Saturday, June 2, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ८) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! दुसऱ्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये “समता सैनिक दल” स्थापन केले....!


१९२० मध्ये बाळकृष्ण गंगाधर टिळकांचे निधन झाले होते.याच काळात डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी साप्ताहिक मूकनायक हे वृत्तपत्र प्रकाशित केले होते.डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्रातील प्रबोधनकारी लिखाणामुळे कोल्हापुरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज प्रभावित झालेले होते.त्यामुळे ते मुंबईला येऊन त्यांनी डॉ बाबसाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांचे बरोबर त्यांनी जेवण केले होते.त्यानंतर डॉ बाबसाहेब आंबेडकर हे पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले होते.त्यांना छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी मोलाचे सहकार्य केले होते.पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभाराव असे त्यांना वाटत होते.त्यामुळे त्यांनी मुंबईला पुतळा बनविण्याचे कार्य जोरात सुरु केले.शनिवार वाड्यावर त्यांना तो पुतळा बसवयाचा होता परंतु बामणी व्यवस्थेने आणि आपल्या काही स्वकीयांनी तो पुतळा तेथे बसविण्यास विरोध केला.त्यामुळे त्यांनी शिवाजीनगर येथे महार समाजाच्या जागेत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याचे निश्चित केले होते.मुंबईतून पुतळा पुण्यात आणताना खंडाळा बोगद्यातून तो पुतळा आणण्यास अडचण निर्माण झाली होती.तेव्हा भोगीची उंची कमी करून नंतर तो बोगद्यातून आणला गेला.इंग्लंडचे युवराज यांचे हस्ते अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण शाहू महाराज यांनी करून घेतले.त्यानंतर छत्रपती राजश्री शाहू महाराज पुण्याहून मुंबईला जात असताना लोणावळा येथे त्यांचे १ मे १९२२ मध्ये निधन झाले (म्हणजे त्यांची हत्या झाली) याची खबर दोन महिन्यानंतर डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना तारेने लंडनला असताना कळाली त्यांना याचे खूप मोठे दु:ख झाले. डॉ बाबसाहेब आंबेडकर लंडनला असताना त्यानी रुपयाच्या समस्यावर एक अहवाल तयार करून तो सादर केले होता.१९२३ ला डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना “डॉक्टर ऑफ सायन्स” ही पदवी मिळाली होती.एकंदरीत पहात डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे आणि स्वराज्याचे नाते अतिशय घट्ट झाले होते.सामाजिक घडामोडीचा आभ्यास करीत असताना अस्पृश्यतेच्या समस्यांवर आणि महिलांच्या समस्यावर कार्य करीत असताना त्यांना महात्मा फुले यांच्या कार्याचा आभ्यास झाला त्यांनी महात्मा फुले समजून घेतले.त्यांना महात्मा फुले यांनी केलेले कार्य आणि छत्रपती शिवरायांचा विचार लक्षात आलेले होते.महात्मा फुले यांनी सांगितले होते की,वैदिक धर्म पंडितांनी मनुस्मृती तयार करून तो कायदा मानून इथली सामजिक व्यवस्था आपल्या ताब्यात ठेवलेली होती.छत्रपती शिवरायांनी वैदिक धर्म पद्धतीचा राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत २४ सप्टेंबर १६७४ मध्ये केला होता.आणि महात्मा फुले यांनी याच दिनाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक चळवळीची स्थापना करून भगवा ध्वज स्विकारलेला होता.डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आले होते की,दुसरा राज्याभिषेक म्हणजे समता आणि ही समता प्रस्थापित करण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून केले आहे.तेव्हा समता लक्षात घेऊन डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर याच दिनाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १९२४ मध्ये “समता सैनिक दल” स्थापन करून त्याच्या सदस्याच्या डोक्यावर निळी टोपी देऊन हातामध्ये भगवा ध्वज दिला.(क्रमश😊

Friday, June 1, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ७) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! केशव बळीराम हेगडेवार यांचा १९१५ मध्ये तर मोहन करमचंद गांधी यांचा १९१६ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि १९२१ मध्ये त्यांना नेतृत्व मिळाले...!


