Thursday, June 6, 2019

शुद्र म्हणून हिणवीत आलेल्या वैदिक धर्म पंडितांचा राज्याभिषेक शिवरायांनी नाकारला आहे असे असताना आपण तो साजरा करून त्यांच्या विचारांचा अपमान तर करीत नाही ना…?


 
                    शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून इथल्या रयतेला समतावादी राज्य असल्याचा विश्वास दिला...परंतु जो पर्यंत शिवराय राज्याभिषेक करीत नाही तो पर्यंत स्वराज्याचे संविधान लागू करता येत नाही.तेव्हा माता जिजाऊ यांनी शिवरायांना राज्याभिषेक करून घेऊन छत्रपती होण्याचे आदेश दिले होते.जेव्हा शिवरायांनी राज्याभिषेक करून छत्रपती होणारा असल्याची घोषणा रयतेला दिली तेव्हा रयतेच्या आनंदाचा पारावार राहिला नाही.परंतु शिवराय छत्रपती होणे हे त्याकाळी वैदिक धर्म पंडितांना मान्य नव्हते.कारण त्यांच्या मते शिवराय हे शुद्र होते आणि शूद्रांना राजा होता येत नाही असा मनुस्मृतीचा कायदा होता...त्याकाळी फक्त शुद्र होते अतिशूद्र म्हणून कोणीही नव्हते.... अतिशुद्र म्हणजे अस्पृश्य होय हे आपण लक्षात घेतले पाहिजे.तेव्हा त्या वैदिक धर्म पंडितांच्या नाकावर टिच्चून आपण छत्रपती व्हायचे असा मनसुभा शिवरायांनी मनाशी धरलेला होता.तेव्हा त्यांनी काशीच्या गागा भट्टाकडून राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले परंतु त्यांनीही नकार दिला होता...परंतु वैदिक धर्म पंडितांचा विरोध झुगारून टाकण्यासाठी गागा भट्टाना त्यांच्या वजनाएवढ्या मोहरा देण्याचे कबूल केल्यामुळे त्यांनी राज्याभिषेक करण्याचे मान्य केले होते. परंतु शिवरायांना क्षत्रिय घराण्याशी जोडण्यासाठी त्यांनी त्यांची नाळ राजपूत असलेल्या शिसोदिया घराण्याशी जोडून शिवरायांचा राज्याभिषेक केला त्यामुळे शिवराय छत्रपती झाले.संपूर्ण जगाला शिवराय छत्रपती झाले हा संदेश तर पोहचला परंतु हे रयतेचे स्वराज्य आहे आणि समतावादी विचारांचे आहे याचाही संदेश पोहचला.तरीही इथले वैदिक धर्म पंडित त्यांना छत्रपती मानण्यास नकारच देत होते.
              रयतेच्या सुखासाठी राजपूत घराण्याशी त्यांनी नाळ जोडली आणि गागा भट्टाच्या वजनाएवढे मोहरा देऊनही हे आपणास शुद्र म्हणून हिणवीत असतील तर माझ्या रयतेचे काय हाल करीत असतील याचा सारासार विचार करून छत्रपती शिवरायांनी वैदिक राज्याभिषेक नाकारण्याचे ठरविले.तेव्हा शाक्त पंथीय शंभूराजे यांनी त्यांना शाक्त पंथीय राज्याभिषेक करण्यास सांगितले तेव्हा छत्रपती शिवरायांनी राजपूत शिसोदिया घराणे नाकारून मनुस्मृती मान्य वैदिक धर्म पद्धतीतील राज्याभिषेक नाकारून शाक्त पंथीय राज्याभिषेक करून घेऊन ते समतावादी विचारांचे छत्रपती शिवाजी महाराज झाले.त्यामुळे छत्रपती शिवराय यांनी नाकारलेला ६ जूनचा राज्याभिषेक साजरा करणे म्हणजे त्यांच्या विचारांना तडा देणे होय.त्यामुळे ६ जूनचा राज्याभिषेक करूनही शुद्र म्हणून हिणवीत आलेल्या वैदिक धर्म पंडितांचा राज्याभिषेक शिवरायांनी नाकारला आहे असे असताना आपण तो साजरा करून त्यांच्या विचारांचा अपमान तर करीत नाही ना…?

