Saturday, May 2, 2020

RRS संदर्भात आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी कोरोना रेड झोन मधील दलित मुस्लीम बहुजनांना मार्गदर्शन करावे....! राजेश खडके सकल मराठी समाज


        विषय असा आहे कोरोना महामारीचे संकट संपूर्ण देशात असताना आणि इथला नागरिक त्या विरोधात लढत असताना रोज रोज नव नवीन खेळ उभे रहाताना आपल्याला दिसत आहे.त्याचे कारण असे आहे की, रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराजन यांनी कोरोना विषया बाबत देशात सुरू असलेला लॉक डाऊन संदर्भात खूप मोठे विधान केलेले आहे ते असे म्हणतात की, कोरोना ह्याला सर्दी खोकल्या सारखा आधार देऊन देशातील सुरु असलेला लॉक डाऊन उठ्विण्यातात यावा जेणेकरून इथला गरीब कामगार मजूर यांचा भविष्यात भूकबळी सारखा प्रश्न उपस्थित होणार नाही.जर असा प्रश्न उपस्थित झाल्यास कोरोनाच्या आजाराने मारणाऱ्या जनसंख्येपेक्षा भूकबळीने मरणाऱ्याची संख्या मोठी असेन.रघुराजन यांनी उपस्थित केलेला प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही. कोरोना साथ रोगाच्या विरोधात आरोग्य यंत्रणा मजबूत करायला हव्यात त्याला लॉक डाऊन सारखा पर्याय योग्य राहणार नाही.त्यामुळे देशहितासाठीचा २१ दिवसांचा आणि समाजहितासाठीचा १९ दिवसांचा जनता कर्फ्यू म्हणून सर्व जात धर्माच्या लोकांनी प्रामाणिकपणे पाळला आहे.असे असताना कामगार दिनाच्या दिवशी म्हणजे १ मे रोजी महाराष्ट्र राज्यातील १४ जिल्हे कोरोना रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.राज्याची आर्थिक राजधानी मुंबई एक नंबर तर सांस्कृतिक राजधानी दोन नंबर क्रमांकावर जाहीर करून केंद्रीय गृहखात्याचा कोणताही जबाबदार मंत्री किंवा अधिकारी समोर न येता इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून दोन आठवड्यांचा लॉक डाऊन वाढविण्यात आलेला आहे.आता हा लॉक डाऊन जनतेने पाळायचा का नाही पाळायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.परंतु या गृहखात्याने जाहीर केलेल्या कोरोना रेड झोनमध्ये लॉक डाऊनच्या काळात RRS चे कार्यकर्ते घरो घरी तपासणी ( Screening) करणार आहेत.माझा प्रश्न एवढाच आहे की या केंद्रीय गृहखात्याच्या लॉक काळात कोरोना रेड झोन म्हणजे दलित मुस्लीम समाजाच्या घरोघरी हे कार्यकर्ते जाणार आहेत हा विषय माझ्यासाठी गंभीर आहे.कारण आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी या RRS संदर्भात वेळोवेळी वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून इथला दलित मुस्लीम बहुजन समाजाला या संघी लोकांचा कसा त्रास होणार आहे आणि होत आहे यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे.त्यामुळे माझे असे म्हणणे आहे की, सध्या मुस्लीम बांधवांचा उपवासाचा म्हणजे रमजानचा महिना आहे.या काळात त्यांच्या घरात तपासणी ( Screening) च्या माध्यमातून RRS चे कार्यकर्ते घरोघरी जाणार ही बाब योग्य नाही याचा पुढे गंभीर परिणाम होऊ शकतो.म्हणून मला असे वाटते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी दलित मुस्लीम बहुजन समाजाला योग्य ते मार्गदर्शन करावे अशी माझी मनपूर्वक विनम्रतेची विनंती आहे.

No comments:

Post a Comment