ्याच्या प्रश्ना संदर्भात जे इंग्रज सरकारला ज्या लेटरहेड वर निवेदन दिले त्या लेटरहेड वर “जय भवानी जय शिवाजी” असे लिहिले होते.त्यानंतर स्वतंत्र भारताला जे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर देत असताना संविधान सभेच्या भाषणात असा उल्लेख केला आहे की,सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य लोकहितवादी लोकशाही राज्य असल्याने मला संविधान लिहिण्यास सोपे झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ मध्ये महापरीनिर्वाण झालेनंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित कार्यक्रम अंधेरी येथे एका हॉलमध्ये होता तेथे आण्णाभाऊ साठे उपस्थित होते.जेव्हा श्रद्धांजली अर्पित करण्याची त्यांची वेळ आली तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांनी मातंग समाजाला उद्देशून एक कविता केला ते म्हणतात की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण स्वराज्याचा इतिहासाचा आभ्यास आहे.त्यामुळे त्यांनी मला सांगितले आहे की,तू इतिहासातील ऐरावत आहे म्हणजे हत्तीसारखा बलदंड आहेस.या गुलामगिरीच्या खाईत का अडकून बसलास तू...तूला या धर्ममार्तंडानी छळले आहे.उठ अंग झाडुनी मज सांगून गेले भीमराव अशा तऱ्हेची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून त्यांनी मातंग समाजाचे योगदान स्वराज्यात निश्चित केले आहे. त्यामुळे शहाजीराजे संकल्पित स्वराज्य शिवरायांनी समतावादी स्वराज्य म्हणून प्रचंडगडावर समतेचे प्रतिक असलेले पहिले भगवे निशाण यल्ल्या मांगाच्या हातून चढवून त्यांचे तोरणगड असे नामकरण करून समतेच्या स्वराज्याचा पहिला गडकरी म्हणून मान दिलेले आहे अशा समतेच्या स्वराज्याचा मराठी सरदार असणारा यल्या मांगाच्या सन्मानासाठी २८ जानेवारी १६४५ च्या दिनाचे औचित्य साधून भीमा कोरेगावच्या युध्दाच्या २०० वर्षपूर्ती निमित्त २८ जानेवारी २०१८ रोजी “येलोजी बुवाचा चांग भले” असे म्हणत चलो तोरणागड..! चलो तोरणागड...!! चलो तोरणागड....!
                                                   धन्यवाद
                                                                                                  राजेश खडके
                                                                                                     समन्वयक
                                                                                            सकल मराठी समाज 


जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।।
गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।
धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।
मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।
ठरवून आम्हा हीन अवमानीत । जन्मोजन्मी करुनी अंकित ।।
जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।।
एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।।
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रगट निज नाव ।
 

Sunday, January 7, 2018

आमच्या गळ्यात गाडगे,मडके आणि कमरेला झाडू होता....तर आमचे सैनिकी प्रशिक्षण कसे झाले.,,,! प्रकाश आंबेडकर नेते भारिप बहुजन महासंघ


सोशल मिडीयावर भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या लढाईस झालेल्या २०० वर्षापूर्ती निमित्त एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या लेखाचे जर विश्लेषण केले तर प्रत्येकाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेले उदगार आठ्विल्याशिवाय राहणार नाही.एक विश्लेषक म्हणून मला याठिकाणी त्यांचे ते उदगार का...? महत्वाचे वाटत आहे.तर त्याचे कारण तुमच्या समोर आणू इच्छितो. प्रकाश आंबेडकर यांनी महार समाजाचे ऐतिहासिक महत्व शोधण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या महार समाजावर टाकली असल्याचे सदरच्या लेखावरून दिसून येते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यामध्ये स्वराज्याला खूप महत्वाचे स्थान दिलेला आहे. स्वराज्यातील भगव्या ध्वजाला खूप मोठा सन्मान दिलेला आहे.