संभाजी ब्रिगेड मधील पवार साहेबांचे दोन शिलेदार...पवार साहेब मला माझा मतदार संघ महत्वाचा….तुमची चिकाटी घेऊन काय करू…! राष्ट्रवादीला प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज…! राजेश खडके सकल मराठी समाज


      मुळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हे स्वार्थ राजकारणावर उभे राहिलेले संघटन आहे.साल १९९९ ला शरद पवार कॉंग्रेस मधून बाहेर पडून हा पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे.आज या पक्षाला २० वर्ष पूर्ण झालेली आहे.शरद पवारांनी ५० वर्षात काय केले हे कोणीही त्यांना विचारीत नाही....परंतु पवार साहेबांनी २० वर्षात काय केले असा सर्वसामन्य जनतेचा विषय आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जर विचार केला तर फक्त हा मराठा समाजातील लोकांना सत्तेच्या राजकारणात घेऊन जाणारा पक्ष म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरूण या पक्षाकडे आकर्षित होत आलेला आहे तो सोडला तर इतर समाज त्यांच्याकडे आकर्षित होताना गेल्या २० वर्षात दिसलेला नाही.त्यामुळेच प्रकाश आंबेडकर त्यांना जातीवादी पक्ष म्हणत असतात ते एकदम बरोबर आहे.ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व मराठा समाजाकडे असते….त्याच प्रमाणे शहरी भागाचे नेतृत्वही मराठा समाजाकडे असते.राजकीय दृष्टीकोनातील मराठा समाज सामाजिक दृष्टीकोनातून प्रबल करावा यासाठी त्यानी खेडेकर यांना संभाजी ब्रिगेड स्थापन करण्यास सांगितली आणि मराठा समाजाला राजकीय बळ देण्याचे काम ही संभाजी ब्रिगेड करीत राहिली...परंतु या संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता म्हणून घडविण्याऐवजी मोठ्या प्रमाणात ठेकेदार म्हणून घडविण्यात आलेले आहे. म्हणून या संघटनेच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या ठेकेदार यांचे टेंडर मिळविण्यासाठी आपापसात हाण्यामाऱ्या डोके फोडाफोडीच्या घटना घडून आपसी मतभेद निर्माण झालेले आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून इथला बहुजन समाजाची दिशाभूल करून त्यांचेवर वर्चस्व करायचे असा एकमेव दृष्टीकोन त्यांचा होता.परंतु ज्याप्रमाणे आरक्षण मागणी घेऊन हा मराठा समाज अक्ट्रोसिटी अक्ट कायद्याला विरोध करण्यासाठी लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरला तेव्हाच बहुजन नेतृत्व म्हणून हा समाज पुढे लयास जात आला. त्याचे कारण की,मराठा समाजाकडे नेहमी देणारा समाज म्हणून पाहिले गेले होते परंतु तो आता मागणी करणारा समाज असल्यामुळे त्याचे नेतृत्व लयास गेलेले आपल्याला लोकसभा निवडणुकीत पाहिला मिळालेले आहे.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे ठेकेदार,व्यावसायिक आणि स्वस्वार्थाने उभे राहिलेले लोक आहेत त्यांना शरद पवार प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणत आहेत….आणि अशा कार्यकर्त्याना ते आरएसएस भाजपाकडून चिकाटी शिका असे ते म्हणत आहे...चिकाटी हा शब्द आणि हा विषय संघटनेच्या विचारांना जोडणारा शब्द आहे जिथे कार्यकर्ता प्रामाणिक आणि निष्ठावान घडतो….असे संघटन राष्ट्रवादी कॉंग्रेस उभे करण्यात अपयशी ठरलेली आहे.पक्ष संघटनेसाठी प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज लागत असते.तसे कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे असणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचा वार्ड आणि त्याचा मतदार संघ शाबूत ठेवणे महत्वाचे वाटते.त्यामुळे तो शाबूत ठेवण्यासाठी तो कोणत्याही पक्षाकडे जाऊन त्या पक्षाची उमेदवारी घेऊन त्याचा मतदार संघ शाबूत ठेवण्याचे काम करणार...त्यामुळे चिकाटी ठेवण्याचा शरद पवारांनी दिलेला सल्ला तो मान्य करणारा नाही...म्हणून तो कार्यकर्ता म्हणतो पवार साहेब मला माझा मतदार संघ महत्वाचा….तुमची चिकाटी घेऊन काय करू…! त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,राष्ट्रवादीला प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज आहे.

Tuesday, June 4, 2019

संभाजी ब्रिगेड पुरोगामी कशी….? कारण ब्रह्म विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारले आहे...!


