Wednesday, March 20, 2019

प्रकाश आंबेडकरामुळे धोक्यात आलेल्या बामणी व्यवस्थेला वाचविण्यासाठी कॉंग्रेस आणि मराठा पुढे सरसावले…! चर्मकार समाजाला मिळाली आहे एक संधी…! राजेश खडके सकल मराठी समाज


           एकंदरीत संपूर्ण देशाचे राजकारण पहाता हा देशच बदल्यासाठीचा कार्यक्रम आरएसएसने मोदी-शहाच्या माध्यमातून सुरु केलेला आहे.देशातील सामान्य नागरिकाचे भवितव्य किती भयंकर असणार आहे याची त्याला जाण नाही.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ही धोक्याची घंटा ओळखलेली असल्यामुळे आरएसएस प्रणीत भाजप आणि कॉंग्रेस यांना सपोर्टर असणारा ओबीसी समाज जागृत करून त्यांचा कार्यक्रम थांबविण्याचे मोठे कार्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती अंताची लढाई जरी उभी केली आहे.त्यामध्ये इथल्या मागास जातींचे सर्वेक्षण करून त्यांना शेड्युल्ड ठरवून देऊन ते म्हणाले होते की ज्या वेळेस इथला मागासवर्ग जातीयनिहाय समाज जागरूक होईल तेव्हा तो त्याचे अस्तित्व शोधू लागेल आणि त्याला ज्या दिवशी आपल्या अस्तित्वाचा शोध लागेल त्यादिवशी इथली बामणी व्यवस्था कोलमडून पडेल.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी जातीयनिहाय उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात उभे करून त्या जाती जागरूक केल्या आहेत.त्या संपूर्ण जाती जागरूक झाल्यामुळे खरेच बामणी व्यावस्था आज धोक्यात आलेली आहे.त्यामुळे या बामणी व्यवस्थेला वाचविण्यासाठी इथली कॉंग्रेस आणि मराठा पुढे सरसाविलेला आहे.
कॉंग्रेसची निर्मिती बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी १८८४ मध्ये हिंदू महासभेतून केलेली आहे.ह्या कॉंग्रेसचे एकच देह होते आणि ते म्हणजे इथल्या ब्रिटीश प्रशासनात बामणी व्यावस्था उभे करून ती मजबूत करून इथल्या भारतावर आपले एकाधिकार प्रशासन व्यावस्था निर्माण करायची आणि ही प्रशासन व्यवस्था मजबूत करण्यासाठी आयबी ही गुप्तचर यंत्रणा १८८७ मध्ये त्यांनी उभी केलेली आहे.परंतु स्वतंत्र भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या आयबीला संविधानात्म्क दर्जा दिलेला नाही परंतु आजही ही यंत्रांना सुरु असून या यंत्रणेला नागपूरच्या संघ कार्यालयातून चालविले जात आहे.
इथला ओबीसी याला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांचेनंतर याच बामणी व्यवस्थेने घराणेशाही निर्माण करून त्या घराणेशाहीचा दबदबा गावपातळी निर्माण करून त्या घराणेशाहीवर बामणी व्यवस्थेने ताबा निर्माण केलेला आहे.पेशवाई काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या लढवय्या वर्गाला “मराठा” जात नावाचे लेबल लावण्यात येऊन त्याला अज्ञातवासात ठेवण्यात आले. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्य कर्तुत्वामुळे इथला मागासवर्ग जागरूक झाला आणि तो समतेच्या लढाईत सहभागी झाला.
इथल्या टिळक कॉंग्रेसने ब्रिटीश प्रशासनावर दबाव टाकून इथल्या प्रशासन व्यावस्था बामणी व्यवस्थेच्या ताब्यात घेण्याचे कार्य सुरु झाले.त्यामुळे इथाल्या घराणेशाहीला आपल्या ताब्यात घेऊन धार्मिक खेळ उभा करून संपूर्ण देशात मनुस्मृतीची अमलबजावणी सुरु केली.परंतु टिळकांच्या मृत्यूनंतर इथली कॉंग्रेस मोहन करमचंद गांधी यांच्या ताब्यात आली.आणि इथला ओबीसी त्यांनी जागरूक करून संपूर्ण देशात घरोघरी ती कॉंग्रेस पोचविण्यात आली.त्यामुळे जागरूक झालेल्या इतर समाजामुळे हिंदू संकप्लना धोक्यात येणार असे ज्यावेळेस टिळक समर्थकांना वाटले.आणि ज्या वेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन करून त्यांचे पुढील कार्य सुरु केले तेव्हा इथल्या बामणी व्यवस्थेच्या लक्षात आले की,इथला अस्पृश्य व्यक्ती जागरूक झाला तर पुन्हा आपण संकटात येऊ म्हणून त्या समता सैनिक दलाला प्रतिरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएस या संघटनेची स्थापना कॉंग्रेस मधून बाहेर पडून केशव बळीराम हेगडेवार यांनी केली.पुढे जागरूक झालेला ओबीसी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जागरूक केलेला अस्पृश्य यांच्यासाठीचा संघर्ष उभा राहिला.आणि याच आरएसएस वाल्यांनी व्दिराष्ट्र धर्म संकल्पनेतून महात्मा गांधी यांची हत्या केली.त्यामुळे इथे दोन विचारांचा ओबीसी उभा राहिला एक गांधीवादी आणि दुसरा संघवादी..!