लपविलेले शिव छत्रपती शोधून रयते समोर आणण्याचे कार्य ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आहे....त्यांना गुरुचे स्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहे.वैदिक धर्म पद्धतीत झालेला राज्याभिषेक नाकारून संभाजीराजांच्या सांगण्यावरून तीनच महिन्यानंतर म्हणजे २४ सप्टेंबर १६७४ मध्ये दुसरा     राज्याभिषेक करून त्यांनी समतांपर्व सुरू केले होते.२४ सप्टेंबर या दिवसाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या समाज सुधारक चळवळीमध्ये मोलाचे स्थान दिलेले आहे.त्यांनी २४ सप्टेंबर १८७४ मध्ये म्हणजे स्वराज्याच्या दुसऱ्या राज्याभिषेक दिनाच्या २०० वर्षापुर्ती निमित्त सत्यशोधक धर्माची स्थापना करून रयतेच्या हातामध्ये भगवा ध्वज देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले आहे.बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या पर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.सातारचे छत्रपती प्रतापसिह महाराज यांनी स्थापन केलेल्या शाळेमध्ये भीमराव रामजी सपकाळ (डॉ बाबासाहेब आंबेडकर) यांचे १ ली ते ४ थी शिक्षण झाले आहे.राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या काळात त्यांना खूप मदत केलेली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखाणाच्या माध्यमातून रयतेचे प्रबोधन केले.....आणि जेव्हा त्यांना वाटले की,आता रयतेमध्ये जाऊन काम करण्याची वेळ आलेले आहे.तेव्हा स्वराज्याचा दुसरा राज्याभिषेक आणि सत्यशोधक समाज स्थापनेच्या २४ सप्टेंबर या दिनाला महत्व देऊन २४ सप्टेंबर १९२४ मध्ये “समता सैनिक दल” स्थापन केले आहे.याठिकाणी मुद्दामून आपले लक्ष केंद्रित व्हावे म्हणून उल्लेख करतो की,महात्मा ज्योतिबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७४ मध्ये जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती...तेव्हा त्यांनी भगवा ध्वज रयतेच्या हातामध्ये दिला होता.म्हणजे “भगवा ध्वज” हा कधीही वैदिक धर्म सानातनांच्या हातामध्ये नव्हता.मग त्यांचा ध्वज कोणता होता असा प्रश्न साहजिकच आपल्याला उद्भविलेला असेल.त्यानी स्थापित केलेल्या सत्यशोधक धर्मास कॉर्टर करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांनी एक वर्षानंतर म्हणजे १८७५ मध्ये गुजरात मधील काठीयावाड जिल्ह्यातील टंकारा गावातील (त्यावेळी गुजरात मुंबई प्रांतामध्ये होता) त्यांच्या आश्रमात आर्य सनातन हिंदू धर्माची स्थापना केली होती.एक विश्लेषक म्हणून मला असा प्रश्न पडला आहे की,जर सत्यशोधक धर्माचा ध्वज भगवा होता....तर आर्य सनातन हिंदू धर्माचा ध्वज कोणता होता...? मानव कल्याणात भगव्या ध्वजाला खूप मान होता व आहे.त्याचे कारण असे की,भगवान गौतम बुद्धांचा ध्वज “भगवा” तर सम्राट अशोकांचाही ध्वज “भगवा” तर बौध्द भिकुंचे “चीवर” पण भगवेच....! वारकरी संप्रदाय यांचा ध्वजही “भगवा”च तर शहाजीराजे यांनी स्वराज्याचे प्रतिक म्हणून शिवरायांच्या हातामध्ये भगवाच ध्वज दिलेला आहे.म्हणूनच संता (वारकरी संप्रदाय) बाबत शिवरायांना अत्यंत आदर होता.सत्यशोधक धर्माचा ध्वज “भगवा” तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर या दिनाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १९२४ मध्ये “समता सैनिक दल” स्थापन केले....त्याच्या प्रत्येक सदस्याला समतेचे संरक्षणाचे प्रतिक म्हणून डोक्यावर निळी टोपी धारण केलेली आहे.१९२७ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथे एकदाच भेट देऊन तेथील महार योद्ध्यांना मानवंदना केली आहे....आणि प्रकाश आंबेडकरांचेही तेच म्हणणे आहे ते म्हणतात की,माझ्या माहिती प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगावला एकदाच भेट दिलेली आहे.त्यांनतर बाबासाहेब यांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात मनुस्मृतीचे दहन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी असे उदगार काढले आहे की,”जो इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाही” एक विश्लेषक म्हणून मला असे वाटते की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना इतिहासाचा आभ्यास होता.