Tuesday, November 13, 2012

निजामपूरला हळद लागवडीवर भर

माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील डॉ. बालाजी केंद्रे व मीरा केंद्रे यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यावर भर दिला आहे. तसेच निजामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी हळदीचे उत्पादन घ्यावे यासाठी मोफत बियाणे, योग्य मार्गदर्शन करुन अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हळदीची लागवड केली आहे. दररोजच्या घरगुती वापरासाठी तसेच विविध सौंदर्यप्रसाधनांबरोबर आयुवेंदिक औषधे व जंतुनाशक औषधासाठी हळदीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे दिवसेंदिवस हळदीला महत्व व वाढती मागणी आहे. 

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याबरोबरच आता कोकणातील शेतकरीही एकमेकांच्या मदतीने व कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन पिके मोठ्या प्रमाणात घेत आहेत. माणगाव तालुक्यातील निजामपूर भागात डॉ. केंद्रे यांनी डॉक्टरी व्यवसायातून शेतीचे नवनवीन प्रयोग करुन गेल्या वर्षी हळदीचे पीक घेऊन उत्पन्न झालेल्या पिकाचे बियाण्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली तर अन्य शेतकऱ्यांना मोफत बियाणे देऊन मदतीला हात दिला आहे. 
गेल्यावर्षी सन 2010-11 मध्ये निजामपूरजवळ डॉ. बालाजी केंद्रे व सौ. मीरा केंद्रे या शेतकरी दाम्पत्यांनी आपल्या मालकी जमिनीवर 75 किलो हळदीच्या पिकाची लागवड 8 गुंठे जागेवर प्रायोगिक तत्वावर केली होती. त्यापासून त्यांना 75 किलो हळदीचे पिकाचे उत्पादन मिळाले होते. त्यानंतर त्यांनी यंदा याच बियाण्यांतून व बाहेरुन एका एकर जमिनीवर 6 क्विंटल बियाणे जून महिन्यात लावून मोठ्या प्रमाणात केली. तसेच गेल्या वर्षी मिळालेल्या उत्पादनातील शिल्लक असणारे हळदीचे बियाणे मोफत गुणाजी भोसले, सरपंच कडापे, रामा वाघमारे, पंढरी उतेकर, मोतीराम वाघमारे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना थोड्या फार प्रमाणात लागवड करण्यास दिले. त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी हळदीच्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.
दरम्यानच्या काळात हळदीला अधिक महत्व येणार असून,तसेच ती जंतूनाशक व आयुवेदिक औषधासाठी व सौंदर्यप्रसाधनासाठी तसेच घरगुती कामासाठी दैनंदिन महत्व हळदीला येऊ लागल्यामुळे या पिकासाठी पिवळ्या क्रांतीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळू लागला आहे.

No comments:

Post a Comment