मोहन करमचंद गांधी यांचा जन्म १८६९ मध्ये झाला होता.याच काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवराय यांची पहिली शिवजयंती पुण्यामध्ये सुरु केली होती.१८७५ मध्ये गुजरात येथील काठीयावाड येथील टंकारा गावात स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य सनातनी हिंदू धर्माची स्थापन केली होती.याच काठीयावाडचे मोहन गांधी यांचे वडील करमचंद गांधी दिवान होते.बाळकृष्ण गंगाधर टिळक व आगरकर यांनी १८८४ ला पहिली हिंदू महासभा आयोजित करून त्याचे १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये रुपांतर केले होते.भाऊ रंगारी म्हणजेच भाऊ लक्षमण जावळे या मराठा समाजाच्या व्यक्तीला हाताशी धरून गणपती उत्सव साजरा करण्याची तयारी करून १८९४ मध्ये पहिला सार्वजनिक गणपती त्याच्या हातून बसवून घेऊन १८९५ मध्ये तोच सार्वजनिक उत्सव आपल्या हातामध्ये घेऊन बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव सुरु करून हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरु करून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कार्य जोरात सुरु केले.१९१५ मध्ये केशव बळीराम हेगडेवार यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.त्यानंतर मोहन करमचंद गांधी यांचा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये १९१६ मध्ये प्रवेश झाला.१९२० मध्ये बाळकृष्ण गंगाधर टिळकांचे निधन झाल्यानंतर १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेतृत्व मोहन करमचंद गांधी यांचेकडे आले होते यावरून स्पष्टपणे दिसते की,भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक ब्राह्मणवादी संघटन म्हणून कार्य करीत होते.इकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण पूर्ण झालेले होते त्यांनी साप्ताहिक मूकनायकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरु केली होती.साप्ताहिक मूकनायक मधील लिखाणामुळे कोल्हापुरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवाळ्याचे संबध प्रस्थापित झालेले होते.१९२२ मध्ये मोहन गांधी यांनी असहकाराची चळवळ सुरु केली होती.त्यामुळे राजद्रोहाचा आरोप करून मोहन गांधी यांना ब्रिटीश सरकारने तुरुंगात डांबले होते.१९२३ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रुपयाच्या समस्यावर एक अहवाल तयार केला होता.त्यानंतर भीमराव आंबेडकर यांना “डॉक्टर ओंफ सायन्स” ही पदवी मिळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संघटन जोरात सुरु झाले होते.(क्रमश😊

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ६) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या साप्ताहिक मूकनायक या वृत्तपत्राला प्रभावित होऊन छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आंबेडकर यांचे बरोबर जेवण केले....!