विषय असा आहे की,चार पुस्तके वाचणारा किंवा लिहिणारा कोणताही व्यक्ती उठतो आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला दिलेले ज्ञान खोडण्याचे कटकारस्थान करीत असतो. खरे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जर आम्हाला कोणी दाखविले असतील तर ते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेले आहे.त्यांच्या समतावादी स्वराज्याचा कारभार आम्हाला दाखवून त्याचा उपभोग आम्हाला देण्याचे महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.या दोन्ही महापुरुषांनी वैदिक धर्म व्यवस्था नाकरून त्यांची मनुस्मृती दहन केली आहे.ब्रह्म विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती याला छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यात कधीही स्थान दिलेले नाही ही सत्यता आहे आणि ते नाकरून चालणार नाही.वयाच्या चौदाव्या वर्षी शंभूराजे यांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांचे समतावादी कार्य किती मोलाचे होते हे दाखवून “बुध” म्हणजे “विद्वान" म्हणून त्यांचा गौरव या ग्रंथामध्ये केला आहे.म्हणजेच विद्वान हा नेहमी भूषणावह असतो ते त्यांनी दाखवून दिलेले आहे.परंतु त्यांचे नंतर उभ्या राहिलेल्या पेशवाईने जातीव्यवस्था निर्माण करून इतिहास बदलण्याचे कार्य केले आहे.अशा व्यवस्थेला संपविण्याचे माहान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर केले आहे. ब्राह्मण हत्या (ब्रह्म हत्या) पाप आहे अशी म्हण प्रचलित असताना छत्रपती संभाजी महाराज यांनी ब्राह्मणाचा वध करून बुध्दनीती वापरली आहे हे विसरता कामा नये.छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याला घातक असा मानवधर्मीय शत्रूचा वध करून जातीयवादी व्यवस्था उलथून टाकण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आहे...तर अशा शंभूराजे नंतर जर वैदिक धर्म पंडितांचा आणि त्यानी उभ्या केलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा मनुस्मृती दहन करून बामणी व्यवस्था उलथून टाकण्याचे कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वत:चा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार करून त्यानी स्वराज्याची राजमुद्रा पिंपळाच्या पानावर कोरून हे राज्य बुध्द विचारांचे आहे हे दाखवून दिलेले आहे.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांचा आभ्यास करून “बुध्दभूषण” नावाची प्रिंटींगप्रेस उभारून एक प्रकारे छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मानच केला आहे.कारण “बुध” आणि “बुध्द” या दोन्हीचा अर्थ एकच विद्वान आणि “भूषण” चाही अर्थ एकच आणि तो म्हणजे भूषणावह असा आहे.त्यामुळे या दोन्ही महापुरुषांनी बुध्दनितीवरच कार्य केले आहे हे समजण्यास काहीच कारण नाही.या सर्व बाबींचा आभ्यास मराठा सेवा संघ यांनी करून एक बहुजन समाज घडविण्यसाठी “संभाजी ब्रिगेड” हे सामाजिक संघटन स्थापन करून छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य जगासमोर आणण्याची फार मोठी संकल्पना निर्माण केली होती.संघटना स्थापनेचा उद्देश अतिशय चांगला होता त्यासाठी त्याग देण्याची तयारीही त्यांनी मोठ्या प्रमाणात केली परंतु समाजात आतपर्यंत रुतलेली धर्म भावना ते खोडू शकले नाहीत.ब्रह्म विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांना केलेला विरोध त्यांना समाज मान्यता मिळण्यास होणारी अडचण आणि राजकीय व्यावस्थेकडून होता असलेला मोठा विरोध त्यामुळे त्यांना त्यांचा मार्ग बदलावा लागला.सामाजिक काम करीत असताना समाजाचे परिवर्तन करावे लागते परंतु पुढे त्यांच्यात परिवर्तन झाले आणि त्यांनी शंकराला महापुरुष करून तो समाजापुढे मांडावा लागला.राम कृष्ण यांना आपले महापुरुष दाखवून त्या दोघांचा समाजात मान निर्माण करण्यात आला.गणपती याला इतिहासात कोणताही आधार नसताना केवळ गणप्रमुखाची उपमा देऊन जानवेधारी ब्राह्मण स्वीकारून त्याला भाऊ रंगारी यांची उपमा देण्यात आली.त्यामुळे त्यांचे कार्य हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात असल्यामुळे पर्यायाने ते शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात जात आहे.त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांनी नाकारलेला पहिला ६ जूनचा राज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा करून इथल्या वैदिक धर्म पंडितांचे बळ वाढवीत आहेत.त्यामुळे आमचे असे म्हणणे आहे की,संभाजी ब्रिगेड पुरोगामी कशी….? कारण ब्रह्म विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारले आहेत…!

