Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील पहिला बलुतेदार महार होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज

 

        जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येते तेव्हा तेव्हा स्वराज्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार पुढे येत असतात.परंतु हे बलुतेदार आणि अलुतेदार नेमके कोण आहेत हे सांगण्याचे धाडस कोणता इतिहास लेखक किंवा इतिहास संशोधक करताना दिसत नाही.त्याचे कारणही तसेच आहे गेल्या साडेतिनशे वर्षात जवळ जवळ साडेसहा हजार जाती निर्माण झालेल्या आहेत.त्यामुळे एखद्या जातीचे नाव घेऊन दुसऱ्या जातीला दुखवायचे नाही अशी भूमिका हे लोक घेताना दिसत असतात.परंतु असे का...? झाले आणि असे का...? होत आहे याचा विचार कोणीही करीत नाही....मी अमुक जातीचा आहे त्यामुळे मला माझ्या जातीचां गर्व आहे असे म्हणणारे आणि फक्त आपल्या जातीसाठीच काम करणारे आपल्याला सध्या राजकारणात दिसत आहे.परंतु त्याच्या जातीचा इतिहास काय आहे....? पूर्वी तो कोण होता...? याचा जो पर्यंत तो शोध घेणार नाही तो पर्यंत तो स्वराज्यातील कोणत्या बलुतेदार किंवा अलुतेदार मधून पुढे आलेला आहे हे त्याला कळणार नाही.कारण स्वराज्यात जे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार छत्रपती शिवाजी महाराज यांनी बरोबर घेतले आहेत.त्याच बलुतेदार व अलुतेदार यांनी गावगाडा उभा केलेला आहे.आता हा गावगाडा कसा उभा राहिला हे पहिले आपण समजून घेऊयात.

        दहा हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृती उदयास आली.या सिंधू संस्कृती तेथील स्त्रियांनी आपल्या हातात घेऊन कृषी संस्कृती उभी केली....म्हणजेच शेतीचा शोध लावून शेतातील बी बियाणे निर्माण केले.शेतीलां लागणारे अवजारे विकसित केली.या स्त्रीला “नेॠृती” असे म्हणत असे.या सिंधू संस्कृतीने गणराज्य पधदत अस्तित्वात आणली होती.साडेसहा हजार वर्ष ही सिंधू संस्कृती चालली आणि त्यानंतर म्हणजे साडेसहा हजार वर्षानंतर म्हणजे साडेतीन हजार वर्षापूर्वी या सिंधू संस्कृतीवर आर्यांचे आक्रमण झाले.सिंधू संस्कृती मानवतावादी संस्कुती होती.आर्यांनी आक्रमण करून ही सिंधू संस्कृती ताब्यात घेण्याचे ठरविले आणि यासाठी त्यांनी “सनातन धर्म व्यवस्था” उभी केली.या आर्यांच्या आक्रमणाला रोखण्यासाठी स्त्रियांच्या हातातील सिंधू संस्कृती पुरुषांच्या हातामध्ये आली आणि तो पहिला पुरुष म्हणजे “बळीराजा” होय.तुम्हाला याठिकाणी कोणतीही जातव्यवस्था दिसणार नाही....त्यामुळे अस्पृश्यता तर नक्कीच दिसणार नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यानंतर हजार वर्षानी म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वी सनातन धर्म व्यवस्थेतून मनूने मनुस्मृती लागू करून सिंधू संस्कृतीवर मनुवादी व्यवस्था निर्माण केली.या व्यावस्थेला मोडीत काढण्यासाठी चौवीस गण व्यवस्था उभी राहिली त्याच चौवीस गणातील एक “गण” म्हणजे “महार” गण होय.नंतरच्या काळात जो काळीमध्ये “बी” पेरायचा आणि शेती करायचा त्याला पुढे “कुणबी” म्हणून संबोधले जाऊ लागले.त्यामुळे जो “बी” पेरतो तो “बळीराजा” चे पूजन करतो म्हणून त्याला “कुणबी” म्हटले जाते.मग “बी” पेरणारा चौवीस गणातील “महार” का....? असेना त्याला “कुणबी” म्हंटले जाते.पूर्वीपासून “महार” गणाने या आर्यव्यावस्थे विरुध्द शस्त्र हातात धरले असल्यामुळे त्याला योध्दाच संबोधले जायचे ते आजपर्यंत जात आहे.आणि गौतम बुद्धांच्या काळात या गणाचे पुरावे सापडतात.

सिंधू संस्कृती मधून उभी राहिली “गावगाडा” व्यावस्था –:

सिंधू संस्कृती मधून उभी राहिलेली कृषी व्यवस्था इथल्या लोकांनी समजून घेतली आणि त्यामुळे जंगलात राहणारे लोकांना काळी आणि पांढरी समजल्यामुळे त्यांनी पांढरीवर घरे उभारली आणि काळीमध्ये “बी” पेरून शेती उभारली....आणि या दोन्ही प्रक्रियेतून “गाव” उभे राहिले आणि हे “गाव” चालविण्यासाठी उभा राहिला “गावगाडा” आणि आणि गावगाड्यामध्ये उभे राहिले “ग्रामदैवत”.....आणि हा “गावगाडा” चालविण्यासाठी पुढे आले बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार....आता हे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार कोण...? हे आपण इथून पुढे समजून घेणार आहोत.त्यातील पहिला बलुतेदार म्हणजे “महार” होय.

         कोणत्याही गोष्टीची सुरुवात मूळ व्यक्तीपासून होते...म्हणजे कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो.त्यामुळे “गावगाडा” उभा करण्याची सुरुवात “महार” या गणांने केली आहे.त्यामुळे त्या गावाची व्यवस्था उभी करण्याचे काम “महार” याने केली आहे.गावातील बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार आणि “कुणबी” यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही “महार” याने घेतली.गावातील बलुतेदार अलुतेदार यांना न्याय देण्याची जबाबदारी “महार” याने घेतली आहे.त्यामुळे गावातील शंभर ठोकळगडी बरोबर घेऊन प्रशासन व्यवस्था उभी केली.त्यामुळे जो कोणी बारा बलुतेदार मधील व्यक्ती काळीमध्ये “बी” पेरायचा तो पुढे “कुणबी” म्हणून संबोधला जायचा....अठरा अलुतेदार मधील जो कोणी व्यक्ती काळीमध्ये “बी” पेरायचा तो पुढे “कुणबी” म्हणून संबोधला जायचा..मग शेताच्या बांधावरून वाद उभा राहिल्यास तो बांध नेमका कोणाचा याचा न्यायनिवडा हा त्या गावचा प्रमुख म्हणून “महार” करायचा....या बदल्यात कुणब्या कडून तो सारा जमा करायचा आणि आपल्या गोदामात ठेवायचा...ज्या वेळेस पाऊस होयचा नाही किंवा जास्त पाऊस झाला की शेतातील पिकांचे नुकसान होई....त्यावेळेस गावचा प्रमुख म्हणून या गोदामातील अन्न हा “महार” त्या गावातील बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार यांना पुरवायचा.....गावातील ग्रामदैवत याची वर्षातील जत्रेचे तो नेतृत्व करायचा अशा प्रकारे गावगाडा चालविण्याची जबाबदारी ही त्याची असायची.त्यामुळे शंभर ठोकळगड्यांचे नेतृत्व त्याचेकडे असल्यामुळे अशा गावातील महारांना एकत्र करून मावळातील दीडशे महार एकत्र करून पंधरा हजाराची सेना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला उभी केली आहे.

No comments:

Post a Comment