Thursday, March 7, 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीच्या उत्सवात वंचित बहुजन आघाडीने आम्हाला सहभागी करून घ्यावे….! राजेश खडके सकल मराठी समाज


स्वतंत्र भारतासाठी अहोरात्र कष्ट करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीब-श्रीमंत,उच्च-निच्च,स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव न ठेवता वय वर्षे १८ पूर्ण असणाऱ्या भारत देशातील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिलेला आहे.त्यामुळे दर पाच वर्षानी या भारत देशात याच निवडणूक प्रक्रियेला मोठ्या उत्साहाने निवडणूक आयोगा मार्फत राबविला जातो.संपूर्ण नागरिक या प्रक्रियेत सहभागी होत असल्यामुळे याला लोकशाहीचा उत्सव असे म्हणतात.जे लोक या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत नाही त्यांना मूर्ख असे म्हटले जाते.त्यामुळेच देशातील ३० ते ४० टक्के लोक मूर्ख आहेत म्हणून या देशातील मतांची टक्केवारी ५० ते ६० टक्के पर्यंतच पोहचत असते.त्यामुळे ज्याला मताचा अधिकार आहे अशा व्यक्तींनी मोठ्या उत्सवात हा लोकशाहीचा उत्सव साजरा केला पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.आरएसएस मोदी सरकार हा उत्सव बंद करण्याच्या मार्गावर आहे. एकदा हा उत्सव बंद झाला तर या देशातील वंचित घटकांना वाचविण्यासाठी पुन्हा कोण येणार नाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नाव पुन्हा एकायला मिळणार नाही...कारण त्यांनी दिलेले संविधानच बदलले जाणार आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू हे संविधान वाचविण्यासाठी आणि हा लोकशाहीचा उत्सव अबाधित ठेवण्यासाठी लढत आहे.म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे.या आघाडीच्या माध्य्यमातून रस्तेच्या कडेला रहाणारा उमेदवार दिला आहे...प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सगळ्यांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहान केले आहे..आपण सर्वानी त्यांच्या आवाहनाला साद द्यायची आहे.वंचित बहुजन आघाडीला आमच्या सकल मराठी समाजाचे असे आवाहान आहे की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या लोकशाही उत्सवात आम्हाला सहभागी करून घ्यावे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचे आदेश द्यावेत.

No comments:

Post a Comment