Sunday, February 3, 2019

प्रतिशिवाजी राजे उमाजी नाईक यांचा मृत्यू बोधीसत्व वृक्षावरच….आणि छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला गौतम बुध्दाच्या माध्यमातून दिले बोधीसत्व वृक्षच…! राजेश खडके सकल मराठी समाज


 
प्रथम प्रतिशिवाजी राजे उमाजी नाईक यांचा आज स्मृतीदिन आहे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन …..! क्रांती शब्द राजे उमाजी नाईक यांचे समोर छोटासा आहे असे मला वाटते...परंतु क्रांतीच्याही पुढे जाऊन राजे उमाजी नाईक यांनी काम केल्यामुळे लोक त्यांना प्रतिशिवाजी राजे उमाजी नाईक असे म्हणत असे…! त्याचे कारण असे आहे की,छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य मोगलाईपेक्षा वैदिक धर्म पंडीत यांचेपासून सुरक्षित ठेवायचे होते आणि ते स्वराज्य सुरक्षित ठेवायचे काम युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे.त्यामुळे त्यांना लोक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणतात.राजे उमाजी नाईक यांना स्वराज्याची प्रेरणा जी मिळाली ती छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून म्हणून उमाजीराजे यांनी त्यांचा पेहराव व राहणीमान चालचलन छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रमाणे केले होते.उमाजी नाईक यांनी पेशवाई विरुध्द भीमा कोरेगाव येथे लढण्यासाठी आपले सहकारी पाठविले होते.१ जानेवारी १८१८ च्या जातीयवादी स्वराज्य बुडव्या पेशव्याच्या विरोधात लढण्यासाठी राजे उमाजी नाईक यांना जाता आले नाही कारण ते तुरुंगात होते.परंतु त्यांचे सहकारी या युध्दात मोठ्या प्रमाणात शहीद झाले आहेत.तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान पुरंधरचा किल्ल्याची निवड केली होती.साल १८२२ मध्ये त्यांनी स्वत:चा राज्यभिषेक करून स्वराज्य निर्मितीची पावले पुढे टाकली होती.परंतु ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची हत्या करून स्वराज्य लाटण्याचा प्रयत्न केला त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे औरंगाजेब यांचेकडून करून घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेले समतावादी स्वराज्य बुडवून जातीयवादी पेशवाई लागू केली होती ती जातीयवादी पेशवाई स्वराज्याचे प्रामाणिक सरदार सिध्द्दनाक महार यांनी भीमा कोरेगाव येथे संपविली होती.परंतु पेशवाईची पिलावळ जिवंत राहिली होती.राजे उमाजी नाईक यांना जेव्हा स्वराज्यातील रयत प्रतिशिवाजी म्हणून मानु लागली तेव्हा सातारच्या छत्रपती भोसले यांनी त्यांचा मानसन्मान केल्याच्या नोंदी आपल्याला इतिहासात सापडतात. त्यामुळे पुन्हा उभे होत असलेले स्वराज्य इथल्या वैदिक धर्म पंडितांना नको होते तेव्हा त्यानी ब्रिटिशांना मदत करण्याच्या बदल्यात राजे उमाजी नाईक यांची फसवणूक करून त्यांना ब्रिटीशांच्या ताब्यात दिले.ज्याप्रमाणे शंभूराजे यांच्या शरीराची मृत्यूनंतर विटंबना झाली त्याच प्रमाणे पुणे येथील तहसील येथील कचेरीत पिंपळाच्या झाडाला लटकावून त्यांना फाशी देऊन त्यांचे मृतदेह कित्येक दिवस बेवारसप्रमाणे लटकावून ठेवला होता.परंतु एक बाब मला येथे आवर्जून सांगविसी वाटते आणि माझ्यासाठी ती अभिमानाची बाब आहे आणि ती म्हणजे राजे उमाजी नाईक यांची हत्या ज्या झाडावर केली आहे ते झाड होते बोधिसत्व वृक्षाचे म्हणजे राजे उमाजी यांना ज्या झाडावर लटकविले होते ते पिंपळाचे झाड होते आणि आजही ते झाड त्याठिकाणी आहे.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा ही बोधीसत्वाच्या वृक्षावर म्हणजे पिंपळाच्या पानावर होती,त्याचप्रमाणे प्रतिशिवाजी राजे उमाजी नाईक यांना बोधिसत्व वृक्षाखालीच मरण आले.आणि १९५६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बोधीसत्व वृक्षाचीच ओळख करून दिलेली आहे.

No comments:

Post a Comment