बाळकृष्ण गंगाधर टिळकांनी पहिली हिंदू महासभा १८८४ मध्ये भरविल्या नंतर त्याचे १८८५ मध्ये  भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये रुपांतर केले.नंतर त्यांनी ब्रिटीश सरकारला त्यांचे प्रशासन ताब्यात देण्यासाठी आणि इथल्या धर्मात ढवळाढवळ करू नये यासाठी नेहमी दबाव आणला.तरीही ब्रिटीश सरकार इथल्या मानवाला बाधक असणाऱ्या गोष्टीवर कायदा तयार करून त्या बंद करण्यात येत होत्या.त्यांचे असे म्हणणे होते की,जो शिक्षण घेईल आणि आपल्या अभ्यासात प्रगती करेन त्यालाच इथल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये जागा दिली जाईल.परंतु इतिहास काळापासून ही बामणी व्यवस्था राज्य करणाऱ्यांच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये राहिलेली आहे याला स्वराज्यही अपवाद राहिलेले नव्हते.१८९५ च्या गणपती उत्सवा नंतर हिंदू धर्म मोठ्या प्रमाणात उभा राहू लागला.हिंदू – मुस्लीम तेढ व अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली होती.आता या बामणी व्यवस्थेला अडविणारे कोण राहिले नव्हते.जयसिंगराव घाटगे व राधाबाई घाटगे यांचे पुत्र यशंवत घाटगे यांना १८८४ मध्ये ते १० वर्षाचे असताना कोल्हापूर गादीने दत्तक घेतले होते.दत्तक घेतलेल्या यशवंतरावांचे शाहू असे नामकरण झाले होते.ते २० वर्षाचे झाल्यानंतर कोल्हापूर गादीवर विराजमान करण्यासाठी १८९४ मध्ये त्यांचा राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आलेला होता.राज्याभिषेक करतेवेळी त्यांच्या लक्षात आले की,वैदिक धर्म पद्धतीतील हा राज्याभिषेक असताना हा धर्म पंडित वैदिक धर्माचे मंत्र उचारण न करता पुरानोत्व मंत्राचे उचारण करीत आहे.तेव्हा त्यांनी त्या वैदिक धर्म पंडिताला हटकले.आणि सांगितले की,माझा राज्यभिषेक तू वैदिक धर्म पद्धतीत करीत आहे असे तू म्हणतो आणि मंत्र मात्र पुरानोत्व मंत्राचे उचारण करीत आहे.तेव्हा त्या वैदिक धर्म पंडिताने त्यांना सांगितले की,तुम्ही शुद्र आहात त्यामुळे तुमच्या राज्याभिषेकासाठी मी वैदिक मंत्राचे उचारण करू शकत नाही.शाहू महाराजांनी त्या वैदिक धर्म पंडिताला हाकलून दिले.आणि असे जाहीर केले की,इथून पुढे स्वराज्याच्या खजिन्यातील एक पै रक्कम बामणाला दिली जाणार नाही.त्यांचा इथून पुढे कोणताही सन्मान केला जाणार नाही.असे म्हणून त्यांनी अलुतेदार आणि बलुतेदार यांना ५०% आरक्षण लागू करून आरक्षणाचे जनक झाले.इकडे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे शिक्षण सुरु झाले होते.सातारा गादीचे छत्रपती प्रताप[सिह भोसले यांनी सुरु केलेल्या शाळेमध्ये १ ली ते ४ थी शिक्षण घेतले.नंतर पुढे त्यांचे शिक्षण मोठ्या प्रमाणात सुरु झाले होते.१९२० मध्ये डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी मुंबईतून साप्ताहिक मूकनायक प्रकाशित करून आपल्यातील पत्रकार दाखवून दिला होता.त्यातील लिखाणाला प्रेरित होऊन छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी डॉ बाबसाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांचे बरोबर जेवण केले.डॉ बाबसाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात झालेले जेवण हिंदू धर्म पंडितांना आवडली नाही त्यांनी या जेवणाची चर्चा मोठ्या प्रमाणात घडविली मात्र त्याचा परिणाम छत्रपती शाहू महाराज यांचेवर झाला नाही.बाळकृष्ण गंगाधर टिळकांचा १ ऑगस्ट १९२० मध्ये निधन झाले.छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी माहाराज यांचा पुतळा बसविण्याचे ठरविले होते.परंतु बाळकृष्ण गंगाधर टिळकांचा इथल्या बामणी व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात प्रभाव होता.त्यांचा आणि छत्रपती शिवराय यांचा काहीही संबध नव्हता.त्यामुळे छत्रपती शिवाराय यांचा अश्वरूढ पुतळा त्यांना महार समाजाच्या जागेत उभारावा लागला.आज शिवाजीनगर येथे जो छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारलेला आहे तो पहिला पुतळा असून छत्रपती शाहू महाराज यांनी लंडनच्या युवराज यांच्या हस्ते उभारेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबई येथे १ मे १९२२ मध्ये निधन झाले (म्हणजे त्यांची हत्या झाली).(क्रमश😊