Sunday, April 22, 2012

पर्यावरण संतुलन

राज्य शासनाने पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजने अंतर्गत संपूर्ण राज्यात एक अब्ज वृक्ष लागवड करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ हजार रोपे असलेली रोपवाटिका ‘रोहयो’च्या माध्यमातून निर्माण करण्याचे निर्देश दिले होते. या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्याने रोपवाटिका निर्मिती मध्ये बाजी मारली आहे. जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतीपैकी ५५१ ग्रामपंचायतीनी पुढाकार घेऊन रोपवाटिका सुरु केल्या आहेत. आज ५५१ ग्रामपंचायतींच्या रोपवाटिकांमध्ये पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी विविध प्रजातीची १ कोटी ३७ लक्ष ७५ हजार वृक्षांची रोपे तयार आहेत.

गोंदिया तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींपैकी १०४ ग्रामपंचायतीत रोपवाटिकेची स्थापना करण्यात आली असून ह्यात आजमितीस २६ लाख रोपे तयार आहे. तर तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींपैकी ९५ ग्रामपंचायतीत रोपवाटिका सुरु असून ह्या ठिकाणी एकूण २३ लाख ७५ हजार वृक्षांची रोपे तयार आहेत. आमगाव पंचायत समितीच्या ४३ ग्रामपंचायतीमध्ये रोपवाटिका स्थापून १६ लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. तसेच सालकसा तालुक्यातील ४३ गावांपैकी ४३ ग्रामपंचायतीमध्ये रोपवाटिका तयार करण्यात आल्या असून १० लाख ७५ हजार रोपे तयार आहेत.

ह्याशिवाय देवरी व गोरेगाव या दोन्ही तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी ५६ ग्रामपंचायतीनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७१ ग्रामपंचापयतीपैकी ७१ ग्रामपंचायती यादेखील पर्यावरण संतुलित ग्राम योजनेत भाग घेऊन एकूण २८ लाख वृक्षरोपांची जोपासना केली आहे. सडक अर्जुनी पंचायत समितीतील ६३ ग्रामपंचायतींपैकी ६२ ग्रामपंचायतींनी १५.५० लाख रोपे लावली आहे. योजनेत सहभागी झाल्या असून त्यांच्याद्वारे १७ लाख ७५ हजार रोपांची लागवड करण्यासाठी सज्ज आहेत.

जिल्ह्यातील आठही पंचायत समिती मिळून ५५६ ग्रामपंचायतीपैकी ५५१ ग्रामपंचायतीं मार्फत एकूण १ कोटी ३७ लक्ष ७५ हजार रोपांची लागवड होते आहे. जिल्ह्याच्या पर्यावरण संतुलनासाठी उचललेले एक मोठे पाऊल होय.

No comments:

Post a Comment