Tuesday, December 18, 2018

महार योध्याचे योगदान आधुनिक भारत घडविण्यासाठीच……!

वर्षाचा डिसेंबर हा अखेरचा महिना असतो आणि वर्षाभरात काय चांगले किंवा काय वाईट घडले याची शहानिशा राजकीय आणि सामजिक स्तरावर केली जाते.या वर्षाचा आम्ही सकल मराठी समाजाला काय मिळाले किंवा काय देण्याचा प्रयत्न केला याचा आढावा घेतला आहे.हा आढावा घेत असता काही जुने मित्र तुटली तर काही नवीन मित्र जुडली आहेत.सकल मराठी समाजाचे समन्वय करणे खूप अवघड बाब आहे परंतु हि बाब पूर्ण करण्याचे धाडस महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केल्याचे आता जवळ जवळ सर्वच मानीत आहे.त्यामुळे बामणी व्यवस्थेने सोशल मिडीया वार रूम तयार करून या दोन महापुरुषांना सोशल मिडीयावर बनावट आयडीच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रामाणात सुरु केला आहे.याच बरोबर यांनी प्रत्येक समाजात आणि प्रत्येक चळवळीत दलाल निर्माण केल्याचे आता सकल मराठी समाजा समोर गेल्या वर्षभरात आलेले आहे.......मग त्यातून आंबेडकरी चळवळ पण सुटलेली नाही.परंतु या द्लालांचा काय फायदा झाला किंवा भविष्यात काय फायदा होणार आहे याचे काहीच कारण दिसून आलेले नाही.परंतु काही कारणांची मीमांसा केली तर काही गोष्टी समोर आल्या आहेत आणि त्यातील प्रमुख बाब म्हणजे या दलालांच्या माध्यमातून मग तो दलाल मराठा समाजातील का असा ना याचे मूळ जर शोधले तर इथला “महार” संपविणे एवढेच धोरण असल्याचे मोठ्या प्रमाणात समोर आले आहे.हे कोणी मान्य करणार नाही परंतु याचा जर त्या व्यक्तीने खोलात जाऊन आभ्यास केला तर ही बाब त्याच्या पुढे आल्या शिवाय राहणार नाही.काही इतिहास आभ्यासकरांचे म्हणणे असे आहे की,भारताचे मूळ हे “महार” शब्दात अडकले आहे.कारण भारतातील प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व हे “महार” गणात अडकलेले आहे आणि महार गण हा शाख्य कुलीन गण असल्याचे बाबासाहेबांच्या समोर आलेले होते.या गणात स्त्री ला खूप महत्व दिले गेलेले आहे.त्यामुळेच सिंधू संस्कृती ही या देशातील मूळ संस्कृती असल्याचे इथल्या इतिहास आभ्यासकरांचेही म्हणणे आहे.कारण सिंधू संस्कृती ही आधुनिक संस्कृती होती.तांत्रिक संस्कृती होती म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाणे परिपूर्ण अशी संस्कृती होती.इथे मानवी विकास महत्वाचा मानला जात होता. त्यामुळे मानवाच्या खऱ्या विकासाला याच सिंधू संस्कृतीत म्हणजे स्त्री शक्तीला ज्ञानाची संस्कृती म्हटले जाते.म्हणून छत्रपती संभाजी महाराज याच तांत्रिक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त असलेल्या स्त्री शक्तीचे पूजक होते.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला वैदिक धर्म पद्धतीतील राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक विज्ञानवादी राज्याभिषेक करून आधुनिक स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.बामणी व्यावस्थेचा मूळ शत्रू हा "ज्ञान" आणि "विज्ञान आहे.त्यामुळे आता हे स्वराज्य संपविणे महत्वाचे होते.त्यामुळे ज्यांनी ज्यांनी विज्ञानवादी आधुनिक भारत उभारण्याचा प्रयत्न केला त्यांना या बामणी व्यवस्थेने संपविण्याचे कटकारस्थान इतिहासात केल्याचे आता जवळ जवळ स्पष्ट झाले आहे.त्यामुळे गौतम बुध्द,वारकरी सांप्रदाय निर्माण करणारे संत संपविलेले आहेत.यातून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज देखील सुटले नाहीत.अशा विज्ञानवादी स्वराज्याच्या उभारणीला बामणी व्यावस्थेने छेद देऊन इथला मूळ आधुनिक संघर्षवादी जमात म्हणजे महार संपविण्यासाठी शुद्रातून अतिशूद्र म्हणजे अस्पृश्य म्हणून महार समाजा बद्दलची भावना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु अशा बामणी व्यवस्थेला मोडीत काढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्यांनी उभारलेले आधुनिक स्वराज्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी पहिली शिवजयंती साजरा करून इथला संघर्षवादी “महार" समाजाच्या इतिहासाला गती देऊन सत्यशोधक समाजाची स्थापना करून नव्याने आधुनिक भारताची निर्मिती केली.