कारण इतिहास हे सांगतो की छत्रपती संभाजी महाराज यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या झाली होती.....आणि त्यांचे तुकडे गोळा करून महार समाजाने अंत्यसंस्कार करून त्यांची समाधी उभारलेली आहे.संभाजीराजांच्या या हत्येचा बदला स्वराज्याचे तिसरे छत्रपती शाहू महाराज यांचे भोरचे सरदार सिद्धनाक महार याने स्वराज्याची फौज घेऊन पेशवाईचा अंत केल्याची माहिती असल्यामुळेच त्यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास १९२७ साली भेट देऊन अभिवादन केले.आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात मनुस्मृती दहन करून आर्य सनातनी हिंदू धर्माला असा एक मॅसेज दिला की,तुमचे सर्व कृत्य आम्हाला माहित झाले असून पुढील काळात रयतेलाही माहित होईल यासाठीच त्यानी आपल्या सर्वांना इतिहासाकडे वळविले असल्याचे माझे विश्लेषण आहे.त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह्यांच्या हातामध्ये भगवा ध्वज देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देण्यास सांगितल्या असल्याचे हे सर्वश्रुत आहे.ब्रिटीश सरकारला ज्या लेटरहेडवर बाबासाहेबांनी निवेदन दिले त्या लेटरहेडवर बाबासाहेबांनी “जय भवानी जय शिवाजी” असे लिहिलेले होते.असे प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या लेखात नमूद केलेले आहे....ते पुढे असे म्हणतात की,या घोषणेचा घरंदाज मराठ्यांच्या इतिहासात उल्लेखही सापडत नाही.याठिकाणी एक विश्लेषक म्हणून जो महार समाजाचा इतिहास माझ्या समोर आलेला आहे त्यामध्ये “महार” कसा पराक्रमी योध्दा होता ते समोर आलेले आहे.तोरणागडाचे पूर्वीचे नाव “प्रचंडगड” होते आणि त्याचा राजा रायनाक प्रवारी महार होता हा किल्ला जिंकण्यासाठी मोगलांनी या किल्ल्यावर २२ वेळा हल्ला केला होता परंतु तो त्यांना जिंकता आलेला नाही.मात्र जेव्हा या किल्ल्याला मोगलांनी तीन वर्ष वेढा घालून रसद बंद केली तेव्हा या महार राजाला मोगला बरोबर तह करून त्यांचे मांडलिकत्व पत्करावे लागले.शहाजीराजे आणि रायनाक परवारी यांचे सलोख्याचे संबध होते.२८ जानेवारी १६४५ मध्ये शिवरायांकडे पाटलांनी बेअब्रू केले म्हणून पासलकर वाड्यात एका महीलेची तक्रार आलेली होती.तेव्हा त्या पाटील बाबाजी भिकाजी गुजर यांचे हात पाय कलम करून त्याचा चौरंगा करण्याचे आदेश जेव्हा शिवरायांनी दिले तेव्हा मोसे खोऱ्यातील तवं गाव येथील महार योद्धा “खंड्या महार” याने या पाटलाचे हातपाय तोडून त्याचा चौरंगा केला.असे स्त्री संरक्षणासाठी महार समाजाचे पूर्वीपासून योगदान राहिलेले आहे.स्वराज्यात सर्वात जास्त सहभाग महार योध्यांचा होता एक विश्वासू जमात म्हणून शिवरायांच्या दरबारी या महार योध्यांचा मोठा सन्मान होता.छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक किल्ल्याची जबाबदारी या महार योद्ध्यावर सोपविली होती....त्यांना “नाक” किंवा “नाथ” म्हणत असत ब्राह्मणी इतिहासकारांना महार समाजाचे इतिहासातील योगदान लपविता आलेले नाही.एवढे मोठे योगदान महार समाजाचे स्वराज्याच्या इतिहासात आहे.तेव्हा प्रकाश आंबेडकर त्यांच्या लेखात असे नमूद करतात की,अशा किल्ल्याच्या रखवालदार यांना “नाथ” म्हणायचे तेव्हा आपल्या सर्वाना इतिहासाकडे वळवायचे असल्याचे संकेत त्यांनी आपल्याला दिले असल्याचे एक विश्लेषक म्हणून मला वाटत आहे.संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती नुसार औरंगाजेबाच्या माध्यामतून करण्यात आली हे जेवढे सत्य आहे.तेवढे संभाजी महाराजांना वढू येथील महार समाजाने अंत्यसंस्कार केले असल्याचे सत्य आहे.....आणि त्या महार समाजाचा प्रमुख गोविंद महार असल्याने त्याच्या पुढाकाराने हे कार्य पार पाडल्याने त्याचा सन्मान म्हणून त्याठिकाणी त्याची समाधी बांधलेली आहे.याच संभाजीराजांच्या हत्तेनंतर औरंगाजेबाने स्वराज्य ताब्यात घेतलेले नाही तो औरंगाबाद येथे निघून गेला आणि स्वराज्यात पेशवाईचा पाया रचला गेला.त्यानंतर स्वराज्याच्या दोन गाद्या निर्माण करण्यात आल्या.....