Thursday, May 30, 2019

नरेंद्र मोदीनी बसविले मराठा नेत्याला पाचव्या लाईनीत….प्रकाश आंबेडकर करीत होते वंचितांना न्याय देण्याची तयारी….! राजेश खडके सकल मराठी समाज

 
    स्वराज्य म्हणजे मराठी माणसाचा स्वाभिमान आणि अभिमान...आणि पेशवाई म्हणजे मराठी माणसाचा अपमान व लाचारी असे समीकरण पेशवाईत होते.मात्र अशा पेशवाईला तडा देण्याचे काम होळकर आणि महार योध्दा सिद्धनाक महार याने केले आहे.याच मनुवादी व्यवस्थेला दाबण्याचे कार्य प्रतीशिवाजी राजे उमाजी नाईक यांनी केले असल्याची इतिहासात नोंद सुध्दा झालेली आहे.परंतु ब्रिटीश काळात १८५७ च्या उठावा नंतर ब्रिटीश प्रशासनात पेशवाईच्या पिलावळीने शिरकाव करून इथे मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता प्रस्थापित करण्याचे कार्य केले गेले.इथली महसुली व्यवस्था ताब्यात घेऊन जो त्यांच्या व्यावस्थेत सहभागी होईल अशा लोकांना अनाजी पंताच्या योजनेनुसार जमीनदार करण्याचे काम त्याकाळी कुळकर्णी यांनी केले असल्यामुळे इथली जातीयव्यवस्था बळकट करण्यास आणि धर्माद शक्ती उभी करण्यास या जमीनदार यांच्या कडून मदतच झालेली आहे.परंतु अशा व्यावस्थेला तडा देण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी करून रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मान देऊन त्यांची पहिली जयंती साजरी करून त्यांचे स्वराज्याचे विचार पेरण्याचे कार्य करून इथल्या अस्पृश्य यांना न्याय देण्याचे कार्य केले.परंतु आनाजी पंताची पिलावळ शांत काही बसली नाही.टिळक-आगरकर यांनी या महात्मा फुले यांना विरोध करून सत्यशोधक चळवळ मारण्यासाठी आर्य सनातनी हिंदू धर्म स्थापन करून त्याची पेरणीचे काम केले.परंतु महार योध्दा म्हणून जन्म घेतलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कार्य पुढे करून मनुवादी व्यवस्थेचे असणारे संविधान मनुस्मृती दहन करून इथली मनुवादी व्यवस्था उलथवून टाकून समतावादी स्वराज्याचे संविधान लागू करून इथल्या अलुतेदार आणि बलुतेदार यांना न्याय देण्याचे कार्य त्यानी केले आहे.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पाहून इथल्या कुळकर्णी यांनी मराठा नावाची जात निर्माण करून महसुली दप्तरी त्याची नोंद करून मराठा जातीचा एक वर्ग स्थापन केला होता.अशा वर्गाला बरोबर घेऊन त्यांची घराणे निर्माण करून त्यांचेवर मोठ्या प्रमाणात स्वत:ची राजकीय व्यावस्था शरद पवार यांनी उभी केलेली आहे.आज अशा समाजाला पेटवून देण्याचे कार्य इथल्या मनुवादी व्यावस्थेने निर्माण करून इथला मराठा कमकुवत करण्याचे कटकारस्थान करण्यात आले.या मध्ये मराठा नेत्यांचा किती सहभाग होता याचे जाणीव सगळ्यानाच झालेली आहे.ज्या शरद पवारांनी जाणता राजा म्हणून जो किताब मिळविलेला आहे.त्याचा मान त्यांनी काला शपथविधीला दांडी मारून ठेवला असल्याचे आमचे मत आहे.कारण छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठीमागच्या लाईनित उभे करून औरंगाजेबाने त्यांचा अपमान केला होता त्याचे चोख उत्तर त्यानी दरबारातच औरंगाजेबास दिले असल्याची इतिहासात नोंद आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य लाटण्याचा प्रयत्न इतिहासात झालेला असल्याचे आपणास माहित आहे.त्याच प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देऊन उभे केलेले स्वराज्य लाटण्यासाठीचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरु आहे.हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रकाश आंबेडकर मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहेत.परंतु यांना भाजपाचे हस्तक म्हणून लेबल लावण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्याला पहिला मिळत आहे.काल शपथविधी सुरु असताना प्रकाश आंबेडकर हे विधानसभेत वंचित समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी बैठक घेत होते.शपथविधी महासोळाव्यात पाचव्या लाईनिचा पास देऊन मराठा नेतृत्वाचा अपमान दिल्ली येथे करण्यात आला आहे.परंतु इतिहास डोळ्यासमोर ठेऊन शरद पवार यांनी हा अपमान सहन न करता सदरच्या महासोळाव्यास दांडी मारलेली आहे.(क्रमश:)

Tuesday, May 28, 2019

प्रकाश आंबेडकर यांचा विजय रोखण्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी यशस्वी….मुस्लीम फॅक्टर राबविण्यात ओवीसी-आंबेडकर अपयशी…!राजेश खडके सकल मराठी समाज


          वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम असल्याचा आरोप करीत मुस्लीम संघटना-मौलवी यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीने विकत घेऊन त्यांचे मार्फत फतवे काढून अकोला व सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांना पराभूत करून ८० % मराठा मतदार भाजप-शिवसेना यांचेकडे मराठा मूक मोर्चा व मराठा क्रांती मोर्च्याच्या माध्यमतून वळवून हुकुमशाही सरकार आणले आहे.
                एकंदरीत शरद पवारांचे राजकारण याला कारणीभूत आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.त्याचे कारण असे आहे की,शरद पवार यांना महाराष्ट्रातील भविष्यातील राजकारणात मराठा समाजात आपल्या नंतर नेतृत्व उभे राहू नये तसेच बहुजन चळवळीतील ओबीसी-दलित नेतृत्व उभे राहू नये याचीच काळजी जास्त वाटत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
              एकंदरीत शरद पवार यांचे राजकारण पाहता ते सावरकरवादी असल्याचे स्पष्टपणे या लोकसभा निवडणुकीतून दिसून आलेले आहे.आपली प्रधानमंत्री बनण्याची महत्वकांक्षा पूर्ण होणार नसल्याचे त्यांना माहित होते.त्यामुळे कॉंग्रेस आणि गांधी घराण्याने मला माझ्या महत्वकांक्षापासून दूर नेले त्यामुळे ती कॉंग्रेस संपूर्ण देशातून संपली पाहिजे आणि गांधी घराण्याला पुन्हा प्रधानमंत्री पद मिळाले नाही पाहिजे यासाठी त्यांनी देशातील २२ पक्षांना गाफील ठेऊन त्याचे कपटी मनाने नेतृत्व केले होते.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या माध्यमातून उद्याच्या राजकारणात मराठा समाजाचे नेतृत्व करण्याकरीता इतर मराठा पुढे येऊ नये म्हणून धूर्त राजकारण करून इथला मराठा भाजपाकडे वळविलेला आहे.आपल्या नंतर आपला पुतण्या मराठा नेतृत्व करू नये यासाठी त्यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठीची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे उघड झाले आहे.
              आपली कन्या सुपियाताई सुळे यांना निवडून आणण्याठीचे प्रयत्न म्हणून आणि केलेल्या तडजोडी मध्ये बारामतीच्या जागेला कोणताही धोका मिळू नये यासाठी EVM मशीनवर आरोप करून लोकशाहीचा मुद्दा उपस्थित करून बारामतीची जागा राखून ठेवल्यानंतर EVM मशीन मुद्दा निकाली काढला आहे.
             केवळ सिंचन घोटाळाप्रकरणी कोणतीही कारवाई होऊ नये अशी तडजोड करून केवळ निवडून आल्यानंतर मंत्रीपदी वर्णी लावावी लागेल म्हणून शिवसेनेचे जुने नेते आनंत गीते यांचा पराभव करून सुनील तटकरे,शिवाजीराव आढळराव यांचा पराभव करून अमोल कोल्हे तसेच आढसूळ यांचा पराभव करून नवनीत राणा यांना विजय दिलेला आहे.उदयनराजे भोसले हे मराठ्यांचे दैवत असल्यामुळे त्यांचा पराभव करणे आवघड झाले असते आणि संपूर्ण महाराष्ट्रात याची मोठी बोंब झाली असती म्हणून त्यांना विजय देण्यात आलेला आहे.
                 मात्र याबाबत छगन भुजबळ यांनी भाजप-शिवसेनेचा विजय हा EVM मशीनचा विजय असल्याची खरी खंत बोलून दाखविलेली आहे.त्यामुळे पहिल्यांदा EVM मशीनचा वापर हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने कसा करायचा आहे याचा धडा गुरु म्हणून शरद पवार यांनी त्यांचे शिष्य नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे.त्यामुळेच भाजपाच्या विरोधातील पक्ष-पार्ट्यांना एकत्रित करून त्यांचा पराभव निश्चित केलेला होता.त्यातच देश स्वतंत्र झाल्यापसून कधी न हरलेला नेहरुंचा मतदार संघ अमेटी मध्ये नेहरू घराण्याचा पराभव करून गांधी घराणे भाजपाच्या माध्यमातून संपविलेले आहे.
                    त्यामुळे बरोबर राहून शत्रू कसा संपवायचा याचे चांगले राजकारण शरद पवार यांना जमलेले आहे.स्वत:चा नातू पार्थ पवार याचा पराभव करून घेऊन आपल्याकडील लक्ष दुसरीकडे वळविलेले आहे असे असताना अजित पवार नावाचे भविष्यातील वारे थंड करण्यासाठी पिंपरी-चिंचवड मतदार संघातून खूप मोठ्या प्रमाणात पार्थ पवार याचा पराभव करवून घेतला आहे.
                त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाची बी टीम म्हणून शरद पवार यांचेवर केलेला आरोप खरा आहे.दलित नेतृत्व आता बहुजनांचे नेतृत्व करीत असल्यामुळे पुढील काळात दिल्लीतील प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील मोठे नेतृत्व असेल याची कल्पना असल्यामुळे स्वत: शरद पवार यांनी मुस्लीम संघटना आणि मौलवी यांना हाताशी धरून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा विजय रोखण्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी यशस्वी ठरली..तर मुस्लीम फॅक्टर राबविण्यात ओवीसी -आंबेडकर अपयशी ठरले…! नाहीतर मुस्लीम समाज वंचित बहुजन आघाडी बरोबर असता तर अकोल्यात ४५% मते घेऊन तर सोलापुरात ३८% मते घेऊन भाजपचा प्रकाश आंबेडकर यांनी पराभव केला असता….!

