Saturday, January 12, 2019

प्रकाश आंबेडकर यांचे भेट अस्त्र कोणासाठी..! बहनजी याची भेट झाल्यास समीकरण बदलेल....! राजेश खडके सकल मराठी समाज


                             विषय असा आहे की,संसदीय राजकारण करीत असताना इतर राजकीय मित्रांची सांगड घालून नवी समीकरणे उभी करावी लागतात यात काही दुमत नाही.परंतु हि समीकरणे अमलात आणीत असताना त्याचा आपल्यावर दुष्परिणाम तर होणार नाही ना याची काळजी फार घ्यावी लागते हे कोणाला सांगावे असे मला वाटत नाही.परंतु राजकीय आढावा घेतला तर सध्या वरच्या स्थरावरचे राजकारण वंचित बहुजन आघाडीला कोंडीत पकडण्यासाठीचे सुरु आहे हे मात्र निश्चितपणे संसदीय राजकारण समजणारा कार्यकर्ता नक्कीच समजून जाईल हे कांही सांगायचे कारण आहे असे मला वाटत नाही.प्रकाश आंबेडकरांचा १२ जागांचा प्रस्ताव जवळ जवळ कॉंग्रेसने नाक्र्ल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.कारण काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार आणि कॉंग्रेसचे राहुल गांधी यांची बैठक झाली आणि या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेसाठीच्या ४८ जागांचे आपसात वाटप झाले आहे त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला २३ जागा तर कॉंग्रेसला २५ जागा मिळाल्या आहेत.याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीच्या १२ जागांचा प्रस्ताव नाकारण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत.त्यामध्ये आता कॉंग्रेस पक्ष त्यांच्या मित्र पक्षाला काय देणार आणि स्वत:कडे काय ठेवाणार आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे नवीन अस्त्र म्हणजे नवीन मित्रांची जुळवणी अस्त्र बाहेर काढले आहे आणि ते म्हणजे "भेट अस्त्र" यामध्ये त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जुळवणी करीत आहेत काय...? अशा चर्चेला उधाण आले आणि तशा प्रकारच्या सोशल मिडीयावर बातम्याही प्रसिध्द झाल्या आहेत.यातच सकल मराठा समाजाच्या महाराष्ट्र क्रांती सेनेच्या पक्ष नेतृत्वाने आंबेडकर यांची भेट घेऊन युतीचा प्रस्ताव सादर केल्याची बातमीही एका वेब चॅनलला प्रसारित झाली आहे.नव्यानेच शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांची भेट घेऊन प्रकाश आंबेडकर मराठा-ओबीसी समीकरण आखीत आहेत असे दिसते.परंतु सामन्य कार्यकर्ता आणि मतदार यांना असा प्रश्न पडला आहे की या भेट अस्त्राचा परिणाम प्रकाश आंबेडकर कोणासाठी वापर करीत आहे.आणि या अस्त्राचा खरच परिणाम होणार आहे काय...? हा ही विचार होणे गरजेचे आहे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.जर खरेच भेटीचे अस्त्र जर प्रकाश आंबेडकर यांना मजबूत कराचे असेल तर त्यांनी मायावती बहन यांची भेट घेतली पाहिजे याचा परिणाम नक्कीच होईल यात काही दुमत नाही.कारण आता वेळ राहिलेली नाही कॉंग्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रस यांनी आपला प्रचार सुरु केला आहे.

Friday, January 11, 2019

माता जिजाऊ यांच्या ४२१ व्या जयंती निमित्ती माझे दोन शब्द ....! राजेश खडके सकल मराठी समाज