एक गादी साताऱ्यात तर दुसरी गादी कोल्हापुरात निर्माण झाली......पेशव्याने स्वत:चे साम्राज्य उभे केले होते.सातारा गादीचे तिसरे छत्रपती शाहू महाराज यांच्या दप्तरी विचित्रगडाचा सरदार सिद्धनाक महार नावाचा सरदार होता.जेव्हा संभाजी महाराजांच्या मनुस्मृती प्रमाणे हत्येचे उकल स्वराज्याला झाली....आणि दुसऱ्या बाजीरावाने स्वराज्याची टांकसाळ (चलन) बंद करून स्वत:ची टांकसाळ (चलन) सुरु केल्याची बातमी सातारा गादीला झाली तेव्हा तिसरे छत्रपती शाहू महाराज यांनी सिद्धनाक महार ह्या आपल्या प्रामाणिक सरदाराला बोलावून घेतले....आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेऊन पेशवाई संपविण्याचे आदेश केले होते.तेव्हा सिद्धनाक महार याने स्वराज्यातील २५० प्रमुख योद्ध्यांना लखोटा पाठवून प्रत्येकी १०० ठोकाळगडी घेऊन वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर येण्यास सांगितले.सर्वजण म्हणजे पंचवीस हजाराचे सैन्यबळ ३१ डिसेंबर १८१७ मध्ये समाधी स्थळी जमा झाले संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ येथे संकल्प करून शनिवार वाड्यावर हल्ला करायला निघाले होते.याची खबर पेशव्याला लागली होती....त्याने असे ठरविले की,सिद्धनाक महार याला संभाजी महाराज प्रमाणे हत्या करायची आणि त्या महार समाजाला आठवण द्यायची असा विचार करून तो २८००० चे सैन्यबळ घेऊन निघाला होता.ब्रिटीशांना याची खबर लागली होती ते त्यांची सेना घेऊन निघाले त्यांची आणि सिद्धनाक महार याची भीमा कोरेगाव याठिकाणी भेट झाली त्यांचे ५०० सैनिक सिद्धनाक महार याच्या नेतृत्वात लढण्यास तयार झाले.तो पर्यंत पेशवा त्याचे सैन्य घेऊन भीमा कोरेगाव याठिकाणी पोहचला होता त्या सैन्याचे नेतृत्व बापू गोखले करीत होता.आमने सामने युद्ध सुरु झाले पेशवा युध्द हरला आणि पळून गेला युद्ध जिंकले होते.परंतु संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदल पूर्ण झाला नव्हता पेशव्याचा पाठलाग सुरूच होता....इकडे शनिवार वाडा स्वराज्याच्या स्वाधीन जाईल याची भीती पेश्व्याचा पाहुणा बाळाजी नातू याला लागली  होती.लागलीच त्याने ब्रिटीश युनियन जॅक शनिवार वाड्यावर चढवून तो त्यांना शरणागत झाला.गद्दार पेशव्याच्या पाहुण्याला ब्रिटिशांनी संरक्षण देऊन ६९ लाखाची पेन्शन देऊन त्याला मध्य प्रदेश मध्ये पुण्यात न येण्याच्या करारावर पाठविले तिकडेच त्याचा अंत झाला.पाठलाग करणाऱ्या महार सरदार यांची आणि पेशवाई सरदार बापू गोखले यांची आष्टी जवळ भेट झाली पुन्हा युध्द सुरु झाले त्याठिकाणी बापू गोखले मारला गेला आणि पेशवा पुन्हा एकदा पळून जाण्यास यशस्वी ठरला.पुढे तो पेशवा कोठे गेला..? त्याचे काय झाले...? तो कधी व कोठे मेला....? याचे इतिहासात गूढ आहे.(स्वराज्याचे तिसरे छत्रपती शाहू महाराज यांचेकडे हरलेला पेशवा गेला नाही त्यामुळे तो स्वराज्यात नव्हता एवढे मात्र नक्की झाले) इंग्रजांनी त्याठिकाणी पेशवाई अंताचा विजयस्तंभ उभारला आहे.१९२७ साली बाबासाहेबांनी त्या विजयस्तंभास एकदाच भेट दिली आहे.जेव्हा इंग्रजांनी त्यांच्या सैन्यात महार समाजाला घेण्यात बंद केले तेव्हा त्यांना बाबासाहेबांनी सुनावले होते की, “आमचे पूर्वजांनी शिपाईगिरीच केलेली आहे” तेव्हा त्यांना पुन्हा एकदा सेनेत घेण्यास इंग्रजांनी सुरु केले.तेव्हा प्रकाश आंबेडकर त्यांचा लेखात नमूद करतात की,छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास बाहेर आला पाहिजे.त्यांना भाऊ बहिण होते की नव्हते...? होते तर किती होते..? त्यांची नावे काय....? स्वराज्याच्या सुरुवातीला त्यांचे बरोबर कोण होते....? किल्याचे रखवालदार “नाथ” होते तर मग ते कोण होते.हा इतिहास एखाद्या शिकलेल्या अस्पृश्याने किंवा महाराने लिहिला पाहिजे त्याचे संशोधन केले पाहिजे अशी अपेक्षा त्यानी त्यांच्या लेखात व्यक्त केली आहे.जर आमच्या गळ्यात गाडगे मडके होते.....तर आमचे सैनिकी प्रशिक्षण केव्हा झाले...? कसे व कुठे झाले आम्हाला प्रशिक्षण देणारे कोण होते...? त्यांचे नेतृत्व करणारे कोण होते....? असा प्रश्न त्यांनी इतिहासाला विचारला आहे.