Sunday, May 26, 2019

होय तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडी...आता तयारी विधानसभेची….! आंबेडकरी जनतेने रिपब्लिकन नेत्यांना त्यांची जागा दाखवून...राज्यात तिसरा पर्याय दिला आहे...कॉंग्रेस आजही जळत घर असल्यामुळे जळतच आहे….!

लोकसभा निवडणुकीत एकंदरीत दलित जनता प्रकाश आंबेडकर यांचे प्रती भावनिक झालेली आपल्याला पाहिला मिळालेली आहे.आंबेडकरी जनतेने या निवडणुकीत रिपब्लिकन गटबाजीला कोणताच थारा दिला नसल्याचे स्पष्टपणे जाणविलेली आहे.परंतु स्वत:ला बाबासाहेब आंबेडकर यांचे पेक्षा शहाणे समजणाऱ्या लोकांचीही कमी नसल्याचे आपल्याला पाहिला मिळाले आहे.एकंदरीत इथला ओबीसी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी स्पष्टपणे उभा राहिलेला आपल्यालाला पाहिला मिळालेला आहे.प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरातून पराभूत करून वंचित बहुजन आघाडीला कमीत कमी मते कशी पडतील याचीच काळजी परकीयापेक्षा स्वकीयांनी घेतल्याची दिसून आलेली आहे.आंबेडकरी चळवळीचे हित जोपासविण्याऐवजी कॉंग्रेस-राष्टवादी व भाजप-शिवसेना यांचे हित कसे जोपासता येईल याचीच काळजी घेतलेली दिसत आहे.उदाहरण द्यायचे झाले तर मनुवादी विचारांचा पक्ष बळकट कसा होईल आणि जळते घर पुन्हा कसे उभे राहील याची काळजी रिपब्लिकन नेत्यांनी घेतली आहे यांमध्ये पॅथरही पाठीमागे राहिलेली नाही.स्वत:ला विचारवंत म्हणविणारे प्रकाश आंबेडकर यांना कसे भाजपासाठी काम करीत आहेत याबाबत बोंबलताना आपल्याला पाहिला मिळालेले आहे.त्यामुळे आंबेडकरी जनतेची कोणाला किती काळजी होती व आहे हे जनतेने पाहिलेले आहे.त्यामुळेच त्यांच्या शब्दाचा मान ठेऊन कोणीही कॉंग्रेस-राष्ट्रवादी किंवा भाजप -शिवसेनेला अतिशहाणे सोडून मदत केलेली नाही.
प्रकाश आंबेडकर यांचा पराभव एक राजकारण होते त्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी किंवा भाजप -शिवसेना यशस्वी जरी झाली तरी ते प्रकाश आंबेडकर यांचा झंजावात रोखू शकलेली नाही हे वंचित बहुजन आघाडीला पडलेल्या मतावरून दिसून येते.परंतु बहुजन जनतेमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा जो संदेश गेला आहे तो अतिशय महत्वाचा संदेश गेला आहे तो असा की,बहुजन समाजाला जर सत्तेचे दारे कोण उघडे करू शकतो.... तर ते प्रकाश आंबेडकर करू शकतात असा विश्वास अलुतेदार आणि बलुतेदार यांनी प्रकाश आंबेडकर यांचेवर ठेवलेला दिसून येतो.त्यामुळे जनतेने इतर रिपब्लिकन नेत्यांना स्पष्टपणे नाकाल्याचे दिसून येते.स्वस्वार्थासाठी रिपब्लिकन पक्षाचे केलेले तुकडे पहाता जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे.
                 एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत आणि गोपीचंद पाडळकर यांनी विजयाची सीमा जवळ जवळ गाठली असल्याचे दिसून आलेले आहे.प्रकाश आंबेडकर यांचेवर जो तडजोडीचा आरोप लावला गेला आहे त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या कुटुंबाचा किवा राजकीय म्हणून निवडून येण्याचा त्यांना फायदा झालेला आहे काय…? या प्रश्नाची उत्तरे आरोप करणारे यांनी द्यावीत असे आमच्या सकल मराठी समाजाचे त्यांना आव्हान आहे.
             वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पाहिले आणि त्यांना पडलेल्या मतांची टक्केवारी पाहिली तर आपल्याला असे दिसून येईल कि,प्रकाश आंबेडकर यांनी जे जातीयनिहाय उमेदवार उभे केलेले होते.त्यामुळे मतांची अदला बदल झालेली पाहिला मिळालेली आहे.बौध्द समाजाचा लहान भाऊ म्हणून मातंग समाजाच्या लातूर येथील उमेदवाराला लाखोची मते पडलेली आहेत.त्यामुळे मातंग समाजाचा विश्वास आता प्रकाश आंबेडकर यांचेवर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळे अलुतेदार आणि बलुतेदार यांनी आपल्या मतांचा पाऊस करून एक नवीन समीकरणे उभी केल्याची दिसत आहेत.आता त्यांना विश्वास वाटला आहे की,वंचित म्हणून आम्हाला जी सत्तेची दारे कोण उघडे करून देऊ शकतात तर ते प्रकाश आंबेडकर देऊ करून शकतात.म्हणूनच कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांना पडलेली मते पहाता त्यांच्या अर्ध्याहून अधिक मते वंचित बहुजन आघाडीला पडलेली आहेत.वंचित बहुजन आघाडीला जी ४१ लाख मते ११ महिन्यात पडलेली आहेत त्याची गोळाबेरीज मोठ्या प्रमाणात झालेली असून ती विश्वाससार्थक मते असल्याचे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.
                वंचित बहुजन आघाडी कोणाचीही बी टीम नव्हती व नाही..परंतु ज्यांनी बी टीम म्हणून आरोप केला आहे...ते आज कर्त्युत्वहीन असल्यामुळे आणि चुकीच्या घेतलेल्या निर्णयामुळे जनतेने त्यांना पराभूत कलेले आहे.उदाहरण द्यायचे झाले तर शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे देता येईल.राजू शेट्टी यांनी नेहमी भांडवलशाही विरोधात काम केले आहे परंतु यावेळी त्यांनी भंडावलशाही बरोबर राहिल्याने त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते त्यांचेवर  नाराज झाले होते आणि दुसरे कारण म्हणजे पक्षांच्या आघाड्या बदलत राहायच्या म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजपा बरोबर आणि या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर त्यामुळे जनतेने त्यांना नाकरले आहे परंतु हे मान्य न करता केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे माझा पराभव झाला असे म्हणून स्वत:च्या बुद्धीचे प्रदर्शन त्यांनी केले आहे.असाच आरोप कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार अशोक चव्हाण यांनी केला आहे.परंतु त्यांना हे माहित आहे की,संपूर्ण देशात आम्हाला नाकारले आहे आणि का नाकारले आहे याची कोणतीही कारणेमीमांसा न देता वंचित बहुजन आघाडीमुळे आमचा नऊ ठिकाणी पराभव झाला आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे.वंचित बहुजन आघाडीने कोणाचाही पराभव केला नसून तिसरा पर्याय म्हणून दिलेला आहे असे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.(क्रमश:)