Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील दहावा बलुतेदार गुरव होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


 

गावगाडा हा सिंधू संस्कृतीवर उभा राहिला असल्यामुळे गावगाड्याचा आणि आर्य सनातन हिंदू धर्माचा काही एक संबध येत नाही हे प्रथम आपण समजून घेतले पाहिजे.कारण गावगाड्यात आर्य सनातन हिंदू धर्माने दिलेले ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांचे पूजन होत नसायचे.कारण त्याकाळी यांची निर्मिती झालेली नव्हती.सिंधू संस्कृतीचा प्रभाव गावगाड्यावर असल्यामुळे मातुसात्तक पद्धत अस्तित्वात असल्यामुळे गावगाड्यात स्त्री शक्तीची मान्यता होती.त्यामुळे सिंधू संस्कृतीत ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांची मंदिरे आढळून येत नाहीत.त्यानंतर गौतमी पुत्र सिध्दार्थ यांच्या काळात सुध्दा ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांची मंदिरे आढळून येत नाहीत.सम्राट अशोक यांच्या काळात सुध्दा ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांची मंदिरे आढळून येत नाहीत.त्यामुळे गावगाड्यात देखील ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांची मंदिरे आढळून येत नाहीत.त्यानंतर तेराव्या शतकात उभ्या राहिलेल्या वारकरी पंथात सुध्दा ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती यांचे अस्तित्व दिसून येत नाही.

       गावगाड्यात कुलदैवत म्हणून खंडोबाचे पूजन त्याकाळी महार करायचा....त्याच प्रमाणे मरीआई म्हणून भूमातेचे पूजन सुध्दा हा महार समाजच करायचा...कारण तो गावचा प्रमुख प्रशासक वर्ग होता.गावगाडा चालविण्याची जबाबदारी ही त्याची असायची.गावगाड्याने गावात ग्रामदैवत म्हणून भैरोबा याचे मंदिर स्थापन केलेले होते....मात्र या भैरोबाची पूजा करायचा मान गावगाड्यातील बलुतेदार क्रमांक नऊ म्हणजे गुरवसमाजाकडे असायची.गावातील कार्यक्रमांचे निमंत्रण देण्याची जबाबदरी सुध्दा गुरवसमाजाकडे असायची.म्हणजेच काय...तर गावगाड्यातील दैवक पुजण्याचे काम हे गुरवसमाजाकडे होते.......त्यामुळे गावगाड्यात आपल्याला ब्राह्मण दिसत नाही.

    ब्राह्मण म्हणजे आर्य कोकणात सातव्या शतकात आले आहेत.त्यानंतर आठव्या शतकात रचपुत आलेला आहे.कोकणात आलेल्या ब्राह्मणानी हळूहळू गावगाड्यात वर्णाश्रम धर्म व्यवस्था पेरण्यास सुरुवात केली.हळूहळू गावगाड्यामध्ये रचपुत वस्ती करून राहू लागले...त्यानंतर पैठण येथे या ब्राह्मणी व्यवस्थेने धर्मपीठ उभे केले...तेव्हा संत नामदेव महाराज यांनी या वर्णाश्रम धर्मा विरोधात तेराव्या शतकात वारकरी पंथ स्थापन करून पुन्हा एकदा समताप्रस्थापित करण्याचे कार्य सुरु केले.

     याच वारकरी पंथाला बरोबर घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून उभारलेल्या किल्ल्यावर शिवलिंग मंदिर उभी केली...परंतु ब्राह्मणी व्यवस्थेने आज त्या मंदिरावर शंकर कधीही उभा केला.छत्रपती शिवरायांनी किल्ल्यावर कधीही गणपती या देवतेचे मंदिर उभे केले नाही...कारण गणपती ही दैवता त्याकाळी अस्तित्वात नव्हती.त्यामुळे गावगाड्यातील देवतेचे पूजन करण्याचा अधिकार हा गुरव समाजाकडे होता.छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात मावळा म्हणून शस्त्रे हातात घेतली..मावळा झाल्यामुळे त्याला पुढे मराठा म्हणून संबोधले जाऊ लागले.

    आज गावगाडा उभा केलेला गुरव स्वराज्य स्थापनेत सहभागी असलेला गुरव गावगाड्यातून विस्थापित झाल्याचे दिसून येते.राज्यात मुठभर समाज म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे.हा समाज इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) अनुक्रमांक ४३ वर नोंद झालेला असून तो आरक्षित समाज म्हणून ओळखला जातो.... त्याची लोकसंख्या आज तुरळक असल्यामुळे राजकीय पटलावर त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही.

No comments:

Post a Comment