माता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये सिंध्दखेड येथे लाखोजी जाधव यांच्या घरामध्ये झाला आहे.आज त्यांची ४२१ वी जयंती आहे या जयंती निमित्ती कोटी कोटी प्रणाम....! मित्रहो आपणास माता जिजाऊ कोण होत्या हे सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.परंतु त्यांच्या कार्याला आणि इतिहासाला पुन्हा उजाळा मिळावा म्हणून काय इतिहासातील गोष्टी समोर आणण्यासाठीचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे.माता जिजाऊ यांचे लग्न वेरुळचे भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्या बरोबर झाले.शहाजीराजे यांचे स्वप्न होते की,रयतेचे राज्य निर्माण झाले पाहिजे आणि इथली रयत आणि शेतकरी तसेच स्त्री यांचे संरक्षण झाले पाहिजे ही संकल्पना त्यांनी त्यांची पत्नी माता जिजाऊ यांना बोलून दाखविली.त्यासाठी लागणारी व्यवस्था म्हणून त्यांनी १६१५ मध्ये पुणे येथे लाल महाल बांधला होता आणि नागरवास या गावी हत्तीच्या वजना एवढी तुळा करून गोर गरीब जनतेमध्ये धन धान्य आणि सोने चांदी स्वराज्याची संकल्पना प्रस्थापित केली पुढे त्याच गावचे नाव तुळा केलेवरून तुळापुर असे पडले.आणि १६३० मध्ये मुरार जगदेव याने याच लाल महालावर हल्ला करून पुणे बेचीराग केले.पुढे १९४५ माध्ये माता जिजाऊ आणि शिवराय पुणे येथील पासलकर वाड्या मध्ये आल्यानंतर प्रचंगगडाचा राजा रायनाक परवारी यांनी हा गड शिवरायांच्या हाती स्वाधीन केला आणि याच गडावर शिवरायांनी माता जिजाऊ यांच्या मार्गदर्शानाखाली यल्या मांगाच्या हातून स्वराज्याचे पहिले तोरण चढवून त्याचे पुढे तोरणागड असे नामकरण केले.त्यानंतर याच दिवशी स्त्रीची बेअबदा गुजर पाटलाची हातपाय कलम करून त्याचा चौरंगा करण्याची शिक्षा पासलकर वाड्यामध्ये देऊन पहिला न्याय निवाडा करून स्वराज्य प्रस्थापित केले.नंतर त्याच बाजूला राजगड उभारून २२ वर्ष स्वराज्याचा राज्य कारभार चालविला.बेचीराग झालेले पुणे आणि लाल महाल दुरुस्त करून पुन्हा त्याची उभारणी केली.स्वराज्याला मान्यताप्राप्त आणि सुरक्षित अशी राजधानी असावी म्हणून रायगड उभारून ६ जून १६७४ मध्ये माता जिजाऊ यांचे आदेशावर पहिला राज्याभिषेक करून आता स्वराज्य प्रस्थापित झाले आहे असा संदेश संपूर्ण जगाला दिला.माता जिजाऊ यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांना तयार करून समतावादी स्वराज्य निर्माण केले.

Wednesday, January 9, 2019

बहनजी वंचित आघाडीत सामील झाल्यास भाऊ मुख्यमंत्री होतील...! राजेश खडके सकल मराठी समाज


           आदरणीय काशीराम साहेबानी संपूर्ण देशामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करून बहुजन समाज पार्टी स्थापन केली पुढे बहन मायवती यांनी याच विचारावर काशीराम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संसदीय राजकारण मोठ्या प्रमाणात केले आहे.तुम्हा सर्वांना सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही परंतु सदरच्या लेखाचा जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्याचा उच्चार याठिकाणी होणे गरजेचे आहे असे मला वाटत आहे.बहुजन समाज पार्टीचा एकंदरीत महाराष्ट्र राज्याचा आढावा घेतला तर असे दिसून येते की,राज्यातील ७० ते ८० मतदार संघात बहनजी यांचा प्रभाव आहे आणि हा पक्ष आंबेडकरी विचारांचा आहे यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही.एकंदरीत आजची परिस्थती पहाता बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यातील बऱ्याच विधानसभेच्या मतदार संघावर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यामतून प्रभाव निर्माण केला आहे.उत्तर प्रदेश मध्ये बहन मायावती यांनी अखिलेश यादव आणि अजित जोगी यांना बरोबर घेऊन कॉंग्रेसला बाजूला सारून आघाडी तयार केलेली आहे.त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यात बहन मायावती वंचित बहुजन आघाडीत सामील झाल्यास राज्यातील १७० ते १८० जागांवर प्रभाव पडु शकतो अशी परिस्थिती आहे.असे जर झाले तर वंचित बहुजन आघाडीला राज्यातील महाआघाडीची गरज पडणार नाही असे स्पष्ट चित्र आहे.छगन भुजबळ यांचे काही राज्यात ओबीसी मतावर प्राबल्य आहे यात काही दुमत नाही परंतु त्यांचेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पगडा आहे.बाळासाहेब सध्या ओबीसी कार्ड खेळत आहेत त्यानी हे राजकीय समीकरण नक्की आखावे पण हे आखीत असताना आंबेडकरी विचारांचा बहनजीकडे असणारा मतदार आपल्याकडे कसा येईल याचीही रणनीती आखली पाहिजे.एकंदरीत आघाडीचे राजकारण पहाता कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात काही पाडेल असे चित्र दिसत नाही त्यामुळे मागणी केलेल्या १२ जागांचा प्रस्ताव त्यांना मान्य करायचा आहे असे दिसत नाही.परंतु हे करीत असताना आकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर निवडून येतील असेही ते म्हणत आहेत जर अशा वाक्याचा अर्थ जर काढायचा असेल तर स्पष्टपणे असे दिसते की,त्यानी पुन्हा एकदा बाळासाहेब जर आघाडीत आले नाही तर ते त्यांच्या विरोधी षड्यंत्र केल्याशिवाय गप्प बसणार नाही.छगन भुजबळ यांची जरी बाळासाहेबानी भेट घेऊन एक दबावतंत्र निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला असेल तरी ते काही वंचित बहुजन आघाडीच्च्या गळाला लागेल असे वाटत नाही.परंतु बहन मायावती यांना जर वंचित बहुजन आघाडी बरोबर जोडण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी केला तर निश्चितच बाळसाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली वंचित बहुजन आघाडी १४० जागा निवडून येतील आणि मुख्यमत्री पदावरील वंचित बहुजन आघाडीचा दावा हा मजबुतीने बसेल आणि महाराष्ट्र राज्याचा भावी मुख्यमंत्री हे डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे नातू असतील यात काही कोणाचे दुमत असायचे कारण नाही.परंतु जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचे असतील तर बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही बहन मायावती यांचेवार दबाव गट निर्माण केला पाहिजे.आमच्या तर सकल मराठी समाजाचे असे मत आहे की,यासाठीचा प्रयत्न आपण सर्वानी केला पाहिजे जर बहन मायावती वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाल्यास भाऊ प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील आणि हि संधी पुन्हा येईल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत नाही.त्यामुळे अशा संधीचा फायदा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घ्यावा यासाठी सकल मराठी समाजाचा दाखल प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने मान्य जरी केला नाही तरी चालेल....त्यामुळे बहनजी वंचित आघाडीत सामील झाल्यास भाऊ मुख्यमंत्री होतील ही काळ्या दगडा वरील पांढरी रेष आहे...!

Tuesday, January 8, 2019

सकल मराठी समाजाचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे सादर ः राजेश खडके


साहेब कॉंग्रेस धोका देणार....पण वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि मतदार आपल्या शब्दाबाहेर नाही....! राजेश खडके सकल मराठी समाज

 
 
                              भीमा कोरेगाव हल्ल्यानंतर वंचित घटकासाठी आता एकच विश्वास म्हणजे आदरणीय बाळसाहेब आंबेडकर असे समीकरण झाले आहे.यातच आता तिसरा पर्याय म्हणून देशातील जनता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी संघटना यावर विश्वास ठेवताना दिसत आहे.त्यामुळे इतर राजकीय पक्ष आता पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत आहेत.त्यामुळे इथली बामणी व्यावस्था मोठ्या प्रमाणात कामाला लागलेली दिसत आहे.सुरुवातीपासून कॉंग्रेसने नेहमी वंचित घटकांना गुलाम केल्याची परिस्थिती संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे.आरक्षित जागेतून समाजाचा प्रतिनिधी निवडणून येत नाही तर गुलाम निवडून येतो असे सुतोवाच आपण केले आहे.यातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेस हे जळते आहे असे म्हणाले होते.त्यामुळे नेहमीच सत्तेपासून आंबेडकरी पक्ष दूर ठेवण्याचे कटकारस्थान कॉंग्रेस पक्षाने केले आहे.यातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कॉंग्रेसने निवडणुकीत पराभव करून आपल्याही विरोधात षड्यंत्र करून आपल्यालाही पराभूत केले आहे.त्यामुळे यंदाची निवडणूक ही आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याच्या विश्वासहर्तेची निवडणूक असुन काँग्रेसी राजकारण हा विश्वास कसा संपेल याचे षड्यंत्र आखीत आहे.त्यामुळे इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते यांना संसदीय निवडणुकीच्या राजकारणात उतरून पक्ष बांधणी करावी असे जाणकारांचे मत आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडी बरोबर जुळणारा घटक नेहमी जोडता ठेवल्यास महाराष्ट्र राज्यातील सत्ता समीकरणे बदलून त्याची चावी आंबेडकरी जनतेच्या हातामध्ये येईल असे जाणकारांचे मत आहे.कॉंग्रेस हा धोका देणारा पक्ष असल्याचे मत आता आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचे झालेले आहे.त्यामुळे तो धोकाच देणार.....! असो शेवटी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहात आणि गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण करीत आहात.सकल मराठी समाजाचे एवढेच म्हणणे आहे की,तयार झालेला मतदार हा वंचित असून त्याचा हिरमुस होऊ नये हीच अपेक्षा....!
धन्यवाद

