Wednesday, July 10, 2019
मी प्रकाश आंबेडकर यांचा भक्त नाही….बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे…! राजेश खडके सकल मराठी समाज
होय मी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचले आहे आणि अभ्यासले आहे...त्यामुळे मी त्यांच्या विचारांचा पाईक झालो आहे.होय मी हिंदू आहे परंतु आर्य सनातनी हिंदू धर्मीय नाही… कारण हा आर्य सनातनी हिंदू धर्म १८७५ ला स्थापन झालेला आहे...आणि त्याची पेरणी पेशवाई काळात झाली असून याच धर्माच्या नावाखाली जातीय व्यवस्था मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आहे.महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवरायांचे असलेले समतावादी स्वराज्य आपणास दाखविलेले आहे.बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक कार्याचे संशोधन केले तर असे लक्षात येईल की,इथली सिंधू संस्कृती त्यांनी उजागर केलेली आहे.विद्वतेचा, मानव कल्याणकारी विचारांचा आणि सामुहिक जीवन कार्यप्रणालीचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे.त्यामुळे सिधू संस्कृती ही भारताची जीवन प्रणाली आहे.त्यामुळे बोली भाषेतून या सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणण्याची प्रथा सुरु झालेली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणताही नवीन धर्म स्थापन केलेला नाही.आर्य सनातनी हिंदू धर्माच्या विरोधात जाऊन बौध्द धम्माची दीक्षा त्यानी घेतलेली आहे.जो बोध्द धम्म सिंधू संस्कृतीच्या विचारांचे समर्थन करतो.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,माझ्या बुध्द धम्म दिक्षेमुळे इथल्या हिंदुना कोणताही त्रास होणार नाही आणि आजही तो त्रास होताना दिसत नाही.हाच विचार मारण्यासाठी १८८४ ला पहिल्या हिंदू महासभेतून निर्माण झालेला कॉंग्रेस पक्ष पेशवाईचे समर्थन करीत आहे.त्यामुळे १९२५ चा आरएसएसचा इतिहास १८८४ मध्ये पेरला गेला असल्यामुळे त्यांचा इतिहास आभ्यास शास्त्रात घेण्यात आलेला आहे याची आपण दक्षता घेतली पाहिजे.अशा संघरुपी कॉंग्रेस पक्षाची अस्तित्व संपत आहे याचा आनंद इथल्या भूमीपुत्रांनी घेतला पाहिजे.कारण याच संघरुपी कॉंग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना या देशातील वंचितांच्या कल्याणकारी लढ्याला विरोध केलेला आहे...आणि याच संघरुपी कॉंग्रेसने बाबासाहेबांना खूप त्रास दिलेला आहे याचीही आठवण आपण ठेवली पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले नंतर त्यांची समाधी दिल्लीत उभारणे गरजेचे होते परंतु तसे त्यांनी केले नाही.त्यांचे साहित्य २० वर्षापासून गायब होते ते शासनाच्या कब्जेत घेण्यासाठी २० वर्ष लागले आहे.याच काळात त्यांच्या साहित्यात मोठ्या प्रमाणात बदल केले गेले आहेत याचेही संशोधन आपण केले पाहिजे.आणि याच काळात गोवळकर यांचा देखील आभ्यास आपण केला पाहिजे.परंतु जो सन्मान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांना समाजाकडून मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे...त्याचे तसे कारणही आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण नंतर गटटताचे राजकारण उभे राहिले आणि त्यांच्या वारसांना राजकारणा पासून दूर केले गेले.आज प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहे त्यांची कार्यपद्धती बघितली की आपल्या लक्षात येईल की ते संघरुपी कॉंग्रेसच्या आणि इथल्या सरंजामशाही घराण्याच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा मोगलांच्या कमी आणि सरंजामशाही घराण्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात होता.त्यामुळे या डूबत असलेल्या सरंजामशाही घराणेशाहीला वाचविण्यासाठी वामन मेश्राम पुढे आलेला आलेला आहे.छोटे मोठे रिपब्लिकन गटाचे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन पुढे प्रकाश आंबेडकर यांची बदनामी करताना पाहयला मिळत आहेत.ज्या छोट्या मोठ्यां समाजाला विकण्याच्या दुकानादाऱ्या बंद पडत चालल्यामुले ते दुकानदार प्रकाश आंबेडकर यांचेवर आरोप करताना पाहायला मिळत आहे.निवडणुकीच्या राजकारणात आज जरी भाजपाचा फायदा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होताना दिसत असला तरी तो तात्पुरता फायदा आहे याची जान आपण ठेवली पाहिजे.आणि समाजिक दृष्टीकोनातून पाहिले हे खूप मोठे परिवर्तन आहे याचाही अभ्यास आपण केले पाहिजे.कारण आज अलुतेदार आणि बलुतेदार ह्यांना सत्तेची दारे उघडण्यासाठीचा प्रकाश आंबेडकर यांचा मोठा संघर्ष आहे….आणि त्या हा संघर्ष यशस्वी होताना पाहायला मिळत आहे.जो लढा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेला आहे तोच लढा प्रकाश आंबेडकर लढताना दिसत आहे.यातून भविष्यात वंचित समुहाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे समतावादी स्वराज्य निर्माण होत आहे याचा आपण आभ्यास केला पाहिजे.परिवर्तन करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो ज्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना याच संघरुपी कॉंग्रेसने त्रास देण्यासाठी गद्दार उभे केले आज तेच संघरुपी कॉंग्रेसवाले प्रकाश आंबेडकर यांना त्रास देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुन्हा गद्दार उभे करीत आहेत याची आपण काळजी घेतेली पाहिजे. त्यामुळे मी प्रकाश आंबेडकर यांचा भक्त नाही….बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे…!
Thursday, July 4, 2019
जिजाऊ प्रकाशन आणि संभाजी ब्रिगेड यांनी निर्माण केलेले साहित्य विसर्जित का करू नये…? इतिहास सशोधनात राजकारण शिरले काय….? राजेश खडके सकल मराठी समाज
विषय असा आहे की,महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून त्यांची पहिली जयंती साजरा करून त्यांचे समतेचे विचार आमच्या समोर आणले.मनुवादी विचारांच्या मनुस्मृतीचे दहन केले पाहिजे असे त्यानी जाहीर वक्तव्ये केले होते.अशा महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानून त्या मनुस्मृतीचे दहन केले आहे
. परंतु २५ वर्षापूर्वी कुणबी समाजाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी जिजाऊ प्रकाशन स्थापन करून त्या माध्यमातून इतिहासकार यांनी संशोधन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे समतेचे विचार जगासमोर आणले.या विचारांना बाधक प्रवृत्ती ठोकून काढण्यासाठी त्यांनी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या संघटनेची स्थापना केली.आणि माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या भांडारकर संस्थेच्या प्रवृत्ती ठेचून काढल्या आहेत.याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रवीण गायकवाड यांनी घेतली होती.अशा त्यांच्या कर्तुत्वाचे गुणगान गाऊन आम्ही रिपब्लिकन मोर्चाच्या माध्यमातून साधारण फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे १०० कार्यकर्ते घेऊन समर्थन केलेले आहे.
जिजाऊ प्रकाशन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची धर्म पंडितांनी केलेली हत्या जगासमोर आणली आहे.धर्म पंडित यांचा खरा चेहरा उघड करून धर्म पंडित यांनी शिवरायांचा केलेला ६ जूनचा पहिला राज्याभिषेक शंभूराजे यांनी नाकारण्यास सांगून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथ पद्धतीत म्हणजे समतावादी विचारांचा राज्याभिषेक २४ सप्टेंबर रोजी करायला लावलेला आहे.त्यामुळे धर्म पंडित शंभूराजे यांचेवर चिडलेले होते त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त बदनामी कशी होईल याची तजवीज त्यांनी केलेली होती.या सगळ्या गोष्टी संशोधन करून जिजाऊ प्रकाशन यांचे माध्यमातून संभाजी ब्रिगेड यांनी त्यांच्या प्रवक्ते यांच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेल्या आहेत.
जिजाऊ प्रकाशन यांनी छत्रपती शिवराय यांच्या महापरिनिर्वाणानंतर शंभूराजे यांना स्वराज्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांची अटक करून त्यांना संपविण्याचे धर्म पंडित यांचे कटकारस्थान उघड केलेले आहे.या सर्वाना शंभूराजे यांनी कशी तोड दिली हे दाखवून त्यानी स्वत:चा राज्याभिषेक शाक्त पंथ पद्धतीत करून धर्म व्यवस्था नाकरून त्यांनी त्यांची राजमुद्रा पिंपळाच्या पानावर कोरलेली होती याचे पुरावे समोर आणले आहेत.