Saturday, June 1, 2019

EVM मशीन संदर्भात प्रकाश आंडबेकर यांची भूमिका प्रामाणिकच….त्यांना बी टीम म्हणणारे यांची भूमिका काय….? राजेश खडके सकल मराठी समाज

दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अशोक सोनाने यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला जे ठणकावून सांगितले आहे की,येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर बॅलेट पेपर वापरला नाही आणि त्या निवडणुका जर EVM मशीनवर घेतल्या तर त्या होऊ देणार नाहीत अशी घेतलेली भूमिका ही योग्यच असल्याचे मत आमच्या सकल मराठी समाजाचे झालेली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेचे सर्वच पक्षांनी आणि मतदारांनी स्वागतच केले पाहिजे.त्याचे कारण असे आहे की, लोकसभेचा प्रत्येक उमेदवार आज प्रत्येक मतदाराला संशयाने बघायला लागलेला आहे आणि त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रामाणिक कार्यकर्त्याना असे वाटते की, त्यांना मुस्लीम समाजाने मतदान केले नाही.त्यामुळे त्यांच्या प्रती एक अविश्वासाचे नाते निर्माण झालेले आहे.त्यांना त्यांची प्रामाणिकता सिद्ध करण्याची वेळ या EVM मशीनने आणलेली आहे.असाच प्रकार शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे राजू शेट्टी यांचे झालेले आहे.आज मतदार अचंबित झालेला आहे त्याला त्याने केलेल्या मतदानावर विश्वास राहिलेला नाही.ज्याला द्यायचे त्याला त्याचे मतदान झाले आहे काय…? याबाबत तो संभ्रमित झालेला आहे.त्यात मराठा समाजाचे नेते शरद पवार यांना देखील स्वत:च्या कन्या सुप्रियाताई सुळे संदर्भात EVM मशीनवर प्रश्नचिन्ह निर्माण करून लोकशाही धोक्यात येईल असे उदगार काढावे लागले होते.त्यानंतर पार्थ पवार यांचा जो सव्वा दोन लाख मतांनी पराजय झालेला आहे तो पराजय अविश्वास दर्शवित असल्याचे जाणकार यांचे मत आहे.ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा जो पराभव झालेला आहे तो त्यांना संभ्रमात पाडत आहे यापेक्षा नवल म्हणजे अमेटी मतदार संघ हा नेहरूंचा मतदार असल्यामुळे १९५२ पासून याठिकाणी पराभव झालेला नाही.परंतु स्मृती इराणी यांचेकडून राहुल गांधी यांचा झालेला पराभव कोणी मान्य करू शकत नाही.त्यातच प्रकाश आंबेडकर यांचा संपूर्ण देशात झंझावत असताना दोन मतदार संघातून त्यांचा पराभव होतो आणि त्यांचे विरुद्ध निवडून येणाऱ्या धोत्रे यांना मंत्रीमंडळात घेतले जाते आणि आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न होतो.ही खेळी अतिशय भयानक खेळी असल्याचे जाणकार यांचे मत आहे.त्यामुळे जो पर्यंत मतदार यांची विश्वासहर्ता निवडणूक आयोग निर्माण करीत नाही तो पर्यंत लोकशाही आहे असे कोणाला वाटणार नाही.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिका त्यांना बी टीम म्हणणारे मान्य करीत नाही तो पर्यंत त्यांच्या बाबतही विश्वासहर्ता जनमाणसात निर्माण होणार नाही असे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.त्यामुळे EVM मशीन संदर्भात प्रकाश आंडबेकर यांची भूमिका प्रामाणिकच….त्यांना बी टीम म्हणणारे यांची भूमिका काय….?

