Monday, January 28, 2019

Tv9 ला दिली ५०० कोटीची नोटीस….म्हणून Tv9 करते वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात प्रचार आणि दंगल भडकाविण्याचे काम….? राजेश खडके सकल मराठी समाज


एकंदरीत पहाता लोकशाही मजबूत राहवी म्हणून चौथा खांब म्हणून पत्रकारिता करणाऱ्या मिडीयावर प्रामणिक जबाबदारी आहे.परंतु जसे इलेक्ट्रोनिक मिडीयाचा बाजार सुरु झाला तसे या क्षेत्रात व्यवसायाने मोठ्या प्रामाणात तोंड घातले आहे.पत्रकारिता हा क्रांतीचा खूप मोठा पर्याय आहे याची जाणीव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला करून दिलेली आहे.त्यामुळे आपल्या स्वत:चे पत्रकारिता माध्यम उभे करा असे त्यांनी स्वत: प्रात्यक्षिक करून दाखविलेले आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुध्द भारत पुन्हा सुरु करून त्याचा लाईव्ह बेब चायनल सुरु करून त्यांची स्पष्ट भूमिका जनतेपर्यंत पोहचवत आहेत.त्यामुळे Tv9 हे मिडीया माध्यम लोकांच्या समोर उघडे पडत चालले आहे.आता प्रश्न असा पडलेला आहे की,Tv9 असे वागत आहे...तर त्याचे कारण असे आहे की,या भाजप सरकारने या Tv9 ला ५०० कोटी दंड करून तो भरण्यास सांगितलेला आहे.त्यामुळे एक मध्यम मार्ग म्हणून वंचित बहुजन आघाडीचा प्रचार रोखण्याचे काम Tv9 ला मिळाले आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या विरोधातील जास्तीत जास्त खोट्या बातम्या प्रसारित करण्याचे कार्य या Tv9 ने सुरू केले असल्याचे आता स्पष्टपणे जाणवत आहे.यातच देशात दंगल घडवून पुन्हा एकदा भाजपा सरकारला सत्तेत यायचे आहे.त्यामुळे भाजपा या Tv9 चा उपयोग करीत आहे….? असा आमच्या सकल मराठी समाजाचा प्रश्न आहे त्यामुळे भिवंडी शहर हे संवेदनशील असून समाज शांतता बिघडवून कायदा सुव्यावस्था बिघडविण्याचे काम हे Tv9 चायनल करीत असल्याचे दिसून येते.त्यामुळे वेळीच Tv9 च्या खोट्या प्रसारित होणाऱ्या बातम्या संदर्भात आवाज उचलणे गरजेचे आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

1 comment:

  1. नक्कीच सर टीव्ही ९ विरोधात
    आंदोलन उभे झाले पाहिजे
    सुजान नागरिकांनी रस्त़्यावर यायला पाहिजे

    ReplyDelete