Monday, January 7, 2019

लाखोंच्या गर्दीचा फायदा आंबेडकर यांनी मतात परिवर्तीत करून आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा.....! राजेश खडके सकल मराठी समाज

              एकंदरीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभांना होणारी लाखोची गर्दी पहाता ते करीत असलेल्या कष्टाचे अवलोकन आपणा सर्वांना झालेच असेल यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.बाळसाहेब आंबेडकर यांनी भीम कोरेगाव विजयस्तंभाबाबत घेतलेली भूमिका सकल मराठी समाजाने उभारलेले शंभूराजे सन्मान अभियान यशस्वी झाल्याची नोंद संपूर्ण जगात झाली असल्याचे आता समोर आले असल्याचे जाणकार यांचे मत आहे.या शंभूराजे सन्मान अभियानात आदरणीय अंजलीताई आंबेडकर सहभागी झाल्या होत्या.मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मा.प्रवीणदादा गायकवाड आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक मा.शांताराम कुंजीर यांनी त्यांचा सहभाग दर्शविला होता.संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक तसेच छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याचे पहिले सरनोबत वीर बाजी पासलकर यांचे विचार वंशज मा.विकास पासलकर आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मा.संतोष शिंदे यांचा सहभाग होता.कोल्हापूर गादीचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले या शंभूराजे अभियानात प्रत्यक्ष सहभाग देऊन सामील झाले होते.डा बाबसाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट देऊन असे उदगार काढले होते की,"जो इतिहास वाचणार नाही,तो इतिहास घडविणार नाही" या त्यांच्या भूमिकेला येत्या १ जानेवारी रोजी वढू येथील शंभूराजे यांच्या समाधीस्थळी जमलेल्या लाखोच्या जनसमुदायामुळे सन्मान प्राप्त झाला आहे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.इतिहासातील महार योध्यांची कर्तबगारी आता जवळ जवळ संपूर्ण देशाने मान्य केले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.हीच भूमिका मान्य करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकासाठी वंचित बहुजन आघाडी निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील अलुतेदार आणि बलुतेदार यांना न्याय देण्याच्या भूमिकेचे स्वागत झाले असल्यामुळे संपूर्ण वंचित घटक त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.परंतु जर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी या संधीचा जर फायदा वंचित बहुजन आघाडीसाठी करून घेतला नाही तर अशी संधी त्यांना पुन्हा प्राप्त होईल असे वाटत नाही.बाळासाहेबांनी राजकीय कोंडीत पकडण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसत आहेत.....ते कोंडीत सापडू शकत नाही परंतु यासाठी जमत असलेला लाखोचा जनसमुदाय मतात कसा परिवर्तीत होईल यासाठी मोठी शर्त त्यांना करावी लागेल.एकंदरीत त्यांची राजकीय खेळी पहाता आता पर्यंत ते यशस्वी झाले असल्याचे दिसून येते......परंतु समाजात फिरत असणारा विरोधाचा संदेश वेळीच रोखला पाहिजे आणि तळ्यात मळ्यात न रहाता आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली पाहिजे.लाखोच्या सभा ह्या लोकसभेसाठीच्या ४८ जगासाठी आणि विधानसभेसाठीच्या २८८ मतदार संघासाठी कशा फायदेशीर ठरतील याचा विचार होणे गरजेचे आहे.असो सकल मराठी समाजाने सादर केलेला प्रस्ताव स्वीकारून त्यांचा सन्मान व्हावा हिच अपेक्षा....!