Thursday, May 30, 2019

नरेंद्र मोदीनी बसविले मराठा नेत्याला पाचव्या लाईनीत….प्रकाश आंबेडकर करीत होते वंचितांना न्याय देण्याची तयारी….! राजेश खडके सकल मराठी समाज

 
    स्वराज्य म्हणजे मराठी माणसाचा स्वाभिमान आणि अभिमान...आणि पेशवाई म्हणजे मराठी माणसाचा अपमान व लाचारी असे समीकरण पेशवाईत होते.मात्र अशा पेशवाईला तडा देण्याचे काम होळकर आणि महार योध्दा सिद्धनाक महार याने केले आहे.याच मनुवादी व्यवस्थेला दाबण्याचे कार्य प्रतीशिवाजी राजे उमाजी नाईक यांनी केले असल्याची इतिहासात नोंद सुध्दा झालेली आहे.परंतु ब्रिटीश काळात १८५७ च्या उठावा नंतर ब्रिटीश प्रशासनात पेशवाईच्या पिलावळीने शिरकाव करून इथे मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता प्रस्थापित करण्याचे कार्य केले गेले.इथली महसुली व्यवस्था ताब्यात घेऊन जो त्यांच्या व्यावस्थेत सहभागी होईल अशा लोकांना अनाजी पंताच्या योजनेनुसार जमीनदार करण्याचे काम त्याकाळी कुळकर्णी यांनी केले असल्यामुळे इथली जातीयव्यवस्था बळकट करण्यास आणि धर्माद शक्ती उभी करण्यास या जमीनदार यांच्या कडून मदतच झालेली आहे.परंतु अशा व्यावस्थेला तडा देण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी करून रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मान देऊन त्यांची पहिली जयंती साजरी करून त्यांचे स्वराज्याचे विचार पेरण्याचे कार्य करून इथल्या अस्पृश्य यांना न्याय देण्याचे कार्य केले.परंतु आनाजी पंताची पिलावळ शांत काही बसली नाही.टिळक-आगरकर यांनी या महात्मा फुले यांना विरोध करून सत्यशोधक चळवळ मारण्यासाठी आर्य सनातनी हिंदू धर्म स्थापन करून त्याची पेरणीचे काम केले.परंतु महार योध्दा म्हणून जन्म घेतलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कार्य पुढे करून मनुवादी व्यवस्थेचे असणारे संविधान मनुस्मृती दहन करून इथली मनुवादी व्यवस्था उलथवून टाकून समतावादी स्वराज्याचे संविधान लागू करून इथल्या अलुतेदार आणि बलुतेदार यांना न्याय देण्याचे कार्य त्यानी केले आहे.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पाहून इथल्या कुळकर्णी यांनी मराठा नावाची जात निर्माण करून महसुली दप्तरी त्याची नोंद करून मराठा जातीचा एक वर्ग स्थापन केला होता.अशा वर्गाला बरोबर घेऊन त्यांची घराणे निर्माण करून त्यांचेवर मोठ्या प्रमाणात स्वत:ची राजकीय व्यावस्था शरद पवार यांनी उभी केलेली आहे.आज अशा समाजाला पेटवून देण्याचे कार्य इथल्या मनुवादी व्यावस्थेने निर्माण करून इथला मराठा कमकुवत करण्याचे कटकारस्थान करण्यात आले.या मध्ये मराठा नेत्यांचा किती सहभाग होता याचे जाणीव सगळ्यानाच झालेली आहे.ज्या शरद पवारांनी जाणता राजा म्हणून जो किताब मिळविलेला आहे.त्याचा मान त्यांनी काला शपथविधीला दांडी मारून ठेवला असल्याचे आमचे मत आहे.कारण छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठीमागच्या लाईनित उभे करून औरंगाजेबाने त्यांचा अपमान केला होता त्याचे चोख उत्तर त्यानी दरबारातच औरंगाजेबास दिले असल्याची इतिहासात नोंद आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य लाटण्याचा प्रयत्न इतिहासात झालेला असल्याचे आपणास माहित आहे.त्याच प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देऊन उभे केलेले स्वराज्य लाटण्यासाठीचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरु आहे.हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रकाश आंबेडकर मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहेत.परंतु यांना भाजपाचे हस्तक म्हणून लेबल लावण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्याला पहिला मिळत आहे.काल शपथविधी सुरु असताना प्रकाश आंबेडकर हे विधानसभेत वंचित समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी बैठक घेत होते.शपथविधी महासोळाव्यात पाचव्या लाईनिचा पास देऊन मराठा नेतृत्वाचा अपमान दिल्ली येथे करण्यात आला आहे.परंतु इतिहास डोळ्यासमोर ठेऊन शरद पवार यांनी हा अपमान सहन न करता सदरच्या महासोळाव्यास दांडी मारलेली आहे.(क्रमश:)

