Wednesday, May 30, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – २) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..!


छत्रपती शिवराय यांचा इतिहास जर पाहिला तर असे लक्षात येते की,रयतेच्या कल्याणासाठी शिवराय यांनी जे स्वराज्य घडविले तेच स्वराज्य मनुवादी विचारांनी पद्धतशिरपणे संपविले होते.शिवरायांनी मानवकल्याणकारी धर्माच्या पलीकडे कोणतेही कार्य केली नाही.त्यांना दोन पुत्र होती एक सईबाई यांचे पुत्र म्हणजे युवराज शंभूराजे आणि दुसरे सोयराबाई यांचे पुत्र राजारामराजे होते.छत्रपती शिवराय यांनी मनुस्मृती नुसार लादलेली सप्तबंदी मोडीत काढली होती.युवराज संभाजीराजे यांच्या सांगण्यावरून वैदिक धर्म पद्धतीत केलेला पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत करण्यात आलेला होता.त्यामुळे स्वराज्यातील रयत आनंदात होती त्यांनी छत्रपती शिवराय व शंभूराजे जिवापार प्रेम करीत होते.वैदिक धर्म पंडितांच्या हे सर्व लक्षात आल्यावर त्यांनी युवराज शंभूराजे यांना रयतेमध्ये बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू केले.सोयराबाई यांच्या मनामध्ये पुत्रप्रेम जागृत करून शिवराय आणि शंभूराजे यांच्या विरोधात एक षड्यंत्र उभे केले.छत्रपती शिवराय यांना विषप्रयोग करून शंभूराजे यांचे नाव रयतेमध्ये बदनाम करण्याचे षड्यंत्र त्यांनी केले.एकदिवस शंभूराजे रायगडावर नसताना पुत्र मोहात अडकलेल्या सोयराबाई यांना हाताशी धरून याच वैदिक धर्म पंडितांनी शिवराय यांचेवर विषप्रयोग करून त्यांची हत्या करून लहान असलेल्या राजारामला गादीवर बसविण्यात आले.छत्रपती शिवराय यांच्या मृत्यूची बातमी दोन महिने गुप्त ठेवण्यात आली.दोन महिन्यानंतर पन्हाळ गडावर असलेल्या शंभूराजे यांना ही बातमी कळाली.शंभूराजे यांनी या वैदिक धर्म पंडितांना चार वर्ष सुनावणी चालवून मृत्यूदंडाची शिक्षा दिली.नंतर याच वैदिक धर्म पंडितांच्या वारसाने छत्रपती शिवराय यांचे जावई महातजी निंबाळकर आणि गणोजी शिर्के यांच्या मनामध्ये स्वार्थ निर्माण करून औरंगाजेबाच्या माध्यामतून मनुस्मृती प्रमाणे तुळापुर येथे हत्या करून एक सातारा आणि दुसरी कोल्हापूर अशा स्वराज्याच्या दोन गाद्या निर्माण केल्या.स्वराज्याच्या सरदाराना वेगवेगळे उभारून त्यांना संस्थानिक करून स्वराज्याचे वेगवेगळे तुकडे करून त्यांच्या सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचे एक मनुवादी षड्यंत्र या बामणी व्यवस्थेने केले.अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या प्रशासन व्यावस्थेला जातीच्या वर्गामध्ये आणण्याचे कार्य या मनुवादी व्यवस्थेने उभारून पेशवाईच्या माध्यमातून ही जातीय व्यवस्था बळकट करून पुन्हा एकदा मनुस्मृती लादण्यात आली.या जातीय व्यवस्थेमुळे आणि मनुस्मृतीच्या अमलबजावणीमुळे रयत शिवराय आणि शंभूराजे यांना विसरून गेली होती.(क्रमश😊

No comments:

Post a Comment