Friday, August 30, 2019

रोहित पवार म्हणाले वंचित बहुजन आघाडीची ताकद १० पटीने वाढली...म्हणून पत्रकाराने केलेल्या प्रश्नावर शरद पवार यांचा संयम सुटला…!


एकंदरीत विधानसभा निवडणुकीचे राजकारण पहाता असे दिसून येते की राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जे ५५ वर्षात पेरले आहे तेच उगवून आता समोर आलेले आहे.परंतु आम्हाला आभिमान आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे शरद पवार यांच्या राजकारणाला पुरून उरले आहेत.ज्या कॉंग्रेसने इथला भूमिपुत्र संपविण्याचा घाट घातला होता आणि हे कॉंग्रेस जळते घर आहे असे बाबासाहेबांनी सांगितलेले होते.अशा कॉंग्रेसच्या विरोधात प्रकाश आंबेडकर गेली ४० वर्ष संघर्ष करीत आलेले आहेत.परंतु त्यांचा संघर्ष बदनाम करण्याचे गेल्या ४० वर्षात बरेच प्रयत्न झाले आहेत आणि होत आहे.त्यांना कधी भाजपाचे हस्तक म्हणून हिनवले गेले तर कधी भाजपाची बी टीम म्हणून हिणवले गेले आहे.परंतु अशा कोणत्याही गोष्टीला त्यांनी गेल्या ४० वर्षाच्या राजकारणात भिक घातलेली नाही.ही फुले शाहू आंबेडकर चळवळ संपविण्यासाठी संभाजी ब्रिगेड उभी केली होती असे सध्या तरी सुरु असलेल्या राजकारणामुळे दिसत आहे.आज या सर्व मराठा संघटना बंद करण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार समोर आलेले आहे.खेडेकर यांचा प्रवास पुन्हा भाजपाच्या दिशेने सुरु झाला असल्याचे दिसत आहे...तर प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करून हे सिद्ध केले आहे...तसे नसते तर प्रवीण गायकवाड यांना जेव्हा कॉंग्रेसने नाकारले तेव्हा ते वंचित बहुजन आघाडी कडून ते उभे राहिले असते. परंतु त्यांनी तसे न करता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यामुळे आता त्यांच्याकडे काही शिल्लक राहिले आहे असे मला वाटत नाही.आता शरद पवार असक्षम नेतृत्व म्हणून समोर आलेले आहे..त्यांच्या सहकारी यांना आता लक्षात आले आहे की आता शरद पवार यांची प्रशासकीय आणि राजकीय ताकद जवळ जवळ संपुष्टात आलेली आहे.त्यामुळे आपण केलेले घोटाळे आज ना उद्या बाहेर आले तर शरद पवार आपले संरक्षण करू शकणार नाहीत.यातच शरद पवार यांनी मोठी अशी घोड चूक केली ती म्हणजे या महाराष्ट्रात अजित पवार यांना त्यानी म्हणावी तशी राजकीय ताकद दिली नाही.नेहमी त्याना दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तेही मजबूतपणे उभे राहू शकले नाहीत.परंतु सध्याचे राजकारण पहाता त्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अमोल कोल्हे यांच्या हातामध्ये देऊन संपूर्ण वरिष्ठ पदाधिकारी यांना त्यांच्या नेतृत्वात येण्याचे आदेश दिले आणि शरद पवार यांनी उभे केलेले जंगल कोल्ह्याने फस्त केले असल्याचे समोर आलेले आहे.शरद पवार यांनी नेहमी तोडा फोडाची राजनिती केली आहे या राजनिती प्रमाणे बौध्द समाजाच्या विरोधात मातंग समाजाला ताकद देण्यासाठी त्यांनी मातंग समाजाला आवाहन केली की तुमचे प्रश्न माझ्याकडे घेऊन या ते मी सोडविन गेल्या ५५ वर्षात त्यांना मातंग समाज बांधवांचे प्रश्न आठविले नाही आणि आता आठवत आहे.त्यात प्रामाणीकपणा असेल तर ठीक आहे परंतु केवळ दोन जातीत ध्रुवीकरण करण्याचा हेतू मुळातच चांगला नाही.त्यांच्या या आवाहनाला काही मातंग समाजाचे कार्यकर्ते बळी पडले आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या भेटी गाटी घेण्यास सुरुवात केली.असाच एक मातंग समाजाचा एक गट शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीला गेला होता.पवार साहेबाच्या बंगल्यात सुप्रियाताई,अजितदादा,रोहित पवार आणि पवार साहेब एकत्रित चर्चा करीत बसले होते.त्यामुळे पवार साहेबांनी भेटण्यास आलेल्या त्या मातंग समाजाच्या गटास रोहित पवार यांनी भेट घेऊन त्यांच्या बरोबर चर्चा करण्यास सांगितले.त्यावेळी सध्याचे राजकारण यावर चर्चा सुरु झाली तेव्हा रोहित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांची स्तुती करून त्या मांतग समाजाच्या गटास सांगितले की आजच्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीची ताकद आमच्या पेक्षा १० पटीने जास्त वाढली आहे.तो वाढलेला प्रभाव कमी कसा करता येईल असा प्रश्न जेव्हा त्या मातंग गटास केला तेव्हा ते आश्चर्य चकित झाले.तासभर चर्चा झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा बोलाविण्यात येईल असे सांगण्यात आले.त्यामुळे ती चर्चा आटपून तो गट तेथून निघून गेल्यावर आश्चर्यचकित झाला त्यांना त्यांची चूक लक्षात आली असेल असे मला वाटते कारण रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत आणि त्यानी वंचित बहुजन आघाडीची ताकद १० पटीने वाढली असल्याचे कबूल करणे म्हणजेच ते शरद पवार यांनी कबूल केल्यासारखे आहे.यामुळेच एका पत्रकाराने जेव्हा शरद पवार यांना प्रश्न केला की आता तुम्हाला तुमचे नातेवाईकही सोडून चालले आहेत.हा प्रश्न ऐकून शरद पवार यांचा संयम सुटला आणि ते त्या पत्रकारावर भडकले.