समतावादी पंथ संपविण्यासाठी याच धर्म पंडित यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे बरोबर स्वराज्यद्रोह करून औरंगाजेब याचे बरोबर संधान बांधून याच धर्म पंडित यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा मनुस्मृती प्रमाणे कशी हत्या केला होती याचा खरा इतिहास जगासमोर आणलेला आहे.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण नावाचा लिहिलेला ग्रंथ समोर आणलेला आहे.याच बुधभूषण ग्रंथाचे काव्य रुपांतर संभाजी ब्रिगेडचा छावा शरद गोरे यांनी करून ते जनतेसमोर आणलेले आहे.
स्वराज्यातील अलुतेदार आणि बलुतेदार यांचे काय महत्व होते याचा खरा इतिहास संभाजी ब्रिगेड यांनी उजागर केलेला आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला भीमा कोरेगावचा इतिहास आहे.त्याठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज यांची वढू बुद्रुक येथील गोविंद महार याने बांधलेली समाधी आणि तुळापुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची झालेली हत्या ही मनुस्मृती प्रमाणे होती याचे उदाहरण आणि पुरावा देण्यासाठी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात मनुस्मृती दहन केली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा “बुधभूषण” नावाचा ग्रंथ डोळ्यासमोर ठेऊन “बुध्दभूषण” नावाची प्रिंटींग प्रेस उभारलेली होती.पिंपळाच्या पानावर असलेली राजमुद्रा डोळ्यासमोर ठेऊन बुध्द धम्म दीक्षा घेऊन धम्मात पिंपळाच्या पानाचे महत्व आपल्याला समजून सांगितलेले आहे.
असे विचार जिजाऊ प्रकाशनच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड यांनी देऊन त्या प्रकारचे साहित्य निर्माण केले आहे.वैदिक धर्म पंडित यांना कधीही छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यात महत्व दिलेले नाही हे दाखविण्यासाठी जिजाऊ प्रकाशन यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केले आहे.
परंतु गेल्या दोन चार वर्षापासुन संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता भांबाविलेला दिसत आहे.त्यामुळे तो कट्टर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन आपल्या जीवनात धर्म पंडित यांना स्थान देऊन आपले कर्मकांड बामणांच्या हातून करून घेताना पहायला मिळत आहे.आपण शिवधर्मीय आहोत असे दाखवून तो शिवविवाह न करता तो शुभविवाह करून त्याचे कर्मकांड बामणांच्या हातून करून नव्या जोडीने सत्यनारायण महापूजा घालताना दिसत आहे.यातून प्रवीण गायकवाड यांचे देखील कुटुंब सुटलेले नाही.
जिजाऊ प्रकाशन आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आता पुरुषोत्तम खेडेकर यांना त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून भाजपाच्या माध्यामतून राजकारण दिसत आहे...तर प्रवीण गायकवाड यांना शरद पवार यांच्या माध्यमातून राजकारण दिसत आहे.त्यामुळे खासदार अमोल कोल्हे हे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या टीव्ही मालिकेच्या माध्यामतून वैदिक धर्म पंडित यांचे उदात्तीकरण करून छत्रपती शिवराय यांचे स्वराज्य हिंदुत्ववादी असल्याचे दाखवीत असताना युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रवीणदादा गायकवाड शांत बसलेले आहेत.त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,जर इतिहास सशोधनात राजकारण घुसले असेल तर….मग जिजाऊ प्रकाशन आणि संभाजी ब्रिगेड यांनी निर्माण केलेले साहित्य विसर्जित का करू नये….?
Friday, June 14, 2019
तुम्ही आरक्षण तर रद्द करून बघा….तुम्ही संविधान तर बदलून बघा…! उदयनराजे भोसले मराठा समाजावर आणखी किती अन्याय करताल..! राजेश खडके सकल मराठी समाज
विषय असा आहे की,हा भारत देश हिंदुराष्ट्राकडे वाटचाल करीत असताना आता स्पष्टपणे दिसत आहे.परंतु हे होत असताना निसर्गाचा करिष्मा बघा जिकडे तिकडे खोदकाम होताना बुध्द मूर्ती आणि बुध्द विहारे बाहेर येताना दिसत आहे.बहुजन विचारांचा मराठा गौतम बुद्धांना कुणबी म्हणून स्विकारायला लागला आहे.अलुतेदार आणि बलुतेदार आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपले म्हणू लागला आहे.असे असताना समतावादी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या घराण्यातील वंशज असणारे उदयनराजे भोसले यांना माता जिजाऊचा अपमान करणारा बाबासाहेब पुरंदरे आणि मनुस्मृतीप्रेमी मनोहर भिडे प्रिय वाटू लागला आहे.संघाची हिंदुराष्ट्र संकल्पना प्रिय वाटू लागली आहे.म्हणूनच ते म्हणतात की,लोकशाही नसती तर मी सगळेच आरक्षण रद्द केले असते.आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,रयतेचे हे स्वराज्य निर्माण करण्या करीता छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांनी केलेले कष्ट आणि दिलेले बलिदान विसरले कि काय असा प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे.