Tuesday, May 28, 2019

प्रकाश आंबेडकर यांचा विजय रोखण्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी यशस्वी….मुस्लीम फॅक्टर राबविण्यात ओवीसी-आंबेडकर अपयशी…!राजेश खडके सकल मराठी समाज


          वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करीत मुस्लीम संघटना-मौलवी यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीने विकत घेऊन त्यांचे मार्फत फतवे काढून अकोला व सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांना पराभूत करून ८० % मराठा मतदार भाजप-शिवसेना यांचेकडे मराठा मूक मोर्चा व मराठा क्रांती मोर्च्याच्या माध्यमतून वळवून हुकुमशाही सरकार आणले आहे.
                एकंदरीत शरद पवारांचे राजकारण याला कारणीभूत आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.त्याचे कारण असे आहे की,शरद पवार यांना महाराष्ट्रातील भविष्यातील राजकारणात मराठा समाजात आपल्या नंतर नेतृत्व उभे राहू नये तसेच बहुजन चळवळीतील ओबीसी-दलित नेतृत्व उभे राहू नये याचीच काळजी जास्त वाटत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
              एकंदरीत शरद पवार यांचे राजकारण पाहता ते सावरकरवादी असल्याचे स्पष्टपणे या लोकसभा निवडणुकीतून दिसून आलेले आहे.आपली प्रधानमंत्री बनण्याची महत्वकांक्षा पूर्ण होणार नसल्याचे त्यांना माहित होते.त्यामुळे कॉंग्रेस आणि गांधी घराण्याने मला माझ्या महत्वकांक्षापासून दूर नेले त्यामुळे ती कॉंग्रेस संपूर्ण देशातून संपली पाहिजे आणि गांधी घराण्याला पुन्हा प्रधानमंत्री पद मिळाले नाही पाहिजे यासाठी त्यांनी देशातील २२ पक्षांना गाफील ठेऊन त्याचे कपटी मनाने नेतृत्व केले होते.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या माध्यमातून उद्याच्या राजकारणात मराठा समाजाचे नेतृत्व करण्याकरीता इतर मराठा पुढे येऊ नये म्हणून धूर्त राजकारण करून इथला मराठा भाजपाकडे वळविलेला आहे.आपल्या नंतर आपला पुतण्या मराठा नेतृत्व करू नये यासाठी त्यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठीची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे उघड झाले आहे.
              आपली कन्या सुपियाताई सुळे यांना निवडून आणण्याठीचे प्रयत्न म्हणून आणि केलेल्या तडजोडी मध्ये बारामतीच्या जागेला कोणताही धोका मिळू नये यासाठी EVM मशीनवर आरोप करून लोकशाहीचा मुद्दा उपस्थित करून बारामतीची जागा राखून ठेवल्यानंतर EVM मशीन मुद्दा निकाली काढला आहे.
             केवळ सिंचन घोटाळाप्रकरणी कोणतीही कारवाई होऊ नये अशी तडजोड करून केवळ निवडून आल्यानंतर मंत्रीपदी वर्णी लावावी लागेल म्हणून शिवसेनेचे जुने नेते आनंत गीते यांचा पराभव करून सुनील तटकरे,शिवाजीराव आढळराव यांचा पराभव करून अमोल कोल्हे तसेच आढसूळ यांचा पराभव करून नवनीत राणा यांना विजय दिलेला आहे.उदयनराजे भोसले हे मराठ्यांचे दैवत असल्यामुळे त्यांचा पराभव करणे आवघड झाले असते आणि संपूर्ण महाराष्ट्रात याची मोठी बोंब झाली असती म्हणून त्यांना विजय देण्यात आलेला आहे.
                 मात्र याबाबत छगन भुजबळ यांनी भाजप-शिवसेनेचा विजय हा EVM मशीनचा विजय असल्याची खरी खंत बोलून दाखविलेली आहे.त्यामुळे पहिल्यांदा EVM मशीनचा वापर हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने कसा करायचा आहे याचा धडा गुरु म्हणून शरद पवार यांनी त्यांचे शिष्य नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे.त्यामुळेच भाजपाच्या विरोधातील पक्ष-पार्ट्यांना एकत्रित करून त्यांचा पराभव निश्चित केलेला होता.त्यातच देश स्वतंत्र झाल्यापसून कधी न हरलेला नेहरुंचा मतदार संघ अमेटी मध्ये नेहरू घराण्याचा पराभव करून गांधी घराणे भाजपाच्या माध्यमातून संपविलेले आहे.
                    त्यामुळे बरोबर राहून शत्रू कसा संपवायचा याचे चांगले राजकारण शरद पवार यांना जमलेले आहे.स्वत:चा नातू पार्थ पवार याचा पराभव करून घेऊन आपल्याकडील लक्ष दुसरीकडे वळविलेले आहे असे असताना अजित पवार नावाचे भविष्यातील वारे थंड करण्यासाठी पिंपरी-चिंचवड मतदार संघातून खूप मोठ्या प्रमाणात पार्थ पवार याचा पराभव करवून घेतला आहे.
                त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाची बी टीम म्हणून शरद पवार यांचेवर केलेला आरोप खरा आहे.दलित नेतृत्व आता बहुजनांचे नेतृत्व करीत असल्यामुळे पुढील काळात दिल्लीतील प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील मोठे नेतृत्व असेल याची कल्पना असल्यामुळे स्वत: शरद पवार यांनी मुस्लीम संघटना आणि मौलवी यांना हाताशी धरून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा विजय रोखण्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी यशस्वी ठरली..तर मुस्लीम फॅक्टर राबविण्यात ओवीसी -आंबेडकर अपयशी ठरले…! नाहीतर मुस्लीम समाज वंचित बहुजन आघाडी बरोबर असता तर अकोल्यात ४५% मते घेऊन तर सोलापुरात ३८% मते घेऊन भाजपचा प्रकाश आंबेडकर यांनी पराभव केला असता….!

