Monday, January 14, 2019

आंबेडकर यांची अकोल्याची उमेदवारी कॉंग्रेसची खेळी का आंबेडकर यांची युती…? वं.ब.आ. च्या कार्यकर्त्याला व मतदाराला पडलेला प्रश्न -: राजेश खडके सकल मराठी समाज




                 कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभेचा प्रचार सुरु केला आहे.एमआयएम बरोबर वंचित बहुजन आघाडी तयार केल्यानंतर या दोन्ही पक्षाला मोठा झटका बसलेला या संपूर्ण महाराष्ट्र राज्याने पाहिला आहे.त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीसाठी १२ जागांचा प्रस्ताव सादर करून महाराष्ट्र राज्यात दिवस रात्र फिरून कष्ट करून सभांचा धडाका सुरु केला आहे.वंचित बहुजन आघाडीची राज्यात एवढी मोठी चर्चा झाली की,सभेला लाखोंची संख्या वाढली आहे असे असताना या लाखोच्या गर्दीच्या सभेमधून ओवीसी गायब झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.त्यातच बाळासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांची भेट घेतली आहे.याचाच फायदा कॉंग्रेसने घेऊन वंचित बहुजन आघाडीचा १२ जागांचा प्रस्ताव फेटाळला असल्याचे जाणकार यांचे मत आहे.कारण छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे असल्यामुळे बाळासाहेबांनी महाआघाडीत जाण्यासाठीचे रस्ते खुली केली आहेत …? असा प्रश्न जाणकारांनी दावा होता आणि हा दावा कॉंग्रसने जाहीर केलेल्या उमेदवारी वरून तरी निश्चित झाल्याचे दिसत आहे.परंतु आंबेडकर जाणकारांचे असे मत आहे की,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन आंबेडकर यांनी कॉग्रेसला येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणा बरोबर असेल असा डाव टाकल्यामुळे ही उमेदवारी कॉंग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी जाहीर केली आहे.तसेच जाणकार असे म्हणतात की,प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातूनच उमेदवारी लढत असतात त्यामुळे त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता भ्रमित होणार नाही.कारण सोलापूर येथील कार्यकर्त्यांचे मत असे आहे आंबेडकर यांनी आमच्याकडून निवडणूक लढवावी.पण आमच्या सकल मराठी समजाचे असे मत आहे की,एमआयएम प्रमुख ओवीसी यांचा नाराजीचा सूर आहे आता कॉंग्रसच्या खेळी मुळे ते नाराज आहेत की भेट अस्त्रामुळे नाराज आहे परंतु आमच्या म्हणण्या प्रमाणे ओवीसी हे आंबेडकर यांनी घेत्लेलेया भूमिकेमुळे नाराज आहे.कारण एमआयएम हा वंचित बहुजन आघाडीतील महत्वाचा घटक आहे त्याला विश्वासात घेऊनच आंबेडकर यांनी बीड नाशिक आणि म्हाडा येथील उमदेवारी जाहीर करणे गरजेचे होते त्यातच पश्चिम महाराष्ट्र मधून त्यांचेशिवाय मुस्लीम उमेदवार जाहीर करणार असे त्यांनी बोल्यामुळे ओवीसीची सभांना गैरहजेरी लागत आहे.एकंदरीत राजकीय जाणकारांचे असे म्हणणे आहे की,आबेडकर यांच्या जाहीर सभांचा आढावा घेतला असता आणि त्या सभांच्या भाषणाचे अवलोकन केले असता स्पष्टपणे असे दिसून येते की,प्रकाश आंबेडकर यांची कॉंग्रेस बरोबर झालेली युती असल्यामुळे अकोल्यातून प्रकाश आंबेडकर असतील असे जाहीर केलेल्या उमेदवार यादीतून दिसून येते.














3 comments:

  1. वंचित बहुजन आघाडी पोरा, खुशाल कोंबडी दाबून धरा...

    ReplyDelete
  2. वंचित बहुजन आघाडी सत्तेत येणार पोरा, खुशाल कोंबडं दाबून धरा...

    ReplyDelete