Friday, February 8, 2019

देशाच्या कोणत्याही विद्यार्थ्यांच्या समोर जर प्रश्न केला की सक्षम प्रधानमंत्री कोण बनू शकेल तर त्याचे उत्तर असेल प्रकाश आंबेडकर,बहन मायावती आणि शरद पवार….पण नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असणार नाहीत…! सकल मराठी समाज राजेश खडके

एका वृत्तवाहिनीने एकदा विद्यार्थी यांचे समोर प्रश्न केला की,या भारतात महात्मा गांधी यांचे नंतर श्रेष्ठ कोण आहे…? आता अशा प्रश्नांना उत्तर कसे देणार तो विद्यार्थी असा मला प्रश्न पडला होता.कारण जर गांधी श्रेष्ठ आहेत तर मग गांधी नंतर श्रेष्ठ कोण असणार…? आणि त्याचे उत्तर विद्यार्थी काय देणार….? तो तर असे म्हणू शकत नाही की,गांधी नंतर श्रेष्ठ वल्लभभाई पटेल किंवा नेहरू आहेत म्हणून...आणि अभ्यासू व्यक्ती तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव महात्मा गांधी नंतर तर कदापी घेणार नाही.मग अशा प्रश्नांना उत्तर काय तर गांधी श्रेष्ठ….! म्हणजे त्या वृत्तवाहिनीचा हाच खेळ होता की,या देशात महात्मा गांधीच श्रेष्ठ आहे असे त्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवायचे होते.त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाचे असे म्हणणे आहे की,त्या वृत्तवाहिनीचा प्रश्न चुकीचा होता.कारण आमचे असे म्हणणे आहे की,मोहन गांधी यांना या देशात श्रेष्ठ ठरविले कोणी…? याचे पहिले उत्तर त्या वृत्तवाहिनीने दिले पाहिजे होते...नाहीतर त्या विद्यार्थ्या समोर असा प्रश्न केला पाहिजे होता की,या देशात सर्वात श्रेष्ठ कोण..? तर त्याचे उत्तर देताना विद्यार्थ्यांचा संभ्रम निर्माण झाला नसता.आणि त्याने सरळ उत्तर दिले असते की,या देशात श्रेष्ठ डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत.असाच एक प्रश्न सध्या प्रधानमंत्री संदर्भात वृत्तवाहिन्यानी सुरु केला आहे.या भारत देशाचा प्रधानमंत्री २०१९ ला कोण..? बनू शकतो.नरेंद्र मोदी की राहुल गांधी की अन्य कोणी..? आता याचे उत्तर तो विद्यार्थी काय देणार तो असेच म्हणणार नरेंद्र मोदी म्हणून कारण राहुल पेक्षा उजवे नरेंद्र मोदी ठरतात आणि पक्ष बलाबल डोळ्यासमोर ठेऊन भाजपा आणि कॉंग्रेसला राष्ट्रीय स्तरावर बघितले जाते त्यामुळे अन्य व्यक्तीला मतदान त्या प्रमाणे होत नाही आणि आपल्या समोर त्या दोघांचेच नावे चालविली जातात.हा मिडीयाचा मानसिक खेळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.जर खरेच प्रधानमंत्री संदर्भात पोल घ्यायचा असेल तर मिडीयाने असे विचारले पाहिजे की,देशाचा प्रधानमंत्री बनण्याची क्षमता कोणात आहे आणि सक्षम प्रधानमंत्री कोण असू शकतो तर त्याचे विद्यार्थी नक्कीच उत्तर देईल आणि त्याचा पोल असेल प्रकाश आंबेडकर,बहन मायवती आणि शरद पवार साहेब….!


10 comments: