Saturday, March 16, 2019

प्रस्थापित मराठा घराणेशाहीतील सुप्रियाताई सुळे विरुध्द वंचित घटक धनगर समाजातील नवनाथ पडळकर असा सामना बारामती मतदार संघात रंगणार…! राजेश खडके सकल मराठी समाज


बारामती मतदार संघाचा आभ्यास केल्यास इतिहासाकडे गेल्याशिवाय वर्तमानात काय करावे हे कळत नाही.बरेच लोक म्हणतात इतिहासात रमणारे वर्तमानात काम करू शकत नाही त्यामुळे इतिहासात न रमलेले बरे…! पण हे सर्व चूक आहे असे आम्ही मानतो.कारण इतिहास हा सिंधू संस्कृतीचा आहे,इतिहास हा गौतम बुद्धांचा आहे,इतिहास सम्राट अशोकांचा आहे,इतिहास हा वारकरी सांप्रदाय यांचा आहे,छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा आहे, इतिहास हा महार योध्यांचा आहे,इतिहास हा महात्मा ज्योतिबा फुले,शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे.आणि जो पर्यंत यांचा अभ्यास होत नाही तो पर्यंत वर्तमान कळत नाही.जेथे जेथे इतिहास घडलेला आहे तेथे तेथे विकास झालेला नाही आणि जो जो इतिहासात चांगल्या कार्यात सहभागी झालेला आहे त्याला वंचित ठेवण्यासाठीचे कार्य इथल्या मनुवादी व्यवस्थेने केले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.बारामती मतदार संघाचा आभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की,भोर-वेल्हा आणि खडकवासला असा ऐतिहासिक भाग या मतदार संघात येतो.याच मतदार संघात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अलुतेदार आणि बलुतेदार यांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले.स्वराज्याचे पहिले तोरण म्हणून वेल्ह्यातील प्रचंडगड ताब्यात घेऊन स्वराज्याचे पहिले तोरण उभारून त्याचे नामकरण तोरणागड केले आहे.याच मतदार संघात स्त्रीची बेअबदा झाली म्हणून गुजर पाटलाचे हातपाय कलम केले आहे.याच मतदार संघात राजगड उभारून तेथून स्वराज्याचा २२ वर्षे कारभार शिवरायांनी चालविलेला आहे.त्यामुळे आजही या मतदार संघातील स्वराज्य उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या वंशाजाचा विकास आजपर्यंत झालेला नाही.१९८४ पासून हा मतदार संघ बारामतीचे शरद पवार यांचेकडे आहे.आज त्याच्या कन्या या मतदार संघातील खासदार आहे.धनगर समाजाचा खूप मोठा स्वराज्यात इतिहास आहे.या समाजातील २५ तरुणानी जेरबंद छत्रपती संभाजी महाराज यांची सुटका करण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती दिलेली आहे.हा अजरामर इतिहास असून आजही या ऐतिहासिक स्थळाचा विकास केला जात नाही.इथल्या वंचित घटकांना कोणताही रोजगार उपलब्ध करू दिला जात नाही.इथले तरूण आजही हमाली करीत आहेत.चौकीदार म्हणून मोठ्या प्रमाणात इथला वर्ग बाहेर गावी काम करत असतो.स्वत;च्या विकासाची स्वत: संधी शोधत असतो.या मतदार संघात धरणे असताना इथल्या शेतीला पाणी दिले जात नाही.पावसाळी शेतीवर इथल्या शेतकरी यांना जगावे लागत आहे.इथल्या शेतकरी यांच्या जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही.इथल्या गोरगरीब लोकांच्या कवडीमोल भावाने जमिनी लाटल्या गेलेल्या आहेत.या मतदार संघात पवार नावाची दहशत असल्यामुळे इथला मतदार दुसऱ्याला मतदान करण्यास घाबरत असतो.परंतु प्रकाश आंबेडकर यांनी याच मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची सभा घेऊन ती दहशत कमी केलेली आहे.याच मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने धनगर समाजाचे नवनाथ पडळकर यांना सुप्रियाताई सुळे-पवार यांचे विरोधात उमेदवारी दिलेली आहे.त्यामुळे इथल्या अलुतेदार आणि बलुतेदार यांना एक बळ मिळालेले आहे.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत न भिता तो वंचित मतदार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पारड्यात भरघोस मते घालून प्रचंड मताने विजयी करणार आहे.त्यामुळे सकल मराठी समाजाचे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की,या धनगर समाजाच्या वंचित घटकातील नवनाथ पडळकर यांची लढाई येथील प्रस्थापित मराठा घराणेशाहीतील सुप्रिया सुळे यांचे बरोबर आहे.त्यामुळे कार्यकर्त्यानी मजबूतपणे नवनाथ पडळकर यांचे कार्य करून त्यांना संसदेत पोहोचवावे.

10 comments:

  1. वंचित बहुजन आघाडी

    ReplyDelete
  2. पडळकर साहेब यांचा विजय नक्की होणार

    ReplyDelete
  3. वंचित बहुजन आघाडी

    ReplyDelete
  4. जय भिम जय मल्हार जय मिम..जय शिवराय

    ReplyDelete
  5. वंचित बहुजन आघाडी ला प्रचंड बहुमताने विजयी करा🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

    ReplyDelete