इथला गांधीवादी ओबीसी हा संघवाद्याला महात्मा गांधी यांचा हत्यारा समजत असल्यामुळे तो त्याचेकडे कधी आकर्षित होत नाही.परंतु त्या गांधीवादी ओबीसी वाल्याला हे माहित नव्हते की,गांधी हत्यानंतर इथली कॉंग्रेस ही आरएसएस वाल्यांनी ताब्यात घेतली आहे.परंतु त्या गांधीवादी ओबीसीला जागरूक करण्याचे काम प्रकाश आंबेडकर यांनी केल्यामुळे तो या कॉंग्रेस मधून आणि भाजपा मधून बाहेर पडून तो प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात उतरलेला आहे.त्यामुळे इथला मागास,इतर मागास,दलित,मुस्लीम एकत्र करून प्रकाश आंबेडकर यांनी इथली बामणी व्यवस्था धोक्यात आणलेली आहे.आणि ही बामणी व्यावस्था खरोखरच धोक्यात आल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा ही सत्ता हातात मिळविण्यासाठी आपले स्वीपरसेल बाहेर काढले आहेत.त्यामुळेच कॉंग्रेस संपूर्ण देशात भाजपला फायदा कसा होईल असे काम त्यांनी सुरु केले आहे.परंतु प्रकाश आंबेडकर यांनी हा काँग्रेसी खेळ हाणून पाडल्यामुळे इथल्या कॉंग्रेसने आणि सावरकर समर्थक शरद पवार यांनी या महाराष्ट्रात असे वातावरण निर्माण केले आहे की,घराणेशाहीला राजकीयदृष्ट्या नाराज करून त्यांना भाजपाकडे जाण्यास कळत न कळत भाग पाडले आहे.
एकंदरीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात दिलेले उमेदवार हे कमजोर उमेदवार देऊन त्याची सरशी केलेली आहे.सध्या पोटाला भागेल एवढेच खायचे असे धोरण कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांनी सुरु केलेले आहे.त्यामुळे स्वघरातील व्यक्तींना प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात टीका करून प्रकाश आंबेडकर यांनी जागरूक केलेला समाज भटकाविण्याचे काम सुरु झालेले आहे.छत्रपती शिवराय यांना मानणारा मराठा वंचित बहुजन आघाडी पासून दूर सारण्यासाठी बी जी कोळसे-पाटील यांचा वापर शरद पवार यांनी केला आहे.
बहन मायावती यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात बीएसपी पक्षाचे उमेदवार उभे करायला लावून शरद पवार यांनी इथल्या चर्मकार यांच्या मतांचा प्रश्न मार्गी लावलेला आहे.हा चर्मकार समाज कधीही फुले-शाहू-आंबेडकर विचाराला प्रामणिक न रहाता स्वत:च्या फायद्यापुरता आंबेडकर समर्थक राहिलेला आहे.आज या समाजाला खरेच प्रामणिक रहाण्याची संधी प्राप्त झालेली आहे.त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.आज जर चर्मकार समाज प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राहिला नाही.तर भविष्यात त्याला ही संधी कधीही प्राप्त होणार नाही,त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी उभा केलेला बामणी व्यवस्थेचा लढा हा निर्णायक वळणावर असल्यामुळे सर्वानी त्यांना साथ दिली पाहिजे. त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे की,प्रकाश आंबेडकरामुळे धोक्यात आलेल्या बामणी व्यवस्थेला वाचविण्यासाठी कॉंग्रेस आणि मराठा पुढे सरसावले…! चर्मकार समाजाला मिळाली आहे एक संधी…!

7 comments:

  1. अगदी समर्पक मांडणी व ओबीसी, बहुजन समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख.

    ReplyDelete
  2. वंचित बहुजन आघाडी

    ReplyDelete
  3. Khadke sir aple jevha hi lekh read karto tr yek khara manus aplyat disto sir maratha kranti morcha ne jr ka balasahebana suport kela tr tyana konich roku Shankar nahi

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर आणि अप्रतिम लेख आहे.सर आपणास धन्यवाद.

    ReplyDelete
  5. Vanchit bahujan aghadi...karan sglikde zali ahe bighadi

    ReplyDelete