Sunday, August 16, 2020

कॉग्रेस पक्ष असताना ब्राह्मणी व्यवस्थेला जनसंघ पक्षाची स्थापना का करावी लागली....? राजेश खडके सकल मराठी समाज

 

            गोखले-आगरकर-टिळक यांनी इथल्या प्रशासकीय व्यवस्थेवर दबाव निर्माण करण्यासाठी १८८५ मध्ये कॉंग्रेस ही संस्था स्थापन केली होती.पुढे टिळकांच्या नेतृत्वात मोहन गांधी यांचा १९१५ मध्ये तर श्री हेगडेवार यांचा १९१६ मध्ये प्रवेश झाला.टिळकांचा १९२० मध्ये मृत्यू झालेनंतर कॉंग्रेसचे नेतृत्व मोहन गांधी यांच्याकडे आले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२४ मध्ये समता सैनिक दलाची स्थापना केल्यामुळे कॉंग्रेस मधून श्री हेगडेवार बाहेर पडले आणि त्यांनी समता सैनिक दलास पॅरेलल असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १९२५ मध्ये स्थापन केले.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास नेहमी ब्राह्मणी व्यवस्थेकडून अडचण निर्माण करण्याचे काम होत होते.स्वतंत्र भारतात येथील शूद्रांना समानतेचा दर्जा मिळावा यासाठी गोलमेज परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिनिधित्व केले होते. शूद्रांना प्रतिनिधित्व देण्यासाठी सायमन कमिशन गठीत होऊन १९२९ मध्ये ते भारतात आले होते.परंतु या कमिशनला कॉंग्रेसने विरोध केला त्यामुळे शूद्रांच्या प्रतिनिधित्वचा प्रश्नासाठी संघर्ष उभा राहिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३० मध्ये डीप्रेस्ड क्लास्सेस फेडरेशन स्थापन करून अतिमागास वर्गासाठी संघर्ष केला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये शुद्रांची दिलेली जातीय यादी (शेड्युल्ड कास्ट) संदर्भात १९३१ मध्ये जातीची जनगणना करण्यात आली.तर १९३५ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून इथल्या कामगारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय  दिलेला आहे.

              गोलमेज परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शुद्रांची जातीय यादी प्रमाणे जणगणना झाली.या सर्व जातीना न्याय देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केली त्यामुळे सर्व जाती या पक्षाकडे आकर्षित झाल्या होत्या.गावगाड्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार आणि फिरस्ते यांच्यासह  गावगाड्यातील एकतिसावा घटक म्हणजे कुणबी बरोबर घेण्यासाठी शेतकरी कामगार पक्षा बरोबर युती केलेली आहे. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचे १९४२ आणि १९४७ चे यश पहाता ब्राह्मणी व्यवस्था आणि कॉंग्रेस पक्ष गडबडला होता.त्यामुळे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनला रोखण्यासाठी ब्राह्मणी व्यवस्थेने कॉंग्रेसच्या मदतीने ३ अक्टोबर १९५१ साली जनसंघ पक्षाची स्थपना करून हिंदूंच्या नावाखाली फोडण्यास सुरु केले.परंतु १९५२ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशन उभा रहात असताना दिसला.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर म्हणजे १९५७ साली सुध्दा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाला मान्यता मिळालेली होती.त्यामुळे १९६२ पर्यंत इतर जाती या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाला आकर्षित होत्या.परंतु नंतरच्या काळात रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आणि पुढे पुढे या जाती दूर होत जाताना दिसल्या आहेत.या गावगाड्यातील शेड्युल्ड कास्ट (जातीच्या यादी) प्रमाणे जे वर्गीकरण करण्यात आले जसे SC,ST,NT,VJNT,OBC यांची मते वळविण्याचे कॉंग्रेस,जनसंघ आणि कॉम्रेडच्या माध्यमातून काम करण्यात आले.परंतु आज आदरणीय प्रकाश आंबेडकर या गावगाड्यातील प्रत्येक जाती शोधून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसत आहे.पुढे त्या सर्व गावगाड्यातील जातींची यादी आपण पाहूयात....(क्रमशJ

 

Saturday, August 15, 2020

शेड्युल्ड कास्ट फेडरेशन म्हणजेच वंचित बहुजन आघाडी होय....उदाहरण “डफली बजाओ आंदोलन” होय...! राजेश खडके सकल मराठी समाज

 

            “शेड्युल्ड” म्हणजे यादी आणि “कास्ट” म्हणजे जाती असा त्याचा अर्थ होय...आणि हा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३० मध्ये स्थापन केलेला डीप्रेस्ड क्लासेस फेडरेशन आणि १९३५ मध्ये स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष या दोन संस्था समजून घेतल्या पाहिजेत.या दोन संस्था समजून घेतल्यास आपल्याला १९४२ मध्ये स्थापन केलेला शेड्युल्ड कास्ट फेडरेशन समजून घेता येईल आणि जेव्हा आपण शेड्युल्ड कास्ट फेडरेशन समजून घेऊ तेव्हा आपल्यला वंचित बहुजन आघाडी ही संस्था समजून घेता येईल.

