Monday, January 29, 2018

माता जिजाऊ स्वराज्याच्या रयतेला माफ करा....! छत्रपती शिवराय स्वराज्याच्या रयतेला माफ करा....! यात रयतेची चूक नाही......!




२६ जानेवारी हा दिवस स्वराज्यातील रयतेच्या आनंदाचा दिवस आहे....कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताला भगवान गौतम बुध्द यांच्या विचारांचा,सम्राट अशोक यांच्या साम्राज्याचा आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी विचारांचे स्वराज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेतून तयार केलेले संविधान दिले.बावीस प्रतिज्ञाच्या माध्यमातून वैदिक धर्म पंडितांनी स्वराज्याच्या रयतेवर लादलेले ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती नाकरून मानसिक गुलामीतून रयतेला मुक्त करून सिंधू संस्कृतीचे दर्शन दिले आहे.मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोठेही कुलदैवत नाकारल्याचे दिसत नाहीये.असे असताना आपण आपले कुलदैवत नाकरून वैदिक धर्म पंडितांनी निर्माण केलेलं त्यांचे आराध्य दैवत मोदक खाणाऱ्या गणपतीचे आजचा तरूण मोठ्या प्रमाणात भक्त होताना दिसत आहे.सामजिक क्षेत्रात काम करणारी संभाजी ब्रिगेड जेव्हा राजकीय पक्ष झाला तेव्हा त्यांनी त्यांची भूमिका बदल केल्याचे नुकतेच गेल्या वर्षीच्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून समोर आलेले आहे.बाळकृष्ण गंगाधर टिळकांनी १८९५ मध्ये पहिला सार्वजनिक गणपती बसविलेला होता आणि तो तेहतीस कोटी हिंदू देवतांचा आराध्य दैवत म्हणून समोर आणला होता.मात्र सामाजिक संघटना असलेल्या संभाजी ब्रिगेड यांनी वैदक धर्म पंडितांचा मोदक खाणारा गणपती हा भाऊ रंगारी (लक्ष्मण जावळे) यांनी टिळकांच्या आधी म्हणजे १८९४ मध्ये पहिला सार्वजनिक गणपती बसविलेला होता असा प्रचार करून आर्य सनातनी हिंदू धर्माचा प्रचार करून स्वराज्याच्या रयतेला सुखकर्ता आणि दुखकर्ता म्हणायला लावून स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांचा अपमान करणारे स्वराज्य बुडविणारे वैदिक धर्म पंडितांचे समर्थन करायला लावून स्वराज्याच्या रयतेला दोषात ठेवले आहे.म्हणून मी म्हणतो स्वराज्याच्या रयतेची यात काही चूक नाही.माता जिजाऊ स्वराज्याच्या रयतेला माफ करा....!
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांचे मार्गदर्शन घेऊन मावळातील दीडशे मावळे बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज स्व्राज्यचे संकल्पक झाले आहेत.त्यानी त्यांच्या कर्तबगारीतून स्वराज्य निर्माण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात कधीही ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांना स्थान दिलेले नाही.असे असताना कोल्हापूर गादीचे वंशज भाजप समर्थक खासदार संभाजीराजे भोसले यांनी २६ जानेवारी २०१८ च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्याभिषेक रथ काढण्यात आला होता.या रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातात मध्ये विष्णूची मूर्ती देऊन शिवराय कसे वैदिक धर्म पंडितांचे मानसिक गुलाम होते याचे प्रत्यक्ष खोटे दर्शन जगासमोर आणले आहे.याला कोणताही विरोध खासदार संभाजीराजे भोसले यांनी केला नाही आणि हा अपमान सर्वानी आनंदात स्वीकारला आहे. म्हणून छत्रपती शिवराय स्वराज्याच्या रयतेला माफ करा....! यात रयतेची चूक नाही......!

No comments:

Post a Comment