मनुस्मृतीने शुद्र आणि अतिशूद्र ठरविलेल्या लोकांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन ब्रिटीश सरकारकडे आरक्षणाची मागणी केली होती.त्यासाठी भारतात आलेले सायमन कमिशनला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती आणि ह्याच आरक्षणासाठी त्यांनी आपल्या जीवाचे बलिदान देण्याची तयारी देखील दर्शविली होती.परंतु हिंदूप्रेमी महात्मा गांधी यांनी या मागणीला विरोध केला आणि राखीव मतदार संघ पुणे कराराच्या माध्यमातून आपल्या पदरी पाडून घ्यावा लागला.परंतु हे आरक्षण जेव्हा आपल्या पदरी पाडून घेत असताना काही अटी शर्ती लागू करण्यात आल्या होत्या.यावरून स्पष्टपणे जाणविते की. सुरुवातीपासून शुद्र आणि अतिशूद्रांना मानसन्मान देण्यास किती मोठ्या प्रमाणात विरोध होता.
आज या आरक्षणाच्या माध्यमातून इथला शुद्र आणि अतिशूद्र संसदेत जाऊन बसला आहे.अशा लोकांना पुन्हा संसदेत घेऊन जाण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची दारे खोलून दिलेली आहेत.अहोरात्र कष्ट करून इथला शुद्र आणि अतिशुद्र एक करून मोठ्या प्रामाणात त्यांनी संसदेत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु इथल्या राजकीय व्यवस्थेला म्हणजेच इथल्या संघाच्या काँग्रेसीवाल्यांना हे नको होतो.त्यामुळे त्यानी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचे षड्यंत्र करून त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले होते.स्वराज्यात त्याच शुद्र आणि अतिशूद्र यांना अलुतेदार म्हणत आणि त्यांना प्रकाश आंबेडकर हे वंचित म्हणत आहे.मात्र सातारा गादीचे छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांना हा “वंचित” शब्द आवडत नाही.त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आवडत नाही म्हणून ते म्हणतात संविधान नसते तर मी आरक्षण रद्द केले असते म्हणजेच त्यांना हा शुद्र आणि अतिशूद्र वंचित म्हणून संसदेत गेलेला आवडत नाही.
पुढच्या वर्षी म्हणजे २०२० साली आरक्षणाचा करार संपणार आहे त्यामुळे तो करार पुन्हां होऊ नये यासाठी संघाने काळजी घेतली म्हणून आरक्षण रद्द करण्याची भाषा उदयनराजे भोसले यांच्या मुखातून बोलली जात आहे.हिंदुत्ववादी संघटनांच्या आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधी यांच्या माध्यमातून संविधान बदल्याची भाषा बोलली जात आहे.परंतु हे सर्वजण विसरले आहेत आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे घराणे जिवंत आहे आणि आजही त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर शुद्र आणि अतिशूद्र यांच्या सन्मानासाठी संघर्ष करीत आहे.२०२० ची खेळी त्यांनी ओळखलेली आहे.म्हणून त्यांनी लोकसभा निवडणुकीत जातीनिहाय वर्ग उभा करून ही खेळी मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.त्यामुळे त्यांना आपण साथ दिली पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.
इथला मराठा समाज आजही अज्ञानी आहे त्याला या खेळ्या समजत नाही तो खोट्या अहंकाराने पछाडलेला आहे त्याचे होत असलेले वाटोळे त्याला दिसत नाही,त्याने डोळे मिटलेले आहे.ज्या दिवशी त्याचे डोळे उघडतील त्यादिवशी त्याला त्याने केलेली चूक लक्षात येईल.परंतु तेव्हा ती वेळ त्याच्याकडे नसेल आणि पश्चाताप शिवाय त्याच्याकडे मार्ग नसेल.
