Sunday, March 17, 2019

कोळसे-पाटलांना आंधळ्या प्रेमामुळे शरद पवारांनी फसविले आणि संपविले….वंचित बहुजन आघाडीचा खरा शत्रू आरएसएस….! राजेश खडके सकल मराठी समाज


          प्रश्न असा आहे की,वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार पहाता प्रस्थापित मराठा संपूर्ण महाराष्ट्रात एकटा पडलेला दिसत आहे.प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच अलुतेदार आणि बलुतेदार यांना बरोबर घेऊन १५९ घराणेशाहीला दणका दिलेला आहे.कारण हीच घराणेशाही इथल्या आरएसएस वाल्यांना संरक्षण देण्याचे काम करत आहे…..याला उदाहरण द्यायचे झाले तर जयंत पाटलांचे आपल्याला देता येईल कारण याच घरामध्ये संभाजी भिडे पडून असतो.मिरजच्या झालेल्या दंगलीमध्ये भिडेला कोणी वाचविले हे कोणाला सांगायची गरज नाही असे आमच्या सकल मराठी समजाला वाटत आहे.शरद पवार हे पुर्व्रीपासून सावरकर समर्थक राहिलेले आहेत.महाराष्ट्राचा विकास करीत असताना त्यांनी इथली संस्कृती शिल्लक ठेवली नाही.पाश्चत्य संस्कृतीचे दर्शन यांनी याच आरएसएसवादी यांच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला दिले आहे असो इथे हा विषय नाही.इथे विषय आहे तो कोळसे-पाटील यांचा आता कोळसे पाटील का फसले तर त्यांना लोकसभेत जायचे आहे.आणि लोकसभेत गेल्यावर प्रधानमंत्री म्हणून शरद पवार यांना सपोर्ट करायचा आहे.त्यामुळे कोळसे-पाटील यांना वाटले आपण वंचित बहुजन आघाडी बरोबर राहिल्यास त्यांना महाआघाडीत सामील करून घेऊ आणि असे झाल्यास आपण निवडून जरी आलो नाही तरी आपली वर्णी राज्यासभेवर पवार साहेब लावतील असा शब्द पवार साहेब यांनी कोळसे-पाटील यांना दिलेला आहे.परंतु प्रामणिक असे प्रकाश आंबेडकर यांनी कोळसे-पाटील यांना वंचित बहुजन आघाडीची औरंगाबादची उमेदवारी दिली परंतु त्यांना ही उमेदवारी जनता दल (एस) कडून हवी होती.त्यांच्या या हट्टाला बाळासाहेबानी समर्थन दिले आणि वंचित बहुजन आघाडीचा त्यांच्या उमेदवारीला पाठींबा जाहीर केला.असे असताना त्यांचा हा हट्ट होता की, लाचारी करून कॉंग्रेस बरोबर आघाडी करा..परंतु प्रकाश आंबेडकर त्यांना सांगत होते की जो पर्यंत कॉंग्रेस आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा प्रस्ताव देत नाही तो पर्यंत त्यांच्या बरोबर आघाडी करता येणार नाही.कॉंग्रेसने कोणताही प्रस्ताव तसा वंचित बहुजन आघाडीला दिला नाही त्यामुळे ही आघाडी होऊ शकली नाही.परंतु कोळसे-पाटील यांची गोची ही झाली की,पुण्यात शिवमहोत्सव कार्यक्रमावेळी एकच मंचकावर शरद पवार आणि कोळसे-पाटील उपस्थित होते.उपस्थित भाषणांत कोळसे-पाटील यांनी पवार साहेबांना प्रधानमंत्री पदासाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबाच जाहीर केला.आता असे चालेल काय…? कारण ओवीसी आणि २६० संघटनानी प्रकाश आंबेडकर यांना वंचित आघाडीचा प्रमुख केला आहे.तरीही प्रकाश आंबेडकर हे कोळसे-पाटील यांना काही बोलले नाही राजकारण म्हणून विषय कानामागे टाकला.परंतु कोळसे-पाटील यांची खरी गोची केव्हा झाली जेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी बारामती मधून सुप्रिया सुळे-पवार यांचे विरुध्द नवनाथ पडळकर (धनगर) आणि मावळ मधून पार्थ पवार विरुध्द राजाराम पाटील (आगरी कोळी) यांची उमेदवारी जाहीर केले तेव्हा..कारण ह्या दोन्ही उमेदवारी अडचणीत आली त्यामुळे पवार साहेब कोळसे-पाटील यांना म्हणाले तुम्ही तर मला प्रधानमंत्री करायला निघाले आहेत परंतु माझ्या घरातील दोन उमेदवार धोक्यात आले त्याचे काय…? आता पवार साहेबांना शब्द दिला होता तो तर कोळसे-पाटील यांना पाळायचा होता कारण तो शब्द जर पाळला नाही तर आपल्याला राज्यसभेवर जाता येणार नाही.प्रकाश आंबेडकर यांचेवर बोट उचलण्याची कोणाची हीमत नाही परंतु कोळसे-पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे चांगले मित्र असल्यामुळे ते त्यांना बोलू शकत होते.परंतु इतक्या वर्षे प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर राहून देखील कोळसे-पाटील हे त्यांना ओळखू शकले नाही.बारामती आणि मावळ लोकसभा मतदार संघात उमेदवार देऊ नका असा हट्ट कोळसे-पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचेकडे धरला होता.परंतु समाजाला बांधील असणारे प्रकाश आंबेडकर आपल्या आजोबांच्या विचरा विरोधात जाऊ शकत नाही.परंतु पवार साहेबांना शब्द दिलाय तो तर पूर्ण करायचा आहे.मग दुसरे हत्यार पवार साहेबांच्या आंधळ्या प्रेमापोटी कोळसे-पाटील यांनी बाहेर काढले आणि ते म्हणजे बदनामी…! एवढा चांगला प्रामाणिक मराठा माणूस आंधळ्या प्रेमात पडला आणि त्या प्रेमापोटी आयुष्यभर कमाविलेले धुळीत घालून बसला.ज्या आरोपाला काही अर्थ नाही असे आरोप करून ते फसले आणि संपले…! म्हणून आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे की,कोळसे-पाटलांना आंधळ्या प्रेमामुळे शरद पवारांनी फसविले आणि संपविले….वंचित आघाडीचा खरा शत्रू आरएसएस….!

9 comments: