Sunday, May 31, 2020

झोपडपट्टी पुर्नविकास म्हणजे...कॉंग्रेसच्या मतदार संघाचे उध्द्वस्तीकरण....तरीही कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा कार्यकर्ता शांत कसा....? राजेश खडके बहुजन मोर्चा


     विषय असा आहे की,काही दिवसापूर्वी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे वृत्तपत्रात स्टेटमेंट आले होते की,कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या भविष्यातील आरोग्याचा दृष्टीकोन ठेऊन झोपडपट्टी पुर्नविकास कार्यक्रम राज्य सरकारच्या परवानगीने सुरु केलेला आहे.पुणे शहरात एकूण ५३८ झोपडपट्ट्या आहेत दाट वस्त्या असल्या कारणामुळे तेथे कोविड १९ चा प्रार्दुभाव रोखण्यास खूप मोठी कसरत प्रशासनास करावी लागत आहे.आणि त्यातील सार्वजनिक परिस्थीतीचा आढावा घेतल्यास सार्वजनिक शौचालयास येणाऱ्या नागरिक यांच्यामुळे कोविड १९ चा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य भवितव्याचा विचार केल्यास झोपडपट्ट्या ह्या विकसित कराव्या लागणार आहेत.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांनी ५३८ मधील एकूण २२ झोपडपट्ट्या पुर्नविकास योजनेखाली आणलेल्या आहेत.आणि या २२ झोपडपट्ट्या विकसित करण्यासाठी साधारणत: शंभर ते सव्वाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.सदरचा खर्च हा बांधकाम व्यावसायिकास मोबदला देऊन विकसित करण्याचा मानस असून त्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे असे त्यानी सांगितलेली आहे.एकंदरीत पहाता फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या पक्षाला मतदान करणाऱ्या मतदार यांची संख्या झोपडपट्ट्यामध्ये नगण्य आहे.परंतु कॉंग्रेसला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे.आणि त्यानंतर आपल्याला भाजपाचा मतदार या झोपडपट्ट्यामध्ये आपल्याला दिसत असतो.भाजप कसेही वागले तरी इथला मतदार हा धर्माच्या नावाखाली भाजपालच मतदान करीत असतो.
     झोपडपट्टी पुर्नविकास कार्यक्रमामुळे झोपडपट्ट्यातील कॉंग्रेसचा कार्यकर्ता आणि मतदार अस्थाव्यास्था अवस्थेत बाहेर पडणार आहे. झोपडपट्टी लाभधारक म्हणून त्याला लाभ मिळणार नाही. झोपडपट्टी पुर्नविकास कार्यक्रमामुळे कॉंग्रेसचा मतदार संघाचे तुकडे तुकडे होऊन कॉंग्रेसचे तेथील राजकीय अस्तित्व संपणार आहे.असे असताना कॉंग्रेस कोणतेही स्टेटमेंट याबाबत करावयास तयार नाही.याचा अर्थ आता जसे केंद्रातील कॉंग्रेसचेनेते जेवढे गंभीर दिसत नाही तेवढ्याच प्रमाणात स्थानिक कार्यकर्ते गंभीर दिसत नसल्याची परिस्थिती आपल्याला दिसत आहे.कोविड १९ चा प्रार्दुभाव संपूर्ण शहरात असताना केवळ कन्टेनमेंट झोनच्या माध्यमातून मुस्लीम-अनुसूचित वर्ग आणि ओबीसी वर्ग कोविड १९ चा प्रार्दुभाव म्हणून  टार्गेट करण्यात आलेला आहे काय...? असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.एकंदरीत झोपडपट्ट्या वरील प्रमाणेचा वर्ग हा रोजंदारीवर आपला उर्द्निर्वाह करीत असतो गेल्या अडीच महिन्यापासून त्याला रोजगार नसल्यामुळे त्याच्या अन्नधान्याची सोय काही बांधकाम व्यावसायिक यांनी केल्याचे काही लोक सांगत आहेत.
  झोपडपट्टी पुर्नविकास कार्यक्रमामुळे कॉंग्रेस उध्वस्त होणार यात काही शंका नाही....आणि त्याठिकाणी भाजप प्रभावी ठरणार आहे यातही काही शंका नाही.मग असे असताना तेथील कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा कार्यकर्ता शांत कसा...? असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रश्न असा आहे की काही तथाकथित आंबेडकर चळवळीचे लोक कॉंग्रेसचे समर्थन करीत तिला वाचविण्यासाठी आणि नव्याने उभारी घेण्यासाठी झटताना दिसत आहे.परंतु त्यांच्या या कष्टाला फळ काँग्रेसी नेत्यांना द्यायचे नाही कारण आता आरएसएसची कॉंग्रेस नरेंद्र मोदी यांनी मुक्त केली असल्याची घोषणा सुध्दा झालेली आहे.त्यामुळे कॉंग्रेसच्या माध्यमातून पुरोगामी विचारांना मानणारा कॉंग्रेसचा कार्यकर्ता आणि मतदार आता झोपडपट्ट्यातून मुक्त करायचा आहे.