Saturday, August 24, 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केली आहे असे म्हणता येत नाही…..! राजेश खडके सकल मराठी समाज


                  बरेच दिवसापासून माझ्या पहाण्यात येत आहे की,आपले असो किंवा विरोधक असोत सर्वच्या सर्व प्रकाश आंबेडकर यांना एकटे पाडण्यासाठीच कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या दिड वर्षापासून प्रकाश आंबेडकर यांनी दिवसाची रात्र आणि आणि रात्रीचा दिवस करून इथल्या स्वराज्यातील अलुतेदार यांना न्याय देण्याची भूमिका प्रस्थापित केली आहे.त्यामुळे इथला ओबीसी असणारा वंचित घटक बाळासाहेबांच्या पाठीशी उभा राहिलेला मला पाहिला मिळालेला आहे.त्यामुळे इथले प्रस्थापित असणारे मराठे घराणे अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न रिपब्लिकन जरी होते आणि भविष्यातील राजकीय पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जरी होते तरी त्यांनी ती पार्टी स्थापन केली असल्याचा पुरावा कुठेही उपलब्ध होत नाही.तसेच काही लोकांचे म्हणणे असे आहे की,अशोक चक्रांकित निळा ध्वज बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे याचेही पुरावे कोठेही उपलब्ध होत नाहीत.मात्र यां देशाचा राष्ट्रीय ध्वज भगवा असावा यासाठी त्यांनी संघर्ष केला असल्याचे पुरावे मात्र समोर आलेले आहेत.१९५७ ला समता सैनिक दलाची पुर्नस्थापना होऊन निळा ध्वज प्रस्थापित केल्याचे पुरावे समोर आलेले आहेत.१९५७ ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची इतर नेत्यांनी स्थापना केली असल्याचे आणि त्याचे बरेच गट पडून वेगवेगळ्या प्रकारे निळा ध्वज प्रस्थापित करण्याचे कार्य त्यावेळी झाले असल्याचे पुरावे समोर आलेले आहेत.राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांचा ध्वज वेगळा आहे आणि काशीराम-मायावतींचा यांचा निळा ध्वज वेगळा आहे.
                डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेनंतर त्यांनी लिहिलेले साहित्य आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्याकाळी कोणत्याही नेत्यांनी केला नाही.त्यांच्या दिल्लीच्या घरातून त्यांचे साहित्य काँग्रेसी गुंडांनी रस्त्यावर फेकून दिले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्याकाळी काही नेत्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करून अशोक चक्रांकित निळा ध्वज दिला असल्याची वल्गना करून वेगवेगळ्या गटात तिचे तुकडे करून निळा ध्वजाच्या माध्यमातून इथली जनता आपल्या ताब्यात ठेऊन त्याचा राजकीय लाभ पुरेपूर पद्धतीत घेतला आहे.बाबासाहेबांचे झालेले महापरिनिर्वाण डोळ्या समोर ठेऊन त्यांच्या मृत्यूचा प्रश्न निर्माण करून त्या आंदोलनाच्या माध्यमातून २० वर्ष ताबा आंबेडकरी जनतेवर ठेवला होता.परंतु जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा हा प्रश्न सोडून देण्यात आलेला होता.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य कुठे आहे…? याकडे कोणीही लक्ष दिले नाही.काही लोकांनी प्रयत्न केला परंतु म्हणावे तेवढे यश त्यांना प्राप्त झालेले नाही.हा मुद्दा संपतो ना संपतो लगेचच मराठवाडा नामांतर मुद्दा पुढे करून आंबेडकरी जनतेची १७ वर्ष त्यात खर्ची करून निळ्या ध्वजा संदर्भात अस्मिता तयार केली गेली आहे.त्यामुळे निळा ध्वज आज संघर्षाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो आणि त्याची अस्मिता टिकविण्याचे कार्य आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे याची आपण जाण ठेवली पाहिजे.
              असे जरी असले तरी समतेच्या विचारांचा असलेले भगवा ध्वज आज प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेला आहे.जो सम्राट अशोका पासून ते आजपर्यंत टिकून राहिलेला आहे. या भगव्या ध्वजाचा आणि आर्य सनातनी हिंदू धर्माचा कोणताही संबध नाही १९७३ ला या भगव्या ध्वजावर त्यांनी ताबा मारलेले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेनंतर त्यांचे मृत्यूची माहिती शासनाकडे नाही तसेच त्यांचे अंत्यसंस्कार करतेवेळी त्यांना तिरंगा ध्वज देण्यात आलेला नाही.त्याच्या पार्थिव देहावर शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा ध्वज समर्पित केल्याचा आजही त्यावेळच्या फोटोमध्ये दिसत आहे.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केली आहे असे म्हणता येत नाही आणि त्यांनी निळा ध्वज दिला आहे अये म्हणता येत नाही.

