Saturday, January 23, 2021

शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री...आणि नामांतर लढा उभा राहिला...! प्रकाश आंबेडकर राजकरणात...! वतन बचाओ आंदोलन


 

सन १९७२ पासून खासगीकरणाला सुरुवात....आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना...!

शरद पवार विरोधी पक्षनेता असताना...मराठा आरक्षणासाठी झाले पहिले आत्मबलिदान...!

       महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे शरद पवार अतिशय लाडके असे शिष्य बनले होते.त्यामुळे दिल्लीत गेल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी त्याकाळी शरद पवार यांच्यासाठी खास युवकपद निर्माण करून त्यांना महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सन १९६४ मध्ये वयाच्या चौवासाव्या वर्षी अध्यक्ष केली होते...त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांची महाराष्ट्रातील संपूर्ण ताकद शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहिली होती.याचाच लाभ घेऊन शरद पवार यांनी सन १९६४ मध्ये दादासाहेब गायकवाड यांच्या बरोबर युतीची बोलणी करून रिपब्लिकन-कॉंग्रेस युती घडविली होती.त्यामुळे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाच्या मतदारांची मते मिळून सन १९६७ मध्ये वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी शरद पवार आमदार म्हणून निवडून आले होते.आणि वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री झाले.यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबर वसंतदादा पाटील हे सुध्दा शरद पवार यांना मार्गदर्शन करायचे परंतु वसंतदादा पाटील यांनी सन १९७७ मध्ये महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.यातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि शरद पवार यांचे संबध १९७३ पासून आलेले होते.त्यामुळे त्यांनी सन १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला जाहीर समर्थन दिले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी सन १९७७  मध्ये शरद पवार यांच्या समवेत वाढदिवस देखील साजरा केला होता.त्यानंतर सन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिलेला होता.त्यामुळे जसा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा रिपब्लिकन पक्ष म्हणून शरद पवार यांनी सन १९६४ मध्ये युती घडविली होती.त्याप्रमाणे शरद पवार यांनी शिवसेनेचा पाठींबा कॉंग्रेसला मिळविला होता.त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला चांगली उभारी मिळाली होती आणि शरद पवार यांचे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात चांगले वजन देखील निर्माण झाले होते.हे सर्व करीत असताना शरद पवार यांना त्याकाळी कॉम्रेडची ताकद मोठ्या प्रमाणात मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.त्यामुळेच कॉम्रेड बरोबर असल्यामुळे शरद पवार यांनी कॉंग्रेस पक्षां बरोबर बंडखोरी करून कॉंग्रेस मधील बारा आमदार फोडून वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून टाकले होते....त्यावेळी वसंतदादा पाटील यांनी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीत खंजीर खुपसाल्याची शरद  पवार यांच्यावर विरोधात भावनिक प्रतिक्रिया दिली होती.आणि शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे सहावे मुख्यमंत्री म्हणून १८ जुलै १९७८ रोजी शपथ घेतली होती.महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस सरकार सत्तेत आलं. यात पवारांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. या बिगर-काँग्रेस आघाडीचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद. पण हे सरकार फार काळ टिकलं नव्हतं.यावेळी शरद पवार यांचे वय वर्ष अडोतीस होते.विधानसभेच्या तिसऱ्या टर्म मध्ये आणि कमी वयामध्ये मुख्यमंत्री पद मिळविणारा देशात पहिलाच व्यक्ती म्हणून त्यांनी नावलौकिक वाढविला.जे बारा आमदार फोडून शरद पवार यांनी सत्तेची गणिती सुरु केली....ती गणित म्हणजे घराणेशाहीला प्रोत्साहन देण्याची सुरुवात शरद पवार यांनी १९७८ मध्ये केल्याचे दिसून येते....परंतु त्याची पायेमुळे पूर्वीच रोवल्याचे दिसत आहे.

 

शरद पवार मुख्यमंत्री झाले....आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर विषय उभा राहिला....!

        शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला....आणि पुन्हा एकदा भावनिक लढा सुरु झाला...याच वेळी आंतरराज्य स्थलांतरीत कामगार (रोजगारांचे नियमन आणि सेवा शर्ती) अधिनियम १९७९ मंजूर करण्यात आला.परंतु सन १९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत बसल्या आणि त्यांनी देशातील विरोधी पक्षाचे सरकार बरखास्त केली त्यात शरद पवार यांचे सरकार २७ फेब्रुवारी १९८० मध्ये बरखास्त झाले...आणि त्या नंतर इंदिरा कॉंग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सातवे मुख्यमंत्री म्हणून ए आर अंतुले यांनी शपथ घेतली.परंतु कॉम्रेड बरोबर असल्यामुळे त्याचा शरद पवार यांना फारसा फरक पडला नाही....परंतु शरद पवार असे वागतील याची तिळमात्र शंका यशवंतराव चव्हाण यांना नव्हती...त्यामुळे यशवंतरावांना त्याचा धक्का बसला होता.त्यानंतर शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या समोर कधी उभी ठाकले नाही.त्यानंतर कॉम्रेडच्या बळावर शरद पवार हे विरोधी पक्ष नेते झाले....यावेळी शरद पवार यांचे वय वर्षे चाळीस होते.कॉम्रेड बरोबर असल्यामुळे शरद पवार यांना भांडवलदार यांची मोठ बांधण्यास सोप्पे झालेले होती.परंतु तो पर्यंत कॉंग्रेसचा मूळ चेहरा बदलण्यात आणि देशात कॉंग्रेस कमजोर करण्यात इंदिरा गांधी यशस्वी झालेल्या होत्या...कारण याच दरम्यान नामांतर लढा जोर धरत होता.....या दरम्यानच जनसंघ पक्षाचे भारतीय जनता पार्टी म्हणून नामकरण होऊन हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष उभा राहिलेला होता.