परंतु इथले आरक्षण जर रद्द केले गेले...आणि आणि इथले संविधान बदलले गेले तर इथल्या राजकीय व्यवस्थेला ते पेलविणार नाही.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इथला शुद्र आणि अतिशुद्र यांना “शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा” असा मूलमंत्र दिलेला आहे त्यामुळे तो शिकून बुध्द झालेला आहे आणि एकत्रित येऊन आता तो संघर्ष करीत आहे.देशातील कानाकोपऱ्या प्रत्येक व्यक्ती हे आरक्षण आणि हे संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलेला असेल.आणि तो जेव्हा रस्त्यावर उतरलेला असेल त्या वेळेस मात्र आरक्षण विरोधी आणि संविधान विरोधी लोकांना लपायला जागा राहणार नाही.त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाचे असे म्हणणे आहे.तुम्ही आरक्षण तर रद्द करून बघा….तुम्ही संविधान तर बदलून बघा…!
Thursday, June 6, 2019
शुद्र म्हणून हिणवीत आलेल्या वैदिक धर्म पंडितांचा राज्याभिषेक शिवरायांनी नाकारला आहे असे असताना आपण तो साजरा करून त्यांच्या विचारांचा अपमान तर करीत नाही ना…?
शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून इथल्या रयतेला समतावादी राज्य असल्याचा विश्वास दिला...परंतु जो पर्यंत शिवराय राज्याभिषेक करीत नाही तो पर्यंत स्वराज्याचे संविधान लागू करता येत नाही.तेव्हा माता जिजाऊ यांनी शिवरायांना राज्याभिषेक करून घेऊन छत्रपती होण्याचे आदेश दिले होते.जेव्हा शिवरायांनी राज्याभिषेक करून छत्रपती होणारा असल्याची घोषणा रयतेला दिली तेव्हा रयतेच्या आनंदाचा पारावार राहिला नाही.परंतु शिवराय छत्रपती होणे हे त्याकाळी वैदिक धर्म पंडितांना मान्य नव्हते.कारण त्यांच्या मते शिवराय हे शुद्र होते आणि शूद्रांना राजा होता येत नाही असा मनुस्मृतीचा कायदा होता...त्याकाळी फक्त शुद्र होते अतिशूद्र म्हणून कोणीही नव्हते.... अतिशुद्र म्हणजे अस्पृश्य होय हे आपण लक्षात घेतले पाहिजे.तेव्हा त्या वैदिक धर्म पंडितांच्या नाकावर टिच्चून आपण छत्रपती व्हायचे असा मनसुभा शिवरायांनी मनाशी धरलेला होता.तेव्हा त्यांनी काशीच्या गागा भट्टाकडून राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले परंतु त्यांनीही नकार दिला होता...परंतु वैदिक धर्म पंडितांचा विरोध झुगारून टाकण्यासाठी गागा भट्टाना त्यांच्या वजनाएवढ्या मोहरा देण्याचे कबूल केल्यामुळे त्यांनी राज्याभिषेक करण्याचे मान्य केले होते. परंतु शिवरायांना क्षत्रिय घराण्याशी जोडण्यासाठी त्यांनी त्यांची नाळ राजपूत असलेल्या शिसोदिया घराण्याशी जोडून शिवरायांचा राज्याभिषेक केला त्यामुळे शिवराय छत्रपती झाले.संपूर्ण जगाला शिवराय छत्रपती झाले हा संदेश तर पोहचला परंतु हे रयतेचे स्वराज्य आहे आणि समतावादी विचारांचे आहे याचाही संदेश पोहचला.तरीही इथले वैदिक धर्म पंडित त्यांना छत्रपती मानण्यास नकारच देत होते.
रयतेच्या सुखासाठी राजपूत घराण्याशी त्यांनी नाळ जोडली आणि गागा भट्टाच्या वजनाएवढे मोहरा देऊनही हे आपणास शुद्र म्हणून हिणवीत असतील तर माझ्या रयतेचे काय हाल करीत असतील याचा सारासार विचार करून छत्रपती शिवरायांनी वैदिक राज्याभिषेक नाकारण्याचे ठरविले.तेव्हा शाक्त पंथीय शंभूराजे यांनी त्यांना शाक्त पंथीय राज्याभिषेक करण्यास सांगितले तेव्हा छत्रपती शिवरायांनी राजपूत शिसोदिया घराणे नाकारून मनुस्मृती मान्य वैदिक धर्म पद्धतीतील राज्याभिषेक नाकारून शाक्त पंथीय राज्याभिषेक करून घेऊन ते समतावादी विचारांचे छत्रपती शिवाजी महाराज झाले.त्यामुळे छत्रपती शिवराय यांनी नाकारलेला ६ जूनचा राज्याभिषेक साजरा करणे म्हणजे त्यांच्या विचारांना तडा देणे होय.त्यामुळे ६ जूनचा राज्याभिषेक करूनही शुद्र म्हणून हिणवीत आलेल्या वैदिक धर्म पंडितांचा राज्याभिषेक शिवरायांनी नाकारला आहे असे असताना आपण तो साजरा करून त्यांच्या विचारांचा अपमान तर करीत नाही ना…?