परंतु बामणी व्यावस्था गप्प बसली नाही त्यांनी पुन्हा एकदा आधुनिक भारताच्या विकासाला बाधा निर्माण करण्यासाठी शिवजयंती उत्सव बंद करण्यासाठी व्दिराष्ट्राची संकल्पना निर्माण करून आर्य सनातनी हिंदू धर्माची स्थापना करून शाख्यकुलीन गणप्रमुखाची मोदकरुपी गणपती निर्माण करून त्याचा उत्सव सुरु करून आधुनिक भारताच्या निर्मितीला पुन्हा एकदा छेद दिला.परंतु या व्यवस्थेला तडा देण्यासाठी भीमराव रामजी आंबेडकर यांनी आधुनिक भारताचे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा इतिहास दाखविणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून पुन्हा एकदा भारताची वाटचाल आधुनिक भारताकडे सुरु केली.इथली बामणी व्यावस्था निर्माण करण्यासाठी जो “महार” समाज संपविण्याचे कटकारस्थान झाले होते त्याला पुन्हा एकदा छेद देत महार समाजापुढे लावलेला “अस्पृश्य” शब्द उखडून फेकण्याचे महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इथला कायस्थ प्रभू (जंगम स्वामी) याला बरोबर घेऊन केले आहे.आधुनिक भारताच्या विकासाला बाधा असणारी “मनुस्मृती" याच कायस्थ प्रभू (जंगम स्वामी) याला बरोबर घेऊन दहन केली आहे.१८७५ ला स्थापन झालेला आर्य सनातनी हिंदू धर्म रुजविण्यासाठी राम व कृष्ण यांना काल्पनिक ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांची उपाधी देऊन आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारा राम नावाचा धनुष्यधारी गणप्रमुख याचेवर ताबा मारला आहे.सिंधू संस्कृती मधील आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त असणारी स्त्री “नेऋती” हिला विष्णू पत्नी लक्ष्मीचे नाव देऊन सिंधू संस्कृतीवर ताबा मारला आहे.परंतु या सर्व गोष्टींचा आभ्यास करून बाबासाहेब आंबेडकर यांनी सिंधू संस्कृतीला उजाळा देण्यासाठी गौतमी पुत्र सिद्धार्थ यांनी प्रस्थापित केलेला आधुनिक विचार म्हणजे बौध्द धम्म याचा आभ्यास करून आधुनिक भारत घडविण्यासाठी ज्या जाती जमाती यांनी कार्य केला अशा जाती जमाती बामणी व्यावस्थेने अविकसित ठेवल्या अशा लोकांना “आरक्षण” विषय निर्माण करून पुन्हा एकदा आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांना स्वतंत्र भारतात संरक्षण देऊन हक्क व अधिकार दिले.मानव कल्याणकारी विज्ञानवादी असणारा विचार म्हणजे बौध्द धम्म स्वीकारून पुन्हा एकदा भारत देशाची वाटचाल आधुनिक भारताकडे केली.हा धम्म संपूर्ण भारतात पोहचविण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांना पुरासा वेळ मिळाला नाही आणि ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचे महापरिनिर्वाण झाले.त्यांनी निर्माण केलेले साहित्य नष्ट करून काही साहित्यात बदल करण्याचे कटकारस्थान काही शिक्षित वर्गाला बरोबर घेऊन या बामणी व्यावस्थेने केले आहे.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेत असतांना इथला संघर्षवादी महार समाजाचे अस्तित्व अबाधित राहण्यासाठी “महार रेजिमेंट" पुन्हा स्थापित करून भारतीय सेनेत जिवंत ठेवली आहे.परंतु आधुनिक विचार म्हणजे बौध्द धम्म संपविण्यासाठी इथली व्यावस्था कार्यरत झालेली होती.या बौध्द धम्म व्यवस्थेत काही त्यांचे दलाल निर्माण करून “महार अस्तित्व” संपविण्यासाठी हा बौध्द धम्म बदनाम करण्याचे कटकारस्थान झाल्याचे आता समोर आलेले आहे.बाबासाहेबांनी भारताच्या प्रत्येक नागरिकांना न्याय मिळण्यासाठी नागरी हक्क संरक्षण कायदा निर्माण केला होता परंतु केवळ “महार” अस्तित्व संपविण्यासाठी “महार” शब्दाचा उच्चार जातीयवादी व्देष असा करून साल १९८९ ला अक्ट्रोसिटी कायद्याची निर्मिती केली आहे.त्यामुळे आज आम्ही बौध्द जरी असलो तरी आमचे ऐतिहासिक अस्तित्व हे “महार” आहे जो या देशाच्या प्रशासन व्यावस्थेचा मुख्य घटक आहे.आणि तेच अस्तित्व अबाधित राहावे म्हणून दरवर्षी आपण १ जानेवारीला भीमा कोरेगावला महार योद्ध्यांना मानवंदना द्यायला जात असतो.
                           मित्रहो हाच खरा इतिहास आहे आणि जो आभ्यास करेल,इतिहासाचे संशोधन करेल त्याच्या समोर हा इतिहास येईल.त्यामुळे ज्याला विरोध करायचा असेल त्याने पहिला ह्या सर्व बाबी तपासल्या पाहिजे आणि जेव्हा तो तपसेल तेव्हा तो या इतिहासाचे समर्थन करेल आणि आधुनिक भारताच्या वाटचालीमध्ये आपले योगदान निश्चित करेल…..!
धन्यवाद
राजेश खडके
समन्वयक सकल मराठी समाज

No comments:

Post a Comment