Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील अकरावा बलुतेदार कोळी होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


 

 
 

     आज आपण गावगाड्यातील अकरावा बलुतेदार म्हणजेच कोळी समजून घेणार आहोत.गेल्या दहा लेखात आपण दहा बलुतेदार कोण आहेत....आणि त्यांचे गावगाड्यातील अस्तित्व आणि योगदान काय होते ते समजून घेतले आहे.या गावगाड्यावर सिंधू संस्कृतीचा कसा पगडा होता हे समजून घेतले आहे....आणि या सिंधू संस्कृतीवर आर्यांचे आक्रमण कसे झाले हे समजून घेतले आहे.त्याचप्रमाणे या आर्यांनी या सिंधू संस्कृतीवर ताबा मिळविण्यासाठी सनातन व्यावस्था कशी निर्माण केली हे आपण समजून घेतले आहे.या सनातन व्यवस्थे विरोधात  गौतमी पुत्र सिध्दार्थ म्हणजे गौतम बुद्धांनी सिंधू संस्कृती मधील विद्वानांचा कसा सन्मान करून मानवधर्म म्हणजेच बौध्द धम्म उभा केला हे आपण समजून घेतले आहे.याच धर्माचे संस्कार गावगाड्यावर कसे निर्माण करण्यात वारकरी पंथ याच बलुतेदार आणि अलुतेदार यांनी स्थापन करून गावगावात भगव्या निशाणाखाली समताप्रस्थापित केल्याचे समजून घेतले आहे.त्यामुळे गावागावातून आजही समतेच्या बलुतेदार व अलुतेदार दिंड्या घेऊन निघत असताना आपण पहातो.

     गावगाड्यात कोळी समाजाचे महत्वाचे योगदान होते.प्रत्येक माणसाला जगण्यासाठी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते.गावगाड्यात राहत असणाऱ्या बलुतेदार आणि अलुतेदार यांच्या कुटुंबासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून ते पाणी त्यांच्या पर्यंत पखालीने पोहचविण्याचे कार्य हा कोळी करायचा.परंतु शंभर लोकांचे असणारे कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त पाणी पोहचवून होणार नाही.म्हणून त्यातील काही लोक काळीमध्ये बीपेरून शेती करायचे आणि शेती करीत असल्यामुळे पुढे त्यांना कुणबीम्हणून लागले.

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी जे गडकोट किल्ले उभे केले होते.त्या किल्ल्यावर ज्या लोकांची ज्या सैनिकांची राहण्याची सोय छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती.त्या लोकांपर्यंत आणि त्या सैनिकांपर्यंत पिण्याचे पाणी पोहचविण्याची जबाबदारी या कोळी समाजावर होती.त्याचप्रमाणे युध्द काळात लढाई करीत असणाऱ्या सैनिकांना पिण्याचे पाणी देण्याची सोय हा कोळी करीत असायचा.त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी जे समुद्री आरमार उभे केले त्यामध्ये या कोळी बांधवाचा मोठा सहभाग होता.त्यांच प्रमाणे हातात शस्त्र घेऊन स्वराज्याच्या सैन्यात सहभागी होऊन त्याने स्वराज्याची लष्कर वाढवून ते मजबूत करण्यासाठीचे मोठे कार्य केले आहे.त्यामुळे पुढे तो स्वराज्याचा मावळाम्हणून पुढे आला आणि नंतरच्या काळात या मावळ्यालाच मराठाम्हणून संबोधले जाऊ लागले.त्यामुळे मराठा दुसरा तिसरा कोणी नसून तो या बलुतेदार आणि अलुतेदार पैकीच आहेच हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

       प्रबोधनकार ठाकरे यांनी सिंधू संस्कृतीमधून उभा राहिलेला बौध्द धम्म आणि  हां बौध्द धम्म आनंतकाळा पर्यंत टिकून रहावा यासाठी सम्राट अशोक पुत्रांनी उभी केलेले बुध्द विहार, स्तूप,लेण्या डोळ्या समोर ठेऊन कारल्याची लेणी येथील गौतम बुद्धांच्या विचारांची प्रतिमेची आणि महामायेच्या कार्यकौशल्याची ओळख देणारी आणि गौतम बुद्धांना जन्म देण्यासाठी एकटी संघर्ष करणारी महामायालोकामध्ये पोहचविली.अशा ठिकाणी कोळी बांधवांसाठी असणारी कुलदैवत म्हणून एकविराअसे स्थान निर्माण केले आहे.आज ही एकविराहे ठाकरे घराण्याचे कुलदैवत म्हणून त्याला मान्यता आहे.परंतु नंतरच्या काळात कर्मकांड नुसार याठिकाणी चालीरीती करून आर्य सनातनी हिंदू धर्मयाचा पगडा याठिकाणी निर्माण केला गेला आहे.

           आज गावगाडा उभा केलेला कोळी स्वराज्य स्थापनेत सहभागी असलेला कोळी गावगाड्यातून विस्थापित झाल्याचे दिसून येते.समुद्री किनारी मासेमारी करून मुंबईचा रहिवासी आज मुंबई शहरातून मोठ्या प्रमाणात विस्थापित झालेला आहे.मासेमारी करण्यासाठी स्थापन झालेल्या कंपन्यामुळे त्याला मनासारखी मासेमारी करता येत नाही.हा समाज विशेष  मागास प्रवर्गातील (एसबीसी) अनुक्रमांक ४ वर नोंद झालेला असून तो आरक्षित समाज म्हणून ओळखला जातो.... त्याची लोकसंख्या आज तुरळक असल्यामुळे राजकीय पटलावर त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही.त्याच प्रमाणे हा कोळी समाज काही ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील (एसटी) अनुक्रमांक २८,२९,३० वर नोंद झालेला असून तो आरक्षित समाज म्हणून ओळखला जातो.

 
 

No comments:

Post a Comment