Tuesday, January 29, 2019

आठवले आणि कवाडे सोडून वंचित बहुजन आघाडीस मायावती आणि मेश्राम यांचा बिनशर्त पाठींबा….? आंबेडकरी चळवळीला येणार चांगले दिवस….! सकल मराठी समाज राजेश खडके


आंबेडकरी चळवळीच्या पक्षांचे एकंदरीत राजकारण पहाता २०१९ ची केंद्रीय निवडणूक अतिशय भयंकर आणि रिपब्लिकन पक्षासाठीची चांगले दिवस आणणारी निवडणूक आहे असे सकल मराठी समाजाचे स्पष्ट म्हणणे आहे.त्याचे कारण असे आहे की,मायावती यांनी कोणत्याही परिस्थितीत दिल्ली गाठण्याचा मनसुभा केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळे विरोधी असणारा अखिलेश यांच्या पक्षाशी हातमिळवणी करून त्यांच्या बरोबर युती करून कॉंग्रेसला बाजूला सारून निवडणुकीची समीकरणे आखली आहेत.अखिलेश याने उत्तर प्रदेश सांभाळायचा तर मायावती यांनी दिल्ली सांभाळायची आहे अशी समीकरणे या दोघांनी जमवली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर याना बिनशर्त पाठींबा देण्याची तयारी बहन मायावती यांनी केली असल्याची माहिती सकल मराठी समाजाला समजली आहे.वामन मेश्राम हे आंबेडकरी चळवळीचे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांच्याही लक्षात असे आले आहे की,इथली रिपब्लिकन जनता यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभी आहे आणि केंद्रीय राजकारण आपण करू शकत नाही.त्यामुळे मेश्राम ह्यांनीही प्रकाश आंबेडकर यांना पाठींबा दिला असल्याचे लक्षात येत आहे.त्यामुळे घडत असलेली राजकीय समीकरणे कोणीही नाकारू शकत नाहीत.कावडे सर हे कॉंग्रेसचे चांगले मित्र आहेत त्यांना यावेळी रिपब्लिकन जनतेचा मूड लक्षात का येत नाही…? असा आमचा प्रश्न आहे.कवाडे सर जर स्वत:ला खरेच आंबेडकरवादी म्हणत असतील तर त्यांनी बिनशर्त वंचित बहुजन आघाडीला पाठींबा दिला पाहिजे.यातच रामदास आठवले म्हणतात की,प्रकाश आबेडकर यांच्या बद्दल मला आदर आहे त्यांच्या बोलण्याचे मी काहीच वाईट मानत नाही….जर असे असेल तर आठवले यांनी नरेंद्र मोदी यांची स्तुतिसुमने गाण्याचे बंद करून प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.आपण आता सत्ता भरपूर प्रमाणात भोगल्या आहेत जो त्याग केला होता त्याची फळे भरपूर प्रामाणात चाखली आहेत.आता एक आंबेडकरवादी म्हणून आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना बिनशर्त पाठींबा दिला पाहिजे.त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पहाता आठवले आणि कवाडे सोडून वंचित बहुजन आघाडीस मायावती आणि मेश्राम यांचा बिनशर्त पाठींबा….? आंबेडकरी चळवळीला येणार चांगले दिवस….! असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

49 comments:

  1. असे झाले तर आंबेडकरी समाजासाठी हा सुवर्णयोग असेल .....

    ReplyDelete
  2. वंचित बहुजन समाज चांगले दिवस येतील. जय भीम जय शिवराय भारिप बहुजन महासंघ इंदापूर पुणे प्रा विनोद जगताप 9422513314

    ReplyDelete
  3. जर का? मा.अँ.प्रकाश आंंबेडकर साहेब सपूर्ण 48 सिट काँग्रेस व भाजपा यांंच्या विरुद्ध लढविणार आसेल तर बहन मायावती आणि मा.मेश्राम साहेब यांनी B.V.A. लाच समर्थन करावे, आणि मा.प्रकाश आंबेडकर साहेबांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनवावे.

    ReplyDelete
  4. असं होणं काळाची गरज आहे

    ReplyDelete
  5. बाळासाहेबांना हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  6. Ambedkari mansalach nahi tar sarw bahujan wargala yacha fayda hoil

    ReplyDelete
  7. खूप छान होईल

    ReplyDelete
  8. खूप छान ।
    असे सगळे एकत्र आले तर किती छान होईल ।
    सत्ता आपलीच ।

    ReplyDelete
  9. खूप छान होईल जर बहन मायावती आणि वामन मेश्राम यांनी साहेबांना पाठिंबा दिला तर

    ReplyDelete
  10. रामदास अठावले आणि जोगिंद्र कवाडे यानी सुधा न मोहमाया ठेवता यानी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर जी याना लालच न करता पाठिम्बा दिला पाहिजे तरच तुम्ही खरे बाबा साहेबांचे अनुयायी ठरणार नाही तर तुम्ही सुधा
    बबसाहेबांना ज्याणी विरोध केला त्यांचाच हात धरणार का

    ReplyDelete
  11. बहुजनांचे सरकार येणे खूप गरजेचे आहे बहुजनाने सत्तेची चावी स्वतःकडे घेतली पाहिजे कारण हा देश बहुजनांचा आहे हे अगोदर लक्षात घेतले पाहिजे म्हणून अशी वेळ परत परत येत नाही त्यामुळे प्रस्थपिता विरुद्ध वंचित अशी ही लढाई आहे त्यामुळे या मध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजय झाला पाहिजे
    बहुजन वंचित आघाडी मध्ये ओबीसी मराठा एस सी ऐस टी सर्व समाजाचे नेतृत्व करणारे घटक आहेत त्यामुळे सत्तेत बसून आपण आपली आणि समाजाची प्रश सोडविली पाहिजे

