Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील नववा बलुतेदार परीट होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


            सिंधू संस्कृतीच्या आधारावर जंगलातील लोकांनी गावगाड्याची निर्मिती केली आहे हे आपण आतापर्यंत समजून घेतले आहे.गावगाड्यातील काळी आणि पांढरी म्हणजे काय हे देखील आपण समजून घेतली आहे.सिंधू संस्कृतीच्या आधारावर स्त्री शक्तीला सन्मान देण्याचे काम इथल्या महापुरुषांनी केलेले आहे.सिंधू संस्कृतीवर आर्यांनी आक्रमण करून येथे सनातन धर्म व्यवस्था उभी केल्याचे आपण समजून घेतले आहे.या सनातन धर्म व्यवस्थेच्या विरोधात गौतम बुद्धांनी विद्वानाची महती,विद्वानांचे विचार आणि सिंधू संस्कृती मधील संघ आणि तेथील मानवतावादी विचार आपल्याला दिलेले आहेत.त्यांचे विचार जगात पोहचविणारे लाखो भिक्कुंची हत्या सनातन धर्म व्यवस्थेने केलेला इतिहास आपल्या समोर आलेला आहे.सम्राट अशोक पुत्रांनी संपूर्ण भारतात उभारलेल स्तूप,विहार,लेण्यामुळे गौतम बुद्धांचे विचार आजही टिकून आहेत.पंढरपुरच्या बुध्द विहारातील विठ्ठलाला साक्ष मानून उभा राहिलेला वारकरी पंथ भगवान गौतम बुद्धांनी धारण केलेल्या भगव्या वस्त्राची आजही समतेची साक्ष देत आहे.मानवतावादी विचारांवर उभा राहिलेला गावगाडा एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथयाची साक्ष देणारा बलुतेदार अलुतेदार यांच्या सामाजिक व्यवस्थेची जाण करून देत आहे.

     आजपर्यंत आपण गावगाड्यात प्रमुख असलेला बलुतेदार महार याचेकडे लष्कर असल्याचे समजून घेऊन प्रशासन व्यवस्था सांभाळीत असल्याचे पहिले आहे.संत चोखामेळा समजून घेतला.बलुतेदार क्रमांक संत भोजलिंग काका सुतार समजून घेतले आहेत.बलुतेदार क्रमांक चार मधील संत रोहिदास समजून घेतले आहेत.पाचवा बलुतेदार कुंभार समाजातील  गोरा कुंभार समजून घेतला आहे.सहावा बलुतेदार न्हावी समाजातील संत सेना न्हावी समजून घेतला आहे.तर सातवा सोनार समाजातील संत नरहरी सोनार समजून घेतला आहे.छत्रपती शिवरायांचे हेरगिरी खाते सांभाळणारा जोत्शीसमजून घेतला आहे.

      एकंदरीत काय......तर आपण गावगाड्यातील बलुतेदार यांचे योगदान समजून घेऊन त्यांनी उभारलेली कुटुंब व्यवस्था समजून घेतली आहे.तसेच त्यांनी निर्माण केलेली सामाजिक व्यवस्था समजून घेतली आहे.एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होणारा बलुतेदार समजून घेतलेला आहे.घर,वस्ती,वाडे,इमले उभारणीत असलेले योगदान समजून घेतले आहे.शेती व्यावसायात बलुतेदार यांचे असलेले योगदान समजून घेतले आहे.आज आपण नववा बलुतेदार म्हणजे परीटसमजून घेणार आहोत.गावगाड्यातील बलुतेदार व अलुतेदार यांच्या घरी लग्न समारंभात कपडे धुवण्याचे काम तो करीत असे...लग्न मंडपात नवरा नवरीच्या मध्ये चांदवा धरण्याचे तो काम करीत असे.एखाद्या बलुतेदार अलुतेदार यांच्या घरात कोणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या घरातील सुतकाचे कपडे धुवण्याचे काम तो करीत असे...परंतु या कामात शंभर लोकांचे असलेले कुटुंब या उदरनिर्वाह चालत नसे.त्यामुळे त्यातील काही लोक पुढे येऊन काळीमध्ये बीपेरून शेती व्यवसाय करून कुणबीझाले.छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्यात सहभागी होऊन स्वराज्यासाठी शस्त्रे हातात घेऊन स्वराज्याचे मावळे झाले......पुढे तेच मावळे मराठा झाले.

     आज गावगाडा उभा केलेला परीटतो त्या गावातून विस्थापित झालेला आहे....राज्यात मुठभर समाज म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे.हा समाज इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) अनुक्रमांक १२५ वर नोंद झालेला असून तो आरक्षित समाज म्हणून ओळखला जातो.... त्याची लोकसंख्या आज तुरळक असल्यामुळे राजकीय पटलावर त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही.

No comments:

Post a Comment