Wednesday, January 3, 2018

आम्ही समतावादी स्वराज्यातील मराठी सरदारच.....कोणीही आमचा इतिहास बुजवू शकत नाही....! आता तरुण आपल्या पूर्वजांचा इतिहास शोधत आहे....! गोविंद महार झिंदाबाद - झिंदाबाद – झिंदाबाद......! सिद्धनाक महार झिंदाबाद - झिंदाबाद – झिंदाबाद......! डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.....!

आम्ही समतावादी स्वराज्यातील मराठी सरदारच.....कोणीही आमचा इतिहास बुजवू शकत नाही....! आता तरुण आपल्या पूर्वजांचा इतिहास शोधत आहे....!
गोविंद महार झिंदाबाद - झिंदाबाद – झिंदाबाद......!
सिद्धनाक महार झिंदाबाद - झिंदाबाद – झिंदाबाद......!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.....!
राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी समाज
समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास लेखक चंद्रशेखर शिखरे यांनी जिजाऊ प्रकाशन यांचे वतीने प्रकाशित केला आहे.त्यास मान्यता युगपुरुष खेडेकर साहेबानी दिली आहे.मला त्यांचे कौतुक करावेसे वाटते कारण त्यांनी खुल्या मनाने सांगितले आहे आणि त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की,संभाजी महाराज यांची स्वराज्यात ३८ दिवस धिंड काढून मनुस्मृती प्रमाणे हत्या करण्यात आली.अस्पृश्य महार गोविंद गोपाळ महार (गायकवाड) याने त्यांचे तुकडे गोळा करून आपला भाऊबंद मेला असे सांगून आपल्याच महार वाड्यात संभाजी महाराजांचा अंत्यविधी केला.त्या गोविंद गोपाळ महार यांची समाधी नंतरच्या काळात त्याच महार वाड्यात उभारलेली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात अस्पृश्य शब्दाला थारा नव्हता.कारण त्यांचे मराठी सरदार यांच्यामध्ये महार योद्धे भरपूर होते....आणि तिसरे छत्रपती शाहू महाराज यांचा महार योध्दा मराठी सरदार सिद्धनाक महार याने स्वराज्यातील २५० सरदार यांचे प्रत्येकी १०० ठोकाळ गडी घेऊन वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी संकल्प करून भीमा कोरेगाव येथे ५०० महार सैनिका सोबत दुसरा बाजीराव पेशवा आणि त्याचा सरदार बापू गोखले यांचे विरुध्द युध्द करून त्यांचा पराभव केला आणि बापू गोखले याला याच महार योद्ध्यानी आडवा केला असल्याचा इतिहास सांगत आहे.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव याठिकाणी जाण्या अगोदर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले होते.१९२७ मध्ये भीमा कोरेगाव याठिकाणी त्यांनी त्या स्वराज्याच्या महार शूर वीरांना सलामी देऊन १९२७ मध्येच स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात मनुस्मृती दहन केली आहे....आणि त्यांनी असे उद्गार काढले आहे की “जो इतिहास वाचणार नाही,तो इतिहास घडविणार नाही” यांचे संकेत काय आहेत.ज्या महार सैनिकांच्या स्मरणार्थ विजयस्तंभ उभारला त्याच महार सैनिकांना ब्रिटीशानी सेनेत घेणे बंद केले होते.त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटीशा विरोधात संघर्ष करून त्यांना असे सुनावले की “आमच्या पूर्वजांनी शिपाईगिरीच केली आहे.तेव्हा पुन्हा महार वीरांना ब्रिटिशांनी सेनेत घेण्यास सुरुवात केली.याचे संकेत काय आहेत हा विचार आपण का करीत नाही.