Wednesday, March 13, 2019

मायावती यांचा वंचित बहुजन आघाडीला अघोषित पाठींबा…? तर मत विभाजन करून २०१९ साठी कॉंग्रेसची भाजपाला साथ…! राजेश खडके सकल मराठी समाज


एकंदरीत कॉंग्रेसचे संपूर्ण देशात राजकारण पहाता बुडत असलेल्या भाजपाला संपूर्ण देशात मत विभाजन करून २०१९ ला पुन्हा सत्तेच्या राजकारणा जवळ नेण्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर म्हणतात की,कॉंग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकत चाललेली दिसत आहे.त्याला तसेच कारणही आहे कधी जानवे न घालणारा व्यक्ती राहुल गांधी जानवे घालून प्रर्दशन करीत असताना संपूर्ण जगाने पाहिला आहे.२०१९ ची निवडणूक लढवीत असताना प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीत येण्यासाठीचा जो प्रस्ताव कॉंग्रेसकडे सादर केला होता तो प्रस्ताव कॉंग्रेसने मान्य केला नाही.कॉंग्रेसने जर आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसविले असते तर नक्कीच प्रकाश आंबेडकर हे महाआघाडीत सहभागी झाले असते.कारण महाराष्ट्रात कॉंग्रेसकडे नेतृत्व न राहिल्यामुळे त्यांना २५ जागी देण्यासाठी उमेदवार शिल्लक राहिलेले आपल्याला दिसत नाहीये.त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला पाठींबा देणे गरजेचे होते.परंतु देशातील कॉंग्रेसची खेळी पहाता त्यांच्याकडून भाजपाला पुन्हा एकदा सत्तेकडे घेऊन जाण्याची तयारी सुरु झाली असल्याचे दिसून येते.त्याचे कारण असे आहे की,आरएसएसला संपूर्ण देश व्दिपक्ष राजकारणातच अडकवून ठेवायचा आहे.देशात तिसरा पर्याय उभा राहून द्यायचा नाही.त्यामुळे कॉंग्रेसने दिल्लीत आप बरोबर आघाडी केलेली नाही सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करून मत विभाजन करून भाजपला साथ द्यायची आहे.बहुजन समाज पक्षा बरोबर जागांच्या वाटाघाटी सन्मान पूर्वक केल्या नाहीत याउलट उत्तर प्रदेश मध्ये सपा-बीएसपी यांचे विरोधात जास्तीत जास्त उमेदवार उभे करून मत विभाजनाचा फायदा भाजपाला कसा होईल याचीच काळजी घेतली जातेय.त्यामुळे मायावती आणि प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसची राजनीती ओळखलेली आहे.म्हणून महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अघोषित पाठींबा देण्याच्या तयारीत मायावती असल्याचे जाणकार यांचे मत आहे.त्यामुळे महाराष्ट्रात मत विभाजनाचा आरोप प्रकाश आंबेडकर यांचेवर लावण्याच्या सुरुवात कॉंग्रेसने केली आहे.त्यांनी असे काही दलाल बाजारात सोडले आहेत ते दलाल सोशल मिडीयावर,चौका चौकात,वस्ती पातळीवर आणि गावोगावी हाच प्रचार करीत आहेत.चळवळीच्य बैठकी ठिकाणी सहभागी होऊन ते मत विभाजनाचा आरोप वंचित बहुजन आघाडीवर करीत आहे.त्यामुळे अशांना जशाच तसे उत्तर आंबेडकर समर्थक यांनी दिले पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.म्हणूनच सर्वानी एकत्र येऊन या स्वराज्याच्या गद्दार आन्नोजी दत्तो आणि त्याच्या टीमला धडा शिकवून छत्रपती संभाजी महाराज यांनी कसे हत्तीच्या पायी कसे दिले याची आठवण करून दिली पाहिजे.आमच्या सकल मराठी समाजाचे असे म्हणणे होते की,जेव्हा जनमत तयार होईल तेव्हा देशातील आरएसएस आणि कॉंग्रेस संपुष्टात येईल.आज जनमत तयार होताना दिसत आहे त्यामुळे कॉंग्रेस आणि आरएसएस संपण्याच्या मार्गावर असल्यामुळे बहन मायावती ह्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला अघोषित पाठींबा देतील असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.


