Sunday, February 23, 2020

आरएसएसवाल्या प्रशिक्षित गुंडाना ठोकण्यासाठी आम्ही तयार आहोत....! प्रकाश आंबेडकर



      विषय असा आहे की आज कोणाताही समाज असो त्याला सीएए – एनपीआर – एनआरसी ची दहशत आरएसएस निर्माण करू पहात आहे.त्यामध्ये सर्वात जास्त दहशत कोणाला झाली असेल तर ती इथल्या मुस्लीम समाजाला झालेली आहे. आज जन्म आणि मृत्यू नोंद कार्यालयात मोठ्या प्रमाणात हा समाज गर्दी करू लागला आहे.कारण त्याला स्पष्टपणे कळाले आहे की,शेवटी या कायद्याचा आपल्यावर हल्ला हा ठरलेला आहे.आणि तो हल्ला होणारच आहे अशी मानसिकता त्यांची झालेली आहे.त्यामुळे इथल्या भारत देशाचे संविधान धोक्यात आलेले आहे यात कोणालाही दुमत असायचे कारण नाही असे मी मानतो.ही आरएसएसची व्दिराष्ट्र संकल्पना होती आणि ती १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र देश झाल्यामुळे आणि त्यांचा ध्वज फडकल्यामुळे यशस्वी झाल्याने त्यावेळच्या आरएसएस वाल्यांनी आपल्या घरी खीर बनवून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला होता.आणि १५ ऑगस्ट १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाल्यामुळे आणि त्याला डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू होणार हे माहित झाले असल्यामुळे त्याने तो स्वतंत्र दिवस काळा दिवस म्हणून पाळला असल्याचे पुरावे असल्याचे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेली आहे.आणि असे लोक सध्या भारताचे संविधान बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात सीएए – एनपीआर – एनआरसी कायद्याचा अमल व्हावा म्हणून दहशत माजवीत आहेत.प्रश्न असा आहे की इथला हिंदू असणाऱ्या समाजाची हे लोक दिशाभूल करीत असताना दिसत आहे.नेहमी अंधश्रध्दा म्हणून जीवन व्यथित करणारा हा समाज त्याचा बळी पडत आहे.त्याला एनपीआर कायद्याच्या माध्यमातून त्याचे स्वत:चे नागरिकत्व सिध्द करावे लागणार आहे याची जाण त्याला होण्यास तयार नाही.ज्यावेळी त्याला याची जाण होणार आहे तो पर्यंत त्याच्या हातातून वेळ निघून गेलेली असणार आहे.आज तो या आरएसएस वाल्यांचे समर्थन करीत फिरत जरी असला तरी या हल्ल्याचा तो उद्या बळी ठरणार आहे याची त्याला कल्पना नाहीये.परंतु विश्वास देण्यास इतिहासापासून वैदिक धर्म पंडीत हे हुशार आहेत याची त्याला जाण होत नाही.
                हिंदू राष्ट्र संकल्पना ही बाळकृष्ण गंगाधर टिळक यांची होती त्यामुळेच त्यांनी साल १८८४ मध्ये पहिली हिंदू महासभा बोलाविलेली होती.कोकणस्थ ब्राह्मणानी घाटाखालची गणपती ही देवता घाटावरती आणलेली आहे.आणि त्या देवतेला बहुजनांच्या माथावरती साल १९९२ ला भाऊ रंगारीच्या माध्यमातून बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी बसविलेली आहे.तेव्हापासून मुस्लीम व्देष पेरण्याचे कार्य जोरात सुरु झाले होते या संदर्भात इतिहासकार आणि संशोधक यांचे दाखले उपलब्ध होत असतात.यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव प्रामुख्याने आदराने पुढे येते. प्रबोधनकार ठाकरे यांनी कधीही गणपती ही देवता बहुजन समाजाने पुजली नाही किंवा भजली नाही असे सांगितलेले आहे.त्या प्रमाणे त्यानीही कधी गणपती ही देवता पुजली नाही किंवा भजली नाही.कार्ल्याच्या लेणी मधील महामायेला एकविरा म्हणून आपले कुलदैवत निर्माण करून तिचे पूजन केले आहे.
               महात्मा ज्योतिबा फुले यांनी वैदिक धर्म पंडितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची लपविलेली समाधी शोधून स्वराज्य समोर आणले आहे.विषमतेच्या मनुस्मृतीच्या विषात डुबविलेली समता बाहेर काढून त्याची पेरणी जन सामान्य माणसात केलेली आहे.अशा विषमतेच्या मनुस्मृतीचे दहन केली पाहिजे असे ते म्हणाले होते.अशी समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी साल १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून समोर आलेले स्वराज्य आणि स्वराज्यातील समतावादी बुध्दप्रेमी छत्रपती संभाजी महाराज यांची विषमतेच्या मनुस्मृती प्रमाणे झालेली हत्या आणि त्या हत्येचा घेतलेला बदला म्हणजे भीमा कोरेगावच्या विजयस्तंभास भेट देऊन त्या विषमतेच्या मनुस्मृतीचे दहन करून स्वतंत्र भारताला संविधान दिलेले आहे.
               अशा स्वतंत्र भारताला दिलेली समता टिकविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुध्द धम्माची (विचार) दीक्षा घेऊन ही समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी ही २२ प्रतिज्ञातील क्रमांक ९ व १० प्रमाणे बौध्द धम्मीय व्यक्तीला दिलेली आहे.आणि तो बौध्द धम्मीय व्यक्ती ही समता टिकविण्यासाठी आजही संघर्ष करीत असताना आपल्याला पाह्यला मिळत आहे.
            डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेली समता उध्वस्त करण्याचा कायदा या आरएसएस वाल्यांनी सीएए – एनपीआर – एनआरसी च्या माध्यमातून बेकायदेशीरपणे आणलेला आहे.आणि तो लागू करण्यासाठी आरएसएस चे गुंड दशहत माजवीत आहेत.त्या प्रकारचे ट्रेनिंग त्यांना आरएसएसच्या माध्यमातून देण्यात येत आहे.परंतु तो आरएसएसवादी हे विसरत आहे की,इतिहास हा नेहमी महार योध्यानी गाजविलेला आहे.आणि आजही या महार योध्यांचा भीमा कोरेगावचा विजयस्तंभ प्रेरणा देत आहे.त्यामुळे स्वराज्य हे अलुतेदार लढवय्या योध्याचे आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वीर मावळ्यांचे आहे.एखाद्या गुंडाने समाजात दहशत माजविली तर समाज एकत्र येऊन त्या गुंडाला ठोकून टाकतो.त्या प्रमाणे या आरएसएसवाल्या प्रशिक्षित गुंडाना ठोकण्यासाठी आम्ही तयार आहोत असे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी नुकत्याच एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.त्यामुळे लढाई ही समतेची आहे आणि शेवटच्या वळणावर आलेली आहे याची जाण आज इथल्या वीर योद्ध्यांच्या वंशजांना झालेली आहे.