Friday, February 1, 2019

टिळकांची कॉंग्रेस सवर्णवादी….तर गांधीची कॉंग्रेस ओबीसीवादी…! इंदिरा गांधी प्रमाणे आजची कॉंग्रेस आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणेल काय..? प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत…! राजेश खडके सकल मराठी समाज


आम्ही स्वतंत्र भारतात रहातो काय…? आणि आमच्या स्वतंत्र भारतामध्ये संविधान लागू आहे काय…? असा प्रश्न आज सर्वांनाच पडला आहे.त्याचे कारण असे की,काय दिवसापूर्वी गांधी पुण्यतिथी निमित्त हिंदू महासभेने कार्यक्रम आयोजित केला होता.त्या कार्यक्रमामध्ये हिदुत्ववादी लोकांचे विकृत दर्शन संपूर्ण देशाला झाले म्हणजे काय तर मृत्यू नंतर या हिंदू महासभेने मोहन करमचंद गांधी यांना गोळ्या घातल्या आणि रक्ताचा पहात वाहिला गेला.ज्या नथुराम गोडसेने गांधीची सुंता करून हत्या केली म्हणजे हिंदू मुस्लीम दंगल भडकाविण्याचे काम केले अशा गोडसेचा विजयदिवस साजरा केला जातो हीच बाब भयानक आहे.काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाले त्यामध्ये ते असे म्हणाले की,टिळकांची कॉंग्रेस ही सवर्णवादी होते त्याचे कारण की,१९८४ मध्ये याच टिळकांनी हिंदू महासभेची स्थापना केली होती आणि या हिंदू महासभेचे कॉंग्रेस मध्ये रुपांतर करून जहालवादी विचाराने ब्रिटीशांच्या विरोधात कार्य सुरु केले.परंतु १९१६ मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मोहन गांधी यांनी १९२० ला टिळकांचा मृत्यू झालेनंतर कॉंग्रेस ताब्यात घेतली.ताब्यात घेतलेल्या कॉंग्रेसचे सवर्णवादी कॉंग्रेस सोडून त्यांनी गावातल्या ओबीसी असणाऱ्या व्यक्ती पर्यंत पोहचविली...आणि पुढे याच लोकांनी कॉंग्रेस मोठ्या प्रामाणात वाढविली.त्यामुळे हिंदू महासभेची ध्येय आणि उद्दिष्टे संपुष्टात आल्यामुळे १९२५ मध्ये पुन्हा नव्याने हिंदू महासभेची स्थापना झाली.कॉंग्रेस मधून गांधीला कंटाळून बाहेर पडलेल्या बळीराम हेगडेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ची स्थापना केली.नथुराम गोडसे याच संघटनेचा कार्यकर्ता होता हे विसरून चालणार नाही.पुढे नेहरू नंतर कॉंग्रेसची झालेली अवस्था सुधारण्यासाठी इंदिरा गांधी यांनी कॉंग्रेस हातात घेतली.आणि याच आरएसएसला संविधानिक प्रक्रीयेमध्ये आणण्याचे कार्य सुरु झाले आणि इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि ते काम बंद पडले.अशा प्रकारे आरएसएसकडे आज एके-४७ सारखी हत्यारे आहेत.नेमकी हत्यारे कशासाठी लागत आहे असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित करून आरएसएस यांना कायदेशीर प्रक्रीयेमध्ये आणा अशी घोषणा करून एक प्रकारे आरएसएस यांच्या विरोधी यल्गारच पुकारला आहे.त्यामुळे महाआघाडीत या असे कॉंग्रेसने राजगृहावर येऊन आवाहन केले तेव्हा आघाडीचा प्रस्ताव म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसकडे अशी मागणी केली आहे की,अशा आरएसएस संदर्भात त्यांना संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा काय कार्यक्रम आहे तो आमच्या वंचित बहुजन आघाडीकडे सादर करा मग आघाडीत येण्याविषयी बोलणी पुढे सरकेल..त्यामुळे टिळकांची कॉंग्रेस सवर्णवादी….तर गांधीची कॉंग्रेस ओबीसीवादी…! इंदिरा गांधी प्रमाणे आजची कॉंग्रेस आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणेल काय..? या प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याशी आणि त्यांच्या मागणीशी आमची सकल मराठी समाज सहमत आहे.

No comments:

Post a Comment