Tuesday, January 8, 2019

साहेब कॉंग्रेस धोका देणार....पण वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि मतदार आपल्या शब्दाबाहेर नाही....! राजेश खडके सकल मराठी समाज

 
 
                              भीमा कोरेगाव हल्ल्यानंतर वंचित घटकासाठी आता एकच विश्वास म्हणजे आदरणीय बाळसाहेब आंबेडकर असे समीकरण झाले आहे.यातच आता तिसरा पर्याय म्हणून देशातील जनता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी संघटना यावर विश्वास ठेवताना दिसत आहे.त्यामुळे इतर राजकीय पक्ष आता पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत आहेत.त्यामुळे इथली बामणी व्यावस्था मोठ्या प्रमाणात कामाला लागलेली दिसत आहे.सुरुवातीपासून कॉंग्रेसने नेहमी वंचित घटकांना गुलाम केल्याची परिस्थिती संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे.आरक्षित जागेतून समाजाचा प्रतिनिधी निवडणून येत नाही तर गुलाम निवडून येतो असे सुतोवाच आपण केले आहे.यातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेस हे जळते आहे असे म्हणाले होते.त्यामुळे नेहमीच सत्तेपासून आंबेडकरी पक्ष दूर ठेवण्याचे कटकारस्थान कॉंग्रेस पक्षाने केले आहे.यातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कॉंग्रेसने निवडणुकीत पराभव करून आपल्याही विरोधात षड्यंत्र करून आपल्यालाही पराभूत केले आहे.त्यामुळे यंदाची निवडणूक ही आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याच्या विश्वासहर्तेची निवडणूक असुन काँग्रेसी राजकारण हा विश्वास कसा संपेल याचे षड्यंत्र आखीत आहे.त्यामुळे इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते यांना संसदीय निवडणुकीच्या राजकारणात उतरून पक्ष बांधणी करावी असे जाणकारांचे मत आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडी बरोबर जुळणारा घटक नेहमी जोडता ठेवल्यास महाराष्ट्र राज्यातील सत्ता समीकरणे बदलून त्याची चावी आंबेडकरी जनतेच्या हातामध्ये येईल असे जाणकारांचे मत आहे.कॉंग्रेस हा धोका देणारा पक्ष असल्याचे मत आता आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचे झालेले आहे.त्यामुळे तो धोकाच देणार.....! असो शेवटी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहात आणि गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण करीत आहात.सकल मराठी समाजाचे एवढेच म्हणणे आहे की,तयार झालेला मतदार हा वंचित असून त्याचा हिरमुस होऊ नये हीच अपेक्षा....!
धन्यवाद

No comments:

Post a Comment