 

सन १९७२ पासून खासगीकरणाला सुरुवात....आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना...!

      सन १९७२ पासून खासगी कंपनी पासून खासगीकरणाला सुरुवात झाली असल्याचे दिसून येते...यासाठी आपल्याला भोसरी आणि लोणी काळभोर येथील फिलीफ्स कंपनीचा इतिहास समजून घ्यावा लागेल...या काळात या दोन्ही कंपन्यांची युनियन तोडण्याचे काम झाले...तेथून पुढे फिलिप्स कंपनीला अधोगती सुरु झाल्यामुळे त्याकाळी साडेबारा हजर कामगार उध्वस्त झाले...आणि देशातील भांडवलदारास उभे राहिण्याची संधी प्राप्त झाली.त्यामुळे एकंदरीत कॉम्रेडचा इतिहास पाहिला तर आपल्याला इथला कामगार संपविण्याचा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कामगार कायदा कमजोर करण्याचा राहिला असल्याचे दिसून येते.शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यानी सावरकर यांची स्तुतिसुमने गायली असल्याचे आपल्या सर्वांनाच माहित आहे.शरद पवार यांचे सरकार १७ फेब्रुवारी १९८० मध्ये बरखास्त झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झालेली होती.कॉंग्रेसचा चेहरा बदलून इंदिरा कॉंग्रेस म्हणून  चेहरा बाहेर आलेला  होता.त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीच्या काळात जनसंघाने ६ एप्रिल १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना केली होती.त्यानंतर राष्ट्रपती राजवट उठवून इंदिरा कॉंग्रेस मधील ए आर अंतुले यांनी महाराष्ट्र राज्याचे सातवे मुख्यमंत्री म्हणून ९ जून १९८० मध्ये शपथ घेतली होती.या सरकारच्या काळात शरद पवार यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून राज्याचे काम पहिले.याचा काळात या सरकारने सन १९८० मध्ये खासगीकरणाला खरी सुरवात केली.त्यानी प्रथम खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ लागू केला.याच काळात महाराष्ट्र झोपडपट्टीदादा अधिनियम १९८१ लागू करण्यात आला....आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची राजकीय जीवनाला सुरुवात झाली.

शरद पवार विरोधी पक्ष नेते असताना...मराठा आरक्षणाची मागणी...आणि  आरक्षणासाठी पहिले आत्मबलिदान झाले....!

 

     सन १९७८ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा ठराव शरद पवार यांच्या सरकारच्या काळात मंजूर झालेला होता..आणि हा ठराव कसा आला...आणि हा लढा कसा उभा राहिला याची माहिती आपल्या सर्वाना आहे.याच काळात प्रकाश आंबेडकर यांची राजकारणात सुरुवात झाली होती...याकाळात आंबेडकर अनुयायी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचे आंनदाने स्वागत करीत होता.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर प्रदीर्घ काळानंतर त्यांचे वारस राजकारणात आले होते.रिपब्लिकन पक्ष नेर्तुत्वात त्यानी कार्याला सुरुवात केलेली होती.

         याकाळात अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना माथाडी कामगार नेते आण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती....ए आर अंतुले मुस्लीम समाजतील पहिले मुख्यमंत्री होते. १२ जानेवारी १९८२ रोजी ए आर अंतुले यांना पायउतार व्हावे लागले.त्यांचा कार्यकाळ अठरा महिने राहिला...त्यानंतर २१ जानेवारी १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी आठवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली....मराठा आरक्षण मागणीला यश मिळत नाही असे लक्षात आल्यावर २२ मार्च १९८२ साली आण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाचा मुंबई मध्ये मोठा मोर्चा काढला...एवढा मोठा मोर्चा निघूनही आपल्याला यश मिळाले नाही....अशी भावना आण्णासाहेब पाटील यांची झाली होती....आणि त्यानी २३ मार्च १९८२ मध्ये रहात्या घरी स्वत:ला गोळी मारून घेऊन आत्महत्या केली.....त्यामुळे बाबासाहेब भोसले यांना १२ फेब्रुवारी १९८३ रोजी पाय उतार झाले....त्यांचा कार्यकाळ तेरा महिने राहिला... त्यानंतर २  फेबृवारी १९८३ मध्ये वसंतराव पाटील यांनी नववे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली...त्यानी त्यांच्या कार्य काळात सार्वजनिक प्रयोजनासाठी आणि कंपन्यांसाठी भूमी संपादन संबधीचा म्हणजे भूमीसंपादन (विशोधन) अधिनियम १९८४ चा कायदा मंजूर केला होता....यावेळी शरद पवार हे चव्वेचाळीस वर्षाचे होते.(क्रमशJ

No comments:

Post a Comment