Monday, August 29, 2011

अंध बांधवांना मिळाली दृष्टी

अपंगाना काठीचा आधार तर अंधांना दृष्टी हे शासनांचे ध्येय आहे. शासनाच्या या ध्येयामुळे जिल्हयातील आदिवासी व गरीब जनतेला दिलासा मिळत आहे. आतापर्यत जिल्हयातील ११ हजार ४६३ जणांच्या डोळयांवर नेत्रपेढीत शस्त्रक्रिया करुन दृष्टी दिल्याने मागास व आदिवासी भागातील अंध बांधवांना जग पाहण्याची संधी मिळाली आहे.

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा पर्यावरणाच्या बाबतीत समृध्द आहे. त्यामुळे जिल्हयात प्रदुषणाची समस्या नाही. मात्र आजही वातातरणातील संसर्गजन्य आजारामुळे डोळयाच्या आजाराची समस्या बिकट होत आहे. लहानांपासून मोठयांपर्यत मोतिबिंदुचा आजार दिसून येतो. या आजारापासून नागरिकांची मुक्ती व्हावी, तसेच जग पाहण्याची संधी देण्यासाठी शासनाच्या वतीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रपेढी सुरु करण्यात आलेली आहे. या नेत्रपिढीने मागील ५ वर्षात ११ हजार ४६३ जणांना दृष्टी दिली आहे.

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रपिढीला सन २००७ - ०८ मध्ये २ हजार ५०० शस्त्रक्रियेचे उदिष्टे देण्यात आले होते. नेत्रपिढीने २ हजार ८८८ शस्त्रक्रिया केल्या. सन २००८ - ०९ मधील २ हजार ९०० उदिष्टापैकी २ हजार ६१८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सन २००९ - १० मध्ये २ हजार २५० शस्त्रक्रियेचे उदिष्टे दिले होते. ते उदिष्टे पुर्ण करीत नेत्रपेढीने ३ हजार १९० जणांना दृष्टी दिली तर सन २०१० - ११ देण्यात आलेल्या उदिष्टांचे ध्येय पुर्ण करीत २ हजार ३२० जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली.

एप्रिल २०११ ते जून २०११ या कालावधीत ४४७ रुग्णांना शस्त्रक्रियेमुळे जग पाहण्याची संधी मिळाली आहे. जिल्हयातील आरोग्य संस्थेत रुग्णांची तपासणी करुन नेत्रपेढीत सदर रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते. नेत्रपेढीत कमी खर्चात व रुग्णांना परवडणाऱ्या रकमेत शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने जिल्हयाच्या दुर्गम भागातील रुग्णांनाही दिलासा मिळाला आहे.

खासगी रुग्णालयात मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी अवाढव्य रक्कम आकारली जाते. त्यामुळे मोतिबिंदूचा आजार असलेल्या आदिवासी जनतेची जग पाहण्याची आशा धुसर झाली होती. मात्र शासनाने दृष्टी देण्याचे ध्येय अवलंबिल्याने अंधाना जग पाहण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये अतिदुर्गम भागातील नागरिकांना देखील नेत्र संबंधित आजाराकरिता जिल्हा प्रशासनामार्फत फिरते नेत्र चिकित्सालय सुरु केले असून यामुळे जिल्हयातील आदिवासी व गरीब नागरिकांना डोळयांला मोतीबिंदू सारखे विविध आजार असलेल्याना नेत्रपेढीने दृष्टी देवून ध्येय साकार केले आहे हे विशेष. 

No comments:

Post a Comment