Friday, January 22, 2021

दलित पॅथरची स्थापना.....आणि अडीच वर्षातच पॅथरची झंझावात मावळला....! शिवसेनेने घेतली उभारी....! वतन बचाओ आंदोलन


 

      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एस,एसटी,एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी आणि अल्पसख्यंक या प्रवर्गाला सोबत घेऊन सन १९४२ मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केली होती.....आणि हा पक्ष बरखास्त झाला नसताना तो बरखास्त झाल्याचे समजण्यात येऊन सन १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर सन १९६२ मध्ये रिपब्लिकन पक्षाची बांधणी करण्यात आलेली होती.गेल्या लेखात या संदर्भात आपण वाचले आहे....आणि रिपब्लिकन-कॉंग्रेस युती देखील आपण समजून घेतली आहे.युतीचा पश्चाताप होऊन दादासाहेब गायकवाड यांचे निधन झाल्याचेही आपण समजून घेतले आहे.दादासाहेब गायकवाड यांच्या निधना नंतर रिपब्लिकन पक्षाची धुरा ही दादासाहेब गवई यांच्याकडे आली होती.त्यामुळे रिपब्लिकन-कॉंग्रेस युतीवर सन १९७२ मध्ये पुन्हा शरद पवार हे कॉंग्रेस पक्षाचे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले होते.

           विषय असा आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्ष बरखास्त झाल्याचे समजण्यात येऊन “रिपब्लिकन पक्ष” हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील होता...तर “दलित पॅथर” स्थापन करण्याची गरज काय होती असा प्रश्न त्याकाळी बऱ्याच लोकांना पडलां होता.परंतु रिपब्लिकन-कॉंग्रेस युती ज्यांनी ज्यांनी समजून घेतली आहे...त्यालाच या बाबतची उकल होईल अन्यथा होणार नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.सन १९७१ मध्ये दादासाहेब गायकवाड यांचे निधन झाले...आणि सहा महिन्यानंतर नामदेवराव ढसाळ यांच्या नेर्तुत्वात ९ जुलै १९७२ मध्ये दलित पॅथरची स्थापना झाली...आता ही स्थापना कुठे झाली...आणि या स्थापने दरम्यान कोण कोण उपस्थित होते याची माहिती ही चळवळीच्या कार्यकर्त्यांना माहित आहे.त्यामुळे याठिकणी त्या बाबतचे विश्लेषण मी येथे देत नाही.

     एकंदरीत काय तर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचा मतदार रिपब्लिकन पक्ष आणि कॉंग्रेस युतीमुळे बऱ्याच प्रमाणात कॉंग्रेसचा मतदार म्हणून तयार झालेला होता.परंतु एक मतदार वर्ग असा होता की तो कॉंग्रेसचा कधीच मतदार झालेला नाही.परंतु या काळात प्रबोधनकार ठाकरे यांची शिवसेना लोकामध्ये सामाजिक संघटना म्हणून शिव विचार पेरण्याचे कार्य करीत होती.त्यामुळे प्रबोधनकार ठाकरे हे समतावादी विचार लोकामध्ये पेरण्याचे काम करीत होते.याचा परिणाम त्याकाळी आरएसएसवादी कॉंग्रेस आणि जनसंघ यांचेवर होत होता.त्यामुळे जनसंघ हा बामणी व्यवस्थेचा पक्ष होता आणि मनुवादी विचारांचा पेरक होता.आणि यातच प्रबोधनकार यांचे २० नोव्हेंबर १९७३ मध्ये निधन झाले होते.त्यामुळे आता शिवसेनेची सूत्र बाळासाहेब ठाकरे यांचेकडे आलेली होती.यावेळी समतावादी विचारावर उभी राहिलेली शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी विचारावर पुर्नस्थापित केली गेली.यातच दलित पॅथरने दलित अन्याय अत्याचाराच्या विरोधातील आक्रमक लढा उभा केला होता.गावोगावी जाऊन दलित पॅथर आक्रमक आंदोलन करीत होती.त्यामुळे नव्या जोशाची गरम रक्ताची पोर दलित पॅथरच्या आक्रमक भूमिकेकडे वळू लागली होती.हजारोंच्या संख्येने आक्रमक आंदोलनासाठी तरुण गावोगावी जमत होती.त्यामुळे कमी काळात दलित पॅथर संघटनेची दहशत गावोगावी झाली होती.आक्रमक भूमिकेमुळे तरुणावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होऊ लागले होते.गुन्हे दाखल झाल्यामुळे पोलीस प्रशासनाचा ससेमिरा या तरुणाच्या पाठीमागे लागला होता.त्यामुळे दलित पॅथरच्या कार्यकर्त्यांना भूमिगत होण्यास भाग पडत होते.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समतेची कास दलित पॅथर संघटनेच्या माध्यमातून सुटत चाललेली होती.बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत कधीही आक्रमक आंदोलानात्मक हल्ला केला नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी केलेले चवदार तळ्याचे आंदोलन समजून घ्यावे लागेल.परंतु दलित पॅथरचे संस्थापक नेते नामदेवराव ढसाळ यांनी मी मार्क्सवादी विचारांचा समर्थक असल्याचे जाहीर केले.त्यामुळे दलित पॅथर ही आंबेडकर विचारावर उभी रहीलेली संघटना नसल्याचे तरुणांच्या लक्षात आले आणि ते त्या सघटनेमधून बाहेर पडू लागले....आणि उभा राहिलेला दलित पॅथर झंझावात मावळला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतली उभारी...!

        मार्क्सवादी विचारांचे समर्थन नामदेवराव ढसाळ यांनी केले आणि दलित पॅथरच्या आक्रमक आंदोलनामुळे गावोगावी दहशत झाल्यामुळे याचा फायदा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनाला मिळाला..आणि गावोगावी जाऊन शिवसेनेने आपली पायेमुळे रोवण्यास सुरुवात केली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्युच्या अहवाल मागणी आंदोलन स्थगित...!

          २१ फेब्रुवारी १९७५ मध्ये शंकरराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री झाले...आणि २५ जून १९७५ मध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती.या नंतर बी सी कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्युच्या अह्वालच्या मागणीचा भावनिक लढा जो सन १९५६ मध्ये सुरु केला होता...तो लढा १९७६ पर्यंत सुरु ठेवला होता...जेव्हा पुण्यातील श्रमिक भवन येथे सुरु असलेल्या बैठकीत उपस्थित झालेल्या प्रश्नाने बी सी कांबळे यांनी हा लढा आटोपण्याचा निश्चय करून तेथेच तो थांबविला गेला.त्याचे कारण असे होते की जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शवविच्छेदनच झाले नसेल...तर मृत्यूचा अहवाल मिळणारच कसा असा प्रश्न त्या बैठकीत त्यांचे  कार्यकर्ते अशोक माने यांनी उपस्थित केला होता.त्यामुळे १९७५-७६ मध्ये हे आंदोलन बंद करण्यात आले.गेल्या वीस वर्षापासून सुरु असलेले आंदोलन हे एका कार्यकर्त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नावर बंद करण्यात आले.....याची चर्चा त्याकाळी बऱ्याच जाणकार यांनी घडविली.याच दरम्यान शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना नागरी जमीन कमाल धारणा कायदा १९७६ लागू करण्यात आलेला होता... यावेळी शरद पवार हे ३६ र्षाचे होते... (क्रमशJ

No comments:

Post a Comment