Sunday, May 24, 2020

प्रकाश आंबेडकर म्हणतात नरेंद्र मोदी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा...मग खुनाची परवानगी का द्यावी...? राजेश खडके सकल मराठी समाज


विषय असा आहे की, आदरणीय प्रकाश आंबेडकर म्हणतात नरेंद्र मोदी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा...आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, कोविड १९ चा पहिला रुग्ण उपचार घेऊन घरी गेला आहे...त्यामुळे आता पर्यंत जवळ जवळ पंधरा हजार रुग्ण उपचार घेऊन घरी गेलेले आहेत.असे असताना मिडीया आणि विरोधी पक्षातील लोक हे आजच्या कोविड १९ नोंद रूग्णाच्या संख्येत घरी गेलेल्या रुग्णाचा आकडा बेरीज करून वाढीव दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.आणि काही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ म्हणतात मुळातच कोविड १९ टेस्ट कीट ही बोगस आहे.त्यामुळे सदरचा व्यक्ती कोरोना रुग्ण ठरविणे चुकीचे आहे.त्यामुळे चांगले व्यक्ती असताना त्याला कोरनटाईन होऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे.इतर आजाराने व्याधीत असणारे रुग्णांना उपचार घेण्यासाठी त्रास होऊन तो दगावीत असल्याची परिस्थिती मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आहे.त्याला देण्यात येणारी उपचार पद्धत्ती चुकीची असल्यामुळे मरणार नसणारा रुग्ण इतर आजारामुळे मरत असताना दिसत आहे.त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री यांना नम्रतेची विनंती आहे की,ज्याला गरज आहे त्याचीच चांगली व विश्वासू कोविड १९ रुग्ण तपासणी यंत्रणा उभी करावी अन्यथा चुकीचा उपचार होऊन तसेच ज्याला इतर आजारा संदर्भात उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू होईल आणि त्याला जीवास मुकावे लागेल.त्यामुळे हा मृत्यू एक प्रकारची हत्याच असेल असे जाणकार यांचे मत आहे.देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर कोविड १९ मुळे दागाविलेल्या रुग्णांच्या नातेवाईकानी भा.द.वि. कलम ३०२ चा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल करावा असा सल्ला आदरणीय प्रकाश आंबेडकर दिलेला आहे.त्यामुळे आता भारतातील नागरिकांचे म्हणणे असे आहे की,बोगस कोविड १९ टेस्ट कीट नुसार स्वॅब टेस्टची परवानगी देणे म्हणजे स्वत:च्या खुनाची परवानगी द्यायची का...? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.

Wednesday, May 13, 2020

कॉंग्रेस कार्यकर्ते आणि मतदार यांनी आता मतदान करायचे कोणाला...? राजेश खडके सकल मराठी समाज