Saturday, August 10, 2019

कलम ३७० रद्द परंतु पाक व्याप्त काश्मिरचे काय…? POK साठीचे बलिदानाचे काय..? राजेश खडके सकल मराठी समाज


                 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३७० ला विरोध केला होता हे सत्य आहे आणि कलम ३७० त्यांनी लिहिलेच नाही...जम्मू काश्मिरची जनता त्यावेळी भारतात यायला तयार होती...त्यामुळे कलम ३७० बनविण्याचा काहीही संबध नव्हता.परंतु त्यावेळी जे राजकारण झाले त्यामुळे कलम ३७० तयार झाले सुरुवातीला या कलमाला मोठ्या प्रमाणात विरोध झालेला होता.आज त्याला ७० वर्षे झालेली आहे.असे असताना आणि कलम ३७० मध्ये आता काही शिल्लक राहिले नव्हतेच कारण त्या कलमाला हळू हळू कमजोर करण्यात आलेले होते.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तो रद्द करणे सयुक्तिक नव्हते.त्याचे कारण असे की,आताच्या काळात काश्मिरी जनता मनापसून आणि बुद्धीपासून आपल्या भारत देशापासून तुटलेली होती दूर झालेली होती.त्यामुळे तेथील जनतेला विश्वासात घेणे अतिशय गरजेचे होते.परंतु जसे भाजपा सरकार आले आहे तसे इथला भांडवलशहा आणि धार्मिक व्यवस्था बळकटीकरण करणे संदर्भातील पावले उचलली जात आहे याचा अनुभव आता जवळ जवळ सगळ्यानाच होत आहे.कलम ३७० रद्द करीत असताना भाजप सरकारने पाक व्याप्त काश्मिरचा मुद्दां सोडून दिल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. केवळ आणि केवळ इथला भूमाफिया त्याठीकाणी प्रस्थापित करण्यासाठी आणि तेथील पर्यटन व्यवस्था ताब्यात घेण्यासाठी कलम ३७० रद्द करण्यात आलेले आहे.भारत हा सवैधानिक देश आहे तो जनमताचा आदर करीत असतो परंतु कलम ३७० रद्द करण्यासाठी ज्याप्रकारे अमलबजावणी करण्यात आली ती एक हुकुमशाही पद्धतीची अमलबजावणी होती असे स्पष्ट आपल्या समोर आलेले आहे.त्यामुळे कलम ३७० भारत देशाच्या दृष्टिकोनातून नुकसान दायक आहे कारण पाक व्याप्त काश्मिर हा प्रश्न आपण सोडला असल्याचा निर्णय आहे.परंतु यासाठी जे लाखो लोकांचे बलिदान गेले आहे त्याचा विचार या भाजप सरकारने केला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट म्हणणे आहे.त्यामुळे एक प्रकारची हुकुमशाही या देशात नांदायला सुरुवात झाली आहे काय…? आता असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.