Sunday, July 31, 2011

गटाने दिली प्रगतीची वाट

सायखेडे हे लहानशे आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. गावांची लोकसंख्या ४०० ते ५०० आहे. गावात माविम अंतर्गत ६ गटाची स्थापना करण्यात आली. माविमचे काम सन २००६ पासून या गावात चालू आहे. महालक्ष्मी गटाची स्थापना ऑक्टोंबर २००६ ला झाली. गटात एकूण १४ महिला आहेत. गटाची मासिक बचत ५० रुपये आहे. 

आज प्रत्येक सभासदांची एकूण बचत २७०० रुपये झाली आहे. गटाचे वय ५ वर्ष आहे. गटातून लहान-मोठ्या अडचणी भागविल्या जातात. त्याच बरोबर उद्योग सुरु करण्यासाठी सुध्दा गटातून कर्ज दिले जाते. त्याप्रमाणे सुधा कोडापे या महिलेने उद्योजकता प्रशिक्षणातून प्रेरणा घेवून त्यांनी किराणा दुकान सुरु करण्याचे ठरविले. घरात दोन व्यक्ती आहेत. उत्पन्न मिळविण्याकरीता दुसरे साधन त्यांच्याजवळ नाही.

गटातून त्यांनी २ एप्रिल २०१० ला १२००० रुपये कर्ज घेवून लहानशे किराणा दुकान लावले. सुरुवातीला दुकानात जास्त कोणी येत नव्हते, विक्री बरोबर व्हायची नाही. त्यामुळे सुरुवातील त्या नाराज झाल्या. परंतु गटाच्या हिंमतीने व सहयोगीनीच्या मार्गदर्शनाने त्यांना बळ दिले. हळूहळू त्यांचे ग्राहक वाढू लागले.

आज त्यांनी गटाची पूर्ण कर्ज परतफेड केली. दुकानांमुळे त्यांच्या दोन व्यक्तीचा कुटूंब निर्वाह चालू लागला.दुकानाच्या भरवशावर गटात मासिक बचत भरतात. गटाचे कर्ज परतफेड केले.त्यांना हृदयाच्या झडपेचा आजार असून स्वत: दवाखाना करतात.त्या खंबीरपणे दुकानाचा व्यवसाय सांभाळत आहे. त्या नेहमी म्हणतात. मला माविमने खूप आधार दिला.आज गटामुळे मला दोन वेळचे जेवण आरामात मिळू लागले आहे. मला गटातून खूप शिकायला मिळाले, नविन ज्ञान मिळाले .गटामुळे मला चांगले वाईट कळायला लागले. माविममुळेच मी घडू शकली, गटामुळे माझी प्रगती होऊ शकली.

No comments:

Post a Comment