संभाजी ब्रिगेड मधील पवार साहेबांचे दोन शिलेदार...पवार साहेब मला माझा मतदार संघ महत्वाचा….तुमची चिकाटी घेऊन काय करू…! राष्ट्रवादीला प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज…! राजेश खडके सकल मराठी समाज
मुळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हे स्वार्थ राजकारणावर उभे राहिलेले संघटन आहे.साल १९९९ ला शरद पवार कॉंग्रेस मधून बाहेर पडून हा पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे.आज या पक्षाला २० वर्ष पूर्ण झालेली आहे.शरद पवारांनी ५० वर्षात काय केले हे कोणीही त्यांना विचारीत नाही....परंतु पवार साहेबांनी २० वर्षात काय केले असा सर्वसामन्य जनतेचा विषय आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जर विचार केला तर फक्त हा मराठा समाजातील लोकांना सत्तेच्या राजकारणात घेऊन जाणारा पक्ष म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरूण या पक्षाकडे आकर्षित होत आलेला आहे तो सोडला तर इतर समाज त्यांच्याकडे आकर्षित होताना गेल्या २० वर्षात दिसलेला नाही.त्यामुळेच प्रकाश आंबेडकर त्यांना जातीवादी पक्ष म्हणत असतात ते एकदम बरोबर आहे.ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व मराठा समाजाकडे असते….त्याच प्रमाणे शहरी भागाचे नेतृत्वही मराठा समाजाकडे असते.राजकीय दृष्टीकोनातील मराठा समाज सामाजिक दृष्टीकोनातून प्रबल करावा यासाठी त्यानी खेडेकर यांना संभाजी ब्रिगेड स्थापन करण्यास सांगितली आणि मराठा समाजाला राजकीय बळ देण्याचे काम ही संभाजी ब्रिगेड करीत राहिली...परंतु या संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता म्हणून घडविण्याऐवजी मोठ्या प्रमाणात ठेकेदार म्हणून घडविण्यात आलेले आहे. म्हणून या संघटनेच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या ठेकेदार यांचे टेंडर मिळविण्यासाठी आपापसात हाण्यामाऱ्या डोके फोडाफोडीच्या घटना घडून आपसी मतभेद निर्माण झालेले आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून इथला बहुजन समाजाची दिशाभूल करून त्यांचेवर वर्चस्व करायचे असा एकमेव दृष्टीकोन त्यांचा होता.परंतु ज्याप्रमाणे आरक्षण मागणी घेऊन हा मराठा समाज अक्ट्रोसिटी अक्ट कायद्याला विरोध करण्यासाठी लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरला तेव्हाच बहुजन नेतृत्व म्हणून हा समाज पुढे लयास जात आला. त्याचे कारण की,मराठा समाजाकडे नेहमी देणारा समाज म्हणून पाहिले गेले होते परंतु तो आता मागणी करणारा समाज असल्यामुळे त्याचे नेतृत्व लयास गेलेले आपल्याला लोकसभा निवडणुकीत पाहिला मिळालेले आहे.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे ठेकेदार,व्यावसायिक आणि स्वस्वार्थाने उभे राहिलेले लोक आहेत त्यांना शरद पवार प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणत आहेत….आणि अशा कार्यकर्त्याना ते आरएसएस भाजपाकडून चिकाटी शिका असे ते म्हणत आहे...चिकाटी हा शब्द आणि हा विषय संघटनेच्या विचारांना जोडणारा शब्द आहे जिथे कार्यकर्ता प्रामाणिक आणि निष्ठावान घडतो….असे संघटन राष्ट्रवादी कॉंग्रेस उभे करण्यात अपयशी ठरलेली आहे.पक्ष संघटनेसाठी प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज लागत असते.तसे कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे असणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचा वार्ड आणि त्याचा मतदार संघ शाबूत ठेवणे महत्वाचे वाटते.त्यामुळे तो शाबूत ठेवण्यासाठी तो कोणत्याही पक्षाकडे जाऊन त्या पक्षाची उमेदवारी घेऊन त्याचा मतदार संघ शाबूत ठेवण्याचे काम करणार...त्यामुळे चिकाटी ठेवण्याचा शरद पवारांनी दिलेला सल्ला तो मान्य करणारा नाही...म्हणून तो कार्यकर्ता म्हणतो पवार साहेब मला माझा मतदार संघ महत्वाचा….तुमची चिकाटी घेऊन काय करू…! त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,राष्ट्रवादीला प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज आहे.