             २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकी नंतर कॉंग्रेस देशातून संपली असल्याची परिस्थिती जवळ जवळ स्पष्टपणे पुढे येताना दिसत आहे.त्याची कारणेही तसेच आहेत देशाचे माजी प्रधानमंत्री आज भाजपाच्या गोठ्यातून खासदार झालेले आहेत.आर्थिक तज्ञ कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पी चिंदबरम यांना भाजपाने झेलची हवा दाखवून सोनिया-राहुल गांधी यांना बऱ्याच प्रकरणामध्ये अडचणीत आणले आहे.कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी अपयशी झाल्यामुळे त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राजकीय सन्यास घेतल्या सारखी परिस्थिती दिसत आहे.देश संकटात असताना दोघे माय-लेक देश सोडून गेल्या सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.यातच गांधी नंतर कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे जोतीरादित्य सिंदिया भाजपवासी झालेले आहेत.जेवढे आरएसएस विचाराचे लोक कॉंग्रेसमध्ये होते ते आता भाजपात प्रवेश करीत आहेत.राहिले साहिलेले आता लॉक डाऊन उठल्यानंतर भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे जाणकार याचे असे म्हणणे आहे की, आता आरएसएस कॉंग्रेस संपलेली आहे.परंतु पुरोगामी विचारला मानणारी कॉंग्रेस आणि त्याचा कार्यकर्ता तसेच मतदार शिल्लक राहिलेला दिसत आहे.परंतु कॉंग्रेस पक्ष चालविणारे देशात नेतृत्व आपल्याला दिसत नाही....ज्या पक्षाला देशात नेतृत्व राहिले नाही त्या पक्षाचे राज्यस्तरावर नेतृत्व थंड झाल्याची परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री वडटीवार यांच्या शांत असलेल्या कार्य पद्धतीमुळे दिसत आहे.त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस ही नेतृत्वहीन झालेली कॉंग्रेस दिसत त्यामुळे इथला कार्यकर्ता भ्रमित झालेला असून आता कॉंग्रेसच्या मतदाराला प्रश्न पडला की, इथून पुढे मतदान करायचे कोणाला...?

नरेंद्र मोदीजी वेळीच कोरोना संदर्भात रघुराम राजन आणि नारायण मूर्ती यांचे ऐकले असते तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती....! राजेश खडके सकल मराठी समाज


               विषय असा आहे की, नेमका कोरोना वायरस आहे काय...? याचा प्रचार आणि प्रबोधन जनमाणसात करण्यात आलेले नाही....याउलट मिडीयाच्या माध्यमातून जनतेमध्ये दहशत निर्माण करून जन सामन्य माणसाची अधोगती केली असल्याचे कालच्या नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून दिसून आले आहे.काल ते असे म्हणाले की आता कोरोनाची चर्चा सोडून द्या आणि स्वत:ला उभे करण्यासाठी लढा असे त्यानी बोलून दाखविलेले आहे.परंतु जेव्हा रिजर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्री रघुरामराजन आणि नारायणमूर्ती म्हणाले की, कोरोना माणसाला नेहमी होणाऱ्या आजारा सारखा आहे त्यामुळे त्याला भयभीत होण्यासारखे काही कारण नाही.परंतु त्यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन करणे हे देशाच्या हिताचे नसून...देश डबघाईला जाईल आणि जितके लोक कोरोनाने मरणार नाहीत त्याचे काही पटीने लोक भूकबळीमुळे मरतील आणि ही भूकबळी रोकता येणार नाही.परंतु ऐकतील ते कसले मोदी त्यांनी ऐकले नाहे उलट लॉक डाऊन वाढवित गेले.काही दिवसापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की कोरोना या विषाणू वर कोणतीही लस तयार होणार नाही....आणि आमच्या देशातील कोरोना स्वत:हून संपुष्टात येणार आहे.त्यामुळे कोरोना विरोधात संघर्ष करायची आम्हाला गरज नाही असे त्यांनी म्हटले होते.त्यातच आपल्या आयुष मंत्रालयाने सांगितले होते की,कोरोना विरोधात लढण्यासाठी आपल्याला निसर्गाने दिलेली साधन संपत्ती पैकी आपण तुळसी-काळी मिर्च-सुंठ-दालचिनी यांचा काढा करून पिल्यास कोरोन बरा होतो म्हणून त्यानी या काढ्याला “आयुष काढा” असे नाव दिलेले आहे.असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉक डाऊन का राबविण्यात आला आहे असा प्रश्न आता इथले लोक करू लागले आहेत.