     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी ठेऊन स्वराज्य समजून घेतले होते.महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी  महाराज यांच्या समाधीची बंद असलेली दिवाबत्ती पुन्हा सुरु करून १८६९ मध्ये पुण्यातील हिराबाग येथे छत्रपती शिवरायांची पहिली जयंती सुरु करून छत्रपती शिवरायांचे समतेचे विचार जनतेमध्ये पोहचून २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.याच दिनाचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दलाची स्थापना केली होती.

    छत्रपती शिवाजी  महाराज यांनी अलुतेदार व बलुतेदार यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन केले होते.अशा स्वराज्याची राजधानी असलेल्या परिसरात म्हणजे महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह २० मार्च १९२७ साली “जय भवानी जय शिवाजी” घोषणा देऊन केला होता.....म्हणजेच “गावगाडा” जागरूक करून गावगाड्यातील अलुतेदार व बलुतेदार यांना न्याय देण्याचा लढा उभा केला.ज्या मनुस्मृतीने गावगाड्यात जातीयता निर्माण करून स्वराज्यातील खऱ्या मावळ्यांवर अन्याय केला अशी मनुस्मृती दहन करून अति मागास जाती वर्गासाठी “डीप्रेस्ड क्लासेस फेडरेशन” ही संस्था उभी केली होती.

       भारताचा मुख्य कणा इथला कामगार वर्ग असल्यामुळे तो मजबूत होणे अत्यंत आवश्यक असल्याची भावना निर्माण होऊन त्याला न्याय देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “स्वतंत्र मजूर पक्ष” निर्माण करून खरा कामगारांचे नेते म्हणून पुढे आले आणि ३ ऑगस्ट १९४२ साली कामगारांच्या हक्कासाठी कामगार कायदा मंजूर करून घेतला.

       बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार आणि कुणबी मिळून जो एकतीस सदस्यांनी जो गावगाडा उभा केला त्या एकतीस सदस्यांच्या आणि फिरस्ते म्हणून असणाऱ्या जातींच्या अनेक जाती निर्माण झालेल्या होत्या.त्या सर्व जातींचा आभ्यास करून त्यातील प्रत्येक जातींना न्याय देण्याची भूमिका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेऊन त्या गावगाड्यातील जातींचे जातीनिहाय वर्गीकरण करून त्याचे शेड्युल्ड तयार करून घेतले होते......म्हणजेच जातीची यादी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली होती.या सर्व जातींना एक करून त्यांच्या न्याय हक्कासाठी १७ व १८ जुलै १९४२ रोजी नागपूर येथे अधिवेशन भरवून “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” या पक्षाची स्थापना करून शेतकरी कामगार पक्षा बरोबर युती करून निवडणूक लढविलेली होते.म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी याच गावगाड्यातील लोकांना लॉकडाऊन मधुन बाहेर काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात “डफली बजाओ आंदोलन” उभारून नागपूरमधून स्वत: आंदोलनाचे नेतृत्व केले आहे.

      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ साली स्थापन केलेल्या “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” च्या माध्यमातून ३ ऑगस्ट १९४७ साली भारताचे कायदामंत्री झाले आणि १५ ऑगस्ट १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला आणि याच स्वतंत्र झालेल्या भारत देशाला संविधान देऊन गावगाड्यातील प्रत्येक जातीला संविधानिक अधिकार मिळवून दिलेले आहेत. “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” च्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडविलच्या माध्यमातून भारतीय स्त्री ला १९५२ मध्ये गुलामगिरीतून मुक्त करून तिला हक्क मिळावे म्हणून मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे.

        “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” या पक्षाचे नेतृत्व करीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गावगाड्याची जुनी बौध्द संस्कृती पुन्हा गावगाड्याला देण्यासाठी १९५६ साली बुध्द धम्माची दीक्षा घेतली आहे.त्यानंतर त्यांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा याच “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” पक्षाचा ध्वज त्यांना अर्पण करण्यात आलेला होता.

     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेनंतर लोकसभेची निवडणूक झाली आणि “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” पक्षाचा ध्वज दिल्लीला फडकला यामध्ये “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” या पक्षाचे दादासाहेब गायकवाड,बी सी कांबळे,बाळासाहेब साळुंके,डी ए कट्टी,बी के माने लोकसभेवर निवडून गेले आहेत.नंतर या सर्वानी १९६२ पर्यंत “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” च्या वतीने खासदार की भोगलेली आहे.

     एकंदरीत आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे कामकाज पाहिले असता असेच दिसून येते की ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” उभा करीत आहेत(क्रमशJ