Tuesday, June 4, 2019
संभाजी ब्रिगेड पुरोगामी कशी….? कारण ब्रह्म विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारले आहे...!
विषय असा आहे की,चार पुस्तके वाचणारा किंवा लिहिणारा कोणताही व्यक्ती उठतो आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला दिलेले ज्ञान खोडण्याचे कटकारस्थान करीत असतो. खरे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जर आम्हाला कोणी दाखविले असतील तर ते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेले आहे.त्यांच्या समतावादी स्वराज्याचा कारभार आम्हाला दाखवून त्याचा उपभोग आम्हाला देण्याचे महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.या दोन्ही महापुरुषांनी वैदिक धर्म व्यवस्था नाकरून त्यांची मनुस्मृती दहन केली आहे.ब्रह्म विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती याला छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यात कधीही स्थान दिलेले नाही ही सत्यता आहे आणि ते नाकरून चालणार नाही.वयाच्या चौदाव्या वर्षी शंभूराजे यांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांचे समतावादी कार्य किती मोलाचे होते हे दाखवून “बुध” म्हणजे “विद्वान" म्हणून त्यांचा गौरव या ग्रंथामध्ये केला आहे.म्हणजेच विद्वान हा नेहमी भूषणावह असतो ते त्यांनी दाखवून दिलेले आहे.परंतु त्यांचे नंतर उभ्या राहिलेल्या पेशवाईने जातीव्यवस्था निर्माण करून इतिहास बदलण्याचे कार्य केले आहे.अशा व्यवस्थेला संपविण्याचे माहान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर केले आहे. ब्राह्मण हत्या (ब्रह्म हत्या) पाप आहे अशी म्हण प्रचलित असताना छत्रपती संभाजी महाराज यांनी ब्राह्मणाचा वध करून बुध्दनीती वापरली आहे हे विसरता कामा नये.छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याला घातक असा मानवधर्मीय शत्रूचा वध करून जातीयवादी व्यवस्था उलथून टाकण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आहे...तर अशा शंभूराजे नंतर जर वैदिक धर्म पंडितांचा आणि त्यानी उभ्या केलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा मनुस्मृती दहन करून बामणी व्यवस्था उलथून टाकण्याचे कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वत:चा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार करून त्यानी स्वराज्याची राजमुद्रा पिंपळाच्या पानावर कोरून हे राज्य बुध्द विचारांचे आहे हे दाखवून दिलेले आहे.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांचा आभ्यास करून “बुध्दभूषण” नावाची प्रिंटींगप्रेस उभारून एक प्रकारे छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मानच केला आहे.कारण “बुध” आणि “बुध्द” या दोन्हीचा अर्थ एकच विद्वान आणि “भूषण” चाही अर्थ एकच आणि तो म्हणजे भूषणावह असा आहे.त्यामुळे या दोन्ही महापुरुषांनी बुध्दनितीवरच कार्य केले आहे हे समजण्यास काहीच कारण नाही.या सर्व बाबींचा आभ्यास मराठा सेवा संघ यांनी करून एक बहुजन समाज घडविण्यसाठी “संभाजी ब्रिगेड” हे सामाजिक संघटन स्थापन करून छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य जगासमोर आणण्याची फार मोठी संकल्पना निर्माण केली होती.संघटना स्थापनेचा उद्देश अतिशय चांगला होता त्यासाठी त्याग देण्याची तयारीही त्यांनी मोठ्या प्रमाणात केली परंतु समाजात आतपर्यंत रुतलेली धर्म भावना ते खोडू शकले नाहीत.ब्रह्म विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांना केलेला विरोध त्यांना समाज मान्यता मिळण्यास होणारी अडचण आणि राजकीय व्यावस्थेकडून होता असलेला मोठा विरोध त्यामुळे त्यांना त्यांचा मार्ग बदलावा लागला.सामाजिक काम करीत असताना समाजाचे परिवर्तन करावे लागते परंतु पुढे त्यांच्यात परिवर्तन झाले आणि त्यांनी शंकराला महापुरुष करून तो समाजापुढे मांडावा लागला.राम कृष्ण यांना आपले महापुरुष दाखवून त्या दोघांचा समाजात मान निर्माण करण्यात आला.गणपती याला इतिहासात कोणताही आधार नसताना केवळ गणप्रमुखाची उपमा देऊन जानवेधारी ब्राह्मण स्वीकारून त्याला भाऊ रंगारी यांची उपमा देण्यात आली.त्यामुळे त्यांचे कार्य हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात असल्यामुळे पर्यायाने ते शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात जात आहे.त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांनी नाकारलेला पहिला ६ जूनचा राज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा करून इथल्या वैदिक धर्म पंडितांचे बळ वाढवीत आहेत.त्यामुळे आमचे असे म्हणणे आहे की,संभाजी ब्रिगेड पुरोगामी कशी….? कारण ब्रह्म विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारले आहेत…!