Sunday, January 6, 2019

बाळासाहेबांची राजकीय रणनीती ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना बुचकळ्यात पाडणारी आहे....? राजेश खडके सकल मराठी सामाज


                                       संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे.त्यातच २०१९ मध्ये १६ सभेंचे आयोजन करून त्यांनी इथला वंचित मतदार याचा विश्वास मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि तो जवळ जवळ यशस्वी होईल असे जाणकारांचे मत आहे.परंतु एक गोष्ट मात्र इथला सामाजिक कार्यकर्ता आणि वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता तयारीला लागला असताना विधानसभेच्या २८८ पैकी फक्त ५० जागा लढविणार असे मध्यंतरी बाळासाहेबांनी घोषित केल्यामुळे इथला मतदार आणि कार्यकर्ता भ्रमित झाला होता.त्याच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडीत होता की,बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला लाखो लोकांची गर्दी होत आहे आणि वंचित बहुजन आघाडी फक्त ५० जागाच लढविणार यावर त्याचे मत असे होते की,मग उरलेल्या २३८ जागासाठी काय करायचे....? याची चर्चा बहुतेक बाळासाहेब यांचेपर्यंत जाऊन पोहचल्याने त्यांनी २८८ जागा लढविणार असल्याचे संकेत दिले आहे असे जाणकार यांचे मत आहे.परंतु जाणकार असेही म्हणतात जर असे झाले तर निशिच्तच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वंचित बहुजन आघाडीच
ठरवेल.लोकसभेसाठी ४८ जागा आहेत त्यापैकी २४ जागी कॉंग्रेस तर २४ जागी राष्ट्रवादी कॉंग्रेस लढविणार आहेत मग आघाडीकडे मागणी केलेल्या १२ जागा वंचित बहुजन आघाडीला मिळणार नाहीत असे दिसते त्यामुळे बाळासाहेबांनी लोकसभेच्या ४८ जागा लढविण्याचे संकेत देत असताना आघाडीची दरवाजे खुली ठेवली आहे हे मात्र निश्चित आहे.परंतु लोकसभेसाठीच्या दोन जागा बाळसाहेब आंबेडकर यांनी जाहीर करून कोणाला काय संदेश दिले आहेत याचा काही थांगपत्ता लागत नाहीये.परंतु एकंदरीत सभा पहाता एमआयएमचे प्रमुख ओविसी काही सभांना हजेरी लावताना दिसत नाही त्यामुळे मतदारात आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचे जाळे पसरत चालले आहे.यातच बाळासाहेबांनी पश्चिम महाराष्ट्रात मुस्लीम समाजासाठी एक जागा घोषित करणार असल्याचे संकेत दिले आहे.त्यामुळे बुलढाणा माळी समाजासाठी तर नांदेड धनगर समाजासाठी जाहीर केले आहे.आता पश्चिम महाराष्ट्रातून मुस्लीम समाजासाठी कोणता जिल्हा निवडतील याची आता वंचित घटक वाट बघून आहे.परंतु हे सर्व करीत असताना इथला एमआयएम पक्षाचा विचार होतोय किंवा नाही याचीही वाट इथला मतदार पहात आहे.एकंदरीत बाळासाहेबांची रणनीतीचा आढावा अजून तरी कोणाला लागत नाहीये.परंतु प्रचार सभेंचे नियोजन पहाता प्रत्येक ठिकाणी लोकसभेसाठीचा उमेदवार तयार करीत असताना बाळासाहेब दिसत आहे.यातच त्यांनी २८८ विधानसभेसाठीचे उमेदवार लोकसभेच्या निवड प्रक्रियेत जाहीर करणार असल्याचे संकेत दिले आहेत.असोत बाळासाहेबांची रणनीती ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना बुचकळ्यात पाडणारी दिसत आहे या खेळीचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होणार का....? हा विषय फक्त येथे महत्वाचा आहे.