Wednesday, February 22, 2012

शांततेतून समृध्दी

गाव विकासासाठी राजकारणाऐवजी समाजकारणाला प्राधान्य देणारे पदाधिकारी, वेळोवेळी ग्रामस्थांना सहकार्य करणारे सचिव, आपलं गाव सदर अग्रेसर राहावे यासाठी हेवेदावे बाजुला ठेवणारे एकत्र येणारे ग्रामस्थ यामुळे गावातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणा-या हनुमान महाराजांच्या साक्षीने ग्राम जामखेडची शांततेतून समृध्दीकडे वाटचाल सुरु केली आहे. 

गावक-यांनी आपल्याला निवडून दिल ते गावाला विकासाच्या पैलतीरावर नेऊन पोहचविण्यासाठीच गावक-यांचा हा आशावाद नाउमेद न करता काम केले. सरपंच गजानन लोखंडे, उपसरपंच संदीप पोफळे या युवा पदाधिका-यांनी गावातील इतरही राजकीय मंडळीशी वेळप्रसंगी समन्वयाची भूमिका घेतली. गावात आलेल्या कोटयवधींच्या योजनांमध्ये कधी गावातील राजकारणाचा खोडा आला नाही. ७ सदस्य असलेल्या जामखेड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी गजानन लोखंडे विराजमान झाले. पदग्रहणापासूनच त्यांनी उपसरपंच संदीप पोफळे, सचिव आर.टी.राऊत, सदस्य रामदास सखाराम करवते, तुकाराम पोफळे, मंसाराम वाघजी भोंडणे, शेवंताबाई कोंडीराम माघाडे, सौ. रेखा सुर्यभान पोफळे, यांच्या साथीने गावविकासासाठी अंतर्गत राजकारण या पक्षीय राजकारण आड न येऊ देण्याची भूमिका घेतली. विविध पक्षातील नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या जवळपास सोडेतीन वर्षाच्या कालखंडात गजानन लोखंडे, व त्यांचे सहकारी गावात कोटयवधींची विकास कामे आणू शकले. त्यातली काही कामे पूर्ण तर काही प्रगतीपथावर व काही सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. महादेव तिवालेंच्या प्रेरणेतून २ लाखाचे सिमेंट क्रॉकीट रस्ते, दिलीपराव जाधवांच्या शिफारशीतून २६ लाखाची पाणीपूरवठा योजना विष्णु पाटील राऊतांच्या प्रयत्नातून ४९ लाखाची पाणलोट विकासाची हरियाली योजना, माजी आ. विजयराव जाधवांच्या प्रयत्नातून ५ लाखांचे सभामंडप, तत्कालीन जि.प.सदस्य स्व.महादेव तिवालेंच्या पुढाकरातून ५ लाखाचे ग्रामपंचायत भवन तयार केले. आ. सुभाषराव झनकांच्या प्रयत्नातून ठक्करबाबा योजनेअंतर्गत १० लाखाची विकास कामे व ५ लाखाचे बजरंगबली संस्थान सभामंडप पं.स. सदस्य गोपाल पाटील राऊत यांच्या प्रयत्नातून वैधानिक विकास मंडळांतर्गत ५ लाखाचे सभामंडप, सिमेंट क्रॉकीट रोड, गरजूंना ७० हजारांच्या बैलगाडी वाटप, शाळा दुरुस्तीसाठी १ लाख, २५ लाखाची घरकुले तर बाजार समिती संचालक गजाननराव देवळेंच्या प्रयत्नातून २३ लाखाचा पांदन रस्ता गावाला मिळवून देण्यात ग्रामपंचायतच्या पदाधिका-यांना आजवर यश आले. ग्रामसचिव व ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या स्वयंप्रयत्नातूनही विकास निधी खेचण्यावरही ग्रामपंचायतने विशेष भर दिला. त्याचाच परिपाक म्हणून १० लाखाचे विकास कामे केली. ३३ लाखाच्या पॅकेज व रोहयो मधून विहीरी आणण्यासाठी जामखेडच्या विकासाभिमुख ग्रामपंचायतला यश आले. निर्मल ग्रामच्या दिशेने वाटचाल करणा-या जामखेडला पर्यावरणपुरक समृध्द ग्राम निर्माण करण्याचा ध्यास लागला आहे. गावातील जागृत हनुमान महाराजांच्या यात्रोत्सवाला सहकार्य करणा-या ग्रामस्थांनी सरपंच लोखंडे उपसरपंच पोफळे व गावातील कर्त्या लोकांच्या मार्गदर्शनातून धार्मिक कार्याबरोबरच गावएकीचे आदर्श उदाहरण घडविले. यात्रोत्सवाच्या सप्ताहात गावातील सात वेटाळांवर दरदिवशी स्वच्छतेची जबाबदारी टाकतांना सरपंच उपसरपंचासह कत्या मंडळीनी स्वच्छतेत अग्रक्रम घेणा-या गाववेटाळातील स्वच्छतादुतांना बक्षीस योजनाही जाहीर केली आहे. गाव विकासासाठी सदैव कटीबध्द राहू असे मत सरपंच लोखंडे व उपसरपंच पोफळे यांनी बोलतांना व्यक्त केले.

No comments:

Post a Comment