Thursday, April 26, 2012

धान्य महोत्सव


सध्या उन्हाळयाच्या वातावरणामुळे सर्वत्र तापमान वाढते आहे. त्यामुळे घराबाहेर पडणा्यांची संख्या कमी असते. या दिवसांमध्ये प्रदर्शन, महोत्सवांना देखिल लोक रात्रीच्या वेळी भेट देत असतात. परंतु गेल्या चार दिवसापासून औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मैदानावर नागरिकांची गर्दी मोठया प्रमाणावर जाणवत होती. निमित्त कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रम अथवा धार्मिक कार्यक्रमाचे नव्हते तर निमित्त होते शासनाच्या कृषी विभागाने 'सकाळ' समुहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाचे .

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकांना विकता यावा, शेतकरी ग्राहक यांच्यातील अंतर कमी होवून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा. ग्राहकांनाही चांगला माल योग्य दरात मिळण्यासाठी कृषी विभाग हा उपक्रम राबवित आहे. दिनांक २१ ते २३ एप्रिल या काळात आयोजित करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले बाजार वार्षिक धान्य महोत्सव २०१२ शेतकरी ग्राहक थेट विक्री याचे उदघाटन राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले. मागील वर्षापासून अशा प्रकारचा महोत्सव भरविण्यात येत आहे. या महोत्सवास अतिशय उर्त्स्फुत प्रतिसाद मिळतो आहे.

या महोत्सवामध्ये गहू, ज्वारी,बाजरी, हरभरे, विविध डाळी गूळ, काकवी , गावरान कांदा, लसूण, मसाल्याचे पदार्थ, फळे, भाजीपाला, हळद मोहरी आदी मालाची तीन दिवसात सुमारे पाच कोटी रुपयाची विक्री झाली यासाठी शेतकऱ्यांचे १०० स्टॉल उभारण्यात आले आहेत. या महोत्सवाबद्दल प्रभावीपणे जनजागृती, केल्याने शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळून शेतकऱ्यासह ग्राहकांचाही फायदा झाला.

या महोत्सवात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना धान्य भरुन आणण्यासाठी ५० टक्के अनुदानांवर गोण्या पुरविल्या होत्या. या गोणीवर शेतकऱ्यांचे नाव, गावाचे नाव, तालुका, धान्याचे नाव, कोणते वाण आहे. धान्यांची किंमत प्रतीवार टाकण्यात आले होते. तसेच हे धान्य कृषी सहाय्यकाच्या समक्ष भरण्यात आले होते. याचबरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातून शेती उत्पादने नेटक्या पॅकिंगमध्ये येथे विक्रीसाठी आणली होती. यामध्ये तीळ, कुळीथ,तुरदाळ, आवला कॅडी आवळा सरबत व वाळवणांचे पदार्थ विक्रीसाठी आणले होते. यासही चांगला प्रतिसाद मिळाला.

शेतकरी व ग्राहकांतील अंतर कमी होण्याबरोबरच शेतमालाची विक्रीची व्यवस्था झाली. ग्राहकांना चांगला भाव योग्य दरात मिळाल्याने असे उपक्रम सातत्याने व्हावेत अशा प्रतिक्रिया विविध ग्राहक व्यक्त करीत होते.

  • गोविंद अहंकारी
  • No comments:

    Post a Comment