Wednesday, January 30, 2019

आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाकडे पाहून वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठींबा द्यावा…! रिपब्लिकन चळवळीला चांगले दिवस येत आहेत….! सकल मराठी समाज राजेश खडके.

शिव-फुले-शाहू-आंबेडकर जनतेचा मूड सध्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाकडे पाहून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री पदावर पहाण्याचा आहे.त्यामुळे त्यांना आता रोखणे कठीण झालेले आहे.त्याचे कारण असे आहे की,गेल्या ७० वर्षामध्ये अशी संधी रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकार्त्यच्या हातामध्ये आली नव्हती ती २०१९ च्या माध्यमातून आलेली आहे त्य्यामुळे तो ही संधी सोडेल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत नाही.एकंदरीत मायवती यांचे उत्तर प्रदेश मधील राजकारण पहाता त्यांनी प्रधानमंत्री कसे होता येईल याचीच रणनीती आखलेली आहे.त्यामुळे त्यानी अखिलेश यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचे वचन दिलेले आहे.त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून मायावती यांना वंचित बहुजन आघाडीची गरज म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची गरज दिल्लीमध्ये लागणार आहे.त्यांमुळे मायावतींचा कल हा महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील हे पाहण्याचा आहे.त्यामुळे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री व्हावेत असेच आश्वासन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेले आहे..त्यामुळेच त्यानी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठींबा दिल्याचे चित्र महाराष्ट्रातील जनतेसमोर स्पष्टपणे दिसत आहे.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन जनतेसाठी मोठा त्याग केला आहे यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही..परंतु त्या त्यागापोठी त्यांनी सत्तेची फळे चाखली असल्याचे सर्वांनाच माहित आहे.आता रिपब्लिकन जनतेने आठवले यांना असे आवाहन केले आहे की,२०१९ हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीचे साल आहे आणि याची जाण इथल्या आंबेडकर अनुयायी यांना झालेली आहे.त्यामुळे जसा मायावती यांनी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठींबा दिलेला आहे तसा पाठींबा रामदास आठवले यांनी द्यावा.त्यामुळे एकही रिपब्लिकन पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात जाईल असे वाटत नाही.जर तसा कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी जनता त्याला माफ करेल असे वाटत नाही.त्यामुळे रामदास आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाकडे पाहून वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठींबा द्यावा असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.;

1 comment:

  1. बहुजनांचे सरकार असणे ही काळाची गरज आहे... सर्वांनी सहकार्य करावे

    ReplyDelete