Saturday, June 1, 2019
EVM मशीन संदर्भात प्रकाश आंडबेकर यांची भूमिका प्रामाणिकच….त्यांना बी टीम म्हणणारे यांची भूमिका काय….? राजेश खडके सकल मराठी समाज
दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अशोक सोनाने यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला जे ठणकावून सांगितले आहे की,येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर बॅलेट पेपर वापरला नाही आणि त्या निवडणुका जर EVM मशीनवर घेतल्या तर त्या होऊ देणार नाहीत अशी घेतलेली भूमिका ही योग्यच असल्याचे मत आमच्या सकल मराठी समाजाचे झालेली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेचे सर्वच पक्षांनी आणि मतदारांनी स्वागतच केले पाहिजे.त्याचे कारण असे आहे की, लोकसभेचा प्रत्येक उमेदवार आज प्रत्येक मतदाराला संशयाने बघायला लागलेला आहे आणि त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रामाणिक कार्यकर्त्याना असे वाटते की, त्यांना मुस्लीम समाजाने मतदान केले नाही.त्यामुळे त्यांच्या प्रती एक अविश्वासाचे नाते निर्माण झालेले आहे.त्यांना त्यांची प्रामाणिकता सिद्ध करण्याची वेळ या EVM मशीनने आणलेली आहे.असाच प्रकार शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे राजू शेट्टी यांचे झालेले आहे.आज मतदार अचंबित झालेला आहे त्याला त्याने केलेल्या मतदानावर विश्वास राहिलेला नाही.ज्याला द्यायचे त्याला त्याचे मतदान झाले आहे काय…? याबाबत तो संभ्रमित झालेला आहे.त्यात मराठा समाजाचे नेते शरद पवार यांना देखील स्वत:च्या कन्या सुप्रियाताई सुळे संदर्भात EVM मशीनवर प्रश्नचिन्ह निर्माण करून लोकशाही धोक्यात येईल असे उदगार काढावे लागले होते.त्यानंतर पार्थ पवार यांचा जो सव्वा दोन लाख मतांनी पराजय झालेला आहे तो पराजय अविश्वास दर्शवित असल्याचे जाणकार यांचे मत आहे.ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा जो पराभव झालेला आहे तो त्यांना संभ्रमात पाडत आहे यापेक्षा नवल म्हणजे अमेटी मतदार संघ हा नेहरूंचा मतदार असल्यामुळे १९५२ पासून याठिकाणी पराभव झालेला नाही.परंतु स्मृती इराणी यांचेकडून राहुल गांधी यांचा झालेला पराभव कोणी मान्य करू शकत नाही.त्यातच प्रकाश आंबेडकर यांचा संपूर्ण देशात झंझावत असताना दोन मतदार संघातून त्यांचा पराभव होतो आणि त्यांचे विरुद्ध निवडून येणाऱ्या धोत्रे यांना मंत्रीमंडळात घेतले जाते आणि आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न होतो.ही खेळी अतिशय भयानक खेळी असल्याचे जाणकार यांचे मत आहे.त्यामुळे जो पर्यंत मतदार यांची विश्वासहर्ता निवडणूक आयोग निर्माण करीत नाही तो पर्यंत लोकशाही आहे असे कोणाला वाटणार नाही.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिका त्यांना बी टीम म्हणणारे मान्य करीत नाही तो पर्यंत त्यांच्या बाबतही विश्वासहर्ता जनमाणसात निर्माण होणार नाही असे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.त्यामुळे EVM मशीन संदर्भात प्रकाश आंडबेकर यांची भूमिका प्रामाणिकच….त्यांना बी टीम म्हणणारे यांची भूमिका काय….?
Subscribe to:
Posts (Atom)






