Saturday, April 13, 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझे दोन शब्द…..! समता राखण्याची जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुध्द म्हणून आमच्याकडे दिलेली आहे…..! राजेश खडके सकल मराठी समाज


प्रथम महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम…..!

विषय असा आहे की,इतिहासा काळापासून चालत आलेला समतेचा भगवा पताका आम्ही स्विकारीत नाही तो पर्यंत समता आम्ही प्रस्थापित करू शकत नाही.म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवे वान धारण करून झालेले भगवान गौतम बुद्धांच्या माध्यमातून बुध्द म्हणून ज्या २२ प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्यामधील १० वी प्रतिज्ञा जी दिलेली आहे ती म्हणजे “मी समता प्रस्थापित करण्याचा मी प्रयत्न करेन” अशी दिलेली आहे.त्यामुळे धम्म विचार घेऊन चालणारा व्यक्तीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता राखण्याची जबाबदारी दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते.त्यामुळे जो बुध्दाला मानतो आणि त्यांच्या विचाराचे जो अनुकरण करतो त्याचीच समता प्रस्थापित करण्याची जबाबदारी आहे.त्यामुळे या भगव्या पताक्याचे महत्व आम्ही समजून घेतले असल्यामुळे इतिहासातील महार योद्ध्यांचे योगदान समजून घेऊन साल २०१४ पासून फुले-शाहू-आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांना आम्ही समजून सांगत आलेलो आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणेस्टेशन या ठिकाणी याच महार योद्ध्यांच्या माध्यमातून महार योध्दा या भगव्या पताकाखाली आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करून त्या भगव्या पताक्याचे महत्व समजून सांगत आलेलो आहे.

या भगव्या पताक्याखाली महार योद्ध्यांच्या कार्यक्रमाला मान्यता आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते एल डी भोसले आणि मुरलीधर जाधव यांनी दिली आहे.सदर कार्यक्रमात वेळोवेळी उपस्थित राहून समतेची पताका भगवा म्हणून त्यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील त्यांच्या पुतळ्याला साक्ष देऊन त्याचा सन्मान केलेला आहे.

याची जबाबदारी समाजातील प्रत्येक समाज घटकातील व्यक्तींनी घ्यावी अशी सकल मराठी समाजाचीअपेक्षा होती.आणि ती अपेक्षा आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी पूर्ण केली आहे.मुंबई येथील यल्गार मोर्चा आयोजित केला होता.त्या मोर्चात सकल मराठी समाजाच्या वतीने उभारलेला सिहाची छाप आणि महार योध्दा नमूद असलेला भगवा पताका घेऊन सहभागी झालेला कार्यकर्ता हा भीम साम्राज्य संघटनेचा अध्यक्ष गणेश भोसले होता त्यालाही भगव्या पताक्याचे महत्व समजले होते.त्यामुळे त्या ध्वजावर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची नजर पडावी अशी धारणा मनात बाळगून तो त्या मुंबईच्या यल्गार मोर्चात सहभागी झाला.
सहभागी झालेल्या त्या कार्यकर्त्याच्या हातातील ध्वजावर प्रकाश आंबेडकर यांची नजर गेली लागलीच त्यांनी त्याला बोलावून घेतले आणि मंचकावर तो ध्वज लावून टाकण्यास सांगितले आणि इतर कार्यकर्त्यांना तो महार योध्दा असलेला भगवा पताका लावण्यास मदत करायला सांगितली.आणि तो भगवा ध्वज यल्गार मोर्चाच्या मंचकावर फडकला.
 ह्या सगळ्या घडामोडी होण्यासाठी दोन वर्षाचा काळ लोटावा लागला याची जनजागृती संघर्षाचा आवाज या वृत्तपत्राच्या माध्यमातून संपादक संजय सोनवणे यांनी केले आहे.त्यांनी सकल मराठी समाजाची भूमिका नेहमी आपल्या वृत्तपत्रात प्रसिध्द करून ते वृत्तपत्र आदरणीय प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांच्या पर्यंत पोहचत असे.


याच महार योध्दा भगव्या ध्वजाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आदरणीय प्रकाश आंबेडकर,अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली.

त्यामुळे विविध कार्यक्रम राबवून भगव्या ध्वजामध्ये इतिहास काळापासून समता आहे.आणि ती प्रस्थापित करण्याचे कार्य सम्राट अशोकापासून ते वारकरी संप्रदायपासून ते छत्रपती शिवाजी महाराजापासून ते महात्मा ज्योतिबा फुले पासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेपर्यंत आले होते,आणि आता ते कार्य प्रकाश आंबेडकर यानी भगवे उपरणे परिधान करून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले आहे.



No comments:

Post a Comment