30 comments:

  1. कॉंग्रेस ही मनु विचारांची आहे

    ReplyDelete
  2. आता अपेक्षा बाप ची आहे की ती पाठिंबा कधी जाहीर करते

    ReplyDelete
  3. बसपा अगर खरोखर आंबेडकरी विचार जोपासत असेल तर तिने हमखास बाळासाहेबांना पाठिंबा द्यावा.
    परंतु राजकिय फायद्यासाठी rssप्रणित भाजप आणि साॅफ्ट मनुवादी विचारांच्या काॅग्रेस आणि रा.काॅग्रेसशी घरोबा करू नये.
    बाळासाहेब आंबेडकरांनी वैचारीक आणि संविधान रक्षक समाजाची जी मोट बांधलेली आहे ती सक्षम करण्यासाठी मायावतीने महाराष्ट्रात वंचित बहुजन अघाडीस मतदान विभाजन होऊ नये म्हणुन आपले उमेदवार घोषित न करता खंबिर पाठिंबा द्यावा.

    ReplyDelete
  4. काँग्रेस पक्षाचे बारा वाजवलेच पाहिजेत. .. सकल मराठा समाजाला विनंती आहे की, आपण सुज्ञपणे वंचित बहुजन समाजाला मतदान करावे. आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल.

    ReplyDelete
  5. अॅड बाळासाहेबाना बिनशर्त पाठिंबा देण्या करिता बहेनजीला संधी चालुन आली . बहेनजीने परिस्थिती पाहुन वंचित बहुजन आघाडीला पाठींबा द्यावा आणी केंद्रात बसपाची पक्कड मजबुत करावी.येणारा PM बहेनजी पण अशु शकतात, हे कोणी पण नाकारु शकत नाही.

    ReplyDelete
  6. Balasheb ambedkar tum aaghe badho hum tumhare sath hai

    ReplyDelete
  7. बसपा राषटरीय मान्यता असलेला संपुरण भारता त पसरलेला पक्ष ऐका लहाण राज्य मानयता नसलेलया पक्षाला कसा काय अघोषित पाठींबा देईल? हे खोट आहें
    वंचीत भाजपा नी निर्माण केलेल तात्पुरत कालपनक क्षणीक वावटल आहे ती थोडयच दिवसात विरून जाईल
    बसपा सपा वंचीत brsp API एकत्र आले तरच निकाल चांगले येतील नसता ही शेवटची निवडनुक समझा कारण मनुस्मृति लागु होईल

    ReplyDelete
    Replies
    1. बसपा व भारीप हे समविचारी पक्ष असून वंचितांच्या भल्यासाठी काम करतात त्यामुळे मायावतीजी महाराष्ट्रात जर प्रकाश आंबेडकरांना समर्थ देत असतील तर त्यांचा निर्णय योग्यच आहे.
      आणि बसपा जरी राष्ट्रीय पक्ष असला तरी महाराष्ट्र मध्ये बसपाच वर्चस्व नाही त्यामुळे जर बसपा प्रकाश आंबेडकरांबरोबर जात असेल तर तो दोनही पक्ष मिळून महाराष्ट्राच्या राजकारणात क्रांती घडवून आणू शकतात.
      जय भीम जय प्रकाश आंबेडकर जय मायावती

      Delete
    2. अगदी बरोबर आहे भाऊ

      Delete
    3. बसपा नी वंचित बहूजण आघाडी ला महाराष्ट्रात बिनशर्त पाठिंबा द्यावा

      Delete
  8. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत काॅग्रसने हिच भूमिका स्विकारली त्यामुळे या भारत देशात भाजपा सरकार विराजमान झाले. म्हणून या वर्षी दोघांना माती चारण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.

    ReplyDelete
  9. प्रकाश आंबेडकर कि जय , मायावती जी की जय��

    ReplyDelete
  10. यही सही वक्त है कि आर एस एस की मनुवादी विचार धारा को ख़त्म करने का, इसीलिए मायावती ने वंचित बहुजन आघाडी को साथ देकर प्रकाश आंबेडकर की ताकत बढ़ानी चाहिए.

    ReplyDelete
  11. Now came golden opportunity in Maharashtra.

    ReplyDelete
  12. Bhenji pathimba detil hich apeksha maharashtratil baspa karykarte ichhuk ahet.jay bhim

    ReplyDelete
  13. राज्यात बाळासाहेब आणि केंद्रात मायावती. हे शक्य आहे. सर्व गटांनी आता एकत्र येऊन विलीन व्हावे ही काळाची गरज आहे.

    ReplyDelete
  14. वंचित आघाडीमुळे आज कधी नव्हे तसा वंचित घटकांचा विचार मोठमोठे पक्ष करताना दिसताहेत फक्त EVM वर संशय आहे

    ReplyDelete
  15. अतिशय तळमळीने लिहीलेला लेख

    ReplyDelete
  16. अगदी बरोबर आहे

    ReplyDelete
  17. अगदी बरोबर आहे

    ReplyDelete