Sunday, May 26, 2019

होय तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडी...आता तयारी विधानसभेची….! आंबेडकरी जनतेने रिपब्लिकन नेत्यांना त्यांची जागा दाखवून...राज्यात तिसरा पर्याय दिला आहे...कॉंग्रेस आजही जळत घर असल्यामुळे जळतच आहे….!

लोकसभा निवडणुकीत एकंदरीत दलित जनता प्रकाश आंबेडकर यांचे प्रती भावनिक झालेली आपल्याला पाहिला मिळालेली आहे.आंबेडकरी जनतेने या निवडणुकीत रिपब्लिकन गटबाजीला कोणताच थारा दिला नसल्याचे स्पष्टपणे जाणविलेली आहे.परंतु स्वत:ला बाबासाहेब आंबेडकर यांचे पेक्षा शहाणे समजणाऱ्या लोकांचीही कमी नसल्याचे आपल्याला पाहिला मिळाले आहे.एकंदरीत इथला ओबीसी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी स्पष्टपणे उभा राहिलेला आपल्यालाला पाहिला मिळालेला आहे.प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरातून पराभूत करून वंचित बहुजन आघाडीला कमीत कमी मते कशी पडतील याचीच काळजी परकीयापेक्षा स्वकीयांनी घेतल्याची दिसून आलेली आहे.आंबेडकरी चळवळीचे हित जोपासविण्याऐवजी कॉंग्रेस-राष्टवादी व भाजप-शिवसेना यांचे हित कसे जोपासता येईल याचीच काळजी घेतलेली दिसत आहे.उदाहरण द्यायचे झाले तर मनुवादी विचारांचा पक्ष बळकट कसा होईल आणि जळते घर पुन्हा कसे उभे राहील याची काळजी रिपब्लिकन नेत्यांनी घेतली आहे यांमध्ये पॅथरही पाठीमागे राहिलेली नाही.स्वत:ला विचारवंत म्हणविणारे प्रकाश आंबेडकर यांना कसे भाजपासाठी काम करीत आहेत याबाबत बोंबलताना आपल्याला पाहिला मिळालेले आहे.त्यामुळे आंबेडकरी जनतेची कोणाला किती काळजी होती व आहे हे जनतेने पाहिलेले आहे.त्यामुळेच त्यांच्या शब्दाचा मान ठेऊन कोणीही कॉंग्रेस-राष्ट्रवादी किंवा भाजप -शिवसेनेला अतिशहाणे सोडून मदत केलेली नाही.
प्रकाश आंबेडकर यांचा पराभव एक राजकारण होते त्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी किंवा भाजप -शिवसेना यशस्वी जरी झाली तरी ते प्रकाश आंबेडकर यांचा झंजावात रोखू शकलेली नाही हे वंचित बहुजन आघाडीला पडलेल्या मतावरून दिसून येते.परंतु बहुजन जनतेमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा जो संदेश गेला आहे तो अतिशय महत्वाचा संदेश गेला आहे तो असा की,बहुजन समाजाला जर सत्तेचे दारे कोण उघडे करू शकतो.... तर ते प्रकाश आंबेडकर करू शकतात असा विश्वास अलुतेदार आणि बलुतेदार यांनी प्रकाश आंबेडकर यांचेवर ठेवलेला दिसून येतो.त्यामुळे जनतेने इतर रिपब्लिकन नेत्यांना स्पष्टपणे नाकाल्याचे दिसून येते.स्वस्वार्थासाठी रिपब्लिकन पक्षाचे केलेले तुकडे पहाता जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे.
                 एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत आणि गोपीचंद पाडळकर यांनी विजयाची सीमा जवळ जवळ गाठली असल्याचे दिसून आलेले आहे.प्रकाश आंबेडकर यांचेवर जो तडजोडीचा आरोप लावला गेला आहे त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या कुटुंबाचा किवा राजकीय म्हणून निवडून येण्याचा त्यांना फायदा झालेला आहे काय…? या प्रश्नाची उत्तरे आरोप करणारे यांनी द्यावीत असे आमच्या सकल मराठी समाजाचे त्यांना आव्हान आहे.
             वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पाहिले आणि त्यांना पडलेल्या मतांची टक्केवारी पाहिली तर आपल्याला असे दिसून येईल कि,प्रकाश आंबेडकर यांनी जे जातीयनिहाय उमेदवार उभे केलेले होते.त्यामुळे मतांची अदला बदल झालेली पाहिला मिळालेली आहे.बौध्द समाजाचा लहान भाऊ म्हणून मातंग समाजाच्या लातूर येथील उमेदवाराला लाखोची मते पडलेली आहेत.त्यामुळे मातंग समाजाचा विश्वास आता प्रकाश आंबेडकर यांचेवर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळे अलुतेदार आणि बलुतेदार यांनी आपल्या मतांचा पाऊस करून एक नवीन समीकरणे उभी केल्याची दिसत आहेत.आता त्यांना विश्वास वाटला आहे की,वंचित म्हणून आम्हाला जी सत्तेची दारे कोण उघडे करून देऊ शकतात तर ते प्रकाश आंबेडकर देऊ करून शकतात.म्हणूनच कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांना पडलेली मते पहाता त्यांच्या अर्ध्याहून अधिक मते वंचित बहुजन आघाडीला पडलेली आहेत.वंचित बहुजन आघाडीला जी ४१ लाख मते ११ महिन्यात पडलेली आहेत त्याची गोळाबेरीज मोठ्या प्रमाणात झालेली असून ती विश्वाससार्थक मते असल्याचे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.
                वंचित बहुजन आघाडी कोणाचीही बी टीम नव्हती व नाही..परंतु ज्यांनी बी टीम म्हणून आरोप केला आहे...ते आज कर्त्युत्वहीन असल्यामुळे आणि चुकीच्या घेतलेल्या निर्णयामुळे जनतेने त्यांना पराभूत कलेले आहे.उदाहरण द्यायचे झाले तर शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे देता येईल.राजू शेट्टी यांनी नेहमी भांडवलशाही विरोधात काम केले आहे परंतु यावेळी त्यांनी भंडावलशाही बरोबर राहिल्याने त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते त्यांचेवर  नाराज झाले होते आणि दुसरे कारण म्हणजे पक्षांच्या आघाड्या बदलत राहायच्या म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजपा बरोबर आणि या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर त्यामुळे जनतेने त्यांना नाकरले आहे परंतु हे मान्य न करता केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे माझा पराभव झाला असे म्हणून स्वत:च्या बुद्धीचे प्रदर्शन त्यांनी केले आहे.असाच आरोप कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार अशोक चव्हाण यांनी केला आहे.परंतु त्यांना हे माहित आहे की,संपूर्ण देशात आम्हाला नाकारले आहे आणि का नाकारले आहे याची कोणतीही कारणेमीमांसा न देता वंचित बहुजन आघाडीमुळे आमचा नऊ ठिकाणी पराभव झाला आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे.वंचित बहुजन आघाडीने कोणाचाही पराभव केला नसून तिसरा पर्याय म्हणून दिलेला आहे असे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.(क्रमश:)