प्रधानमंत्र्यानी जाहीर केलेल्या वीस लाख कोटी रुपये संदर्भात कॉंग्रेसच्या सोनिया-राहुल प्रश्न करतील काय...? देशाचे आर्थिक तज्ञ मनमोहनसिंग व पी चिंदबरम शांत कसे...? राजेश खडके सकल मराठी समाज


        प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या भाषणाची सुरुवात जागतिक मानवकल्याणावर झाली...आणि संपूर्ण भारत या जागतिक मानवकल्याण अभियानात कसा सहभागी झाला हे त्यानी ठासून सांगत असताना त्यांनी देशातील गोरगरीब जनतेचे कसे हाल झाले आणि त्यानी हे हाल मानवकल्याण संदर्भात प्रामाणिकपणे कसे सोसले हे देखील आवर्जून सांगितलेले आहे.परंतु हे सांगत असताना त्यांनी जुमलेबाजी सोडली असल्याचे चित्र मात्र कोठे दिसले नाही हे मी आवर्जून सांगेन...त्याचे कारण असे आहे की देशातील जीडीपी शुन्यावरून खाली आलेला आहे....असे असताना नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला आत्मनिर्भर भारत अभियान योजना दिलेली आहे....आत्मनिर्भरता काय हे तुम्हाला सर्वांना माहित आहे असे मी मानतो.एखाद्या व्यक्तीला कोणेही मदत करत नाही तेव्हा तो आपल्या स्वत:ची कामे स्वत: करतो त्याला आत्मनिर्भरता म्हटले जाते.मग मला असा प्रश्न पडला आहे भारत देशाला जागतिक पातळीवर इतर देशांनी नाकरलेले आहे काय...? इतर देश भारताला सहकार्य करणार नाही काय...? म्हणून आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे काय...? असे बरेच प्रश्न तुम्हालाही उपस्थित होत असतील असे मला वाटते.
      भारताचा जीडीपी आज शून्याच्या खाली येऊन पोहचला आहे...अशा परीस्थित भारताला कोणीही कर्ज देऊ शकत नाही...भारताचे बजट हे साडेतेरा लाख कोटी आहे याची कल्पना आपल्या सर्वांना आहे असे असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारत अभियान योजनेसाठी वीस लाख कोटीचे पॅकेज कशाच्या आधारवर जाहीर करतात असा प्रश्न माझ्यासह अनेकाना पडलेला आहे.मग नरेंद्र मोदी वीस लाख कोटी रुपये आणणार कोठून...? हे त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे असे माझे म्हणणे आहे...आणि जनतेने असा प्रश्न केलाच पाहिजे....नाही तरी देशतील बऱ्याच सरकारी कंपन्या मोदी यांनी विकल्याच आहे हे तर सर्वांना माहित आहे....मग हे वीस लाख कोटी रुपयासाठी काय विकले....? आणि कोणाला विकले...? असा प्रश्न मला उपस्थित होत आहे.कारण त्या शिवाय तुम्हाल वीस लाख कोटी रुपये कोणी देणार नाहीये.मला तर कधी कधी असा प्रश्न पडतो की, मोदी यांनी देशातील सोन्याची खाण तर कोणाला विकलेली तर नाही नां...आता हा विचार जनतेने करायला हवा.अशा परिस्थितीत देशातील विरोधी पक्ष कॉंग्रेस शांत कसा काय बसला आहे...? सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रश्न विचारताना का दिसत नाही....? देशाचे वाटोळे होत असताना हे दोघे मायलेक आपला चेहरा कोठे दडवून बसले आहेत...? आता असा प्रश्न लोक विचारू लागलेले आहेत.
      भारतीय जनता पार्टीकडे यशवंत सिन्हा सारखा आर्थिक तज्ञ असणारा चेहरा होता त्याचा उपयोग मोदी सरकारने करवून घेतला नसल्याचे चित्र घसरलेल्या जीडीपीमुळे दिसत आहे.तसेच कॉंग्रेसमध्ये मनमोहनसिंग व पी चिंदबरम सारखे आर्थिक तज्ञ असताना या वीस लाख कोटी रुपये संदर्भात प्रश्न उपस्थित करताना दिसत नाही.मग कॉंग्रेसने देशाला वाऱ्यावर सोडले आहे काय...? असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.