    ReplyDelete
  12. मायावती व वामन मेश्राम सरांचे वंचित बहुजन आघाडी मध्ये स्वागत आहे आणि आठवले आणि कवळे साहेब यांना योग्य वेळ आणि समाज धडा शिकवेल याची त्यांनी जाणीव ठेवावी वेळ अजून गेलेली नाही जय भीम जय भारत जय शिवराय

    ReplyDelete
  13. Balasaheb ambedkar greatest powerful man vanchit bhahujan aaghadi sarwdharmm respected and lokshahi

    ReplyDelete
  14. Aplya pudhachya pidhya jr shukhat thevaychya astil tr pratek bahujan la ek hone garjeche ahe

    ReplyDelete
  15. तर तो सोन्याचा दिवस असेल

    ReplyDelete
  16. कोणावर हि विसंबून न राहता आदरणीय आंबेडकर साहेबांनी आपलं कार्य असंच चालू ठेवले पाहिजे.
    काही झाले तरी गुळाला मुंगळे चिकटतात.

    ReplyDelete
  17. Nice, tari pan vanchiv aaghadine sarvanna mothya manane samavun ghevung loksabhechya jaga vatpat share
    dya

    ReplyDelete
  18. जय भिम बरोबर आहे
    दोन्ही नेते सुधारावे..

    ReplyDelete
  19. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच खरे बहुजनांचे कैवारी आहेत. हे बहुतेकांना कळून चुकले आहे. त्यामुळे सर्वच समाजातील लोक एकत्र येऊन बाळासाहेबांना साथ देत आहेत. आता वंचितांची सत्ता नक्कीच येणार. Wait and watch.

    ReplyDelete
  20. लेखकाचे विचार व एकंदरीत लेख चांगला आहे परंतु लेखनात वास्तविकता कमी व मनमुक्ताफळे जास्त दिसतात.
    असो... आपल्याच मनाचे लिहिने वाचने व आपल्याच मनात गुदगुल्या करुन खुश राहण्याघा सर्वांचा हक्क च आहे. परंतु मायावती चा पक्ष कितीही कमकुवत दिसत असला तरी आत्ता तो कुठल्याही दलित आघाडी पेक्षा मोठा आहे त्याचा च बहनजींना ठाम घमंड झाल्याचे दिसत आहे.
    मेश्राम यांची राजकीय संघटना नसल्याने त्यांचा राजकारणात उपयोग होईल असा जो विचार करत असेल तो बालबुद्धीच आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. मेश्राम यांची सामाजिक संघटना ज्यांचा राजकारणात किंवा भविष्यातील निवडणुकीत समर्थन करेल तो राजा बनेल हे दगडावरची रेघ आहे. मेश्राम कधीही कुणाचेही बिनशर्त समर्थन करुच शकत नाही. जो व्यक्ती प्रत्येक वेगळ्या विषयाकरिता वेगळे संगठण स्थापित करतो तो प्रत्येक मुद्द्यावर सशर्त राहतो असे माझे म्हणणे आहे. शेवटी आपापले मत मांडण्याचा सर्वांना हक्क असतो.

    ReplyDelete
  21. बहूजन हा शब्द बर्याच लाेकांना समजलाआहे बहूजन समाज जागा हाेताना दिसताेय हीच फार माेठी प्रगतीआहे

    ReplyDelete
  22. असे झाले तर आती उत्तम होईल

    ReplyDelete
  23. भारिप बहुजन माहासंघाचा वीजय असो..

    ReplyDelete
  24. भिमपँथर
    राजवीर गोपनारायण

    ReplyDelete
  25. भिमपँथर
    राजवीर गोपनारायण

    ReplyDelete
  26. भारिप बहुजन माहासंघाचा वीजय असो..

    ReplyDelete
  27. वंचित बहुजन समाज ज्या खंबीर नेत्रुत्वाची आस लावून बसला होता ते नेत्रुत्व मा.प्रकाश आंबेडकरांंच्या रुपाने बहुजन समाजाला मिळाले.मी वैयक्तिकरित्या मा.प्रकाश आंबेडकर साहेबाना व वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे बंधन मी स्वत:च स्वतःवर घालून घेत आहे.

    ReplyDelete
  28. देर से आये पर दुरुस्त आये.... जयभीम

    ReplyDelete
  29. वंचित बहुजन आघाडी मध्ये सगळ्यांचेच स्वागत आहे.

    जय भिम.

    आता फक्त आणि फक्त बहुजन वंचित आघाडी (भारिप)

    ReplyDelete
  30. असे होने हि आजची गरज आहे
    असे झाले तर वंचित समाजाला सुगिचे दिवस येतील
    जय भिम जय भारत

    ReplyDelete
  31. असे होने हि आजची गरज आहे
    असे झाले तर वंचित समाजाला सुगिचे दिवस येतील
    जय भिम जय भारत

    ReplyDelete
  32. असे होने खुप महत्वाचे आहे झालेच पाहिजे

    ReplyDelete
  33. Atta phakta ekch neta Adv Balasaheb tatha Prakash Ambedkar Jaibhim

    ReplyDelete
  34. जयभीम. हीच वेळ आहे विचारपूर्वक निर्णय घेण्याची. सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

    ReplyDelete